Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

दीपावली : जडत्वाचा अंत


दीपावली : जडत्वाचा अंत

दिवाळी हा हिन्दू संस्कृतीतील सर्वात मोठा सण. दिवाळी म्हटले की नवीन खरेदी, गोड धोड पदार्थ, वेगवेगळे दिवाळी अंक, आनंद व उत्साह यासाठी पर्वणी. हा दीपोत्सव कसा सुरु झाला असावा याचा आढावा घेताना ईशा फाउंडेशन च्या सद्गुरुंचा सकाळ मधील लेख वाचनात आला तो या निमित्ताने बहुतांश देत आहे.
दीपोत्सव साजरा करण्याची आपली संस्कृती ही १२ ते १५ हजार वर्षापूर्वाची आहे. वर्षाच्या या समयी, सृष्टीतील जीवन जडत्वाच्या अशा स्थितीत येतं, जे वर्षाच्या इतर सामान्य गतीत घडत नाही, याचा लोकांना ठाव लागला होता. आपल्या ग्रहाच्या उत्तर गोलार्धात सूर्य एका विशिष्ट स्थानात असल्यामुळे हिवाळा असतो, परंतु सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीची गुरुत्वाकर्षणशक्ती अशा प्रकारे कार्यरत असते की सुष्टोत एक प्रकारकी कुंठित अवस्था निर्माण होते. त्यामुळे या काळात काहीही उत्तमरीत्या उगवत नाही. त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या तुम्ही उदास होऊ शकता आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही अनेक प्रकारे मंदावता, जड़त्वाच्या या अवस्थेचा मानसिक आणि शारीरिकदष्ट्या आपल्यावर परिणाम होऊ न देता, त्याचा आपल्या वृद्धीसाठी उपयोग करून घेण्यासाठी आपण दीपावलीचा सण साजरा करतो, जडत्वाचा अंत करतो.
हा देश १२ हजार वर्षांचा शेतीचा इतिहास असणारा बहुधा एकमेव आहे. म्हणून लोकांच्या हे लक्षात आलं, की वर्षाच्या या काळात बी-बियाणे अंकुरत नाहीत किंवा अतिशय हळूहळू अंकुरतात. सृष्टीतील अवघी जीवन प्रक्रिया मंदावते आणि जडत्व निर्माण होते. जडत्व म्हणजे मृत्यू: गतिशीलता म्हणजे जीवन, एक प्रकारे, सुष्टीतील सर्व व्यवस्था प्रणालींमध्ये एक प्रकारचा तात्पुरता मृत्यू घडून येतो. मानसिकदृष्ट्या तुम्ही उदास होऊ शकता आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही अनेक प्रकारे मंदावता. जडत्वाच्या या अवस्थेचा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपल्यावर परिणाम होऊ न देता, त्याचा आपल्या वृद्धीसाठी उपयोग करून घेण्यासाठी, आपण विविध यंत्रणा विकसित केल्या.
कार्तिक महिन्यात लोक आपल्या घरात चैतन्य राखण्यासाठी दिवे लावत असत. आज आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, पण पूर्वी घरात तेलाचे दिवे वापरत असत आणि लोकांच्या आर्थिक स्थितीमुळें तेव्हा लोक एक किंवा दोनच दिवे लावत असत. परंतु, हा विशिष्ट महिना आल्यावर ते घराच्या प्रवेशद्वारावर आणि आत शक्य तेवढे अधिक दिवे लावत असत, कारण ही अशी वेळ आहे जेव्हा मानवी मन स्वाभाविकपणे नैराश्यावस्थेत जातं किंवा उदास होतं. म्हणून हा दिव्यांचा उत्सव बनला. तर दीपावली फक्त एका दिवसासाठी नव्हती, तर संपूर्ण महिन्यासाठी असायची.
नरक चतुर्दशी
ऐतिहासिकदृष्ट्या दीपावलीला नरक चतुर्दशी म्हणतात. हिवाळ्याच्या महिन्यात तुम्ही सूर्योदयापूर्वी उठणं फार महत्त्वाचं आहे. सूर्याची पहिली किरणं गवत किंवा इतर कृमी-कीटकांवर पडू नयेत – सूर्याची पहिली किरणे तुमच्यावर पडली पाहिजेत. म्हणूनच, सूर्योदय होण्यापूर्वी प्रत्येकजण सूर्याची पहिली किरणे आपल्यावर घेण्यासाठी बाहेर पडतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जडत्व नष्ट करणे. आयुष्य म्हणजे काळ आणि ऊर्जा यांचा खेळ आहे. आपल्या सर्वांमध्ये एक निश्चित वेळ आणि ऊर्जा आहे. वेळ ही आपल्या सर्वांसाठी एकाच गतीनं जात आहे. कोणीही ही गती कमी करू शकत नाही किंवा हा वेग वाढवू शकत नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुम्ही खूप आनंदी असल्यास तुमचा वेळचा अनुभव खूपच संक्षिप्त असेल. तुम्ही शंभर वर्ष जगलात तरी काही फरक पडत नाही, तो कमीच आहे. मानवांत दडलेल्या शक्यता लक्षात घेता शंभर वर्ष अगदीच नगण्य आहेत, मात्र, तुमच्यात जडत्व निर्माण झाले आणि तुम्ही व्यथित, दुःखी-कष्टी असल्यास अचानकपणे तुम्ही पाहाल, वेळ पुढे सरकतच नाही. चोवीस तास म्हणजे जणू एक युग वाटेल.
फक्त व्यथित लोकच दीर्घ आयुष्य जगू शकतात. पण तुम्ही आनंदी असल्यास जीवन अतिशय संक्षिप्त असेल. तुम्ही पाहाल, एखादा समाज जितका व्यथित असतो, तितकी त्याला अधिक करमणुकीची गरज निर्माण होईल. जिथं लोक आनंदी असतात त्यांना करमणुकीसाठी वेळ नसतो; आनंद त्यांचं आयुष्य व्यापतो. ते पहाटे उठतात आणि त्यांना काही कळण्यापूर्वीच रात्र झालेलो असते.
दीपावलीला नरक चतुर्दशी असे म्हणतात कारण नरकासुर हा अत्यंत क्रूर राजा होता, ज्याचा श्रीकृष्णानं यादिवशी वध केला. जो सर्वांना नरक देती तो नरकासुर. पण दुष्टता ही काही फक्त असुरांच्या रूपात येणं आवश्यक नाही. म्हणून जडत्व नरक किंवा नरकाचा स्रोत आहे, कारण एकदा जडत्व निर्माण झाल्यावर तुम्ही स्वतःच नरक बनता. तुम्ही काही नरकात जाणार नाही, तुम्ही स्वतःच नरक बनता अनेक प्रकारे आपण आपल्यात जीवनाच हे जडत्व येऊ देत आहोत. नैराश्य, उदासीनता आणि निराशा तुमच्या आयुष्याचं तुम्ही न पाहिलेल्या भूत-प्रेतांपेक्षाही अधिक नुकसान करू शकतात. दीपावली आपल्या आयुष्यात नकारात्मक असलेल्या सर्व गोष्टी नष्ट करून टाकण्यासाठीचे एक स्मरण आहे.
दिपावली च्या निमित्ताने आपणा सर्वांच्या आयुष्यात नैराश्याचा अंधकार जाऊन सदैव उत्साह व आनंदाचा प्रकाश नांदो, ही च सदिच्छा.
शुभ दिपावली !!!

-ज्योतिषमित्र मिलिंद

श्रीराम व रावणाची कुंडली व विश्लेषण


श्रीराम व रावणाची कुंडली व विश्लेषण

हिंदू संस्कृतीत रामनवमी चा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कारण या दिवशी विष्णूचा सातवा अवतार मर्यादापुरुषोत्तम श्री राम यांचा जन्म झाला. तसेच दरवर्षी विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर श्री रामाच्या लंकेवरील विजयाच्या स्मरणार्थ दुष्टाचे प्रतीक असलेले रावणाचे दहन केले जाते आणि दसरा साजरा केला जातो.

राम आणि रावण यांच्यात भयंकर युद्ध झाले. हे युद्ध पाहून देव आणि दाणव हे सर्व आश्चर्यचकित झाले.
पण सर्वांना माहित आहे की राम आणि रावण दोघेही महाविव्दान आणि दोघेही शिवभक्त होते. श्रीरामांनी युद्धाच्या अगोदर शिवची पूजा केली. रामेश्वरम याचा पुरावा आहे. रावणसुद्धा खूप मोठा भक्त होता. रावणामुळेच भगवान एक ज्योतिर्लिंग आजही देवघरात बाबा वैद्यनाथांच्या नावाने प्रसिद्ध आहे.
दोघे निपूण होते, परंतू एकास देवपण लाभले आणि दुसरा राक्षस म्हणून माहित झाला. राम आणि रावण यांच्या ज्या कुंडल्या प्रचलित आहेत, त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ या. चला आज राम आणि रावणाची कुंडली पाहूया.
राम व रावण यांच्या कुंडल्य़ा अभ्यासल्या असता असे लक्षात येते की काही गोष्टीत दोन्ही कुंडल्यांमधे काही साम्य आहे.

  • श्री रामा चे कर्क लग्न उदीत असून रावणाचे सिंह लग्न उदीत आहे. दोघांची ही कर्क चंद्र रास आहे.
  • दोघांचे ही कुंडलीत गुरु लग्न स्थानी आहे. गुरु हे ज्ञानाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे दोघेही महाविव्दान होते.
  • श्री राम आणि रावण या दोघांच्या कुंडलीत मंगळ मकर राशीत आहे. ज्योतिषशास्त्रात, मकर राशीत मंगळ उच्च मानला जातो. मंगळ हा सामर्थ्य, शोर्य, निर्भयता, योद्धा याचा कारक ग्रह आहे. सहाजिकच श्रीराम आणि रावण दोघेही पराक्रमी व तोडीस तोड होते.

श्री राम यांच्या कुंडलीचे विश्लेषण
भगवान श्री रामाची कुंडलीत चंद्र त्याच्या स्वत: च्या मालकीच्या कर्क राशीत लग्न स्थानी आहे, ही स्थिती जातकास न्याय्य आणि क्षमाशील बनवते. गुरु लग्न स्थानी चंद्रासमवेत आहे. कर्क राशीतील गुरु उच्च मानला जातो. ही स्थिती जातकास भावनिक आणि विद्वान आणि विवेकी स्वभाव देते. अशा लोकांना सभ्य जीवन जगणे आवडते. भगवान रामातही असे गुण होते. म्हणूनच एक्पत्नी मर्यादापुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध झाला.
भगवान रामाच्या कुंडलीत मंगळ सातव्या म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या स्थानात आहे. व १० वे स्थानात मंगळाची मेष राशी आहे. जे लाभ स्थानाचे व्यय स्थान आहे. त्यामुळे सीतेच्या सहवासास पारखा झाला. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह मानला जातो. हा शुक्र ९ वे स्थानात गुरुच्या राशीत केतू बरोबर आहे, जो गुरु ६ वे व ९ वे स्थानाचा स्वामी आहे, ९ वे स्थान अनोळखी ठिकाणी प्रवास दाखवतो. ६ वे स्थान शत्रू स्थान असून ७ वे स्थानाचे व्यय स्थान असल्याने. रामाच्या नशीबी वनवासात असताना रावणाव्दारे सीतेचे अपहरण व वियोग दाखवतो. तसेच ७ वे स्थानाचा स्वामी शनी सुख स्थानात उच्च असूनही ८ या मृत्यू स्थानाचा पण स्वामी असल्याने जोडीदाराचा विरह व दु:ख वाट्यास आले.

रावणाच्या कुंडलीचे विश्लेषण
रावणाच्या कुंडलीत सूर्य लग्न स्थानी स्वराशीत आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. त्याची स्थिती अधिक मजबूत आहे. असे लोक राजासारखे जीवन जगतात आणि त्यांचा विश्वास खूप दृढ असतो. परंतु लग्नात बसलेल्या सूर्यावर व गुरुवर मंगळाची ६ वे स्थानातून दृष्टि असल्याने रावणास अहंकार, गर्व, घमेंड निर्माण झाली हेच रावणाचे नाशास कारणीभूत ठरले,
तसेच चंद्र मानसिकता व स्त्री तत्व दर्शवतो. राम आणि रावण दोघे कर्क राशीचे असून देखील व राशीनिहाय मजबूत स्थिती असूनही मानसिकता विरुद्ध का होती हे कुंडलीत स्पष्ट दिसते. रामाच्या कुंडलीत ही स्थिती लग्न स्थानी असल्याने स्त्री च्या बाबतीत राम मर्यादाशील, विवेकी होता व या विवेकाचे व्ययस्थान जे अविवेक दाखवते त्या १२ वे स्थानात असल्याने व ६ वे स्थानातून जे वासना स्थान आहे, मंगळाची दृष्टि असल्याने स्त्रीसक्त होऊन अपहरणाचा अविवेकी पणा त्याच्या व्ययास कारणीभूत ठरला.
रावणाच्या कुंडलीत गुरु ५ वे व ८ वे स्थानाचा स्वामी आहे. ५ वे स्थान प्रेम प्रकरणे दर्शवते व ८ स्थान मृत्यू, अप्रतिष्ठा दर्शवते. त्यामूळे द्न्यानी असून देखील प्रेमाकर्षणापायी पुढचे रामायण ओढवून घेतले.
II जय श्रीराम II

-ज्योतिषमित्र मिलिंद

त्रिक स्थाने, ग्रह, मानसिक रोग आणि भूत बाधा


त्रिक स्थाने, ग्रह, मानसिक रोग आणि भूत बाधा

अनेक लोकांना वाटत असते की ज्योतिष किंवा ज्योतिषी म्हणजे चमत्कार किंवा जादूगार जो प्रश्न घेऊन गेला की उपाय, तंत्र-मंत्र, गंडे दोरे, शांती केली की आपली समस्या क्षणात दूर व्हायलाच पाहिजे आणि तसे नाही झाले तर तो ज्योतिषी काय कामाचा. याला जबाबदार सुद्धा काही ज्योतिषी व त्यांचे अंधभक्त च आहेत. कारण ते अशा प्रकारची चुकीची प्रसिद्धी, भूलथापा, खोटी आश्वासने, सवंग जाहिरातबाजी करुन जनमाणसांत ज्योतिष वदनाम करतात. व तथाकथित विज्ञान वादी तर तलवार उपसून उभे च आहेत.
खरतर विज्ञान असो वा ज्योतिषवादी दोन्ही शाखांची आपापली बलस्थाने व मर्यादा दोन्ही आहेत. विज्ञान मूर्त गोष्टींचा प्रामुख्याने अभ्यास करते तर ज्योतिषी अमूर्त गोष्टी सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो. जो तो आपण कसे बरोबर, आपलाच दृष्टिकोन कसा योग्य हेच ठसवण्याचा प्रयत्न करतो. पण दोन्ही बाजूंचा तटस्थपणे विचार करुन त्यावर अभ्यास करुन सुवर्णमध्य साधून सर्वांच्या हिताचा मार्ग काढणारे विरळाच.

असो. तुम्ही वेळोवेळी ज्योतिष मार्गदर्शन घेत असाल तर त्रिक स्थाने ( ६ वे, ८ वे, १२ वे स्थान ) ही कुंडलीतील अनिष्ट स्थाने आहेत हे माहित झाले असेल. ६ वे स्थान आरोग्य, आजार दर्शवते. ८ वे स्थान मृत्यू स्थान म्हटले जाते, म्हणजेच मरणप्राय वेदना, शरीराची, आत्माची हानी, न सांगता येणारे, गूढ अनुभव दर्शवते. तर १२ वे स्थान व्यय स्थान म्हणजेच स्वत:च्या आत्म्याचा, शरीरापासून व्यय, मोक्ष, सांसारिक निवृत्ती दर्शवते. कृष्णमूर्ती पद्धती नुसार ८ वे स्थान मानसिक विकृती दर्शवते तर १२ वे स्थान काळी जादू दाखवते. कारण हे स्थान गुप्त शत्रू व गुप्त कारवाया अथवा गुप्त विधी दर्शवते. १२ वे स्थान ६ वे स्थानाचे ७ वे स्थान आहे. म्हणजे आजाराचे निराकरण, दवाखान्यात भरती होणे दाखवते. पण हे झाले शरीर विज्ञान. पण औषधोपचारांनी सुद्धा बरा न होणारा आजार हा बाधा, काळी जादू, झपाटणे या श्रेणीत येतो.
ज्योतिष शास्त्रात ग्रहांचे कारकत्व देखील महत्वाची भूमिका बजावतात. मानसिक आजार हे मुख्यता मानसिकता बिघडल्याने अथवा बुद्धी भ्रम झाल्याने होऊ शकतात. चंद्र मनाचा कारक आहे व भावनेशी संबंध ठेवतो. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. चंद्र हा या जगात गुंतण्यासाठी आहे. हा सर्वात वेगवान ग्रह आहे त्यामुळे आपल्या मनात सतत विचार चक्र चालू असते, भावनांची आंदोलने, मूड मधे बदल हे सतत चालू असते. बुधा प्रमाणे बुद्धी देखील सतत पलत असते व आपला मेंदू शिणवत असते. शनी हा सर्वात हळू चालणारा ग्रह असून चंद्राच्या तत्वाविरुद्ध काम करतो. केतू मोक्षा चा किंवा सांसारिक निवृत्ती चा कारक ग्रह आहे. असेही म्हणतात की चंद्राला त्रस्त करणारा केतू बाधा वा झपाटणे दाखवतो.
असे ग्रह अशा राशी या ग्रंथात मानसिक दृष्ट्या कन्या मंगळ या लेखात व दा भट म्हणतात- कन्या ही ६ वे स्थनाची द्योतक, क्लिष्ट व व्दि रास आहे. या राशित मंगळासारखा शत्रू ग्रह स्वभावात भावनिक आंदोलने, व्दिधा मनस्थिती, संशयित वृत्ती आढळते. चंद्र, बुध, शुक्र हे भावना बुद्धी दर्शक ग्रह हर्शल, नेपच्यून, शनी या ग्रहांच्या जबरदस्त कुयोगात असतील व मंगळ कन्या मधे असेल तर मनो विकृती, भग्न व्यक्तिमत्त्व मानसिक असंतुलन, नैराश्य या गोष्टी आढळतात.
थोडक्यात जेव्हा जेव्हा हे ग्रह ६-८-१२ शी अनिष्ट प्रकारे संबंध प्रस्थापित करतात, तेव्हा मानसिक विकार, बुद्धी भ्रम, बाधा, काळी जादू, झपाटणे या गोष्टी त्या त्या ग्रह स्थिती, शक्ती नुसार संबंधित ग्रहांच्या दशेत घडू शकतात.

ज्योतिषमित्र मिलिंद

ग्रहण-एक खगोलिय़ घटना, पौराणिक कथा व पथ्ये


ग्रहण-एक खगोलिय़ घटना, पौराणिक कथा व पथ्ये

भारतात चंद्राच्या ग्रहणाविषयी अनेक लोकापवाद आहेत. ग्रहण काळात काय करावे आणि काय करु नये यामागे शास्त्रीय कारणे आहेत, पण ती जाणून न घेता सांगोपांगी काही समज गैरसमज पसरल्याने अंधश्रद्धा देखील वाढीस लागली आहे. परंतु विज्ञानाच्या मते ही एक पूर्णपणे खगोलीय घटना आहे.

पौराणिक कथांनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी अमृतपान साठी देव आणि राक्षस यांचा वाद चालू होता, तेव्हा भगवान विष्णूने मोहिनी रुपात एकादशीच्या दिवशी निराकरण केले. भगवान विष्णूंनी देवता आणि असुरांना स्वतंत्रपणे बसवले. पण असुरांनी कपटपूर्वक देवतांच्या ओळीत बसून अमृत प्राशन केले. देवाच्या ओळीत बसलेल्या चंद्र-सूर्याने राहूला हे करताना पाहिले. त्यांनी ही माहिती भगवान विष्णूला दिली, त्यानंतर भगवान विष्णूने राहूचे डोके त्याच्या सुदर्शन चक्रातून तोडले. परंतु राहू अमृत पित होता, ज्या मुळे तो मरण पावला नाही आणि त्याच्या मस्तकाचा भाग राहू आणि धड भाग केतु म्हणून ओळखला जातो. या कारणास्तव, राहू आणि केतु सूर्य आणि चंद्राला आपला शत्रू मानतात आणि पौर्णिमेच्या दिवशी ते चंद्र ग्रासतात म्हणूनच चंद्रग्रहण होते.

खगोलशास्त्रानुसार, जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्यामध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान अशा प्रकारे येते की चंद्राचा संपूर्ण भाग किंवा भाग व्यापला जातो आणि सूर्याच्या किरणां चंद्रापर्यंत पोहोचत नाहीत. अशा परिस्थितीत चंद्रग्रहण होते. जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मधे सरळ रेषेत येतो तेव्हा सूर्य ग्रहण होते.
आजही ग्रहण प्रत्यक्षात डोक्याच्या (वरच्या) बाजूने लागते म्हणून चंद्राला डोक्याने गिळावयाचे व रवीला धडाने गिळंकृत करायचे हा क्रम अविरत चालू आहे.
हे आपण प्रत्यक्ष व ज्योतिष गणिताच्या सहाय्याने पाहू शकतो. याचे नकाशे वर्षभर आधी पंचांगात प्रसिद्ध होतात व दिलेल्या समयी ग्रहन लागते. ग्रहणाचे वेळी सूर्य किरण किंवा चंद्र किरण लंब रुपाने पडतात व त्याचा परिणाम जास्त होतो. हे बिंदू ग्रह तीव्र रुप धारण करतात. तसेच सूर्याचे इंद्रनील किरण वा चंद्र प्रकाश पूर्ण स्वरुपात व स्वच्छ पृथ्वीवर येत नसल्याने जिवाणू, विषाणू, कीटाणू यांचा संचार व प्रादुर्भाव वाढू शकतो व आरोग्यास अपायकारक ठरु शकतो हेच कारण ग्रहण काळात पाळावयाची पथ्ये सांगण्यामागे आहे.

ग्रहण काळात सांगितली जाणारी पाळावयाची पथ्ये :

१) ग्रहणात स्नान करुन पुजा,पाठ करावेत,मंत्र जप करावा.
२) ग्रहण काळात झोपू नये. मानसिक परिणाम होऊ शकतो.
३) घराची साफ सफाई करू नये.
४) गर्भवती स्त्रियांनी देवाची उपासना करावी.जप करावा.घरातून बाहेर जाऊ नये.व ग्रहण काळी काहीही खाऊ नये.नाहीतर बाळाला शारीरिक त्रास होतो.
५)ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका.शांत रहा,ध्यान करा, मौन पाळा, जप करा
६) ग्रहणकाळात झोपू नका नाहीतर रोग पकडतो.
७) ग्रहणकाळात लघुशंका, लघवी करु नये, शौचास जातो त्यास पोटाचे विकार होतात.
८) ग्रहणकाळात संभोग करु नये.
९) ग्रहणकाळात भोजन,मालीश करु नका,नाहीतर अनेक रोग शरीराला जखडतील.
१०) ग्रहणकाळात, नशापाणी, स्वयपाक करु नये, धुने धुवू नये.पाणी भरु नये.

-ज्योतिषमित्र मिलिंद

मंगळ – मंगल की अमंगल


मंगळ – मंगल की अमंगल

लग्न जमवताना अनेक प्रकारच्या धास्ती घेऊन वर वधू संशोधन सुरु असते. स्थळ कसे असेल, माणसे कशी असतील, मने जुळतील का, संसार सुखाचा होईल ना? कुंडलीवर विश्वास ठेवणारे गुण जुळतील ना ई. या सर्वात जर कोणी भाव खाऊन जात असेल तर मंगळ संबंधित प्रभावी दशा असते तेव्हाच ते फ़ळ मिळते. एखाद्या पत्रिकेत मंगळाची दशा जी जास्तीत जास्त ७ वर्षे असते ती येऊन गेली असेल किंवा येणारच नसेल तर मंगळ कितीही बिघडलेला असला तरी चहाच्या पेल्यातील वादळेच असतील. आणि मंगळाला मुळात का घाबरायचे? मंगळ जो उर्जा, धीट पणा, शौर्य, स्पष्टवक्तेपणा, धाडसी वृत्ती अशा अनेक गुणांचा कारक आहे. पोलीस, सैन्य दल, सर्जन, अधिकारी जागा, गुप्तहेर खाते अशा अनेक ठिकाणी मंगळ प्रधान व्यक्ती फ़ार प्रभावी ठरु शकते. मंगळ जागा, मालमत्ता देऊ शकतो. मंगळाला पाश्चिमात्य लोक मार्स म्हणजेच योद्धा समजतात. हिंदू लोक मंगळाचा देव गणपती मानतात, ज्याला विघ्नहर्ता म्हणतात तो मंगल च म्हणायला पाहिजे ना. आधिच्या काळी मुली वर फ़ार बंधने असायची. तिने माजघरातून कोणासमोर बाहेर यायचे नाही, डोक्यावर पदर घेऊन च वावरायचे. कोणात मिसळायचे नाही, दुरुत्तरे करायची नाहीत असा काळ होता. तेव्हा मुलगी मांगलिक असेल तर ती सासरच्या मंडळींना जुमानणार नाही, अन्याय, अत्याचार सहन करणार नाही, प्रतिकार करेल, वागायला धीट असेल तर मनमानी करेल, अशी काहीशी धास्ती लोकांच्या मनात भर करुन राहिली असावी. पण आता काळ बदलला आहे. आज पुरुषाच्या बरोबरीने स्त्री प्रत्येक क्षेत्रात कर्तुत्व गाजवतेय. घराबाहेर पडतेय, जगभर आपला ठसा उमटवतेय. अशावेळी मुलगी अथवा मुलगा मंगळाच्या गुणांचा नसेल, भित्रा, अबोल, अनुत्साही ई असेल तर या जगात त्याचा निभाव लागेल का याचे उत्तर आपणच सांगू शकता. असो. मांगलिक पत्रिकेची थोडक्यात माहिती देऊन हा लेख प्रपंच आटोपता घेतो.

जन्मपत्रिकेमध्ये लग्न म्हणजे प्रथम किंवा चतुर्थ किंवा सप्तम किंवा अष्टम स्थान यापैकी कोणत्याही स्थानात जर मंगळ असेल तर त्याला सामान्यत: मंगळदोष मानले जाते. मंगळदोष असणाऱ्या व्यक्तिला मांगलिक व्यक्ती असे म्हटले जाते.
प्रथम स्थानातील मंगळ
लग्न म्हणजे प्रथम स्थानामध्ये मंगळ असल्याने व्यक्ती हट्टी किंवा उग्र स्वभावाची असते. या स्थानात उपस्थित मंगळाची चतुर्थ दृष्टी सुख स्थानावर असल्याने या व्यक्तींना गृहस्थसुखांना मुकावे लागते. सातव्या स्थानातील दृष्टी जोडीदाराशी संबंध बिघडण्यासाठी कारणीभूत ठरते. तर आठव्या स्थानावरील दृष्टी जोडीदारासाठी अडचणी निर्माण करते.
द्वितीय स्थानात मंगळ
द्वितीय स्थान धन व कुटंबाचे स्थान असते. हा मंगळ नातेवाईक व आप्तस्वकीयात वादविवाद निर्माण करतो, ज्याचा नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या दांपत्यजीवनावर पडतो. या स्थानातील मंगळ पाचव्या, आठव्या व नवव्या स्थानावर प्रभाव टाकतो. त्याचा संततीवर वाईट परिणाम होऊ शकतो. यांना नशिबाचीही साथ मिळत नाही.
चतुर्थ स्थानातील मंगळ
चतुर्थस्थानातील मंगळ सातव्या, दहाव्या व अकराव्या स्थानावर परिणाम करतो. हा मंगळ स्थायी संपत्ती तर देतो पण जोडीदाराच्या अभावामुळे येणारे गृहस्थाश्रमातील क्लेशही देतो. मंगळाची दृष्टी सातव्या स्थानात असल्याने जीवनात प्रेमाची कमतरता जाणवते व वैचारिक मतभेद होऊ शकतात. या मंगळामुळे घटस्फोट किंवा जोडीदाराला शारीरिक त्रास होत नसला तरी वैवाहिक सुख मात्र निश्चित कमी होते.
सातव्या स्थानातील मंगळ
जोडीदाराच्या म्हणजेच सप्तम स्थानातील मंगळ विवाहासाठी सगळ्यात जास्त हानीकारक असतो. हा मंगळ जोडीदारच्या स्वभावात उग्रता व जोडीदाराच्या आरोग्याला मारक असतो. या मंगळाची प्रथमस्थान, धनस्थान व कर्मभावावर दृष्टी पडते त्यामुळे करिअरमध्ये समस्या, आर्थिक चणचण तसेच एखाद्या दुर्घटनेची शक्यता वाढते. या स्थानात मंगळ असणाऱ्या व्यक्ती विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करतात. याच्या अत्युच्च प्रभावामुळे पतीपत्नीमध्ये दुरावा येण्याचे प्रमाण वाढते.
आठव्या स्थानातील मंगळ

आठव्या स्थानाचा संबंध कष्ट, भाव, संकट, दु:ख व आयुर्मानाशी येतो. हा मंगळ मानसिक कष्ट देतो, वैवाहिक आनंद नष्ट करतो. शारीरिक व लैंगिक तक्रारी संभवतात. या स्थानातील मंगळ जर वृषभ, कन्या किंवा मकर राशीला असेल तर अशुभ फलाची तीव्रता कमी होते. परंतु मकर राशीतील मंगळ संततीसंबंधी समस्या निर्माण करू शकतो.
याशिवाय द्वितीय व बाराव्या स्थानातील मंगळ दांपत्य जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करतो.
बाराव्या स्थानातील मंगळ
जन्मपत्रिकेत बाराव्या स्थानाला व्ययस्थानही म्हटले जाते. हे स्थान निद्रेचेही आहे. या भावात मंगळ आल्याने दांपत्य सुखामध्ये बाधा येते. लैंगिक इच्छा प्रबळ होते. शुभ ग्रहांच्या अभावामुळे चारित्र्यावर डाग येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. असे लोक भावुक होऊन आपल्या जोडीदाराला त्रास देऊ शकतात. धनाची कमी वैवाहिक संबंधांवर परिणाम करते. या लोकांना गुप्तरोग व रक्तासंबंधी विकार होण्याची शक्यता असते.

(टिप : कुंडली व माहिती वरुन कोणते ही अंदाज करण्यापेक्षा ज्योतिष जाणकारास दाखवून निर्णय घ्यावा.)

-ज्योतिषमित्र मिलिंद

फुलवा आयुष्याचे रंग – राशिनुसार फुले व रोपांची लागवड


फुलवा आयुष्याचे रंग – राशिनुसार फुले व रोपांची लागवड

वैज्ञानिक संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे की रंग प्रकाशाद्वारे तयार झालेली उर्जा शारीरिक कार्ये, मन आणि भावनांवर परिणाम करतात. घेण्यात आलेल्या अभ्यासानुसार मेंदू, सर्जनशीलता, उत्पादकता आणि शिक्षणाशी संबंधित असलेल्या रंगांचे फायदे दिसून आले आहेत. आधुनिक विज्ञानात अल्फा ब्रेन वेव्ह बदलण्यासाठी ठराविक रंग दर्शविले गेले आहेत. ईईजी आणि नाडी मोजण्याच्या प्रणालीनुसार, पुरुष आणि स्त्रिया रंगांवर भिन्न प्रतिक्रिया देतात. रंग डोळ्यापासून मेंदूमध्ये प्रसारित केला जातो तेव्हा मेंदू भावना, मनाची स्पष्टता आणि उर्जा पातळीवर परिणाम करणारे हार्मोन सोडतो. रंगांचा नकारात्मक आणि सकारात्मक मानसिक प्रभाव माणसांमध्ये वापरल्या जाणार्‍या संयोजनांच्या आधारावर दिसू शकतो.
समोहन, समुपदेशन, मानस शास्त्र या मधे अन्तर्मनात काही गोष्टी प्रक्षेपित करण्यासाठी रंगां चा प्रभावी वापर केला जातो. ज्योतिष शास्त्रातील काही उपाय सांगताना याची विज्ञानाशी कशा प्रकारे सांगड घातली आहे याची कल्पना देखील नसते. उदाहरणच द्यायचे झाले तर शानिला काळे उड़ीद वहा, गणपतीला लाल फूल वहा, वेगवेगळ्या रंगाचे खड़े, रत्न यांचा वापर ई.
आज आपण आयुष्यात समृद्धी, शांती, समाधान नांदावे, यासाठी रंगांचा असाच एक कल्पक व अल्हाददायक उपाय पाहणार आहोत.
आपल्या राशीनुसार रंगांचा उपयोग करुन त्या त्या विशिष्ट रंगांच्या फ़ुलझाडे, रोपटे, तुमच्या बाल्कनीमधे वा तुमच्या घरातला खास कोपरा असेल तेथे लागवड केली तर तर तो विशिष्ट रंग तुमच्या अंतरंगास भावेल व त्याचे निश्चितच चांगले परिणाम अनुभवास येतील.

मेष व वृश्चिक राशी च्या व्यक्तींनी लाल रंगाची फ़ुले असणारे रोप लावावे.
वृषभ व तूळ राशी च्या व्यक्तींनी पांढरा रंगाची फ़ुले असणारे रोप लावावे.
मिथुन व कन्या राशी च्या व्यक्तींनी फ़ुले नसणारे हिरवट रोप लावावे.
कर्क राशी च्या व्यक्तींनी तुळशीचे वा सफेद रंगछटा असलेले फूल रोप लावावे.
सिंह राशी च्या व्यक्तींनी लाल रंगछटा असलेले रोप लावावे.
धनु व मीन राशी च्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाची फ़ुले असणारे रोप लावावे.
मकर व कुंभ राशी च्या व्यक्तींनी गडद निळा, जांभळा वा फ़ुले नसणारे शोभेचे रोप लावावे.

आपले आयुष्य हे फ़ुलां झाडां सारखे रसभरीत, टवटवीत व सदाबहार असावे ही सदिच्छा…

-ज्योतिषमित्रमिलिंद

ग्रहांचे मित्र, शत्रु व सम ग्रह, तत्व, दृष्टि, लिंग, दिशा, भाग्योदय वर्षे, भाग्यांक ई.कोष्टक


ग्रहांचे मित्र, शत्रु व सम ग्रह, तत्व, दृष्टि, लिंग, दिशा, भाग्योदय वर्षे, भाग्यांक ई.कोष्टक

खरे तर कुठलेही पंचांग घेतले आणि सहज चाळले तरी त्यात ग्रहांचे मित्र, शत्रु व सम प्रकारचे ग्रह, तत्व, दृष्टि, लिंग, दिशा, भाग्योदय वर्षे, भाग्यांक ई. ढ़ोबळ परन्तु उपयुक्त माहिती दिलेली असते. पण आयुष्याच्या धावपळीत ती नजरे आड़ करतो.
असेच एक कोष्टक देत आहे ज्यात ग्रह वाचताना त्यांच्या राशि जरी कल्पल्या तरी देखील आयुष्यातील अनेक पड़ताळे तुमचे तुम्हाला तपासता येतील.

-ज्योतिषमित्रमिलिंद

शरीरातील ७ प्रमुख आधार चक्र


शरीरातील ७ प्रमुख आधार चक्र
हिंदू वैदिक शास्त्रानुसार प्रत्येक जीव जंतूत एक चेतना असते. परंतु ती निष्क्रिय अवस्थेत असते. आपले पूर्वज, ऋषीमुनी ह्यांनी आपणास ह्या निष्क्रिय चक्रांच्या जागृतीने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट साध्य करून मोक्ष प्राप्तीचे अनेक मार्ग दाखविले आहेत. आपणास त्यांनी संपूर्ण सुष्टीच्या शक्तींना केंद्रस्थानी ठेवून वेद, ग्रंथ, उपनिषद ह्यात ह्या संबंधी ज्ञान व विज्ञान सांगितले आहे. आपले शरीर हे कशा प्रकारे सुष्टीच्या सर्व शक्तींचे केंद्रस्थान असून त्या शक्तींना प्राप्त करण्यासाठी आपणास आपल्या मूळ सात चक्राना कसे जागृत करावे लागेल हे त्यांनी आपणास सांगितले आहे. ह्या चक्रांच्या माध्यमातून आपण त्या चैतन्यास प्राप्त करणे हेच मानव जीवनाचे ध्येय आहे. तर आता आपण ह्या चक्रां विषयी जाणून घेऊ…
मूळ चक्रे व त्यांचे कार्य
मनुष्याच्या शरीरात अनेक चक्र असतात, परंतु योग व आयुर्वेदात ज्यांना मूळ चक्रे मानण्यात आली आहेत त्यांची संख्या ११४ आहे. त्यातील ७ चक्रानाच मूळ आधार चक्र मानण्यात येते. आयुर्वेदात नाड्यांचा संगम किंवा त्यांचा एकमेकांशी होणाऱ्या मिलनासच चक्र म्हटले गेले आहे. ह्या नाड्यांचे मिलन स्थान अधिकतर त्रिकोणाकारच असते, परंतु तरीही त्यांना चक्र म्हटले गेले आहे.
शरीरातील नाड्यांच्या ह्या त्रिकोणीय मिलन बिंदूंना चक्र संबोधण्या मागे त्यांची कार्यशीलता किंवा निरंतरता हे मुख्य कारण आहे. शरीरातील हे त्रिकोणीय मिलन बिंदू शरीराच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूस गतिशीलता दर्शवित असल्याने त्यांना चक्र ह्या नांवाने संबोधण्यात येते. ह्या चक्रांचे मुख्य कार्य शरीरातील चेतनेस किंवा उर्जेस खालून वर पर्यंत हस्तांतरित करणे हे आहे.
१. मूलाधार चक्र
२. स्वाधिष्ठान चक्र
३. मणिपूर चक्र
४. अनाहत चक्र
५. विशुद्ध चक्र
६. आज्ञा चक्र
७. सहस्त्रार चक्र


१. मूलाधार चक्र – मानवी शरीरातील गुदस्थान व जननेंद्रिय ह्या मध्ये हे चक्र असून ते भौम मंडळ ह्या नांवाने सुद्धा ओळखले जाते. चार पाकळ्यांचे हे आधार चक्र भौतिक स्वरूपात सुगंध व आरोग्याचे नियंत्रण करते. आध्यात्मिक दृष्ट्या हे चक्र धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्यांच्याशी जोडले गेलेले असते. ज्या लोकांच्या जीवनात भोग, संभोग व निद्रेस प्राधान्य असते त्यांची ऊर्जा ह्या चक्राच्या अवती – भोवती एकत्रित झालेली असते.
हे चक्र जागृत करण्यासाठी भोग, संभोग व निद्रा ह्यावर मात करण्याची आवश्यकता असते. हे चक्र जागृत झाल्यावर निर्भयता प्राप्त होऊन सिद्धी प्राप्त होतात.
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे – “लं”

२. स्वाधिष्ठान चक्र – जननेंद्रियांच्या बरोबर मागे पाठीच्या कण्यावर हे चक्र स्थित असून त्यास सहा पाकळ्या असतात. ह्याचा आकार अर्धचंद्राकार असतो. हे चक्र जागृत करून आपण अविश्वास, अवहेलना, सर्वनाश, आग्रह, क्रूरता ह्या सारख्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकता. परंतु हे चक्र जर निष्क्रिय असेल व त्यावर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होत नसेल तर आपण आनंद – प्रमोद, मौज – मस्ती, हिंडणे – फिरणे व मनोरंजनात्मक भावनां मध्ये गुंतून जाल व आयुष्य कधी संपुष्टात येत आहे हे आपणास समजणार सुद्धा नाही.
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे – “वं”

३. मणिपूर चक्र – बेंबीच्या बरोबर मागे हे चक्र दहा पाकळ्यांनी युक्त असते. रक्त वर्णाचे हे चक्र अग्नी तत्वास नियंत्रित करते. ह्या चक्रास ऊर्जेचे केंद्र मानण्यात येते व ज्या व्यक्तीची ऊर्जा ह्या चक्रातून प्रवाहित होत असते त्यास कर्मयोगी म्हटले जाते. अशी व्यक्ती सर्व गोष्टींचा त्याग करून फक्त काम करण्यावरच आपले लक्ष केंद्रित करते. हे चक्र सक्रिय झाल्याने मोह, भीती, घृणा, लज्जा, ईर्ष्या, चहाडी ह्या सारख्या भावना नियंत्रित होतात. राजस गुणांचे हे चक्र आत्मशक्ती, आत्मबल व आत्मसन्मानाची वृद्धी करते. ह्या गुणांमुळे व्यक्ती जीवनातील सर्व समस्यांचा सामना करू शकते.
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे – “रं”

४. अनाहत चक्र – सात ऊर्जा चक्रातील हे चौथे चक्र आहे. हृदयाच्या बरोबर मागे पाठीच्या कण्यावर हे स्थित असलेले चक्र सत्वगुण प्रदान करते. १२ पाकळ्यांचे हे चक्र षटकोनी असते. हे चक्र जागृत झालेली व्यक्ती सृजनशील, नेहमी काही तरी नवीन रचना करणारा, संशोधक असू शकते. हे चक्र जागृत झाल्याने मोह, कुतर्क, कपट, चिंता, हिंसा, दंभ, अहंकार व अविवेकाची समाप्ती होते. त्याच बरोबर अशी व्यक्ती सुरक्षित, चारित्र्यवान, आत्मविश्वासाने भरलेली, जवाबदार व भावनात्मक दृष्ट्या संतुलित होते.
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे – “यं”

५. विशुद्ध चक्र – १६ पाकळ्यांचे हे चक्र सरस्वतीच्या स्थानी कंठाच्या बरोबर मागे स्थित असते. त्याचा वर्ण बहुरंगी व आकार अनियमित असतो. हे चक्र जागृत झाल्यास सोळा कला व सोळा विभूतींचे ज्ञान प्राप्त होते. एका मान्यतेनुसार संगीतातील सात सुरांचा जन्म ह्या चक्रातूनच झाला. हे चक्र जागृत झाल्याने भौतिक ज्ञान, भगवंतास समर्पण, कल्याण, महान कार्य, विष व अमृत समान वृत्ती नियंत्रित होतात.
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे – “हं”

६. आज्ञा चक्र – हे चक्र दोन भुवयांच्या मध्ये भृकुटीत स्थित असते. दोन पाकळ्यांचे हे चक्र असून त्याची एक पाकळी पांढरी व एक काळी असते. ह्या चक्राच्या प्रतीक रूपात २ विरुद्ध रंगाच्या पाकळ्यांच्या माध्यमातून भगवंत व संसार ह्यांचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला जातो.
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे – “ह” “क्ष”
७. सहस्त्रार चक्र – मस्तकात शेंडीच्या स्थानाच्या बरोबर खाली हे चक्र स्थित असून त्यास सहस्त्र पाकळ्या असतात. शुभ्र पांढऱ्या रंगांच्या ह्या चक्रास तंत्राची काशी असे सुद्धा म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीने यम, नियमांचे पालन करून मागील सहा चक्रां सहित ह्या चक्रास सुद्धा जागृत केले तर ती व्यक्ती परमहंस पदास प्राप्त करू शकते. मूलाधारा पासून सहस्त्रार चक्रा पर्यंत पोचणाऱ्या मनुष्याचा संसार, संन्यास व सिद्धींशी काही संबंध येत नाही. ह्या चक्राचे कोणतेही बीज मंत्र व ध्यान मंत्र नाही.

-ज्योतिषमित्रमिलिंद

जैमिनी सूत्रम


जैमिनी सूत्रम

तुम्ही अस्सल पुणेकर असाल तर तुम्हाला हे नक्की माहित असेल, एखादी लागणारी आवश्यक वा अप्रचलित गोष्ट नेमकी कुठे मिळेल.
मग पूण्याचा जुना बाजार पण तुम्हाला वेळेस साथ देऊन जातो. ज्योतिष प्रेमी व अभ्यासू मंडळींना अभंग, गोडबोले, अक्षरधारा ही नावे मी सांगायला नकोत. असो असेच एक्दा संग्रह असण्यासाठी पुस्तके पहात असता विनय कुर्हेकर यांचे जैमिनी सूत्रम हे पुस्तक हाती लागले. ज्यात जैमिनी ऋषि यांनी सांकेतिक शब्दात व श्लोकात ज्योतिष सूत्रे व माहिती दिलेली आढळून आली व मला ती पद्धत फ़ार रंजक वाटली. ती पद्धत तुमच्यासमोर ठेवावी असे वाटले म्हणून या लेखाचा प्रपंच. ज्यांना यात अजून विस्तृत माहिती घ्यायची असेल त्यांनी मूळ ग्रंथ वा मराठीत अनुवाद असलेले विनय कुर्हेकर यांचे हे पुस्तक जरुर वाचावे. या मूळ ग्रंथावर राघवभट्ट, नरसिंह सुरी व निळकंठ या ३ ग्रंथकारांच्या टीका उपलब्ध आहेत.

या सूत्र रुप ग्रंथात स्थान वा राशी ह्या सांकेतिक “कटपयादी वर्ग” अशा गणितात्मक सूत्राने दर्शवले आहे.तर ग्रह हे सामान्य संस्कृत पदाप्रमाणे लिहिलेले आहेत.
जैमिनींचा वेगळेपणा हा कारकत्वावर आधारित आहे. त्यांचा कारकत्व काढण्याचा प्रकार हा प्रत्येक जातकानुसार बदलत असल्याने त्यांना चरकारक असे संबोधतात. ग्रहांचे बलाबल पाह्ण्याची पद्धत सोपी आहे व राजयोग हे सुद्धा कारक व दृष्टी आधारित असून “कर्ता, केवल, योगद, महायोगद असे बलानुरुप नावे दिली आहेत. फ़ळे पाहण्यासाठी कारकांश, आरुढ, उपपद वरुन ठरवली जातात व फ़ळ, फ़ळ विभाग व आयुर्विभाग असा भेद करुन दशा तपासल्या जातात.

“कटपयादी वर्ग” चा गूढ वापर समजण्यासाठी या लेखाबरोबरच्या चित्राच्या सहाय्याने एक उदाहरण पाहू.
यात स्वरांना शून्य ( ० ) व व्यंजनांना वेगवेगळे अंक दिलेले आहेत. क, ट, प, य आदि अक्षरांना १ अंक दिला आहे त्यावरुन “कटपयादी वर्ग” हे नाव पडले. या मधे श्लोक देवनागरी मधे लिहावा, चित्राप्रमाणे अंक लिहावेत. जे अंक येतील ते उलटे लिहावेत. त्याला १२ ने भाग द्यावा. जी बाकी येईल तो अंक कालपुरुषाच्या कुंडलीतील स्थान किंवा राशी समजावी व त्यानुसार सूत्राचा अर्थ अभ्यासावा.

उदा. दारा = द + र = ८२, याचे उलट लिहिले असता २८ अंक मिळेल. २८ भागिले १२ केले असता २ पूर्ण भाग येऊन बाकी ४ उरेल.
याचाच अर्थ श्लोकात दारा असे लिहिले असेल तर ते सूत्र ४ थे स्थान वा ४ थी राशी म्हणजेच कर्क राशी यांचे संदर्भात असलेले सुत्र अशाच सांकेतिक भाषेत दिलेले असेल.

अशा गणिती व गूढ भाषेत ज्योतिष सूत्रे मांडणारे महर्षी जैमिनी यांना नम्र अभिवादन.

-ज्योतिषमित्रमिलिंद

वैदिक घड्याळाची संकल्पना



वैदिक घड्याळाची संकल्पना

घड्याळात वेळ दर्शवणारे १२ आकडे असतात त्यातील एकेक अंकाला वेदातील नावे दिलेली आहेत. त्याची माहिती आज आपण घेणार आहोत.
आदित्य : १२ हा अंक आदित्य या नावाने दर्शवला आहे. कारण सूर्याचे १२ प्रकार आहेत.
अंशुमन, आर्यमान, इंद्र, त्वष्टा, धातू, पर्जन्य, पुषा, भग, मित्र, वरुण, विवस्वान आणि विष्णू
ब्रह्म : १ हा अंक ब्रह्म या नावाने दर्शवला आहे. कारण ब्रह्म १ च प्रकारचे आहे.
एको ब्रह्म व्दितीयो नास्ति
अश्विनी : २ हा अंक अश्विनी कुमार ऐवजी अश्विनी या नावाने दर्शवला आहे. कारण अश्विनी कुमार दोन आहेत.
त्रिगुणा: : ३ हा अंक त्रिगुणा: या नावाने दर्शवला आहे. कारण तीन प्रकारचे गुण आहेत.
सत्व गुण, रजोगुण आणि तमो गुण.
चतुर्वेदः : ४ हा अंक चतुर्वेद: या नावाने दर्शवला आहे. कारण चार प्रकारचे वेद आहेत.
ॠग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.
पंचप्राण: : ५ हा अंक पंचप्राण: या नावाने दर्शवला आहे. कारण प्राणाचे पाच प्रकार आहेत.
अपान, सम, प्राण, उदान आणि व्यान
षडसा: : ६ हा अंक षडसा: या नावाने दर्शवला आहे. कारण रस हे ६ प्रकारचे आहेत.
गोड, तूरट, खारट, कडू, तिखट आणि कसाय
सप्तर्षय: : ७ हा अंक सप्तर्षय: या नावाने दर्शवला आहे. कारण सात ऋषी आहेत.
कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ
अष्टसिद्धी: : ८ हा अंक अष्टसिद्धी: या नावाने दर्शवला आहे. कारण सिद्धी आठ प्रकारच्या आहेत.
अनिमा, वैभव, लहानपणा, मोठेपण, प्राप्ति, पुण्य, अर्थ आणि सामर्थ्य
द्रव्यणि : ९ हा अंक द्रव्यणि या नावाने दर्शवला आहे. कारण ९ प्रकारचे निधी आहेत.
पद्मा, महापद्मा, नील, शंख, मुकुंद, नंद, मकर, कच्छप, खर्व
दशदिशा: : १० हा अंक दशदिशा: या नावाने दर्शवला आहे. कारण १० दिशानिर्देश आहेत.
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य, आकाश, पाताळ
रुद्र: : ११ हा अंक रुद्र: या नावाने दर्शवला आहे. कारण ११ प्रकारचे रुद्र आहेत.
कपाली, पिंगल, भीम, विरुपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिरबुद्धय, शंभू, चंद आणि भव
अशा प्रकारे खुप सारी रंजक व उपयूक्त माहिती पूरातन वैदिक, ज्योतिष ई. शास्त्रात आपल्याला पहायला मिळते.

-ज्योतिषमित्रमिलिंद