
दीपावली : जडत्वाचा अंत
दिवाळी हा हिन्दू संस्कृतीतील सर्वात मोठा सण. दिवाळी म्हटले की नवीन खरेदी, गोड धोड पदार्थ, वेगवेगळे दिवाळी अंक, आनंद व उत्साह यासाठी पर्वणी. हा दीपोत्सव कसा सुरु झाला असावा याचा आढावा घेताना ईशा फाउंडेशन च्या सद्गुरुंचा सकाळ मधील लेख वाचनात आला तो या निमित्ताने बहुतांश देत आहे.
दीपोत्सव साजरा करण्याची आपली संस्कृती ही १२ ते १५ हजार वर्षापूर्वाची आहे. वर्षाच्या या समयी, सृष्टीतील जीवन जडत्वाच्या अशा स्थितीत येतं, जे वर्षाच्या इतर सामान्य गतीत घडत नाही, याचा लोकांना ठाव लागला होता. आपल्या ग्रहाच्या उत्तर गोलार्धात सूर्य एका विशिष्ट स्थानात असल्यामुळे हिवाळा असतो, परंतु सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीची गुरुत्वाकर्षणशक्ती अशा प्रकारे कार्यरत असते की सुष्टोत एक प्रकारकी कुंठित अवस्था निर्माण होते. त्यामुळे या काळात काहीही उत्तमरीत्या उगवत नाही. त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या तुम्ही उदास होऊ शकता आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही अनेक प्रकारे मंदावता, जड़त्वाच्या या अवस्थेचा मानसिक आणि शारीरिकदष्ट्या आपल्यावर परिणाम होऊ न देता, त्याचा आपल्या वृद्धीसाठी उपयोग करून घेण्यासाठी आपण दीपावलीचा सण साजरा करतो, जडत्वाचा अंत करतो.
हा देश १२ हजार वर्षांचा शेतीचा इतिहास असणारा बहुधा एकमेव आहे. म्हणून लोकांच्या हे लक्षात आलं, की वर्षाच्या या काळात बी-बियाणे अंकुरत नाहीत किंवा अतिशय हळूहळू अंकुरतात. सृष्टीतील अवघी जीवन प्रक्रिया मंदावते आणि जडत्व निर्माण होते. जडत्व म्हणजे मृत्यू: गतिशीलता म्हणजे जीवन, एक प्रकारे, सुष्टीतील सर्व व्यवस्था प्रणालींमध्ये एक प्रकारचा तात्पुरता मृत्यू घडून येतो. मानसिकदृष्ट्या तुम्ही उदास होऊ शकता आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही अनेक प्रकारे मंदावता. जडत्वाच्या या अवस्थेचा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपल्यावर परिणाम होऊ न देता, त्याचा आपल्या वृद्धीसाठी उपयोग करून घेण्यासाठी, आपण विविध यंत्रणा विकसित केल्या.
कार्तिक महिन्यात लोक आपल्या घरात चैतन्य राखण्यासाठी दिवे लावत असत. आज आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, पण पूर्वी घरात तेलाचे दिवे वापरत असत आणि लोकांच्या आर्थिक स्थितीमुळें तेव्हा लोक एक किंवा दोनच दिवे लावत असत. परंतु, हा विशिष्ट महिना आल्यावर ते घराच्या प्रवेशद्वारावर आणि आत शक्य तेवढे अधिक दिवे लावत असत, कारण ही अशी वेळ आहे जेव्हा मानवी मन स्वाभाविकपणे नैराश्यावस्थेत जातं किंवा उदास होतं. म्हणून हा दिव्यांचा उत्सव बनला. तर दीपावली फक्त एका दिवसासाठी नव्हती, तर संपूर्ण महिन्यासाठी असायची.
नरक चतुर्दशी
ऐतिहासिकदृष्ट्या दीपावलीला नरक चतुर्दशी म्हणतात. हिवाळ्याच्या महिन्यात तुम्ही सूर्योदयापूर्वी उठणं फार महत्त्वाचं आहे. सूर्याची पहिली किरणं गवत किंवा इतर कृमी-कीटकांवर पडू नयेत – सूर्याची पहिली किरणे तुमच्यावर पडली पाहिजेत. म्हणूनच, सूर्योदय होण्यापूर्वी प्रत्येकजण सूर्याची पहिली किरणे आपल्यावर घेण्यासाठी बाहेर पडतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जडत्व नष्ट करणे. आयुष्य म्हणजे काळ आणि ऊर्जा यांचा खेळ आहे. आपल्या सर्वांमध्ये एक निश्चित वेळ आणि ऊर्जा आहे. वेळ ही आपल्या सर्वांसाठी एकाच गतीनं जात आहे. कोणीही ही गती कमी करू शकत नाही किंवा हा वेग वाढवू शकत नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुम्ही खूप आनंदी असल्यास तुमचा वेळचा अनुभव खूपच संक्षिप्त असेल. तुम्ही शंभर वर्ष जगलात तरी काही फरक पडत नाही, तो कमीच आहे. मानवांत दडलेल्या शक्यता लक्षात घेता शंभर वर्ष अगदीच नगण्य आहेत, मात्र, तुमच्यात जडत्व निर्माण झाले आणि तुम्ही व्यथित, दुःखी-कष्टी असल्यास अचानकपणे तुम्ही पाहाल, वेळ पुढे सरकतच नाही. चोवीस तास म्हणजे जणू एक युग वाटेल.
फक्त व्यथित लोकच दीर्घ आयुष्य जगू शकतात. पण तुम्ही आनंदी असल्यास जीवन अतिशय संक्षिप्त असेल. तुम्ही पाहाल, एखादा समाज जितका व्यथित असतो, तितकी त्याला अधिक करमणुकीची गरज निर्माण होईल. जिथं लोक आनंदी असतात त्यांना करमणुकीसाठी वेळ नसतो; आनंद त्यांचं आयुष्य व्यापतो. ते पहाटे उठतात आणि त्यांना काही कळण्यापूर्वीच रात्र झालेलो असते.
दीपावलीला नरक चतुर्दशी असे म्हणतात कारण नरकासुर हा अत्यंत क्रूर राजा होता, ज्याचा श्रीकृष्णानं यादिवशी वध केला. जो सर्वांना नरक देती तो नरकासुर. पण दुष्टता ही काही फक्त असुरांच्या रूपात येणं आवश्यक नाही. म्हणून जडत्व नरक किंवा नरकाचा स्रोत आहे, कारण एकदा जडत्व निर्माण झाल्यावर तुम्ही स्वतःच नरक बनता. तुम्ही काही नरकात जाणार नाही, तुम्ही स्वतःच नरक बनता अनेक प्रकारे आपण आपल्यात जीवनाच हे जडत्व येऊ देत आहोत. नैराश्य, उदासीनता आणि निराशा तुमच्या आयुष्याचं तुम्ही न पाहिलेल्या भूत-प्रेतांपेक्षाही अधिक नुकसान करू शकतात. दीपावली आपल्या आयुष्यात नकारात्मक असलेल्या सर्व गोष्टी नष्ट करून टाकण्यासाठीचे एक स्मरण आहे.
दिपावली च्या निमित्ताने आपणा सर्वांच्या आयुष्यात नैराश्याचा अंधकार जाऊन सदैव उत्साह व आनंदाचा प्रकाश नांदो, ही च सदिच्छा.
शुभ दिपावली !!!
-ज्योतिषमित्र मिलिंद








