Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

कुंडली तील १२ स्थाने काय फळ देतात हे दाखवणारा चार्ट


नमस्कार मित्रांनो,आज आपण कुंडलीतील १२ स्थाने कशाप्रकारचे फळ देऊ शकतात हे पाहणार आहोत. स्थान आणि रास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सूर्य मालेत ग्रह ज्या ३६० अंशाच्या वर्तुळाकार कक्षेत फिरत असतात. ती कक्षा ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण पट्टया प्रमाणे १२ भागात विभाजित करून त्या प्रत्येक भागास मेष, … Continue reading कुंडली तील १२ स्थाने काय फळ देतात हे दाखवणारा चार्ट

न्यूटन चा गती प्रतिगती चा नियम आणि कुंडली


न्यूटनचा गती व प्रतिगती चा नियम व कुंडली आज आपण न्यूटनचा गती व प्रतिगती चा जो नियम आहे, त्याची कुंडली अनुसार सोप्या भाषेत उकल करण्याचा प्रयत्न करु. NEWTON’S LAW : To every Action there is equal & opposite Reaction provided that there is no external … Continue reading न्यूटन चा गती प्रतिगती चा नियम आणि कुंडली

ठोकळा कुंडलीद्वारे जन्म काळ, जन्म तिथी, जन्म महिना व जन्म वर्ष ओळखण्याची युक्ती


ठोकळा कुंडलीद्वारे जन्म काळ, जन्म तिथी, जन्म महिना व जन्म वर्ष ओळखण्याची युक्ती

एखाद्या ज्योतिषासमोर आपण आपली ठोकळा कुंडली समोर ठेवताच क्षणार्धात काही गोष्टी आपल्याला सांगतो व भोळे लोक त्याला चमत्कारी, सिद्धी पुरुष अशी विशेषणे लावून मोकळे होतात आणि अनावश्यक उपायांसाठी तयार होऊन खर्चास बळी पडतात. या विद्येचा योग्य मेहनताना घेऊन लोकांना दिशा देण्यासाठी उपयोग करणे चांगलेच. पण लोकांच्या श्रद्धेचा गैरफ़ायदा घेऊन लुटणे हे वाईटच. वास्तविक त्यामागे कुंडलीतील मूलभूत तत्वांचा अभ्यास त्यामागे असतो. व जेवढे त्यचे निरीक्षण उत्तम तेवढे उत्तर अचुक.

आपणा सर्वांना महित आहेच सुर्य सकाळी ६ ते ८ वा. दरम्यान उगवतो व ३६० अंश चे चक्र पूर्ण करून २४ तासांनी परत पुर्व दिशेला त्याच राशीत उगवतो. ती रास लग्न स्थान १ ले स्थान असते. २४ तास १२ स्थानात विभागले असता लक्षात येईल कि सूर्य एका स्थानात सुमारे २ तास असतो. आता सुर्य त्या राशीपासून किती पुढे सरकलाय त्यावरून कोणीही अनुमान लावू शकतो कि जन्म किती वाजण्याच्या सुमारास झाला आहे. उदा. सूर्य १ ले स्थानात असेल तर सकाळी ६ ते ८ वा दरम्यान १२ व्या स्थानात असेल तर सकाळी ८ ते १० वा. दरम्यान अजुन एक स्थान पुढे सरकला ११व्या स्थानात असेल तर सकाळी १० ते १२ वा.

आपणा सर्वांना महित आहेच सुर्य साधारण १ महीना एका राशीत असतो. १४ जानेवारीच्या सुमारास मकर संक्रांतीला मकर राशीत प्रवेश करतो. म्हणजेच १४ फ़ेब्रुवारीच्या सुमारास कुंभ राशीत प्रवेश करेल. याचाच अर्थ कुंडलीत सूर्य मकर राशीत दिसत असेल तर जन्म १४ जानेवारी ते १४ फ़ेब्रुवारीच्या दरम्यान झाला असेल. सूर्य कुंभ राशीत दिसत असेल तर जन्म १४ फ़ेब्रुवारी ते १४ मार्च च्या दरम्यान झाला असेल. सूर्य मीन राशीत दिसत असेल तर जन्म १४ मार्च ते १४ एप्रिल च्या दरम्यान झाला असेल.

अमावस्येला कुंडलीमधे सूर्य व चंद्र एकाच राशीत असतात आणि पौणिमेला एकमेकांपासून ७ व्या राशीत असतात. एक रास अंतर पुढे जाण्यासाठी साधारण सव्वा दोन दिवस वा २ तिथी लागतात. त्याप्रमाणे जन्म तिथी ओळखता येते.

जन्म वर्ष ओळ्खण्यासाठी शनी व गुरु भ्रमणाचा एकत्र विचार करावा. शनी एका राशीत अडीच वर्ष असतो. सध्या कोणत्या राशीत आहे व जन्मकुंडलीत कोणत्या राशीत यातील किती घरे पुढे सरकलाय गुणिले अडीच वर्ष यावरुन वयाचा अंदाज बांधता येतो. ज्याचा अंशात्मक अभ्यास जास्त त्याचे उत्तर जास्त अचुक येते.

– ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

ज्योतिष मित्र सेवा


  • वैयक्तिक भेट व ज्योतिष मार्गदर्शन
  • रु.५००/- प्रति सत्र
  • विवाह योग, संतती योग मार्गदर्शन
  • नोकरी, व्यवसाय समस्या मार्गदर्शन
  • शिक्षण, करियर योग मार्गदर्शन
  • वैयक्तिक समस्या ज्योतिष समुपदेशन

कुंड्लीतील राशींची मांडणी


कुंड्लीतील राशींची मांडणी

सामान्य माणसांचा तसा कुंडलीशी फ़ारसा संबंध येत नाही. बहुतांश वेळा घरातला जुना पसारा आवरत असताना जीर्ण झालेली वडीलधारी मंडळीनी आपल्या जन्मा वेळी गुरुजींनी बनवलेली ठोकळा कुंडली सापडते किंवा मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमवताना कुंडली आणली आहे का बरोबर असे विचारले जाते तेव्हा आठ्वण होते. काही चॊकोनात ग्रह व राशी कोंबलेल्या असतात, कसले तरी आकडे लिहिलेले असतात त्यावरुन काही बाही भविश्य वगैरे बघतात हे आपली अगाध माहिती. वधुपिता या बाबतीत थोडे प्रगत असतात व मंगळ तीव्र वा निर्दोष आहे, शुक्र बिघडलाय, षडाष्टक आहे वगैरे चर्चा करताना दिसतात.

वास्तविकपणे पृथ्वी वरुन पाहिल्यास आकाशस्थ आपली सुर्यमाला व त्यातील ग्रह तारे एखाद्या विशिष्ट वेळी कोणकोणत्या भागात आहेत व आपल्याशी कोणता कोन साधत आहेत. व त्यांच्या गुरुतवाकर्षण शक्तीचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो या साठी मांडलेला चित्रालेख म्हणजे कुंडली.

एखादा ग्रह कोणत्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण पट्ट्यात फ़िरत आलेला आहे ते भाग म्हणजे राशी.
चंद्र हा उपग्रह देखील त्याचा आकर्षणाचा मोठा प्रभाव टाकत असल्याने त्याचाही समावेश केला आहे. परिभ्रमणाचा हा चक्राकार मार्ग त्या ग्रहांच्या पट्ट्यांप्रभाणे १२ भागात विभागूण त्या त्या ग्रहांच्या अधिपत्यांप्रमाणे राशीना नाव दिले गेले.
उदा. सुर्याच्या मालकीची सिंह(५) राशी त्या बरोबर चन्द्राच्या मालकीची कर्क(४) राशी.
त्यानंतर सुर्याच्या जवळ्चा ग्रह बुधाच्या पलिकडे कन्या(६) राशी अलिकडे मिथुन(३) राशी. त्यानंतरचा जवळ्चा ग्रह शुक्र च्या तुळ(७) व व्रुषभ(२) राशी.
त्यानंतर मंगळाच्या पलिकडे व अलिक्डे ब्रुश्चिक(८) व मेष(१) राशी.
त्यानंतर गुरुच्या अलिकडे पलिकडे धनु(९) व मीन(१२) राशी,
व शेवटी शनीच्या मकर(१०) व कुंभ(११) राशी

अशी वास्तविक चित्रालेखाद्वारे वैशिश्ट्यपूर्ण मांडणी म्हणजे कुंडलीचा साचा व त्या भागाप्रमाणे ग्रह कोणत्या भागात आहे हे समजणे सोपे जाते. सुक्ष्मता साधण्यासाठी अंशात्मक ग्रह, नक्षत्र, चरण, उपनक्षत्र असे अनेक विस्त्रुत अध्ययन आहे.

तर मित्रांनो अशी आहे कुंड्लीतील राशींची मांडणी.

  • ज्योतिषमित्रमिलिंद

ज्योतिष अभ्यासकाच्या नजरेतुन”


ज्योतिष-अभ्यासकाच्या नजरेतुन”

आयुष्य म्हटले की अनेक चढ-उतार, संधी व संकटे, खाच-खळ्गे, नफ़ा-तोटा, आशा-निराशा, सुख-दु:ख या आणी अशा अनेक अनुभवातुन जावेच लागते. आणी यातुनच अनेक प्रकारच्या गुंतागुंत, शंका, गोंधळ मनात आकार घेत असतात. या जगात वावरताना कोणत्या ना कोणत्या वळणावर माणसाच्या मनात काही प्रश्न हे डोकावतातच. हे असे माझ्या बाबतीतच का? कसे होणार माझे? पुढे काय होणार? हे सर्व बदलणार आहे की नाही?
जेव्हा योजना, तर्क, प्रयत्न, अन्दाज या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही तेव्हा माणसाला कोणाचा तरी सल्ला घ्यावासा वाटू लागतो. माणसाला स्वत:च्या भविष्यातील घटनेचा आधिच मागोवा घेण्याची नेहमीच उत्सुकता वाटत आली आहे. आणि मग यातुनच तो तांत्रिक, मांत्रिक, गुरुजी, सिद्ध पुरुष, ज्योतिषी यांचेकडे धाव घेतो. अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा, विश्वासाचा भाग आहे.
श्रद्धा ही जरुर असावी, पण ती अंध नसावी. विश्वास हा नेह्मी डोळ्स असावा. तो तर्क, अनुभव, अभ्यास या सर्वांच्या कसोटीवर पारखुन घेतलेला असावा. जिथे भोळेपणा, अंधश्रद्धा, अंधविश्वास असतो, तिथे बुवाबाजी, ठगबाजी, अघोरीपणा याला ऊत येतो आणी आपणच आपल्या विनाशाला कारणीभूत होतो. श्रद्धा जर योग्य टिकाणी, योग्य प्रकारे जोपासली तर नक्कीच त्याचा सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी व आयुष्याला दिशा देण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.
आपली श्रद्धा एवढी स्वस्त ही नसावी कि कोणी कर्मकांड, वेगवेगळे चमत्कार सद्रुश्य हातचलाखी करुन दाखवली की त्यास महानत्व बहाल करावे. आपणच अवास्तव कल्पना मनात ठेऊन गेलो की, योगी चमत्कार करुन आपल्याला सुखी, श्रीमंत बनवेल, मुलीचे लग्न लगेच जमेल, मुलाला लट्ठ पगाराची नोकरी लगेल वगैरे वगैरे. तर एक निश्चित समजा की तुमच्या अडचणी हुन त्यावरचे उपाय तुम्हाला महागात जातील. गुरुजी, सिद्ध पुरुष, ज्योतिषी कोणीही असो तो एक मार्गदर्शक म्हणुनच त्याचेकडे पाहणे योग्य ठरेल. जेवढे आवश्यक तेवढेच जाणुन घेऊन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली मानसिकता भक्क्म कशी करता येईल हे पाहणे आवश्यक आहे.

हे सर्व मांडायचे कारण एवढेच की मी ही एक रोजची कसरत करणारा एक सर्वसामान्य माणुस आहे. मलाही २००९ साली असेच काही प्रश्न मनात निर्माण झाले आणी ज्योतीष अभ्यासाकडे वळालो. आणी अभ्यास करत असताना ज्योतीष अभ्यासातील दिग्गज लोकांची मत मतांतरे, विरोधाभास, मी म्हणतो तसे घडणारच असे छातीठोक दावे पाहून कालचा गोंधळ बरा होता अशी माझी अवस्था झाली. हा प्रवास करत असताना आपल्याशी हितगुज करावे, यासाठी हा खटाटोप : “ज्योतिष अभ्यासकाच्या नजरेतुन”

-ज्योतिषमित्रमिलिंद