Category: Uncategorized

पूर्वाफाल्गुनी नक्षत्र विचार


विषय : पूर्वाफाल्गुनी नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण पूर्वाफाल्गुनी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. पूर्वाफाल्गुनी नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील ११ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राची आकृती शय्येसारखी आहे. पूर्वा व उत्तराफाल्गुनी या चार ताऱ्यांचा मिळून चौकोन तयार होतो. या नक्षत्रामध्ये दोन तारे असून ते थोड्या पांढऱ्या व जरा फिक्कट आहेत. फाल्गुन महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते. मघाच्या कोयत्याच्या खाली या नक्षत्राचे तारे असतात. इंग्रजीमध्ये या नक्षत्राला ‘थीट लिओनीस’ असे म्हणतात.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचे ४ ही चरण सिंह राशीत असल्याने हे नक्षत्र एकपाद नक्षत्र आहे. हे अधोमुख, क्रूर, मनुष्यगणी व सुलोचनी आहे. नक्षत्र दैवत भाग्य देवता, नक्षत्र स्वामी शुक्र व राशी स्वामी सूर्य आहे. म्हणून या नक्षत्रात रवीचा मानीपणा व अधिकारलालसा व शुक्राचा रंगेलपणा यांचा मिलाफ दिसून येतो.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये सत्त्वरजमिश्रित गुणधर्म आढळून येतात. त्यात रजोगुण जास्त प्रमाणात असतात. पूर्वाफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेले जातक बुद्धीमान, धूर्त, व्यवहारकुशल, थोड्या आपमतलबी, गर्विष्ठ, चैनी, विलासी, ख्याली-खुशालीत दंग, भोगी, स्वच्छंदी, व्यसनी, प्रवासी वृत्तीच्या, फारशी महत्त्वाकांक्षा किंवा ध्येयहीन, पण शूर, पराक्रमी व धाडसी असू शकतात. पूर्वाफाल्गुनी हे नक्षत्र स्वतःच्या पराक्रमाने व कर्तबगारीने पुढे येणारे आहे.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्र विशेषत: पाश्चात्य खेळ व कला यांना अधिक चांगले वाटते. उदा. बॉक्सिंग, क्रिकेट, टेबल टेनिस, स्विमिंग, ड्रायव्हिंग, बॅडमिंटन, विमानविद्या यात चांगले यश देते. बास्केटबॉल, विशेषतः या नक्षत्रात शुक्र किवा चंद्र असून त्याचा राहू किवा मंगळाशी शुभ योग असता हे निश्चित आढळून येते. त्यांच्या प्रत्येक हालचालीत आकर्षकता व सफाई आढळते.

पूर्वाफाल्गुनी जातक स्त्रियांना हे नक्षत्र फारसे अनुकूल नाही. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रिया पुरुषी बांध्याच्या व जरा राकट, उफाड्याचे शरीर, थोड्या मर्दानी थाटाच्या आढळतात. कोमलपणा किंवा नाजूकपणा थोडा कमीच. स्वभावही थोडासा फटकळ, मानी, चैनी, रजोगुणी, खावे, प्यावे व मजा करावी असा असू शकतो. सेवावृत्ती कमी आढळून येते. घरापेक्षा बाहेर मिरवण्याकडे जास्त लक्ष असते. पुरुषांप्रमाणेच त्या धीट, धाडसी, पराक्रमी, कर्तबगार असतात.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्र हे आरोग्यासाठी चांगले आहे. प्रकृती कणखर असते. हे जातक कधीही साध्या तापाने अंथरूणावर पकडलेले दिसणार नाहीत. यांना होणारे रोग थोडे दाहक स्वरूपाचे आहेत. उष्ण प्रकृती असल्याने अतिशय उष्णता होणे, डोळे जळजळणे, अंगाची लाही लाही होणे, डोके दुखणे, कापणे, भाजणे, खरचटणे, हाड मोडणे, जखमा, ऑपरेशन यापासून त्रास संभवतो. थोडी व्यसनाधीन प्रवृत्ती असल्याने अति मद्य सेवनामुळे पोटात कावीळ होणे, पित्त होणे, गुप्तरोग यापासून त्रास संभवतो. स्त्रियांना या नक्षत्रात चंद्र किंवा शुक्र असता पाळीच्या वेळी त्रास होऊ शकतो. यांना हृदयविकार संभवत नाही.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्राखाली इंजिनियर, यांत्रिक कामासंबंधी शिक्षण घेतलेला कुशल कामगार वर्ग, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स, सरकारी अंमलदार, रेव्हेन्यू अधिकारी, कस्टम ऑफिसर्स, पोलिस किंवा लष्करी खात्यातील लोक, कारखानदार, फॉरेस्टर किंवा बऱ्याच ठिकाणचा अंमलबजावणी खात्यातील वर्ग येतो. या नक्षत्राखाली जातकांचा अनुभव असा येतो की यांनी काम शासकीय किंवा अंमलबजावणीचे असले तरी त्यांना प्रत्यक्षपणे अधिकाराची जाग मिळत नाही.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री रवी पुष्कळ अनुकूल असतो. रवी असता या व्यक्ती फार मानी, गर्विष्ठ व थोड्या त्रासिक असतात. पण उच्चपदे, अधिकारयोग व कर्तबगारी यांना चांगला.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री चंद्र पुष्कळसा चांगला. उत्तम खेळाडू, आनंदी, शौकीन, ऐहिक सौख्य भोगणारा असतो. विद्या कमी ओढ असु शकतो.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री मंगळ असता शरीरप्रकृती उत्तम असते. शरीर वैशिष्ट्य दिसून येते. हाडापेराने मजबूत, पिळदार शरीराचे असते. स्वभाव फार तापट व भडक असतो. पण स्वपराक्रम, धाडस व कर्तबगारीने पुढे येतो. मल्लविद्या, लष्करी शिक्षण, इंजिनिअरग, शस्त्रक्रिया यांना मंगर चांगला, अधिकारयोग मिळतोच.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री बुध असता फारसे अनुकूल नाही. विद्या व बुद्धीनिष्ठतेकडे कमी ओढ असतो. थोडा स्वार्थी व काटकसरी असतो. नोकरी सामान्य प्रतीचीच मिळते.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री गुरु उत्तम असतो. शरीर प्रकृती बळकट व देहयष्टी भरदार असते. हाडापेराने मजबूत व सशक्त असतात. धन चांगले मिळते. मोठ्या अधिकाराच्या जागा मिळतात. प्रापंचिक ओढ जास्त असते. मात्र या नक्षत्रातील गुरुच्या व्यक्ती उदार किंवा उदात्त वृत्तीच्या नसून थोड्या स्वार्थीच असतात. संतती अल्प, पण होते.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री शुक्र ऐहिक सौख्याच्या दृष्टीने चांगला. तो पाश्चात्य कलांना फार चांगला. तो नीटनेटका व व्यवस्थित राहणारा असतो. फॅन्सी, पोषाख, वस्तू, अत्तरे, तेले, मोती, जवाहिरे, चैनीच्या वस्तू. छानछोकीपणा यांची फार आवड असते. खावे, प्यावे, मजा करावी व आयुष्यातील दिवस घालवावेत ही वृत्ती असते. बऱ्याच वेळा पुरुषांच्या कुंडलीत या नक्षत्रात शुक्र असता ते स्त्रियांचे द्वेषी असतात.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री शनि प्रतिकूल असतो. शरीरप्रकृती उत्तम असली तरी बांधा ऐटबाज नसून हाडाळ असतो. श्रम, कष्ट, धडपड, दगदग फार पडते.. त्यामानाने आवक कमी असते. अपयश फार असते. पैसा कमी मिळतो. संकटे व दुःखाचे प्रसंग फार येतात.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री राहू उत्तम प्रकारची शरीरप्रकृती देतो. या व्यक्ती शूर, पराक्रमी, धाडसी, कर्तबगार असून अधिकार भोगणाऱ्या असतात. मात्र चैन, विलास व बिघडलेला राहू असता गुन्हेगारीकडे प्रवृत्ती असते.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री केतू असता शरीर प्रकृती बरी पण इतर दृष्टीने मध्यम, त्यागी वृत्ती असते. दगदग, कष्ट फार व नोकरीच (सेवा) करावी लागते.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री हर्षल या नक्षत्रात शरीरप्रकृती बरी देतो पण जरा लहरी व विक्षिप्त व हेकेखोर असतो. गणित, इंजिनिअरिंग, विमानविद्या यांना चांगला.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री नेपच्यून अंतर्ज्ञान, साक्षात्कार, गूढ विद्या, संशोधन, कला, ललितवाङ्मय यांना चांगला. चंद्र किवा शुक्र नेपच्यूनची युती फारच इष्ट असते.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री नक्षत्र पांढरे व फिक्कट असल्याने हस्ताक्षर बारीक उभट पण एका रेषेत व व्यवस्थित असते. नक्षत्रावर ६ या अंकाचे वर्चस्व आहे व शुक्राचा हिरा लाभदायक ठरतो. सुलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास कितीही प्रयत्न केला तरी सापडत नाही. काही वेळा प्रबल ग्रहयोग अनुकूल असल्यास उत्तरेकडे ती वस्तू सापडण्याची शक्यता असते. मुहूर्त शास्त्रामध्ये हे नक्षत्र मौली, विद्यारंभ, अष्टप्राशन, बाळंतिणीला स्नान घालणे अशा चांगले.  अधोमुखी नक्षत्र असल्याने विहीर खणण्यास आरंभ करणे, द्यूत खेळणे यांना चांगले तसेच उग्र क्रूर नक्षत्र असल्याने थात, अग्निकर्म, विष शास्त्रादी प्रयोग यात यश मिळते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

अमावस्या योग


विषय : अमावस्या योग

संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : भारतीय संस्कृती कोश व कुंडली मंथन

नमस्कार,

“अमावस्या” या शब्दालाच पूर्वापार गूढ वलय प्राप्त झाले आहे. नुसते अमावस्या म्हटलं, तरी अनेकांच्या मनात अशुभत्वाची पाल चुकचुकते. वास्तविकत: ही सूर्य व चंद्राची एक आकाशस्थ स्थिती आहे, जिच्यामुळे काही फळे निर्माण होत असतात.

रवी चंद्राच्या भ्रमणामुळे तिथी निर्माण होतात. चंद्राची गती सूर्याच्या गतीपेक्षा जास्त  असल्याने चंद्र नेहमीच सूर्याच्या पुढे जातो. सूर्याच्या पुढे जात असताना चंद्र सूर्याच्या भोगाचे १२ अंश कापण्यास चंद्रास लागणारा काळ म्हणजे एक तिथी मानली जाते. चंद्र हा कलेकलेने वाढत जाऊन पौर्णिमेस पूर्णचंद्र आपल्याला दर्शन देतो. त्यानंतर उतरत्या क्रमाने त्याच्या कला कमी होत  अमावास्येला तो दिसेनासा होतो. या कला म्हणजेच चांद्रमासाची एकेक तिथी होय. या तिथीस प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी अशी नावे आहेत. पंचांगानुसार अमावस्या ही चंद्र महिन्याची ३० वी तिथी आणि कृष्ण पक्षाची शेवटची तिथी आहे. अमा म्हणजे गोळा होणे आणि वास म्हणजे वास करणे, राहणे. चंद्र आणि सूर्य युतीत आल्याची आकाशस्थ स्थिती अथवा तिथी म्हणजे ‘अमावस्या’. ज्यावेळी सूर्य आणि चंद्र यांचे क्रांतीवृत्तावरील आरंभ स्थानापासूनचे अंतर म्हणजेच भोग राशी, अंश, कला, विकलांनी समान होते, त्यावेळी अमावास्या संपते.

अमावस्या हे नाव कसे पडले असावे या विषयी मत्स्य पुराणाच्या १४ व्या अध्यायात एक रूपक कथा ऐकिवात आहे, त्यानुसार- प्राचीन काळी देवांच्या पूर्वजांनी ‘अछोड’ नावाचा तलाव बांधला होता. या देव पूर्वजांना ‘अमावसु’ नावाची एक मानस कन्या होती. तिने एकदा एक हजार वर्षे कठोर तपश्चर्या केली. म्हणून, देव पूर्वज प्रसन्न होऊन वर देण्यासाठी आले. त्यांच्यापैकी एक  अतिशय तेजस्वी पुरुष मुग्ध झाला आणि अमावसुकडे प्रेमाची याचना करू लागला. पण अमावसू चे मन यासाठी तयार नव्हते. अमावासूच्या संयमामुळे त्या दिवसाची तिथी पितरांना अत्यंत प्रिय झाली. तो दिवस कृष्ण पक्षाची १५ वी तिथी होती. तेव्हापासून ती तिथी या नावाने ‘अमावस्या’ म्हणून ओळखली जाऊ लागली. अमावास्या या तिथीची देवता ‘पितर’ असून श्राद्धकर्मादी विधी या तिथीवर करण्याबाबत आपल्या धर्मग्रंथात स्पष्ट उल्लेख आढळतो.

अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही. पण सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक ज्योतिर्विदांच्या मते ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. वेदातील सूक्तात सूर्याला ग्रासणाऱ्या स्वर्भानूला अत्री ऋषींनी शोधून काढले, असे म्हटले आहे.

ज्योतिष शास्त्रात सूर्यास आत्मा कारक व चंद्रास मनाचा कारक मानले जाते. पाश्चात्य सूर्य राशीस महत्व देतात, तर आपल्याकडे चंद्र फलज्योतिष शास्त्रात महत्वाची भूमिका बजावतो. ज्योतिषी चंद्र कुंडलीचा विचार, ग्रहांच्या गोचर भ्रमणाशी पडताळून, भविष्य कथन करत असतो. विशोत्तरी दशा पद्धतीत जन्म काळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो, तेथून महादशा सुरु होते.

रवी चंद्र युती (अमावास्या योग) दिवशी सूर्याच्या ऊर्जेमुळे चंद्राची सर्व शक्ती नष्ट होते. मनाचा कारक ग्रह चंद्रच सूर्यामुळे अस्तंगत झाल्याने निर्बली असतो व चंद्राच्या कारकत्वात, तसेच ज्या स्थानाचा मालक असतो त्या स्थानाने दर्शविलेल्या गोष्टी, यांच्या फळात कमतरता निर्माण करतो.जर एखाद्या जातकाचा जन्म अमावस्या योगावर असेल तर चंद्र ज्या स्थानी स्थित असेल व ज्या भावाचा स्वामी असेल त्या संबंधी फळ जन्मभर कमी प्रमाणात किंवा अनिष्ट मिळण्याची शक्यता बळावते आणि म्हणूनच ही युती भारतीय पारंपरिक ज्योतिष शास्त्रानुसार अशुभ मानली जाते.

चंद्र मनाचा कारक असल्याने अनेकदा या योगात जातकास आपल्या आयुष्यात काय घडत आहे हे न समजणे, अनपेक्षित उलथापालथ झाल्यामुळे अस्वस्थ होणे, निर्विकारपणा, कमी निर्णयक्षमता, अलिप्तपणा, अशा अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.

चंद्र मातृकारक असल्याने जातकाचे त्याच्या आईशी सतत मतभेद होऊ शकतात.

शुभ अमावस्या योग :

खालील राशीतील अमावस्या शुभ फलित प्रदान करू शकतील.

१. कोणताही ग्रह स्व राशीवर पूर्ण दृष्टी टाकत असेल, तर त्या स्थानाची शुभ फळे प्राप्त होतात. या नियमानुसार मकर व कुंभ राशीतील अमावस्या योग शुभ फळे देऊ शकेल.

२. कोणताही ग्रह स्वराशीत स्थित असेल, तर त्या स्थानाची शुभ फळे देतो. या नियमानुसार कर्क व सिंह राशीतील अमावस्या योग शुभ फळे देऊ शकेल.

३) उच्चीचे ग्रह, त्यांचे राशी अधिपती शुभ असता, शुभ फळे प्राप्त होतात. या नियमानुसार मेष व वृषभ राशीतील अमावस्या योग, त्यांचे अधिपती अनुक्रमे मंगळ आणि शुक्र शुभ असता शुभ फळे देऊ शकेल.

४) केंद्र कोणातील शुभ ग्रह शुभ फळात वाढ करतात. या उलट पाप ग्रह अशुभ फळ कमी करतात. या नियमानुसार अमावस्या योग जर कुंडलीच्या केंद्र कोणात होत असेल तर निश्चितच अशुभत्व कमी करण्यास सहाय्यक ठरेल.

अशुभ अमावस्या योग :

खालील राशीतील अमावस्या अशुभ फलिते देईल.

१) कोणताही ग्रह स्वतःचे नीचक्षेत्री असून त्याचा राशी स्वामी अशुभ असता, अशुभ फळ देतो. या नियमाप्रमाणे तूळ व वृश्चिक राशीत होणारा अमावस्या योग अनुक्रमे शुक्र, मंगळ अशुभ असता, अशुभ फळ देईल. 

२) ग्रहण युक्त अमावस्या सूर्यग्रहण हे फक्त अमावस्येलाच होत असल्याने ग्रहण युक्त अमावस्या योग नेहमीच अशुभ फळ देईल.

३) कोणताही ग्रह कुंडलीच्या ६, ८ व्या स्थानात असता, शुभ ग्रह शुभत्व कमी करतो, तसेच अशुभ ग्रह अशुभत्व वाढवतो. या पारंपरिक ज्योतिष तत्त्वानुसार कुंडलीच्या ६, ८ व्या स्थानातील अमावास्या अशुभ फळ देईल.

प्रत्येक राशीवर सूर्य चंद्र अमावस्या योगाचा स्थूल परिणाम :

मेष राशीमध्ये अमावस्या योग असता तुम्हाला कार्य क्षेत्रात बदल करावा असे वाटेल.

वृषभ राशीतील अमावस्या योग वृषभ राशीची तीव्रता वाढवते आणि आता तुम्ही जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यास सक्षम असाल.

मिथुन राशीचा स्वभाव द्वैत आहे. एकीकडे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल उत्साही असाल तर दुसरीकडे तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंताही असेल.

कर्क राशीचा शासक ग्रह चंद्र आहे आणि तोच अस्तंगत असल्याने आणि तो नेहमी उर्जेवर प्रभाव टाकतो.

सिंह राशीच्या जातकांसाठी अमावस्या योग सकारात्मक राहणार नाही आणि तुम्ही दिवास्वप्नात हरवले असाल. तुम्हाला समस्यांवर उपाय सापडतील पण यशस्वी होणार नाही.

कन्या राशी जातकांना  अमावस्या योग खाली खेचेल आणि काळ खूप कठीण जाईल.

तूळ या राशीत अमावस्या योग आयुष्यात अनेक बदल देऊ शकतो. तुम्हाला चांगल्या गोष्टींची गरज असेल पण तुम्हाला ती नेहमी मिळणार नाही.

वृश्चिक या राशीचे जातक अमावस्या योगात अधिक निराश होऊ शकतात आणि पुढच्या क्षणी काय होईल याची तुम्हाला खात्री नसते.

धनु राशीच्या जातकाना अमावस्या योगात  साहसी उपक्रम आवडतील.

मकर राशीचे जातक त्यांना आवडत असलेल्या क्रियाकलापांमधून मजबूत नफ्याची अपेक्षा करू शकतात, परंतु करिअरशी संबंधित समस्या नेहमीच असतील.

कुंभ राशीच्या जातकांना समाजात बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्या योजना पूर्ण कराव्या लागतील आणि जीवनात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.

मीन राशीच्या जातकांची अनेक स्वप्ने पूर्ण होतील, परंतु तरीही त्यांना हवे ते न मिळाल्याने ते दुःखी असतील.

अमावस्या योग पीडा निवारण :

१. पूजेमध्ये कलश पूजा आणि गणेश, शिव, मातृका, प्रधान-देवता आणि नवग्रह यांसारख्या इतर देवतांची पूजा समाविष्ट आहे. कुंडलीतील अमावस्या योगाचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी यज्ञ केला जातो. चंद्र नक्षत्र किंवा अमावस्येला यज्ञ केल्यास जास्तीत जास्त लाभ मिळेल.

२. सर्वपित्री अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवावा.

३. तुमच्या वडिलांचा, विशेषतः तुमच्या पालकांचा अनादर करू नका.

४. अमावस्येच्या दिवशी गरीब आणि गरजूंना तांदूळ, गूळ आणि दूध यासारख्या अन्नपदार्थांचे दान करा.

५. देवी कालीची पूजा करा, कारण ती मुख्य देवता आहे, जी अमावस्या दोषाचे परिणाम कमी करण्यात मदत करू शकते.

६. सोमवारी भगवान शिवाची आराधना करा आणि ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा. कारण शंकराने चंद्राला त्याच्या शापापासून वाचण्यास मदत केली.

७. अमावस्येच्या दिवशी शाकाहारी भोजन करा.

८. अमावस्येला दान करायच्या गोष्टी : अमावस्येला चांदी, तीळ, मीठ, कापूस, गाय इत्यादींचे दान करणे ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानले जाते.

९. अमावस्येला तीर्थ क्षेत्री स्नान केल्याने त्यांची सर्व पापे धुऊन जातात आणि नवीन कामांना सुरुवात होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. या दिवशी भक्त शिवमंदिरांना भेट देतात, उपवास करतात, मनाच्या आणि आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतात, ज्यामुळे आयुष्यात आध्यात्मिक वाढ होण्यास मदत होते.

१०. अमावस्येचा उपवास : अमावस्येला उपवास करावा, म्हणजेच अन्नाशिवाय उपवास करावा, असे शास्त्रात सांगितले आहे. अमावस्येला असे काम करावे, ज्यामुळे तुम्ही देवाच्या सान्निध्यात रहाल. सांसारिक कामे शेती, व्यवसाय इत्यादी तुम्हाला देवापासून दूर नेणारी आहेत. संध्याकाळचे हवन, सत्संग, भगवंताचे स्मरण, ध्यान ई. करावे.

११. पितृपूजा (श्राद्ध) : पितरांसाठी अमावस्या तिथीला श्राद्ध आणि दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. अमावस्येच्या दिवशी पूर्वज सूर्यास्तापर्यंत वायूच्या रूपात घराच्या दारात उपस्थित राहतात आणि आप्तेष्टांकडून श्राद्धाची इच्छा करतात. पितरांची उपासना केल्याने मनुष्याला वय, पुत्र, कीर्ती, कीर्ती, पुष्टी, बल, सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते.

अमावस्येला मुलगी झाली तर इष्ट की अनिष्ट ?

अमावस्येला जन्मलेल्या मुली अत्यंत शक्तिशाली मानल्या जातात. मात्र, या मुलींची सहज दिशाभूल केली जाऊ शकते आणि लोक त्यांच्या निरागसतेचा सहज गैरफायदा घेऊ शकतात, असाही एक प्रचलित समज आहे. याच कारणामुळे अमावस्येला जन्मलेल्या मुलीच्या पालकांना त्यांच्या मुली वाढल्यानंतर त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

अमावस्येला विवाह करणे इष्ट की अनिष्ट ?

चंद्र मनाचा कारक ग्रह आहे, म्हणून लग्नाच्या हेतूंसाठी अमावस्येच्या तीन दिवस आधी आणि अमावस्येनंतर तीन दिवस चंद्राच्या स्थितीत असण्याआधी शुभ किंवा कोणत्याही नकारात्मकतेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे चंद्र आपला सकारात्मक प्रभाव देऊ शकत नाही.

या तारखेला खरेदी-विक्री आणि सर्व शुभ कर्मे करण्यास मनाई आहे.

अमावस्येची दिशा ईशान्य आहे.

सोमवार, मंगळवार किंवा गुरुवारी येणारी अमावस्या आणि अनुराधा, विशाखा आणि स्वाती नक्षत्रांमध्ये येणारी अमावस्या विशेषतः पवित्र मानली जाते.

अमावास्येचे तीन प्रकार आहेत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावास्येला सिनीवाली अमावास्या म्हणातात. (ऋग्वेदात सिनीवाली नामक देवतेचा निर्देश आढळतो. अपत्यप्राप्तीसाठी तिची पूजा केली जात असे. अथर्ववेदात अमावास्येलाच सिनीवाली म्हटले आहे.) सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः अमावास्या असेल तर त्या अमावास्येला दर्श अमावास्या, आणि अंशतः अमावास्या व अंशतः प्रतिपदा असेल तर कुहू अमावास्या म्हणतात. सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. शनिवारी येणाऱ्या अमावास्येला शनिश्चरी अमावास्या म्हणतात. भावुका अमावास्या वैशाखात असते. त्यादिवशी शनी जयंती असते. आषाढ महिन्यातल्या अमावास्येला हरियाली अमावास्या हे नाव आहे. आषाढी अमावास्येला सुसंस्कृत माणसे दिव्याची अमावास्या, तर अन्य लोक गटारी अमावास्या म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात ती श्रावण महिन्यातली अमावस्या असते, महाराष्ट्रातल्या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावास्या हे नाव आहे. याच अमावस्येला दर्भग्रहणी अमावस्या (कुशोत्पाटिनी अमावस्या) हे दुसरे नाव आहे. त्या दिवशी बैलपोळा असतो. सर्वपित्री अमावस्या भाद्रपदात येते. दिवाळीत येणाऱ्या अमावस्येला लक्ष्मीपूजन असते. मार्गशीर्ष अमावस्येला वेळा अमावस्या हे नाव आहे. मौनी अमावस्या पौषात येते. माघ अमावस्येला द्वापारयुगादी अमावस्या म्हणतात. मार्गशीर्ष अमावस्येला वेळा अमावस्या हे नाव आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

प्राणी, पक्षी, झाडे यांची स्पंदने


विषय : प्राणी, पक्षी, झाडे यांची स्पंदने

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : मानवी जीवनातील गूढ रहस्ये

नमस्कार,

किती इम्प्रेसिव्ह आहे त्याचे व्यक्तिमत्व, छान Vibes आल्या तो नुसता दिसला तर… नको तूच घे तिचा फोन, तिचा नुसता आवाज जरी कानावर पडला तरी Negative Vibes येतात. आपण बरेचदा आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर अथवा नातेवाईकांबरोबर गप्पा मारत असताना Vibes  हा शब्द किती सहजगत्या वापरत असतो. विश्वकोशात बघितले तर Vibes या इंग्रजी शब्दाचा चा अर्थ हा व्यक्त होणारा, अनुभवास येणारा, भावात्मिक संदेश असा आपल्याला पाहायला मिळतो.

हे एक प्रकारचे भावनिक संदेश आपल्याला अनुभवावरून किंवा आपल्या समोर जी व्यक्ती असते त्याचे व्यक्तिमत्वामुळे, त्याच्या वर्तनावरून अथवा सान्निध्यात आल्याने, आजूबाजूच्या वातावरणामुळे येत असतात. मराठीमध्ये यालाच आपण स्पंदने असे म्हणतो. स्पंदने ही सकारात्मक (Positive Vibes) अथवा नकारात्मक (Negative Vibes) असू शकतात.

स्पंदने ही फक्त व्यक्तींद्वारेच येतात असे नसून प्राणी, पक्षी, झाडे, वास्तू ई. द्वारे सुद्धा येऊन आपल्या मनावर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम घडवत असतात.

आज आपण झाडे, प्राणी, पक्षी यांचे स्पंदनांबद्दल संकलित माहिती पाहणार आहोत.

प्राणी स्पंदने :

गाय : हिंदू धर्मामध्ये लोक गाईला खूप पवित्र मानले जाते. गाईमध्ये खूप पवित्र स्पंदने आहेत. अपवित्र स्पंदने मुळीच नाहीत. यासाठीच गाईची पूजा करतात.

बैल : बैलामध्येही चांगली स्पंदने असतात.

कुत्रा : कुत्र्यामध्येही चांगली स्पंदने असतात. कुत्रा हा भैरवाचा प्रतिनिधी आहे.

गाढव : वाईट स्पंदने असतात.

मांजर : मांजरामध्ये मिश्र स्पंदने आढळतात. शुभ्र मांजरामध्ये चांगली स्पंदने आढळतात. तर काळ्या मांजरामध्ये वाईट पैशाचिक स्पंदने आढळतात. पिशाच्च काळ्या मांजराच्या रूपात दिसते.

शेळी व मेंढी : शेळ्या तसेच मेंढ्यांमध्ये चांगली स्पंदने असतात. शेळ्या मेंढ्यांच्या सहवासात राहणारी व्यक्ती निरोगी असते. त्यांच्या सहवासात राहणाऱ्या व्यक्तीला क्षयाचा (टी. बी.) विकार होत नाही.

म्हैस व रेडा : या प्राण्यांमध्ये दुष्ट स्पंदने असतात. तांत्रिक दुष्ट शक्ती प्राप्त करण्यासाठी यांचा वापर करतात. स्वप्नात लोक म्हैस वा रेडा येणे, हे खूप वाईट मानले जाते. त्यामुळे संकटे येतात असे हिंदूधर्मात मानले जाते.

डुक्कर : वाईट स्पंदनांचे प्रतिनिधित्व करतो. याच्यामध्ये खूप वाईट शक्ती असतात. पिशाच्चे डुकराच्या रूपात दिसतात किंवा वाटेत आडवी येतात.

वानर : वानर चांगली स्पंदने प्रक्षेपित करतात. वानरामध्ये पिशाच्च शक्ती दूर करण्याचे सामर्थ्य असते असे म्हटले जाते.

हरिण : हरिणामध्ये पवित्र स्पंदने खूप असतात. याच्या चर्मावर बसून मंत्रजप केला असता ज्ञान प्राप्त होते. यासाठी भारतातील बरेच साधू हरिणाच्या चर्मावर बसून जप करतात. आध्यात्मिक प्रगतीसाठीही हरिणाजिनावर बसून जप करणे, श्रेष्ठ मानले गेले आहे. हा सात्त्विक स्पंदनांचा प्राणी आहे.

वाघ : वाघामध्ये नवग्रहांकडून येणारी स्पंदने आपल्याला अनुकूल करण्याचे सामर्थ्य आहे. वाघनख धारण केले असता नवग्रहांची शांती होते, असे मानले जाते. नैसर्गिकरित्या मृत पावलेल्या (मारलेल्या नव्हे) वाघाच्या चर्मावर बसून मंत्रजप केला असता शक्ती प्राप्त होते. वाघाचे, सिंहाचे सामर्थ्य सारखेच मानले गेले आहे. परंतु सिंहाची स्पंदने ही वाघापेक्षा अधिक पवित्र असतात.

अस्वल : अस्वलामध्ये वाईट स्पंदने असतात. पिशाच्च शक्ती यांच्यातही आढळते, परंतु बर्फामध्ये राहणाऱ्या पांढऱ्या अस्वलामध्ये चांगली स्पंदने असतात.

तरस : अतिशय घाणेरडी स्पंदने या प्राण्यात असतात.

लांडगा : याच्यामध्ये वाईट, तामसी स्पंदने आढळतात.

कोल्हा : या प्राण्याची स्पंदने मिश्र स्वरूपाची असतात. कोल्हा स्वप्नात येणे हे शुभ मानले जाते. एखाद्या कामासाठी जात असता वाटेत कोल्हा दिसला तर यश प्राप्ती होते.

हत्ती : हा सात्त्विक व शुद्ध स्पंदनांचा प्राणी आहे. हत्तीमध्ये दैवी स्पंदने आढळतात. हत्तीचे वैशिष्ट्य असे असते, की एखादा हत्ती खूप पिसाळलेला असेल व आपल्या अंगावर धावून येत असेल तर त्याला नमस्कार करताच तो शांत होतो व काहीही न करता बाजूला निघून जातो.

मुंगूस : हा दैवी स्पंदने असणारा प्राणी आहे. हा प्राणीही वाटेत दिसताच यश प्राप्ती होते.

पक्षी स्पंदने :

मोर : अत्यंत चांगली स्पंदने मोरामध्ये असतात. दैवी स्पंदनांचा हा पक्षी असल्याने दुष्ट शक्तीपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी मोराची पिसे जवळ बाळगतात. हिंदू घरामध्ये मोराची पिसे ठेवली जातात. मुस्लिम धर्म मध्ये, दर्ग्यामध्येही मोरपीस वापरले जाते.

पोपट : हा अत्यंत शुभ पक्षी मानला जातो. त्यामुळे लोक याला घरी पाळतात.

भारद्वाज : हा पक्षीही दैवी स्पंदनांचा पक्षी आहे. याचे दर्शन हे अत्यंत शुभप्रद मानले जाते. घरातून बाहेर पडताना वा प्रवास करताना याचे दर्शन झाले असता प्रवास सुखरूप होतो व कामे तडीस जातात.

हंस : हा पक्षीही दैवी पक्षी आहे. याच्यामध्ये दैवी स्पंदने असून स्वप्नात याचे दर्शन होणे शुभ मानले जाते.

गरुड : याच्यामध्येही चांगली स्पंदने असतात.

कबुतर : याच्यामध्येही चांगली स्पंदने असतात.

कावळा : हा मिश्र स्पंदनांचा पक्षी आहे. तरीही याच्यामध्ये प्रामुख्याने अशुभ स्पंदनेच जास्त असतात. हा पितरांचे प्रतिनिधित्व करतो. हा शनीग्रहाचे वाहन आहे. शनीग्रहाची स्पंदने प्रसृत करतो. याला खायला दिले असता शनीची पीडा होत नाही, असे हिंदूधर्मात सांगितले आहे. हा मृतात्म्यांचे प्रतिनिधित्व करीत असल्याने याला खायला घातल्याने पितरांचीही तृप्ती होते, असे म्हटले जाते.

चिमण्या : चिमण्यांची स्पंदने ही चांगली असतात. या राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात, यासाठी चिमण्यांना बाजरी खाऊ घालावी म्हणजे राहूची पीडा कमी होते, असे मानले जाते. ज्या वास्तूला आगामी काळात धोका नाही अशाच वास्तूत चिमण्या आपली घरटी बांधतात, असे म्हटले जाते.

कोंबडा : कोंबड्यामध्येही शुभ स्पंदने आढळतात.

पिंगळा : हा पिशाच्च शक्ती स्पंदनांचा पक्षी आहे. हा एक जंगली पक्षी असून, हा भविष्य कथन करतो. भारतात काही लोक स्मशानात काही दिवस साधना करून या पक्ष्याची भाषा जाणण्याची विद्या शिकतात. हा माणसाचे अचूक – भूत-भविष्य कथन करतो.

गिधाड : गिधाडामध्ये खूप वाईट स्पंदने असतात. पिशाच्च शक्तीचे हा प्रतिनिधित्व करतो. प्रवासात गिधाड दिसले तर प्रवास कष्टप्रद होतो, असे मानले जाते.

घुबड : पैशाचिक स्पंदने या पक्ष्यात सर्वांत जास्त असतात. सर्व धर्मांमध्ये हा पक्षी अशुभ मानला जातो. जंगली-जाती जमातीतही हा अशुभ समजला जातो. या पक्ष्यामध्ये खूप वाईट, दुष्ट स्पंदने असतात. तांत्रिक सिद्धींसाठी तांत्रिक लोक किंवा ब्लॅकमॅजिक करणारे या पक्ष्याचा वापर करतात.

घार : घारीमध्ये शुभ स्पंदने असतात.

वनस्पती स्पंदने :

औदुंबर : या वृक्षात अत्यंत दैवी स्पंदने आढळतात. याची स्पंदने शांती प्रदान करतात. या वृक्षात शीतलता अधिक. असते. सात्त्विक स्पंदनांच्या या वृक्षामध्ये दत्तात्रेयांची स्पंदने असल्याने हिंदूधर्मात याला पाणी घालणे वा याच्याजवळ दिवा लावणे हे शुभ मानले जाते. यामुळे साहजिकच त्या व्यक्तीला सात्त्विकता प्राप्त होते. नदीच्या किनारी असणाऱ्या औदुंबर वृक्षामध्ये खूप दैवी शक्ती असते.

आंबा : अत्यंत चांगली स्पंदने असणारा हा वृक्ष आहे. याच्यामध्ये दैवी स्पंदने आहेत, म्हणून शुभ कार्यामध्ये याच्या पानांचा तोरण म्हणून उपयोग करतात. याच्यामध्ये देवीची स्पंदने असतात.

तुलसी : अत्यंत सात्त्विक स्पंदनाचे हे झाड आहे. हिंदू धरांच्यासमोर याचे वृंदावन असते. या झाडालाही पाणी घातल्याने सात्त्विकता व शांती लाभते.

पिंपळवृक्ष : या वृक्षामध्ये चांगली व मध्यम दोन्ही प्रकारची स्पंदने असतात. या वृक्षातळी दिवा लावल्याने भाग्य वृद्धी होते.

वटवृक्ष : चांगली व मध्यम दोन प्रकारची स्पंदने असतात. परंतु या वृक्षाची स्पंदने ही सुप्तावस्थेत असतात. वरील पाचही वृक्षांना नेमाने पाणी दिल्यास व्यक्तीचा भाग्योदय होतो. कष्ट तसेच त्रास कमी होतात.

रुद्राक्ष : रक्त शुद्ध करणारी स्पंदने या वृक्षात असतात.

चंदन : या वृक्षात सात्त्विक व शांती देणारी स्पंदने असतात.

हिरडा : याची स्पंदने चांगली असतात ही औषधी वनस्पती आहे. हिरडा उशाखाली ठेवून झोपले असता वाईट स्वप्ने पडणे थांबते.

सर्पगंधा : या वनस्पतीच्या जवळ कधीही साप येत ना साप या वनस्पतीपासून सदैव दूर राहतो. या वनस्पतीचा सापाला सहन होत नाही. या वनस्पतीच्या काडीचा एक लहान तुकडा जर गळ्यात बांधला असता साप स्वप्नात येत नाही व जंगल फिरताना सर्प भय रहात नाही.

बाभूळ : या झाडाजवळ सतत पिशाच्चे राहतात. पिशाच्च साधना करणारे या झाडाच्या आश्रयाने साधना करतात.

वड, औदुंबर, पिंपळ या वृक्षांची लागवड केल्याने पुण्य मिळते. तसेच या वृक्षांना तोडू नये असे शास्त्रात सांगितले आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)