Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

भाकूट दोष विचार


विषय : भाकूट दोष विचार

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : प्रेडिक्टिव्ह स्टेलर ॲस्ट्रॉलॉजी रीडर

नमस्कार,

मुले हाता-तोंडाशी आली की, बहुतेक पालकांची लवकरात लवकर त्यांचे दोनाचे चार हात करायची लगबग सुरु होते. आणि सुरु होतो डोक्याला शीण आणणारा योग्य वधू/वर संशोधनाचा सारीपाट. आपल्याकडील हे संशोधन म्हणजे स्थळ जुळण्यापेक्षा नाकारण्यातच निम्म्याहून अधिक स्थळे खर्ची पडतात. कधी रंग रूप जुळत नाही, तर कधी सामाजिक परिस्थिती, मुळ गाव, शिक्षण, गोत्र, देवक अशा अनेक गोष्टी स्थळाचा खातमा करायला तलवार उपसून उभ्या असतात. त्यात अजून भर म्हणजे अष्टकुट गुणमेलन हा आपल्याकडील एक प्रकार. मंगळ दोषा इतकाच विवाह जमान्यात अडथळे निर्माण करणारा एक प्रभावी प्रकार. त्यातील भाकुट आणि नाडी दोष तर ३६ गुणांपैकी १५ गुण व्यापतात. म्हणजे साधारण ४० % स्थळे या दोन प्रकारात बळी पडू शकतात.

आज आपण त्यातीलच भाकुट या बद्दल माहिती घेणार आहोत.

जन्मकुंडलीत चंद्र ज्या स्थानामध्ये असतो, त्या घराला कुंडलीचा भाकू म्हणतात. भाकू म्हणजेच जन्म चंद्र राशी. विवाह मेलनात एकमेकांच्या कुंडलीत भाकू अनुकूल असणे या भाकुट मेलन म्हणतात. प्रतिकूल असेल तर दोष समजला जातो. पारंपारिक गुणमेलनात हा एक अतिशय गंभीर दोष मानला जातो आणि बहुतेक ज्योतिषी कुंडली जुळत नसल्यास लग्न न करण्याचा सल्ला देतात. कारण यावरून प्रेम, वैवाहिक सौख्य तपासले जाते, त्यासाठी अष्टकूटमध्ये भाकूट जुळणे देखील आवश्यक आहे, अन्यथा तो भकूट दोष बनतो व घटस्फोट आणि वैवाहिक जीवनात प्रेमाचा अभाव यासारख्या समस्या उद्भवू शकतात असे मानले जाते.

भाकूट दोष :

१) जर वराची चंद्र रास वधूच्या राशि पासून २ री येत असता, त्यांचे वैवाहिक आयुष्य दीर्घ काळ टिकण्यात अडथळे येतात.

२) जर वधूच्या चंद्र राशी पासून वराची चंद्र रास ३ री येत असता, वैवाहिक आयुष्य सुखाचे होत नाही, आरोग्यात बिघाड, वैचारिक मतभेद ई. मुळे इतर गुण मेलन झाले, तरी वैवाहिक आयुष्यात ते दु:खी असतील.

३) जर वधूची जन्मराशि वरांच्या राशिपेक्षा ४ थी येत असता, विवाह सांपत्तिक स्थिती खालावण्यास कारणीभूत ठरेल आणि कठीण परिस्थिती निर्माण होईल.

४) जर वधूच्या जन्म राशी पासून वराची जन्म रास ५ वी येत असता, पती दीर्घायुषी असणार नाही व वधूस अल्पायु मधे दुर्दैव भोगावे लागेल.

अपवाद : जर वधूत्रा जन्म मेष व कर्क राशी मध्ये असेल व वराची तिच्या जन्म राशी पासून ५ वी रास येत असेल, तर अनिष्ट परिणाम समाप्त होऊन उत्तम मेलन होऊ शकते.

५) जर वराची जन्मराशि ६ वी येत असेल, तर संतती करता प्रतिकूल असते. थोडक्यात षडाष्टक योग तयार होतो. वर-वधूची चंद्रराशींमध्ये षडाष्टक असल्यास विचारधारा भिन्न राहून नेहमी वाद निर्माण होतील व दु:खी राहतील.

अपवाद : बारा राशिना दोन गटा भध्ये विभाजित केले आहे. मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु व कुंभ या विषम राशि, अथवा सकारात्मक राशि म्हटल्या जातात. वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर, मीन यांना समराशि अथवा नकारात्मक राशि म्हटल्या जातात. हे सांगितले गेले आहे की, विषम अथवा सकारात्मक राशीत जन्मलेल्या मुली करिता षडाष्टक दोष नसतो. तसेच जर मुलीच्या कुंडतीमध्ये चंद्र राशीचा स्वामी वृषभ अथवा वृश्चिक मध्ये असेल, तर त्याचे सहावे स्थान वाहेत तूळ व मेष, वृषभ ई. येऊन त्यांचा अधिपति एक येत असल्याने हा दोष येत नाही.

वराचे चंद्र राशी सम राशी असता व जर ते वधूच्या जन्मराशी पासून २ री येत असता, अनिष्ट परिणाम समाप्त होतील व चांगला मेळ होऊन दीर्घायू जीवन व्यतीत करतील.

याशिवाय, दोन्ही तक्त्यामध्ये नाडी दोष तयार होत नसल्यास, भकुट दोष तयार झाल्यानंतरही त्याचा प्रभाव कमी मानला जातो.

वैदिक काळापासून विवाह वगैरे जुळवण्याची पद्धत प्रचलित आहे आणि बहुतेक आधुनिक ज्योतिषीही कुंडली जुळवण्याच्या अष्ट कुट पद्धतीला खूप महत्त्व देतात. परंतु दशा अंतर्दशा, नवमांश कुंडली, लग्न, पंचम, सप्तम, लाभ स्थान व त्यांचे स्वामी, ई. गोष्टी तपासणे देखील महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त, दोन्ही कुंडलीतील शुभ अशुभ ग्रहांमुळे निर्माण झालेल्या योग-कुयोग किंवा दोषांचा विचार करणे आवश्यक आहे आणि बहुतेक प्रकरणांमध्ये, गुण मिलन किंवा अष्टकूट जुळण्यापेक्षा ते अधिक निर्णायक ठरतात असा माझा अनुभव आहे.

दोषांचे थोडक्यात परिणाम :

भकुट दोषाच्या प्रस्थापित मान्यतेनुसार, वधू किंवा वर यांपैकी एकाचा षडाष्टक भाकुट दोष असल्यामुळे मृत्यू संभवतो, नवव्या-पाचव्या भाकुट दोषामुळे, दोघांनाही मूल होणे कष्टप्रद होते. द्वि-द्वादश दोष, लग्नानंतर वधू-वरांना गरिबीला सामोरे जावे लागते. 

जन्मकुंडली जुळवणे किंवा मालमत्ता जुळवणे यासारख्या प्रक्रिया भारताव्यतिरिक्त जवळजवळ कोणत्याही देशात वापरल्या जात नाहीत. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की जन्मकुंडली जुळण्याच्या वेळी निर्माण झालेल्या अनेक दोषांपैकी भकुट दोष हा फक्त एक दोष आहे आणि जन्मकुंडलीच्या जुळणीत तयार होणारे अनेक दोष जसे की नाडी दोष, गुण दोष, काल सर्प दोष, मांगलिक दोष इ. प्रत्येक दोष आहे. हे सर्व दोष लक्षात घेऊन, असे म्हणता येईल की जगातील जवळजवळ प्रत्येक विवाहाला घटस्फोट किंवा वैधता यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल कारण त्याच्या प्रचलित व्याख्येनुसार, यापैकी एक किंवा अधिक दोष जवळजवळ प्रत्येक कुंडलीशी जुळतात. ही वस्तुस्थिती वास्तवापासून खूप दूर असल्याने, असे गृहीत धरले पाहिजे की भकुट दोष आणि असे इतर दोष असा विवाह मोडण्यास एकेकटे सक्षम नसून आणि हे घडण्यासाठी ग्रहाने निर्माण केलेला दुसरा गंभीर दोष अथवा इतर अनिष्ट ग्रहस्थिती ई. सुद्धा अनिष्ट परिणाम सूचक असावी. केवळ भकुट दोषामुळे वैवाहिक जीवनात कोणतीही गंभीर समस्या उद्भवत नाही आणि मी अनेक विवाहित जोडप्यांना ओळखतो ज्यांना जुळण्याच्या वेळी भकुट दोष असतो, परंतु तरीही असे विवाह झाले आहेत. जवळपास प्रत्येक क्षेत्रात वर्षानुवर्षे यश मिळवले आहे, हेच कारण आहे की, या सर्व प्रकरणांमध्ये वधूच्या कुंडलीत असे काही योग आहेत जे लग्नाचे शुभ परिणाम सांगतात, ज्यामुळे या कुंडलींवर भकूट दोषाचा प्रभाव जवळजवळ नगण्य असतो. कोणत्याही कुंडलीत ग्रहामुळे निर्माण होणारे कोणतेही शुभ किंवा अशुभ योग हे अष्टकूट मुळे निर्माण झालेल्या दोषांपेक्षा जास्त बलवान असतात आणि दोघांमध्ये संघर्ष झाल्यास, अशा वेळी कुंडलीमध्ये तयार झालेले शुभ किंवा अशुभ योगच असतात.

मुळे कुंडलीतील विवाहसंबंधित योगासारखे कोणतेही शुभ योग भकुट दोष किंवा जुळणीतील इतर दोषानंतरही राशीला यशस्वी आणि आनंदी वैवाहिक जीवन देण्यास सक्षम ठरतात.

म्हणून, लग्नासाठी अस्तित्वात असलेल्या भावी वधू किंवा वराने केवळ भकुट दोष तयार झाल्यामुळे आशा सोडू नये आणि तिच्या जन्मकुंडली केवळ अष्टकूट जुळण्याव्यतिरिक्त इतर पद्धतींनी पूर्णपणे जुळल्या पाहिजेतकारण निर्माण झालेले इतर दोष अशा विवाहाला विशेष हानी पोहोचवू शकतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आजचा विचार क्र. (१२४४)


जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विवाह काळ


विषय : विवाह काळ

संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : कुंडलीची भाषा

नमस्कार,

आजच्या काळात विवाह जमणे हा आयुष्यातील सर्वात मोठा जुगार ठरावा, अशी आजची परिस्थिती आहे. मुले कायदेशीर रीत्या सज्ञान झाल्यावर लवकरात योग्य वयात विवाह होऊन मुलांच्या आयुष्याला स्थैर्य लाभावे, ही एकीकडे पालकांची ईच्छा व भूमिका असते. तर दुसरीकडे मुले उच्च शिक्षण घेऊन अर्थार्जनाच्या मागे धावत सुटलेले असतात, मोठमोठे पॅकेज त्यांना व पालकांना सुद्धा मोहात पाडत असतात. आयुष्यात पूर्ण करण्याची स्वप्ने आभाळास स्पर्श करत असतात व महत्त्वाकांक्षा जेवढ्या उंचावलेल्या असतात, तेवढ्याच मुलांच्या व पालकांच्या स्थळा बद्दलच्या अपेक्षाही उंचावलेल्या असतात. व या सगळ्या गदारोळात विवाहाचे वय व विवाह काळ पुढे पुढे सरकत असतो. आणि एक वेळ अशी येते की, विवाहाच्या बाजारातील किंमत वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर कमी कमी व्हायला लागते. ज्यांचे शिक्षण व उत्पन्न साधारण आहे, त्यांची अवस्था तर आणखीन बिकट असते.

खरेतर हा विवाह काळ कधी असेल, याबद्दल सर्वानाच उत्सुकता असते.

त्यासाठी कुंडलीची भाषा या ग्रंथातील विवाह काळ याबाबतचे संकलन सर्वांसाठी आपल्या समोर ठेवत आहे.

१) गोचरीने अगर भ्रमणाने गुरुची तसेच लग्रेश, सप्तमेश, कुटुंबेश, शुक्र व चंद्र यांची परिस्थिती जन्म कुंडलीत कशी असते हे कळल्यावर विवाहाचे वर्ष व महिना कळू शकतो.

२) अ) गुरुचे लग्नी, व्दितीयात, सप्तमात, पंचमात, भाग्यात, लाभात भ्रमण होते. तो काळ विवाहास अनुकूल समजावा.

ब) गुरु जेव्हा लग्रेश सप्तमेश, शुक्र व चंद्र ह्याच्या वरुन भ्रमण करतो किंवा ह्याच्या सप्तमावर भ्रमण करतो तो काळ विवाहास अनुकूल असतो.

३) गुरु हा जेव्हा कुंडलीत लग्न किंवा चंद्रापासून सप्तमेशात असतो तेव्हा गुरुचे स्वस्थानावरुन किंवा सप्तमातून भ्रमण विवाहास अनुकूल असते.

४) जाया कारक शुक्र व सप्तमेश आपल्या भ्रमणात जेव्हा जन्मलग्नेश अगर नवमांश लग्नेश ह्याच्या जन्म स्थित राशीच्या त्रिकोणात येतात, तो काळ विवाहाचा समजावा.

५) जेव्हा जन्म लग्रेश आपल्या भ्रमणात सप्तमातून जातो, तो काळ अगर जन्म सप्तमेश स्थित राशीवरुन जातो, तो काळ विवाहास योग्य समजावा.

६) योग कारक ग्रहाचा सप्तम भाव व सप्तमेश यांच्याशी जन्मकाळी काही संबंध असल्यास, त्याचे सप्तम अगर सप्तमेशावरुन भ्रमण अगर भ्रमणात त्याच्याशी दृष्टीयोग करीत असल्यास तो काळ विवाहास अनुकूल समजावा.

७) जन्म कुंडलीत गुरुचे संबंध कोणाशी आहेत, सप्तम भाव, सप्तमेश, चंद्र अगर शुक्राशी आहेत काय हे प्रथम ठरवावे. ज्याच्याशी जन्मस्थ योग असतील व तसेच योग भ्रमणाने झाल्यास व विवाहास योग्य वय असल्यास आणि दशामुक्ती अनुकूल असल्यास विवाह काळ समजावा.

८) दशामुक्ती पहातांना जन्म कुंडलीतील सप्तमेशची राशी व त्याची नवमांशीय राशी तसेच शुक्र व चंद्र यांच्या जन्म राशी स्वामी व नवमांश स्वामी यांच्यापैकी जो बलवान असेल, त्याच्या दशामुक्तीत जेव्हा गुरु गोचरीने त्याच्यावरुन भ्रमण करतो, त्याच्या त्रिकोणातून जातो अगर त्याच्यासमोरुन जातो तो काळ विवाहाचा समजावा.

विवाहकाळ सिध्द करतांना जात, धर्म, देश, विचार व गरीबी व श्रीमंती विचार, विवाह करण्याची इच्छा आहे किंवा नाही वगैरे गोष्टींचा देखील विचार करावयास पाहिजे. देश परिस्थितीप्रमाणे काळाच्या ओघाप्रमाणे विवाहाची वर्षे बदलत जातात. आपल्या भारतात ५०-७५ वर्षापूर्वी लहानपणीच लग्ने होत होती. पण आता त्या वयाच्या मर्यादेत बराच फरक पडला आहे. या सर्वांचे अनुसंधान साधून विवाहकाळ ठरवावा लागेल.

कै. विष्णू गोपाळ नवाथे यांनी काही अनुभविक नियम जातक संग्रह ग्रंथात दिले आहेत. ते आपल्या माहितीसाठी देत आहे.

जन्म कुंडलीतील चंद, शुक्र, सप्तमेश व कुटुंबेश यांचा विचार करावा. कुंडलीतील त्यांची परिस्थिती जाणून घ्यावी दिलेले योग विवाह संभव काळाकरता पडताळून पहावेत.

१) जन्मकालाच्या शुभ स्थित राशीपासून गोचर शुक्र १-२-७ स्थानी असतो.

२) जन्मकालच्या चंद्रापासून शुक्र १-२-७ स्थानी येतो.

३) कुंडलीतले सप्तम स्थान, त्याचा स्वामी ज्या स्थानी असेल तेथून गोचर शुक्र १-७ स्थानी असावा.

४) जन्म कालच्या जन्मस्थ चंद्र राशीपासून सातवा असावा.

५) जन्म चंद्रावर सप्तमेश असावा.

६) सप्तमेश सप्तमात लग्नी किंवा कुटुंबस्थानी (व्दितीय स्थानी) असावा.

७) कुटुंब स्वामी जाया स्थानी, लग्नी अथवा कुटुंब स्थानी यावा.

८) शुक्र जाया स्थानी कुटुंब स्थानी अगर लग्नी असावा.

९) सप्तमेश कुटुंबेश यांची युती १-२-४-५-७-९-११ स्थानी होत असेल.

१०) जाया स्वामी व लग्नेश ह्यांची युती १-२-४-५-७-९-११ स्थानी होत असेल.

११) कुटुंब स्वामी व लग्न स्वामी यांची युती १-२-४-५-७-९-११ स्थानी होत असेल.

१२) जाया स्वामी व शुक्र अगर कुटुंब स्वामी व शुक्र यांची युती वरील स्थानी होत असेल.

१३) जन्म काली सप्तम व कुटुंब स्थानी जे ग्रह असतील ते जाया अगर कुटुंब स्थानी येतील.

१४) गुरु २-७ अगर लग्नी भ्रमण करीत असता.

१५) गुरु ज्या वेळी जन्म गुरु, शुक्र, अगर चंद्र ह्यावरुन अगर त्यापासून सातव्या राशीतून जात असता.

१६) गुरु ज्या वेळेस लग्नेश, कुटुंबेश अगर सप्तमेश ह्यावरुन अगर त्यापासून सातव्या राशीतून जात असेल तो काल ‘विवाह संभव काळ समजावा. 

टीप : हे संकलन आहे, प्रत्येकाचे आपल्या पद्धत व अनुभवानुसार मत मतांतरे असू शकतात. श्री. कृष्णराव वाईकर, कै. डॉ. यशवंत शुक्ल, कै. विष्णू नवाथे हे त्यांचे काळातील नामांकित व अनुभवी ज्योतिषी असल्याने त्यांचे विचार उपयुक्त ठरतील या साठी येथे दिले आहेत. विनाकारण वाद घालत बसू नये.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)