Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

वर्ज्य गोष्टी – अनुभविक ठोकताळे


विषय : वर्ज्य गोष्टी – अनुभविक ठोकताळे

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : अचूक निदान (खंड १ ला)

मूळ लेखक : कै. उद्धव विष्णू रुईकर (पंचांग कर्ते)

नमस्कार,

ज्योतिष शास्त्राची व्याप्ती अगदी दैनंदिन आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टींपासून विशिष्ट महत्वाच्या घडामोडी, मुहूर्त ई. बघण्या पर्यंत पसरली आहे. डॉक्टर अथवा वैद्य जसे निरोगी राहण्यासाठी अथवा आजार होऊ नये म्हणून रोजच्या दिनक्रमात काही पथ्ये पाळण्यास सांगतात. तसेच एक जाणकार ज्योतिषी रोजच्या व्यवहारात ग्रह, नक्षत्रे, तिथी यांचे कारकत्व, गुणधर्म ई. नुसार अनुभवातून दरवेळी कुंडली न पाहताही काही गोष्टी वर्ज्य करण्यास सांगून उत्तम दिशा देऊ शकतो. पूर्वीचे जुने जाणते लोक याचा दैनंदिन आयुष्यात खुबीने वापर करत असत. पण आज नवीन पिढीपर्यंत काही माहिती न पोहोचल्याने किंवा एकंदरीतच जीवन शैली बदलल्याने व आधुनिकता वाढल्याने या गोष्टीचे महत्व हळू हळू नाहीसे होत चालले आहे. असो.

असेच काही अनुभविक ठोकताळे व वर्ज्य करावयाच्या गोष्टींचे संकलन येथे देत आहे. अनिष्टता दूर करण्यासाठी व सकारात्मकता व निर्विघ्नता वाढीस लागण्यासाठी या छोट्या छोट्या टीप उपयुक्त ठरतील.

खालीळ गोष्टी वर्ज्य कराव्यात. (टाळाव्यात)

१. रविवारी – तैलाभ्यंग करू नये. स्त्रियांनी न्हाऊ नये.

२. मंगळवारी – स्मश्रू (हजामत) करू नये.

३. बुधवारी – स्त्री-संग करू नये.

४. सूर्यास्तानंतर – रात्री माती, शेण, सरपण, गोमूत्र घरी आणू नयेत.

५. दिवसा – निद्रा करू नये.

६. देव, गुरु, पिता, यांचेकडे व दक्षिण दिशेस पाय करून झोपू नये.

७. प्रतिपदा, षष्ठी, एकादशी या तिथीस तैलाभ्यंग; (न्हाणे) करू नये.

८. चतुर्थी, नवमी, चतुर्दशी – स्मश्रू (हजामत) करू नये.

९. पंचमी, दशमी, पौर्णिमा, अमावास्या स्त्रीसंग करू नये.

१०. सप्तमीस – ताम्रपात्रात भोजन करू नये. तीळ खाऊ नये.

११. अष्टमीस – नारळ, खोबरे वर्ज्य करावे.

१२. नवमीस – भोपळा वर्ज्य करावा.

१३. दशमीस – पडवळ खाऊ नये.

१४. एकादशी – पावटे, वाल, घेवडा, चवळी वर्ज्य करावी.

१५. द्वादशीस – मसुर खाऊ नये.

१६. त्रयोदशीस – वांगी वर्ज्य करावी.

१७. तृतीया, अष्टमी, त्रयोदशी – मांस खाऊ नये.

१८. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावास्या व संक्रांत या दिवशी तेल व मांस यांचे सेवन करू नये.

१९. हस्त, चित्रा, श्रवण या नक्षत्रास तेल वर्ज्य.

२०. मघा, कृत्तिका, तिन्ही उत्तरा या नक्षत्रांवर स्त्रीसंग वर्ज्य.

२१. विशाखा – स्मश्रू करू नये.

टीप : वरील तिथी, वार, नक्षत्रावर ती कृत्ये करू नयेत, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे, तथापि नैमित्तिक कारणाने ते करणे आवश्यक असल्यास हरकत नाही.

एखादा दिवस अनिष्ट चालला असेल, तर त्या दिन स्वामी ग्रहाची अनिष्टता दूर करण्यासाठी खालील गोष्टींचे दान करणे उपयुक्त ठरेल.

१. रवि अनिष्ट असता – गहू, मूळ, ताम्रपात्र यांचे रविवारी पूजन करून संकल्पपूर्वक दान करावे. २. चंद्र अनिष्ट असता – रुपे, मोती, तांदूळ, तूप, पांढरे कापड सोमवारी विधिपूर्वक पूजा करून दान करावे.

३. मंगळ अनिष्ट असता – ताम्रपत्रावर भौमाची प्रतिमा काढून विधीपूर्वक पूजन करावे. मंगळवारी मसुरा, गूळ, तांबडे वस्त्र, ताम्रपात्र यांचे संकल्प करून दान करावे.

४. बुध अनिष्ट असता – कास्यपात्र, मूग, तूप यांचे दान करावे.

५. गुरु अनिष्ट असता – कास्यपात्र, हरभऱ्याची डाळ, साखर, पिवळे कापड याची गुरुवारी पूजा करून दान करावे.

६. शुक्र अनिष्ट असता – तांदूळ, तूप, रौप्य, चित्रवस्त्र, खडीसाखर यांचे शुक्रवारी विधीपूर्वक दान द्यावे.

७. शनि अनिष्ट असता – शनिवारी लोखंड, उडीद, तेल, मीठ, काळे कापड यांची यथाशास्त्र पूजा करून त्याचे यथाशास्त्र दान द्यावे.

८. राहू काळ अनिष्ट असता – शिसे, तीळ, तेल, दान करावे.

९. केतू चा नक्षत्र दिन अनिष्ट असता – पोलाद, तीळ, तेल दान द्यावे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

राहू केतुचे ग्रह युती फळ


विषय : राहू केतुचे ग्रह युती फळ

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : हे तर नक्षत्रांचे देणे (राहू-केतू)

मुळ लेखक : डॉ.रघुवीर खटावकर

नमस्कार,

राहू-केतू हे प्रत्यक्षात ग्रह नसून पात बिंदू असले तरी अगदी वराह मिहीर च्या काळापासून त्यांनी ज्योतिष शास्त्रात महत्वाचे स्थान पटकावले आहे. राहू केतू हे मानवी जीवनावर महत्वाचे परिणाम करणारे घटक आहेत.

मध्यंतरी डॉ. खटावकर यांचे राहू व केतू विषयी समग्र माहिती देणारे एक पुस्तक वाचनात आले. अत्यंत विस्तृत माहिती देणारे हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखे आहे. त्यातील राहू किंवा केतूच्या युतीतील ग्रहांचे निर्माण होणारे फळ याबाबत हे एक छोटेसे संकलन आपल्या समोर ठेवत आहे.

राहू किंवा केतूच्या युतीतील रवी किंवा चंद्र (ग्रहण योग) :

राहू किंवा केतूच्या जवळ ५ अंशावर रवी किंवा चंद्र असेल, तर ज्या स्थानात आहे, त्या स्थानासंबंधी अतिशय अनिष्ट फळे निर्माण करतात. धंदा बुडणे, नोकरी गमावणे, पत कमी होणे ई. अशुभ फले दशम स्थानाशी संबंधित असता मिळतात. तर पंचमस्थानाशी संबंधित असता अनपत्य दोष निर्माण करतात.

चंद्र राहू युती हिस्टेरिया, मानसिक खिन्नता, औदासिन्य, मज्जातंतूचे विकार, फेफरे, वेडेपणा, अतिरेकी स्वभाव अशाप्रकारची फले निर्माण करते.

राहू किंवा केतूच्या युतीतील मंगळ :

राहू किंवा केतूच्या युतीतील मंगळ असणाऱ्या जातकाला जबरदस्त येतो. राग राग आवरता आवरत नाही.

राहू किंवा केतूच्या युतीतील बुध :

राहू किंवा केतूच्या युतीतील बुध न ओळखता येणारे आजार, वेडेपणा निर्माण करतो.

राहू किंवा केतूच्या युतीतील गुरु :

राहू किंवा केतूच्या युतीतील गुरु धर्माची निंदा, हेटाळणी, अवहेलना करण्याकडे पाखंडी वृत्ती निर्माण करते.

गुरू-राहू युतीला चांडाळ योग म्हणतात. गुरू सत्वगुणी, तर राहू तमोगुणी आहे. गुरू राहू परस्परांचे मित्रही नाहीत पण शत्रूही नाहीत. असे असूनही त्यांचे दुष्परिणाम जातकावर होऊ शकतात. गुरू युतीत राहूची फले सुधारतात, पण गुरूची चांगली फळे कमी होतात. गुरू-राहू युती एकावेळी पत्रिकेतील चार स्थानावर परिणाम करत असते. ते ज्या स्थानात आहेत ते स्थान, त्यापासूनचे पाचवे, सातवे व नववे स्थान. यामुळेच पत्रिकेतील ही युती अशुभ समजली जाते. तसेच गुरूच्या अशुभ योगातही राहू अशुभच फळे देतो. गोचरीच्या गुरूचे पत्रिकेतील गुरूवरून भ्रमण किंवा त्या गुरूपासून पाचवा, सातवा, नववा गुरू आल्यावर गुरूची जन्मस्थ गुरूवरील दृष्टी ही नेहमी भाग्यकारक असते. परंतु गुरू राहू युती असताना या युतीवरून गुरूचे भ्रमण किंवा या युतीच्या त्रिकोण राशीतून गुरूचे भ्रमण हे अप्रिय किंवा दुःखद घटना घडवीत असते.  यामुळे एकप्रकारे भाग्यात कमतरता येते.

राहू-गुरू व्यतिरिक्त इतर ग्रहांबरोबर राहू असताना, ही युती ज्या स्थानात आहे त्या स्थानाचे व त्यासमोरील स्थानाचे नुकसान करू शकतात.

राहू किंवा केतूच्या युतीतील शुक्र :

राहू किंवा केतूच्या युतीतील शुक्र विपरीत विषय भावना, मृदू-कोमल भावनेचा अभाव, अभिरुचीची पारख नसणे ई. दोष निर्माण करतो.

राहू किंवा केतूच्या युतीतील शनी :

राहू-शनी युती असता खिन्नता, गुन्हेगारी प्रवृत्ती, आत्मघातकी प्रवृत्ती असते, पण गुरू दृष्ट असता व्यक्ती योगी बनू शकते. राहु-मंगळ-शनी अपघात प्रवृत्ती राहते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)