Category: Uncategorized

रोहिणी नक्षत्र विचार


विषय : रोहिणी नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण रोहिणी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

रोहिणी हे नक्षत्रचक्रातील ४ थे नक्षत्र आहे. या नक्षत्राचे ४ ही चरण वृषभ राशीत येत असल्याने हे नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र आहे. तसेच ते स्थिर उर्ध्वमुखी व अंधलोचनी आहे. नक्षत्रांचे कारकांश वृषभ राशीच्या १० ते २३ २० पर्यंत आहे. इंग्रजी नाव ‘आल्डेबरान’ आहे. या नक्षत्राच्या ४ चरणांवर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्राचे अधिपत्व आहे.

रोहिणी नक्षत्राचा आकार इंग्रजी V सारखा दिसतो. या नक्षत्रात ५ तारे असून यातील मुख्य तारा थोडा लाल आहे. हे ५ ही तारे ठळक असून अतिशय तेजस्वी, सुंदर व उठून दिसणारे आहेत. तारे रंगाने थोडेसे लाल व पिवळसर आहेत. ब्रम्ह या नक्षत्राचे दैवत आहे. राशी स्वामी शुक्र व नक्षत्राचा स्वामी चंद्र असल्याने या नक्षत्रात शुक्राचा मोहकपणा, सुंदरता, कोमलपणा व चंद्राचा आनंदीपणा, लावण्य, शांती यांचा सुरेख संगम दिसून येतो. हे नक्षत्र चंद्राचे अतिशय आवडते असल्याने साहित्यामध्ये चंद्र- रोहिणीचा संबंध दांपत्यासारखा सारखा केलेला आढळतो. महिन्यातून एकदा चंद्र आपल्या लाडक्या रोहिनीशी जवळीक साधून जातो, हे अतिशय विलोभनीय दृश्य दिसते.

रोहिणी या शब्दाचा अर्थ आरोहण असा आहे. या बाबतीत असे सांगितले जाते की, या नक्षत्रातील मुख्य लाल तारका स्वर्गात जाण्यासाठी एकसारखी वरवर चढत गेली म्हणून तिला रोहिणी म्हटले आहे. दुसरी एक आख्यायिका अशी आहे की, रोहिणीच्या सौंदर्यावर लुब्ध होऊन प्रजापतीने हिचा पाठलाग केला म्हणून ती रागाने लाल झाली.  असेही सांगण्यात येते की, रोहिणीचा प्रियकर चंद्राच्या तिच्यावरील उत्कट प्रेमाने ती lajjiत होऊन आरक्त झाली. रोहित शब्दाचा अर्थ लाल असा आहे.

रोहिणी ही शांत व आनंदी आहे. कारण तिचा चेहरा रागाने लाल नव्हे, तर ते लाजून गुलाबी झालेला आहे.

रोहिणी नक्षत्र अतिशुभ, प्रचंड कार्य करणारे व सिद्धी देणारे मानले जाते. आकृती V सारखी म्हणजेच कोणत्याही कार्यात विजय (Victory) मिळवून देणारी आहे. रोहिणी हे असे नक्षत्र आहे, जे शारीरिक, मानसिक व ऐहिक सौख्य आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करते. रोहिणी नक्षत्रावर जन्मलेल्या जातकाचे व्यक्तिमत्त्व शांत, सालस, आनंदी, रसिक, विलासी, विद्वान, चतुर, मधुर भाष्य, संगीत, कलेची  फुलांची व सुगंधी अत्तरांची आवड असणारे, भावनाप्रधान तरी विचारी व विवेकी असते. जातकाची बुद्धी व विचार स्थिर असतात. प्रेम, प्रणय, वाहनसुख व अलंकार ई.साठी रोहिणी नक्षत्र अनुकूल असते. या नक्षत्रावर जन्मणाऱ्यां जातकांचा बांधा सुंदर असतो. हे जातक मध्यम उंचीचे व सशक्त असतात. चेहरा तेजस्वी व मोहक असतो.

पुरुषांपेक्षाही स्त्रियांना रोहिणी नक्षत्र हे खूप चांगले आहे. या नक्षत्रात चंद्र व शुक्र असता ते स्त्रियांना लावण्यवती बनवतात. या स्त्रिया जन्माने अतिशय सौंदर्यवान किंवा श्रीमंत घराण्यातील असू शकतात. जुन्या ग्रंथात रोहिणीचे केलेले वर्णन फार बोलके आहे. एक अतिशय धनवान व भरल्या घरातील, भव्य वाड्यात राहणारी मालकीण, जिचे घर धन धान्य व फळाफुलांनी भरलेले आहे. जिच्या गोठ्यात अनेक गाई-म्हशी आहेत, दाराशी हत्तीची अंबारी डुलत आहे. घरामध्ये सोने-नाणे व अलंकार आहेत. हाताखाली चोकरचाकर आहेत. घरात मुलेबाळे, सासुसासरे आहेत असे केलेले आढळते. आपण हे वर्णन तारतम्म्याने घेणे गरजेचे आहे. आजची आधुनिक रोहिणीही दिसायला सुंदर, बंगल्यात किंवा फ्लॅटमध्ये किंवा सुखवस्तू कुटुंबात राहत आहे. तिच्या दारात सुंदर मोटार आहे. घरात रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन, उंची वस्त्रे व अलंकार आहेत ई.

या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रि जातकांचा बांधा गोंडस असतो. त्या अंगाने भरलेल्या असतात. शरीर मांसल व गुबगुबीत असू शकते. मांड्या, पोटऱ्या, दंड, मनगटे ई. पुष्ट व घाटदार, गोलाकार, चेहरा गाल रुंद, गोल व भव्य, सुंदर व पाणीदार मोठे डोळे, काळे व लांबसडक केस असे असू शकते. रोहिणी नक्षत्राच्या स्त्रियांना उंची वस्त्रे व सोन्याचे दागिन्याची आवड आणि मोह असतो. अंगभर दागिने, पूरक रंगाचे उंची शालू, पैठण्या, साड्या याची आवड असते. खोट्या व कृत्रिम अलंकारापेक्षा सोन्याचे खरे व खुलून दिसणारे भारी अलंकार समारंभात मिरवणे त्या पसंत करतात. साध्या मंगळसूत्राप्रमाणे गळ्यात चपलाहार, मोहनमाळ किंवा मोत्याचा कंठा, कमरेला कमरपट्टा, दंडाला वाकी, हातात घाटदार बांगड्या किंवा तोडे, सोन्याच्या पाटल्या, घड्याळाला सोन्याचा पट्टा, चष्मा असल्यास त्याला सोनेरी फ्रेम, बोटात दोन-तीन अंगठ्या, लांबसडक केसांचा अंबाडा व अंबाड्यावरही भरगच्च अशा दोन-तीन वेण्या अशी स्त्री रोहिणी नक्षत्र जातक असण्याची जास्त संभावना असते.

रोहिणी ही शांत व आनंदी असली पण रोहिणी जातकाना आपल्या रूपाचा फार गर्व असून आपल्यापेक्षा दुसरे कोणी सुंदर नाही असेच वाटते. सहसा आपल्यापेक्षा कमी सौंदर्यवान स्त्रियांत व गरीबवर्गात त्या मिसळणे टाळू शकतात. रोहिणी ही मालकीण आहे. नोकर नाही. स्वतः काम करण्यापेक्षाही हाताखालच्या हुकुम करून नोकराकडून काम करून घेणे हे जातक पसंत करतात. यांना श्रमाचा थोडा कंटाळा असून जरा सुस्त असू शकतात. रोहिणी जातक स्त्रिया ऑफिसमध्ये नोकरीला असतील, तर घरी आल्यावर स्वयंपाक करणार नाहीत. स्वयंपाक, घरकामासाठी असलेल्या नोकरांनी घरी आल्यावर स्वयंपाक तयार ठेवला पाहिजे. नसेल तर बाहेर जेवणे वा बाहेरून पदार्थ मागवणे अशी मानसिकता असू शकते.

रोहिणी नक्षत्राच्या अधिकारात फुलांचे व्यापारी (चाफा, चमेली, मोगरा, गुलाब वगैरे) धनिक शेतकरी, धान्य सोने-चांदी, अलंकार, उंची रेशमी वस्त्रे, अत्तरे, सुगंधी पदार्थाचे व्यापारी, जवाहिरे, गुरेढोरे पाळणारे, दूध-दुभत्याचे व्यावसायिक, सुशिक्षित समाजवर्ग, शेतकीविषयक व भौतिक शास्त्राचे पदवीधर, सिनेमा व नाटकात काम करणारे नटनट्या येतात. हे नक्षत्र रोख पैसा देणारे असल्याने द्राक्षे, मोसंबी, ऊस, चिक्कू, आंबे अशा बागायतीला अनुकूल आहे. कमी कष्टात भरपूर मोबदला हा या नक्षत्राचे फलादेश आहे.

रोहिणी नक्षत्राचा प्रभाव स्वर, गळा व घशावर आहे. या नक्षत्रावरच्या लोकांना फळे, फळांची सरबते, शीत पेये व गोड पदार्थ फार आवडतात. यामुळेच यांना होणारे आजार गळा किंवा घशाचे रोग, सर्दी, कफ, घसा बसणे, सुजणे, घटसर्प, टॉन्सिल वाढणे, पोटात गॅसेस धरणे, हवामानातील बदलामुळे तब्येत बिघडणे, शरीरात साखर उत्पन्न होऊन मधुमेह (उत्तरार्धात) होणे अशा प्रकारचे असतात. परंतु रोहिणी नक्षत्रावर होणारे आजार फारसे दाहक किंवा तीव्र नसून सौम्य पण सारखे उद्भवणारे असतात. या जातकांनी आहार व वागण्यामध्ये नियमितपणा ठेवल्यास व व्यायामाची सवय लावल्यास ठणठणीत राहतील.

सर्वसाधारणपणे या नक्षत्रात बहुतेक सर्वत ग्रह शुभ फळे व थोडे तरी धन देणारे आहेत.

रोहिणी नक्षत्री रवि उत्तम शरीरप्रकृती देतो. धनिक शेतकरी, बागवान, सरकारी अमलदार तसेच मानमान्यता यांना चांगला.

रोहिणी नक्षत्री चंद्र यश, सौंदर्य, शांतता, ऐश्वर्य, रसिकता, व्यापार, शेती, दलाली व वाहनसौख्य चांगले देतो.

रोहिणी नक्षत्री मंगळ शेतीवाडी, जमीनजुमला, दुभती, गुरेढोरे पाळण्यास किंवा वाहन अथवा वस्त्रासंबंधी यांत्रिक कामाचे शिक्षण ई. प्रदान करतो.

रोहिणी नक्षत्री बुध व्यावहारिकपणा, सर्व वस्तूंची विशेषतः धान्य व वस्त्रांच्या व्यापारातील दलाली, किरकोळ व्यापार तसेच चतुरपणा, हिशेबीपणा देतो. शिक्षणासाठीही बुध अनुकूल.

रोहिणी नक्षत्री गुरु उत्तम बुद्धिमत्ता, वाणिज्य व निरनिराळ्या शास्त्रातील उच्च शिक्षण, लेखन, काव्य, सौंदर्य, ऐश्वर्य, मानसन्मान व संसारसुख देतो.

रोहिणी नक्षत्री शुक्र सौंदर्य, भोग, अलंकार, वाहन सौख्य, ऐश्वर्य, विलास, गायन, वादन ई. कला, समाजप्रियता देतो. चंद्र, शुक्र या नक्षत्रात असल्यास या स्त्रि जातकांना हवाई सुंदरी अथवा मॉडेलिंग क्षेत्रासाठी चांगला असतो.

रोहिणी नक्षत्री शनि असता स्थिर बुद्धी, मोठा व्यापारी विशेषतः कापड, धान्य व लॉटरी, कॉन्ट्रॅक्टर तसेच मोठ्या प्रमाणावर शेतीवाडी, जमीन व गुरेढोरे असणारा असतो. शास्त्र, व्यापार अथवा इंजिनिअरिंग शिक्षणासाठी चांगला.

रोहिणी नक्षत्री राहू गावी शेतीवाडी, जमीनजुमला व इस्टेट देतो. तसेच मेंढपाळ अथवा गुरेढोरे व म्हशी बाळगण्यासाठी चांगला असतो. शास्त्रीय तसेच स्थापत्य शास्त्राच्या शिक्षणासाठी अनुकूल असतो. गावात वजनदार व्यक्ती म्हणून नावलौकिक असू शकतो.

रोहिणी नक्षत्री केतू फारसे नाही, पण उत्तम शरीरयष्टी व गरजेपुरते धन देईल.

रोहिणी नक्षत्री हर्षल असता विलक्षण बुद्धी, संशोधक, जरा रसिक, आनंदी व थोडीफार मालमत्ता करणारा असतो.

रोहिणी नक्षत्री नेपच्यून शांत व आनंदी स्वभाव, संगीताची व सौंदर्याची आवड, तसेच साक्षात्कार व ईश्वरभक्ती यांना अनुकूल असतो.

रोहिणी नक्षत्र सुंदर व तेजस्वी असल्याने हस्ताक्षरही मोठे, गोल, वळणदार व सुरेख असते. या नक्षत्रावर २ व ६ या अंकाचे वर्चस्व आहे. आणि रत्न चंद्राचा मोती किंवा शुक्राचा हिरा आहे. नक्षत्र अंधलोचनी असल्याने या नक्षत्रावर एखादी वस्तू हरवल्यास, ती थोड्याच प्रयत्नाने व जवळच सापडू शकते.

मुहूर्त शास्त्रात रोहिणी हे तर महत्वाचे नक्षत्र आहे. मुंजी, विवाह, बारसे, नवीन वस्त्र नेसल्यास किंवा सोन्याचे अलंकार अंगावर धारण करण्यास, अलंकार करावयास देण्यास, नवीन वाहन किंवा सुखसोयीच्या वस्तू विकत घेण्यास तसेच गायन, वादन व कलाकौशल्याची कामे शिकण्यास फारच चांगले. स्थिर नक्षत्र असल्याने पायाभरणी, शिलान्यास, कोनशिला बसविणे, वास्तुशांती किवा गृहप्रवेश, ई कार्यासाठी शुभ असते. ऊर्ध्वमुखी असल्याने शोभादायक कृत्ये, घरावर मजला चढवणे, देवळावर कळस चढवणे ही कार्ये करणेस चांगले. शेतकरी वर्गाला बी पेरण्यास, बागायतदार, फळाफुलांचे व सुगंधी वस्तूंचे व्यापारी यांना नवीन व्यवसाय किंवा दुकान सुरू करण्यास उत्तम.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

सामुदायिक प्राण संकट आणि ज्योतिष


विषय : प्राणघातक सामुदायिक अपघात आणि ज्योतिष

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : फलज्योतिषातील शंका समाधान

नमस्कार,

जेव्हा जेव्हा एखादी दुर्घटना घडते आणि एकाच वेळीं अनेक जण प्राण गमावतात, तेव्हा तेव्हा या सर्वांची कुंडली मृत्यू योग दाखवते का, त्यावेळी त्या सर्वांचे ग्रहयोग बिघडले होते का? ज्योतिषशास्त्राचे यावर काय उत्तर आहे? असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. विशेषतः ज्योतिषशास्त्राची चेष्टा करणारे तर या गोष्टीचे नेहमीच भांडवल करतात. 

याचे उत्तर ज्योतिषी वि. के. फडके यांनी त्यांच्या एका पुस्तकात थोडक्यात पण तर्क युक्त दिले आहे.

मृत्यूचे एकंदर दोन प्रकार आहेत. अपमृत्यू व महामृत्यू. 

यांपैकी अपमृत्यू हा केव्हाही व कुठेही येऊ शकतो. 

महामृत्यू मात्र असा केव्हाही येत नाही. 

प्रत्येकाच्या महामृत्यूची तारीख व वेळ निश्चित असते. त्या तारखेला व वेळेला हा मृत्यू येणारच. मग तुम्ही त्या वेळी अगदी सुरक्षित ठिकाणी एखाद्या गादीवर लोळत असा वा तुमच्याभोवती संरक्षणासाठी दहा-बारा संरक्षक त्या वेळी असोत! त्या मृत्यूला कोणीही थोपवू शकत नाही.

अपमृत्यूचे मात्र तसे नसते. रस्त्याने चालता चालता मागून स्कूटर किंवा रिक्षाची धडक बसली, तर तो मनुष्य त्या वेळी त्याच्या नशिबात महामृत्यू लिहिलेला नसतानाही मृत्यू पावतो. एखादे विमान किंवा जहाज यामधून प्रवास करताना ते विमान पडले किंवा जहाज पाण्यात बुडाले तर त्यातील बहुतेक प्रवासी अपमृत्यूचे बळी ठरतात. 

अशा वेळी त्या प्रवाशांपेक्षा त्या विमानाची किंवा जहाजाची वा वाहनाची कुंडली काम करीत असते, त्या कुंडलीमध्ये तुम्हाला हे योग आढळून येतील.

मला तरी हे विश्लेषण योग्य वाटले. पण या दृष्टीने सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. खरेच त्यात तथ्यांश आढळला, तर अशा वाहनांच्या उत्पादनाची जन्म टिपण पाहून अनिष्ट काळात त्या वाहनाच्या फेरी रद्द केल्या आणि लोकांचा अपमृत्यू टाळता आला तर, याच्या इतके प्राचीन ज्योतिष शास्त्राचा उपयोग करून केलेलं संशोधन सर्वात अभिनव व मानवोपयोगी ठरेल, असे मला वाटते.

आपल्याला काय वाटते?

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

संपर्क : 7058115947

(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

गुप्त धन अथवा अकल्पित धन योग


विषय : गुप्त धन अथवा अकल्पित धन योग

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : जातक निदान

नमस्कार,

माणसाला पूर्वापार गुप्त धन अथवा अकल्पित धन योग, लॉटरी अशा धनाचे थोडक्यात विनाकष्ट मिळणार्या धनाचे नेर्हमीच आकर्षण वाटत आले आहे. आज त्या विषयीच काही माहिती आपण घेणार आहोत. जातक निदान या ग्रंथात सायन व परीभ्रमण पद्धतीने यावर विपुल लिखाण आहे. पण निरयन पद्धतीला देखील हि फळे चपखल बसतात, असे मला वाटते.

जन्मकुंडलीतील २ रे स्थान व ११ वे स्थान स्वतःच्या नोकरी व्यवसाय धंद्याच्या द्वारे, कर्तबगारीने मिळणारा पैसा दर्शवते. परंतु गुप्त धन, अकल्पित धन, लाचलुचपतीतून मिळविलेले पैसे, स्त्री धन, वारसा संपत्ती ई. पाहताना ८ वे स्थानाचे परीक्षण केले पाहिजे. २ रे स्थानापासून हे स्थान ७ वे येते. म्हणजे धनस्थानाची पूर्तता ८ वे स्थान करते. ७ वे स्थानापासून हे स्थान २ रे आहे जे स्त्रीचे धनस्थान आहे. म्हणून स्त्री धन, सासऱ्याकडून मिळणारा पैसा ई. दर्शवते. अष्टमेश सप्तमस्थानी किंवा सप्तमेश भाग्यस्थानी असावा लागतो.

८ वे स्थान मृत्युस्थान मानले जाते. म्हणून मृत्यूपासून, मृत्यूपत्रानुसार मिळणारे पैसे, विमा ई. दर्शवते. एखाद्या नातेवाईकाच्या मृत्यूपासून किंवा सासऱ्याकडून पैसा मिळण्याची शक्यता असते. ह्या पैकी कोणताही ग्रह ८ वे स्थानी स्वगृही असेल अगर मित्रगृही असेल, तर अकल्पित धन मिळण्याची शक्यता जास्त बळावते.

गुरु, चंद्र व शुक्र हे ग्रह गुप्तधन देण्यास समर्थ आहेत. जन्मकुंडलीमध्ये ८ वे स्थानी गुरु, चंद्र व शुक्र हे ग्रह, अष्टमेश २ रे स्थानी व पंचमेश ११ वे स्थानी अशी स्थिती असेल, तर अशा जातकास नोकरीमध्ये विशेष श्रम न करता अथवा लाचखोरीने प्राप्ती होते.

अष्टमस्थानी असणाऱ्या ग्रहावर जर शनि, हर्षल, मंगळ यांचा काटकोन योग अगर प्रतियोग असेल, तर वारसा मिळण्याचे अगर अकल्पित धनलाभाचे कामी अडथळे येतील व वारसाची पूर्ण रक्कम अगर संपूर्ण इस्टेट मिळणार नाही. शनि, हर्षल, मंगळ यांपैकी एखादा ग्रह अष्टमातील ग्रहांशी युतित असेल व ती युति स्वगृही अगर मित्रगृही नसेल, तर त्या योगाचा नाश होईल व ही युति अनुकूल राशीत असेल तर वारसा, धन वगैरे मिळेल; परंतु पुष्कळ संघर्षाने मिळेल.

गुरु-चंद्राची युति अगर चंद्र-शुक्राची युति अष्टम स्थानी असेल तर अकल्पित द्रव्यलाभास फार उत्तम असते. या योगावर कोणत्याही ग्रहाची अशुभ दृष्टि नसेल, तर मात्र लॉटरीमध्ये मोठे घबाड हाती लागण्याचा संभव असतो. स्वगृहीचा अगर उच्च राशीचे गुरु, चंद्र, शुक्र हे लॉटरीचे बाबतीत फार अनुकूल असतात.

हे ग्रह केव्हा फल देतील हे फार महत्त्वाचे असते.

अष्टम स्थानी गुरु असेल तर त्याचे फल १२, २४, ३६, ४८, ६० ह्या वर्षी मिळू शकते.

शुक्र असेल तर ८, १६, २४, ३२, ४०, ४८, ५६ ह्या वर्षी मिळू शकते.

शुक्र असेल तर प्रत्येक चवथे वर्षी तसा योग येईल. (चंद्राचा परिभ्रमण योग चार वर्षांचा आहे)

अष्टम स्थानी राहू, केतू असणे गुप्त अगर अकल्पित द्रव्यलाभास फार वाईट. राहू येथे मिथुन राशीचा असेल तर मात्र बरा. इतर राशीचा राहू असेल तर अकल्पित लाभाचे आलेले योग नाहीसे होतील. अष्टम स्थानी राहू असता स्त्री धन मिळण्याची मुळीच आशा नाही.

अष्टम स्थानी केतू असणे दारिद्र्य योग आहे.

अष्टम स्थानी बलहीन अगर अशुभ दृष्टियोगात असलेला शनि गुप्त धन देणार नाही. शनि बलवान असेल तर शेतीचा वारसा मिळेल. बलहीन शनि वृद्धापकाळी दारिद्र्य देईल. स्वतःचे जीवित दुसऱ्यावर अवलंबून असेल.

अष्टम स्थानी मंगळ गुप्त धनास प्रतिकूल. अशा लोकांनी लॉटरीची तिकिटे घेऊ नयेत.

अष्टम स्थानी कन्या अगर मिथुन राशीचा बुध अकल्पित द्रव्यलाभास फार चांगला असतो. स्त्रीधन वगैरे मिळतेच, परंतु सट्ट्याच्या व्यापारात फायदा होतो.

अष्टम स्थानी हर्षल अशा कामास मुळीच अनुकूल नाही. येथे हर्षल मकर, कुंभ अगर मीन राशीच्या जोरदार ग्रहांच्या दृष्टित असेल तर लॉटरीमध्ये अकल्पित लाभ होईल, कोणा नातेवाईकाच्या अकस्मित मृत्यूमुळे फायदा होईल; परंतु सर्वसाधारणपणे हर्षल प्रतिकूल समजावा.

हर्षल अष्टम स्थानी असताना व तो हर्षल शुभदृष्टि संबंधात असेल तर वारसा वगैरे मिळण्याचा संभव असतो. अनपेक्षित लाभ होतील; परंतु हर्षल हा ग्रह विलक्षण गुणधर्माचा असल्याने चांगली अगर वाईट फले केव्हा मिळतील हे निश्चित नसते. अष्टमेश हर्षल असता (अष्टमात मीन राशि असेल तर) अगर अष्टमात हर्षल असता असा प्रसंग येतो, त्यात धोका होण्याचा संभव असतो. त्याप्रमाणेच अशा लोकांनी भांडणाच्यामध्ये जाऊ नये अगर दंगा असलेल्या ठिकाणी देखील जाऊ नये.

नेपच्यून ह्या ग्रहाचा संबंध अष्टमस्थानी असता अकल्पित धनलाभाचा योग येत नाही; परंतु एखादे वेळी असा योग दुसऱ्या ग्रहामुळे आल्यास दुसरा कोणीतरी कपट करून अगर विश्वासघात करून पैसा लाटेल. अष्टमस्थानी नेपच्यून असताना केमिस्ट अगर ड्रगिस्टकडून औषधे घेताना काळजीपूर्वक घ्यावीत. औषधामध्ये प्रामाणिक चूक होऊन प्राण गमविण्याची पाळी येते.

वार्षिक कुंडलीमध्ये जेव्हा रवि, शुक्र, गुरु जन्मतः अष्टम स्थानी असलेल्या ग्रहांशी शुभ योग करतील तेव्हा अकल्पित द्रव्यलाभाचे जन्मत: असलेले योग उत्तेजित होतील.

अष्टम स्थानी रवि अकल्पित द्रव्यलाभास अनुकूल नाही. मात्र इतर ग्रहांमुळे होणारे गुप्त धनयोग रविमुळे भंग पावणार नाहीत.

अष्टमस्थानी चंद्र असून तेथे रवि असेल तर चंद्राचे योगात जास्त भर पडेल.

तसेच रवि, गुरु, शुक्र यांचे समजावे.

अष्टम स्थानातील शुभ ग्रहांशी मंगळाची युति धनयोग भंग करील. युतीच्या गुणधर्माप्रमाणे अनुकूल अगर प्रतिकूल युतीचे निदान करावे.

अष्टमेशावर कोणत्याही ग्रहाची पापदृष्टि असेल तर वारसा वगैरे मिळणार नाही. पापदृष्टि एखादी परंतु शुभदृष्टियोग फार बलवत्तर, तर तसे योग थोड्या प्रमाणात येतील. सरकारी नोकरीत लांचलुचपतीपासून द्रव्य मिळविणाऱ्या लोकांच्या कुंडलीत जन्मतः, चंद्र अगर शुक्र अष्टम स्थानी असतो तो कोणत्याही राशीचा असला तरी चालेल; पैसा मिळेलच. राशिबली असला तर जास्त पैसा मिळेल. ह्या ग्रहांवर हर्षल, रवि, मंगळ यांची अशुभ दृष्टि विशेषतः काटकोनयोग असून शनि ९,१०, १२ वे स्थानी असेल तर मात्र अशा लोकांनी फार जपून असावे. त्यांचेवर चौकशी होऊन खटले होतील.

चंद्र-शुक्रावर अशुभ दृष्टि नसेल तर मात्र असा द्रव्ययोग चांगला पचनी पडेल.

अष्टमेश रवि असून वर सांगितलेल्या स्थानी शुभ दृष्टि असेल तर वारसा दजनि आपल्यापेक्षा जास्त असलेल्या नातेवाईकांकडून मिळेल व तो नातेवाईक वडिलांच्या बाजूचा आपल्या कुळातील पुरुष असेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी की, अष्टमेश म्हणून ह्या रविला काही महत्त्व नाही. त्यामुळे वारसा वगैरे मिळण्याचा फारसा संभव नसतो. अष्टमेश रवि बलिष्ठ असेल तर सासरा मोठ्या दर्जाचा मिळून त्याचेकडून रोख प्राप्ती होते. वारसा वगैरे मिळत नाही किंवा उद्योगधंद्यामध्ये चांगले भागिदार मिळून त्यात पैसा मिळतो. हा योग वयाचे १९ अगर ३८ ते ४२ वर्षेपर्यंत येईल.

अष्टमेश चंद्र असून बलिष्ठ नसेल, तर वारसा, लॉटरीत पैसा वगैरे मिळण्याचा फारसा संभव नाही. नोकरीमध्ये बक्षिसाच्या रूपाने काही पैसा मिळेल. सार्वजनिक संस्थेच्या बाबतीत फायदा होईल. सार्वजनिक हिताची कामे हाती येऊन त्यामध्ये फायदा होईल. असा योग असता तो २०, २४, ३०, ३६, ४०, ४४ वर्षी येईल.

अष्टमेश बुध ‘असेल तर ह्या बाबतीत तो मुळीच अनुकूल नाही. स्त्रीधन वगैरे मिळणार नाही. पैशासंबंधी नेहमी अडचणी येतील. बुध बलिष्ठ असेल तर एखाद्या इस्टेटीचे ट्रस्टी वगैरे नेमण्यात येईल व त्यामध्ये थोडी प्राप्ती होईल. अष्टमेश बुध अष्टम स्थानी असल्यास अकल्पित प्राप्ती होईल.

अष्टमेश शुक्र असेल तर धनाचे कामात उत्तम. त्याच्या योगाने केव्हातरी आयुष्यात वारसा अगर अकल्पित द्रव्यलाभ होण्याचा योग असतो. स्त्री चे नातेवाईकाकडून पैसा मिळेल. मृत्यूपत्राद्वारे अकल्पित धनलाभ होईल, अगर एखादी इस्टेट मिळेल. जेव्हा जेव्हा जन्मशुक्राशी वार्षिक कुंडलीतील ग्रह शुभ दृष्टियोग करतील तेव्हा तेव्हा चांगलाच फायदा होईल. लॉटरीमध्ये पैसा मिळेल. उद्योगधंद्यामध्ये कल्पनेबाहेर लाभ होतील. शेवटचे दिवस शांततेमध्ये जातील. अपघात, धोका वगैरे होण्याची भीति नसते. शुक्राचे परिभ्रमण आठ वर्षांनी असल्यामुळे १६, २४, ३२, ४०, ४८ ही वर्षे फार महत्त्वाची जातील. ह्यावेळी सांपत्तिक स्थितिमध्ये काहीतरी अनुकूल परिस्थिती प्राप्त होईल..

अष्टमेश मंगळ असेल तर वारसा, लॉटरीत पैसा वगैरे मिळण्याची आशा करू नये. तसा योग व्यावहारिकदृष्ट्या असला तरी प्रत्यक्ष वारसा हाती असल्याखेरीज ह्याची खात्री वाटत नाही. मंगळ अतिशय बलिष्ठ असेल तर नातेवाईकाकडून जमिनीच्या रूपाने थोडासा वारसा मिळेल. परंतु पुष्कळ वेळा अष्टमेश मंगळ असता खोटी आशा लावतो. शेवटी ती आशा केव्हाही सफल होत नाही. अष्टमेश मंगळ असता रेल्वे, मोटार अगर सार्वजनिक वाहनांसंबंधी अपघात होण्याचा संभव असतो. मंगळ बलिष्ठ असता थोडासा वारसा मिळण्याचा संभव वयाचे ३० ते ४५ ह्या वर्षी असतो.

अष्टमेश गुरु बलिष्ठ असेल तर ह्या सर्व बाबतीत फार उत्तम असतो. मृत्यूपत्राद्वारे इस्टेट मिळते. नातेवाईकांकडून फायदा होतो. भागिदार अगर कुटुंबाच्या नातेवाईकांकडून फायदा झालाच पाहिजे असा हा योग आहे. हा योग असा आहे की, त्याच्या योगाने प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रीतीने फायदा होतोच. ज्याला नशीब अगर चान्स म्हणतात ते अनुकूल असते. सरकारी नोकरांच्या कुंडलीत असा योग असता असा अनुभव आला आहे की, एखादा मनुष्य सिनिअर वगैरे नसता एखाद्या हंगामी जागी नेमला जातो. काही अडचणीमुळे कायमचा मनुष्य रुजू होऊ शकत नाही. तेव्हा हा मनुष्य त्याचा हक्क नसतानाही त्या जागी पुष्कळ दिवस राहू शकतो किंवा सिनिअर माणसाच्या अकाली मृत्यूमुळे त्याचा फायदा होतो. दुसऱ्याच्या नुकसानीने स्वतःचा फायदा होणे हा ह्या योगाचा मुख्य धर्म आहे. सर्व ग्रहांमध्ये ह्या बाबतीत अष्टमेश म्हणून गुरूला जास्त महत्त्व आहे. शेवटचे दिवस शांततेमध्ये जातील. गुरूची परिभ्रमण वर्षे २४, ३६, ४८, ६०.

अष्टमेश रवि असेल तर या बाबतीत फायदा होणार नाही. निराशा व आशाभंग होईल. दुसऱ्याकडून पैसे मिळण्याची केव्हाही आशा धरू नये. स्त्रीधन मिळणार नाही. उलट स्त्री गरीब घराण्यातील मिळेल. व्यापारधंद्यामध्ये भागिदार चांगले मिळणार नाहीत. शनि अष्टमेश असताना एकच फायदा असतो तो हा की, मनुष्य पुष्कळ वर्षे जगतो व आपल्या आयुष्यातील बऱ्यावाईट कृतींचा विचार करण्यास त्यास भरपूर वेळ मिळतो. शेवटचे दिवस थोड्या विवंचनेत जातात. खिचपत पडणाऱ्या आजाराने शेवट होतो.

सट्टे, जुगार, शर्यती यांचा विचार ५ वे स्थानावरून होतो. पंचमेश ५, ९, ११, १, ३ रे स्थानी शुभ दृष्टिमध्ये असेल, तर अशा बाबतीत पैसा मिळण्याचा संभाव असतो. पंचमेश रवि, मंगळ, गुरु असेल तर अनुकूल असतात. रवि, गुरु यश देतील. मंगळ धाडस देईल, परंतु त्यांत अविचार असेल. शनि, हर्षल, नेपच्यून, बुध हे पंचमेश असून शुभ संबंधित असतील तर साधारण फायदा होईल. मात्र हे ग्रह पंचमेश असून कोणत्याही ग्रहांचे अशुभ दृष्टिसंबंध असतील तर ह्या योगावर जन्मलेल्या लोकांनी सट्टे, जुगार, शर्यती यात नुकसान होईल. शुभ ग्रहांचा अशुभ दृष्टियोग असेल तर नुकसान येईलच परंतु ते ऐपतीबाहेर नसेल. परंतु अशुभ ग्रहांचा दृष्टियोग होईल तर अशा जातकास खूप नुकसान संभवते. हर्षल पंचम स्थानी असल्यास सट्टे, शर्यतीचा नाद जरूर लागतो व त्याचा परिणाम हर्षल मकर, कुंभ, तूला राशीचा नसेल अगर त्यावर रवि-चंद्राचा शुभयोग नसेल तर फार वाईट होईल. इतर वेळी हर्षल, पंचमस्थानी जुगार, सट्टे, शर्यती यास बरा असतो. स्वभाव धाडसी असतो. पंचमस्थानी चंद्र शुभ राशीचा व अशुभ दृष्टिरहित असेल तर सट्टे वगैरे मध्ये चांगली प्राप्ती होईल. मात्र चंद्र पंचमस्थानी असता जुगाराचा नाद फार लागतो. ज्यामध्ये धोका आहे अशा धंद्याकडे लक्ष जाते व पंचमस्थानी चंद्र असलेले लोक अनेक धंदे हाती घेतात.

सट्टे, शर्यती ई. गोष्टी करताना वार्षिक कुंडलीमध्ये रवि-शनि, शनि-हर्षल, रवि-हर्षल, मंगळ-हर्षल यांचे एकमेकांशी त्या वर्षी अशुभ योग नसावेत, ज्या महिन्यात या गोष्टी करावयाचे असतील त्यावेळी चंद्राचा मासिक अशुभ योग नसावा. गुरु अगर शनि गोचर पद्धतीने अशुभ नसावेत व साडेसातीचे अनिष्ट वर्ष नसावे. ज्या दिवशी सट्टे, शर्वती, फरक बगैर कामे करावयाची असतील त्या दिवशीचा चंद्र पंचमेशाशी शुभ योग करीत असावा.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

देव आणि दानव आणि मानवांचे प्रदेश


विषय : देव आणि दानवांचे आणि मानवांचे प्रदेश

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : कौस्मिक लौज इन मेटा फिजिक्स

नमस्कार,

आपल्या बोलण्यात काही शब्द इतक्या सहजपणे येतात, पण त्यांची व्याप्ती आपल्याला माहित नसते.

उदा. या.. या भूतलावर आहात का आपण. व्यवसायात अगदी रसातळाला गेला तो. जास्त आवाज करू नकोस पाताळात गाडीन तुला. स्वर्ग दोन बोटे उरलेय मला. ई. तर आज आपण त्याच तळाबद्दल माहिती घेणार आहोत जिथे देव आणि दानव आणि मानव राहतात.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमची संकल्पना सर्वत्र ज्ञात आहे. मेटाफिजिक्स (तत्व मीमांसा शास्त्र) मध्ये स्पेक्ट्रमला संपूर्णत: ओम म्हणतात. ओम हा अनंताच्या ज्ञानेंद्रियांचा ध्वनी आहे. हा एक तीन पदरी लहर किंवा प्रवाह आहे. हा वारंवारितेच्या माध्यमातून, माहिती तसेच अंगभूत साधन म्हणून कार्य करतो.

हे सर्वज्ञात आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर, विशिष्ट वारंवारता श्रेणीला प्रकाश समजला जातो, दुसरी श्रेणी ध्वनी बनते, तिसरी स्पर्श बनते….. अशा प्रकारे या स्पेक्ट्रमवरील फ्रिक्वेन्सी द्वारे आपल्याला प्रकाश, ध्वनी, स्पर्श, चव ई. इंद्रिय ज्ञान होते. ,

याचे कारण आपल्यासाठी, उत्क्रांतीच्या या स्तरावर ही आपल्या अस्तित्वाची धारणात्मक जाणीव आहे. आपल्या आकलनाची श्रेणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळी आहे. त्याचप्रमाणे अब्जावधी आकाशगंगा असलेल्या आपल्या विश्वाची या अनंत शाश्वत ओम स्पेक्ट्रमवर विशिष्ट वारंवारता (फ्रिक्वेन्सी) श्रेणी आहे. या सार्वत्रिक श्रेणीमध्ये, सर्व आकाशगंगा कार्यरत आहेत. प्रत्येक आकाशगंगेची वेगळी विशिष्ट वारंवारता (फ्रिक्वेन्सी) श्रेणी असते. आकाशगंगेमध्ये सर्व नक्षत्र कार्यरत असतात. परंतु या श्रेणीमध्ये प्रत्येक नक्षत्राची देखील एक विशिष्ट श्रेणी असते.

मेटाफिजिक्स (तत्व मीमांसा शास्त्र) नुसार प्रत्येक अणू त्याच्या वारंवारतेमध्ये अद्वितीय आहे, जरी ती श्रेणी अणू कार्य करत असलेल्या क्षेत्रात येते. ज्या फ्रिक्वेन्सीजला आपण सकारात्मक लहरी आणि नकारात्मक लहरी म्हणतो त्या सापेक्ष असतात. त्यांची सकारात्मकता किंवा नकारात्मकता एका विशिष्ट अवस्थेच्या संदर्भात असते

उदा. ४ मीटर लांबीचा चुंबक रॉड घ्या. त्याचा तटस्थ मध्य बिंदू (न्यूट्रल पॉइंट) दोन्ही टोकांपासून २ मीटर अंतरावर आहे. समजा तो ३ मीटर लांब तुकडा कापला आहे. त्याचा तटस्थ मध्य बिंदू (न्यूट्रल पॉइंट) दोन्ही टोकांपासून २ मीटर अंतरावर असेल. त्यामुळे चुंबकीय श्रेणी तुकड्याच्या लांबीनुसार समायोजित केली आहे.

सकारात्मक आणि नकारात्मक हे शब्द एकतर स्थिती किंवा काळाच्या संबंधात सापेक्ष आहेत. आज आपली पृथ्वी अवकाशाच्या सुरुवातीच्या काळात सोबतच्या आकृतीप्रमाणे पृथ्वी A वर ज्या सकारात्मक लहरींवर होती त्यापेक्षा जास्त सकारात्मक श्रेणीवर आहे. पण G प्रतल असेल त्यापेक्षा ती नकारात्मक श्रेणीवर आहे.

विषुववृत्ताच्या उत्तरेकडे पृथ्वी सकारात्मक आहे, तर विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे ती नकारात्मक आहे. पौराणिक कथांनी याचा उल्लेख आहे की, देव उत्तर गोलार्धात आणि असुर दक्षिण गोलार्धात राहत होते.

या लेखात आपण देव आणि दानवांच्या संदर्भात उल्लेख करत आहोत.

आपल्या पृथ्वीच्या अस्तित्वासाठी पृथ्वीने आपला प्रवास A या पृथ्वीच्या आदिम प्रतालापासून सुरू केला. सध्याचे प्रतल D मध्यभागी आहे. हा आपला भौतिक, वर्तमान पृथ्वी ग्लोब आहे. हे वर्तुळाने वेढलेले आहे. हे वर्तुळ भौतिक प्रतलचे प्रतिनिधित्व करते. हे भौतिक प्रतल अजून एका वर्तुळाने वेढलेले आहे. हे सूक्ष्म प्रतल आहे. पुढील दोन वर्तुळे इथर चे प्रतल आणि आदिम प्रतल दर्शवतात.

तुमच्या लक्षात येईल की भौतिक पृथ्वीच्या विषुववृत्ताने या चक्रांना दोन भागांमध्ये विभागले आहे. खालचा अर्धा नकारात्मक आहे. वरचा अर्धा भाग सकारात्मक आहे.

पृथ्वीच्या उत्क्रांतीसाठी वैश्विक योजनेद्वारे एक विशिष्ट श्रेणी निश्चित केली गेली. ही श्रेणी तात्पुरती निश्चित केलेली श्रेणी आहे. ही पृथ्वीसाठी वैश्विक मनाने कल्पना केलेली एक संभावना आहे.

वास्तविक हा सौरमालेचा एक भाग आहे. म्हणून पृथ्वीची श्रेणी सौर वारंवारता श्रेणीच्या श्रेणीमध्ये येणे आवश्यक आहे. आदिम प्रतलाने पूर्वी सर्व प्रतलांना व्यापून टाकले होते. बाह्य वर्तुळ सुर्ष्टी क्षेत्राचा पडदा आहे. संस्कृतमध्ये त्याला विराट म्हणतात. ब्रह्मांड प्रकट स्थितीत येईपर्यंत हा पडदा राहतो. पृथ्वीचा, किंवा आकाशगंगेचा मृत्यू/नाश याचा या प्रतलांवर परिणाम होत नाही.

पृथ्वीचा प्रवास नकारात्मक टोकापासून सुरू होतो. नकारात्मक अर्ध्या भागांमध्ये तीन प्रतल असतात. प्रत्येक प्रतलात सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन टप्पे असतात. त्यांना प्रदेश किंवा भुवन म्हणतात.

प्राचीन गूढ नोंदींमध्ये खालची सात प्रतले “ताळ” म्हणून ओळखली जातात.

वरच्या सात प्रतलांना लोक (उच्च जग) असे म्हणतात.

एकत्रितपणे त्यांना १४  भुवन म्हणतात.

पहिल्या फेरीत किंवा पहिल्या आणि दुसऱ्या मन्वंतरात पृथ्वी ही आदिम समतल आहे. अताळा, वेताळा येथून प्रवास करत होती.

जस जसे एकेक प्रतल पार करू तसे त्या प्रदेशाचे रक्षण केले जाते आणि त्यांची देखरेख उच्च प्रतलीय प्राणी करतात. ते त्या प्रदेशांच्या वातावरणासाठी आणि उत्क्रांती स्थितीसाठी योग्य असलेल्या वंशांचे वस्ती करतात. पृथ्वीची प्रदक्षिणा सुतला आणि महातळामधून जाते.

तिसरी फेरी तळताळा, रसातळा आहे.

चौथी फेरी जे भौतिक प्रतलात आहे. पृथ्वीचा पाताळ नावाचा एक खालचा ताळ आणि भुताळ वा भूलोक नावाचा एक वरचा ताळ आहे. विषुववृत्ताच्या वर ती सकारात्मक आहे विषुववृत्त खाली ती नकारात्मक आहे.

पाचवी फेरी भुवर आणि स्वर्ग लोक मधून आहे.

सहावी फेरी महर आणि ज्ञान लोक मधून आहे.

सातवी फेरी तपोलोक आणि सत्य लोक मधून आहे.

अटाळ, काळा रंग आहे. वेताळ पांढरा आहे, सुताळ पिवळा आहे, महाताळ गुलाबी आहे, तलताळ खडकाळ रंगाचा आहे, रसाताळ खडकाळ आहे, पाताळ सोनेरी आहे.

(टीप:- ताळाच्या क्रमाबाबत पुराणांमध्ये मत मतांतरे आहेत. हा क्रम आचार्य मौर्या व आचार्य कुटुंबी यांनी अनुमोदन दिलेल्या ब्लावात्स्कीच्या आवृत्तीवर आधारित व सिद्ध आहे.)

विराट विश्वाच्या सर्वात बाहेरील पडद्यापासून खालचे टोक मयासुराचा मुलगा बळी याने संरक्षित केले आहे.

विताळाचे शंकर महादेवाने रक्षण केले आहे.

सुताळ हे विरोचनाचा मुलगा बाली याच्या हाती आहे. विष्णी हा या ताळाचा द्वारपाल आहे.

महाताळाचे रक्षण विष्णूचे प्रसिद्ध भक्त माया असुर करत आहे.

तलताळ चे रक्षण कद्रूच्या मुलाने केले आहे. कृहक, सुषेणा, तक्षक हे साप तेथे आहेत (हे खरं तर एका प्रकारच्या उर्जेवर अधिपती आहेत जी निसर्गात सूक्ष्म आहे.)

रसातळामध्ये सूक्ष्म आहे. तेथे सूक्ष्म प्राणी राहतात.

दैत्य, दानव, म्हणजे दानव ई. पाताळ येथे राहतात. पाताळ म्हणजे भौतिक वातावरण आणि

खोल समुद्रतळांवर नाग असतात. रहिवासी वासुकी हा नागांचा प्रमुख आहे

त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये पृथ्वी उंच लोकांमधून जाईल.

वर्तुळाच्या खालच्या बाजूने अताळ + विताळ आणि वर्तुळाच्या वरच्या बाजूने सत्य + तपोलोका म्हणजे सत्.

हे अनंत अस्तित्व आहे.

प्रत्येक ब्रह्मांड एक विराट पडदा स्वतःभोवती गृहीत धरते. हा पडदा ब्रह्माच्या विचारशक्तीने तयार केला आहे – (एक विलक्षण लांब पल्ल्याची चुंबकीय सार)

हे ताळ, लोक सर्व आकाशीय पिंडांसाठी अस्तित्वात आहेत. येथे आपण पृथ्वीबद्दल बोलत आहोत म्हणून आपण केवळ पृथ्वीच्या दृष्टीने त्याचे वर्णन करू.

वर्तुळाच्या खालच्या बाजूने सुताळ + महाताळ आणि वर्तुळाच्या वरच्या बाजूने ज्ञान +महार्लोका हे पृथ्वीच्या अवकाशातील प्रवासाचे निश्चित लक्षण दाखवते. उत्तर प्रतलात ते ध्रुवीय प्रदेशाच्या वर विस्तारते व दक्षिणेकडे ते दक्षिण ध्रुवीय ग्रहणाच्या खाली विस्तारते. ही पृथ्वीवासीयांच्या दृष्टिकोनातून एक सामरिक स्थिती आहे. खगोलशास्त्रीय भृगु किंवा मायासुर.सारख्या द्रष्ट्यांद्वारे या प्रतलामधून संदर्भ तपासले जातात.

भृगु त्याच्या ज्योतिषविषयक ज्ञानासाठी प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे खगोलशास्त्रीय योगदानासाठीही. मयासूर भारतीयांना सुप्रसिद्ध आहे. कारण खगोलशास्त्रीय ज्ञान सुमारे २१ लाख वर्षांपूर्वी लंका शहरात सुपूर्द करण्यात आला होता (सूक्ष्म सभ्यता वाढत होती….) ज्याचे अक्षांश आणि रेखांश शून्य मानले गेले होते.

वैवस्वत मनूने ते त्याला दिले, खगोलशास्त्रीय संग्रहामध्ये पारंगत होता.

मायासुर मूळचा असुर होता. शुक्राचार्यप्रमाणेच , ते देखील बाह्य-पार्थिव प्राणी होते.

म्हणून सर्व असुर आणि राक्षस हे भूत नाहीत. या साखळ्या आहेत, ज्या सूक्ष्म होत्या. मन्वंतराच्या शेवटी ग्रह निष्क्रिय अवस्थेत जातो. हे अस्पष्टता म्हणून ओळखले जाते. मन्वंतराच्या काळातही असे अस्पष्टतेचे अल्प कालावधी असतात. तेव्हा पृथ्वीवरील वस्ती विरघळण्याच्या अवस्थेत असते. पृथ्वी ई. ओसाड भासते अशा काळात खालच्या आणि उच्च प्रदेशातील प्राणी सुट्टीसाठी पृथ्वीवर येतात.

मया पृथ्वीवर अनेक वेळा आला होता. सहाव्या फेरीत त्याच्या एका भेटीत त्याने उच्च लोकामधून एक अप्सरा हेमा पाहिली. तो तिच्या प्रेमात पडला. त्याने तिच्याशी लग्न केले आणि तिच्यासाठी एक महाल बांधला. तिची मुलगी मंदोदरीने नंतर महाबलाढ्य रावणाशी लग्न केले. रामाच्या काळात हनुमानाचा या महालात सामना झाला, जेव्हा तो सीतेचा शोध घेत होता.

मायाच्या अलीकडील भेटीची नोंद सुमारे ३०००  वर्षांपूर्वी झाली होती. पांडवाने खांडववनाच्या आगीतून त्यांचे रक्षण केले. मायाने त्यांच्यासाठी एक अप्रतिम राजवाडा बांधला. मायाभवन.

सुतलाचे रक्षण विष्णूने केले आहे ज्याने स्वतःला विरोचना-बालीच्या राजवाड्यात द्वारपाल बनण्याचा प्रस्ताव दिला.. हे प्रतीकात्मक आहे. सुताळ येथे आणि ज्ञान लोकामध्ये प्राण्यांना कोणतीही जाणीव नसते. ही विभेदित जीवाची जाणीव आहे. इतर सर्व विद्याशाखा सुप्त आहेत. सुताळामध्ये विद्याशाखा सुप्त असतात कारण ते विकसित होत नाहीत.

ज्ञानलोकामध्ये अतींद्रिय स्थितीची प्रक्रिया म्हणून विद्याशाखा सुप्त असतात. अशाप्रकारे विष्णूची विशेष स्थिर शक्ती सावध रक्षित आहे.

रसाताळ + तलताळ, आणि स्वर्गलोक + भुवरलोक सूक्ष्म प्रतल आहेत.

बहुतेक देव आणि दानव येथे राहतात. हा प्रदेश प्राण ऊर्जेने चैतन्यमय आहे. हे उच्च प्रतल ध्रुव तारा आणि सूर्य यांच्यामध्ये आहे

या प्रतलाला बार्डो काळात पृथ्वीवरील प्राणी भेट देत असत. खालील प्रतल हे स्वर्ग किंवा उच्च प्रतलापेक्षा कमी नाहीत.

नारदांना सुसंस्कृत ताळ प्रतलातील सौंदर्य, समृद्धी, सुखसोयींचा इतका लळा लागला होता, की त्यांनी त्यांस इंद्राच्या स्वर्गलोकापेक्षा श्रेष्ठ घोषित केले. प्राचीन गूढ नोंदी त्याच्या आवृत्तीला समर्थनच देतात.

अ) ते कमी स्पंदनात्मक सूक्ष्म आणि इथरीय प्रतलावर आहेत.

ब) त्यांचे सुख अत्यंत भौतिक असतात तर स्वर्गसुख मानसिक असतात.

देवांचे आयुष्य जास्तीत जास्त एका मन्वंतराचे असू शकते. (म्हणजे पृथ्वी ग्रहाच्या १/१४ एवढे आयुर्मान). रसातळा आणि तलतळा येथे राहणार्‍या दैत्य, राक्षसांच्या बाबतीतही असेच आहे.

महर्लोकाच्या वर राहणार्‍या प्राण्यांचे आयुर्मान आणि

खाली महातळा रहिवाशांचे आयुर्मान = पृथ्वीवरचे आयुष्यमान.

सत्य लोकावरचे आयुर्मान = 100 ब्रह्म वर्षे.

भौतिक पृथ्वीच्या प्रवासात एकाच वेळी लोक आणि ताळ असणे अद्वितीय आहे. संवेदना आणि मानसिक/अध्यात्म. भौतिक प्रतलात अनेक ठळक बिंदू असतात. या प्रतलात सर्वोच्च दैवी चेतनेपेक्षा वरचे पाहिले जाऊ शकते, त्याचप्रमाणे सर्वात खालच्या क्रूडपेक्षाही कमी, कामुकता येथे आढळू शकते. मनुष्य सैतानालासुद्धा त्याच्या सैतानी कृत्यांमध्ये लाज वाटू शकेल असे वागू शकतो. या प्रतलाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ही कर्मभूमी आहे. ही भोगभूमी नाही.

याचा अर्थ इतर परतले उत्क्रांतीच्या प्रगतीसाठी कालबद्ध आहेत. देव त्यांच्या सर्व दैवी कार्यांसह उत्क्रांत होऊ शकत नाहीत, कारण तेथे कर्मभूमी नाही.

जर त्यांना आणखी विकसित व्हायचे असेल तर त्यांनी स्वतःला भौतिक स्तरावर उघड केले पाहिजे, आणि नंतर नवजात शक्तीसमोर संपूर्ण शरणागतीची कृती त्यांना उत्क्रांत करण्यास प्रवृत्त करेल. कोणतेही सकारात्मक किंवा नकारात्मक कर्म खेचण्याच्या पलीकडे अस्तित्व

 जाऊ शकत नाही.

केवळ ईश्वरावर अवलंबून राहून सकारात्मक आणि नकारात्मक परिस्थिती स्वीकारणे याला अध्यात्म म्हणतात. बाकीच्या दोन मनोवृत्ती बंधनकारक आहेत. सकारात्मक कृतींमुळे आनंद मिळतो, यश मिळते पण उत्क्रांतीच्या शिडीवर ते स्थिर होते. नकारात्मक कृतींमुळे दु:ख, दुर्दैव, अडथळे येतात, अनेकदा संवेदना नष्ट होतात, त्यामुळे स्तब्धता येते.

अशाप्रकारे उत्क्रांत होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विशेष ज्ञान घेणे, जे मानवाला द्वैताच्या पलीकडे जाण्यास सक्षम करते. आपण आशा करूया की किर्लियन फोटोग्राफी एवढ्या प्रमाणात विकसित होईल की केवळ इथर ऑराचीच नव्हे तर सूक्ष्म ऑराची देखील छायाचित्रे काढता येतील.

तसे केले तर हे प्राणी ज्यांच्याकडे पाहण्याची मानसिक क्षमता विकसित झालेली नाही  त्यांनाही पाहता येईल. या प्राण्यांना आकार, रंग असतात. त्यांच्याकडे पाचही इंद्रिय संवेदना आहेत.

लवकरच अशी वेळ येईल, जेव्हा पृथ्वी बाह्य प्राणी भौतिक आणि सूक्ष्म प्रतलातून मानवतेशी संवाद साधू लागतील.

ताळ व लोक हे खगोलीय पिंडांच्या मार्गातील मैलाचे दगड आहेत. सर्व तारे आणि ग्रह, सर्व ब्रह्मांडांमध्ये ताल लोक मानक आहेत.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)