Category: Uncategorized

स्वप्नात देव देवता दिसणे


विषय: स्वप्नात देव देवता दिसणे

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ: स्वप्न श्रृंखला

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

दशा संधी आणि एक दशा


विषय : दशा संधि व एक दशा

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : प्रेडीक्टिव्ह स्टेलर ॲस्ट्रोलॉजी

नमस्कार,

आज आपण दशा संधि व एक दशा या संबंधी माहिती घेणार आहोत.

दशा म्हणजे स्थिती. संधि या शब्दाचे तात्पर्य आहे संयोग म्हणजे भेटणे. दशा संधि हा तो काल असतो, जेव्हा एखाद्या जातकाची एक मुख्य दशा संपून दुसरी मुख्य दशा सुरु होत असते.

जेव्हा एखादी विवाहित जोडप्यास अथवा विवाह ठरवताना काही वेळा अशी स्थिती येते जेव्हा पती व पत्नीची दोघांची दशा संपून दुसरी दशा सुरु होण्याचा काळ, म्हनाज्रेच दोघांच्या दशा संधीचा काळ एकाच येतो, तेव्हा

बरेच ज्योतिषी जातकास हे सांगून घाबरवत असतात, की दशा संधीचा काळ असल्याने किंवा एक दशा दोघांना अशुभ असून नुकसान होणार आहे.

येणारा काळ कसा असेल, हे माहित करून घेण्यासाठी खालील गोष्टींचा विचार केला पाहिजे.

१. आधीची दशा शुभ किंवा अशुभ यापैकी कोणते फळ देत होती.

२. येणारी दशा शुभ किंवा अशुभ यापैकी कोणते फळ देऊ शकते.

३. जर दोघांची अशुभ दशा संपून शुभ दशा येणार असेल, तर तो सहजीवनास अनुकूल काळ असेल.

४. जर दोघांची येणारी दशा अशुभ फळ दर्शक असेल, तर लग्न झालेल्या दाम्पत्याला पूर्व कल्पना असल्याने येणारे कटू प्रसंग टाळण्यासाठी किंवा तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. लग्न ठरत असताना दोघांना एकमेकांची मानसिकता तपासण्यासाठी हा काळ महत्वाचा ठरू शकतो. अडचणीत साथ न देणार्या अथवा घाबरणार्या मानसिकतेचा जोडीदार असेल, तर त्यापेक्षा लग्न न जमवलेले योग्य ठरेल. पण याचा देखील विचार होणे गरजेचे आहे की, मुख्य दशा अगदी अनुरूप पाहून विवाह केला तरी, येणाऱ्या अंतर्दशा तुम्ही टाळू शकता का, दोघांची मानसिकता सकारात्मक असेल व काही झाले तरी विवाह टिकवायची मानसिकता असेल तर, कितीही अडचणी आल्या तरी निभावून नेतात व नकारात्मक असेल, तर एखादे निमित्त सुद्धा पुरेसे असेल. शुभ ग्रह दशा तुमच्या सकारात्मकतेला सहाय्यक ठरतात. व अशुभ ग्रह दशा तुमच्या सकारात्मकतेला कणखर बनवतात. या साठीच पूर्ण कुंडलीचे परीक्षण महत्वाचे ठरते.  

५. समजा एखाद्याची वाईट दशा २०२३ मध्ये संपणार आहे आणि दुसर्याची २०२४ मध्ये, तर मधला काळ दोघे परस्प सामंजस्याने सुखाचा नसला तरीही दु:खाचा नसेल याची काळजी घेऊ शकतात.

६. समजा एखाद्या जोडप्यास अनेक वर्षे संतती झाली नाही आणि दशा संधीचे काळात संतती झाली, कारण येणाऱ्या शुभ काळाचा प्रारंभ झालाय, हा संतती योग दोघांच्या कुंडलीत असल्याशिवाय मूल होईल काय?

७. अधिकांश लोक एखाद्या दशेच्या शेवटी अथवा प्रारंभी वास्तविकपणे पीडित होत नाहीत, पण दशाच्या मध्ये अधिक पीड़ा होते व जातकाच्या आयुष्यात परिवर्तन शुभाशुभ फळ देणाऱ्या ग्रहांच्या अंतर्दशेत होत असते.

उदा. जे लोक सेवानिवृत होतात व त्यांना पेन्शन रूपाने काही पैसे मिळत राहतात. हे दशा संधीमुळे नव्हे, तर दशा अंतर्दशा मुळे होत असते.

ज्या लोकांचा अपघात होतो व नोकरी गमवावी लागते, त्यांचा दशा संधि असतो का?

आता आपण पाहू एक दशा म्हणजे काय आणि त्या नुकसान करतात का ?

एक दशा याचे तात्पर्य एवढेच की, पति अथवा पत्नी दोपांना एकच दशा असते, इथे फक्त ग्रहाचे नाव एकच असते. फळ एक सारखेच असेल असे नाही. फक्त कारकत्वास महत्व देणारे ज्योतिषी यास शुभ अथवा अशुभ असे ठरवून मोकळे होतात.

१) पति-पत्नी दोघांची जन्मकुंडली व लग्न स्थान भिन्न असतील, तर ज्या ग्रहाची दशा चाललेली असेल, तो वेगवेगळ्या स्थानांचा अधिपति असतो व विभिन्न फळांचे निर्देशक ग्रह असतात व स्पष्ट रूपाने वेगळे फळ प्रदान करतात.

२) लग्न स्वामी लग्नापासून अथवा चंद्रापासून वेगवेगळ्या स्थाना मधे स्थित असेल म्हणून स्थितिच्या अनुसार फलित भिन्न असेल.

३) युती व दृष्टित असणारे ग्रह भिन्न असल्याने फालत परिवर्तन करतात.

४) दशा स्वामीचे नाव एकाच असले तरी ज्या नक्षत्रात आहे ते भिन्न असू शकते.

उलट काही घटना अशा असतात ज्या एकाच्या कुंडलीत लाभ दर्शवतात, तर दुसर्याच्या कुंडलीत नुकसान.

उदा. पतीने एखादा मौल्यवान दागिना बायकोस घेतला, तर पत्नीच्या कुंडलीत तो लाभ व पतीच्या कुंडलीत त्याच किमतीचे खर्च होणे व बचत खर्च होणे दर्शवते. पण दागिना त्यांचे घरातच येतो ना.

या उलट कठीण प्रसंगी पती पत्नीचे दागिने गहान ठेवतो. ते पत्नीचे स्त्री धन चे नुकसान दाखवते व पतीकडे त्यातून येणारा पैसा दाखवतो.

यात सांगायचा मुद्दा एवढाच की, प्रत्येक कुंडली स्वतंत्र असते व दशा संधि, एक दशा, कारकत्व ई. गोष्टींची भीती वा पूर्वग्रह मनात न बाळगता तटस्थपणे संपूर्ण कुंडलीचे परीक्षण करावयास हवे, लग्नेश, धनेश, पंचमेश, सप्तमेश, लाभेश ई. स्थिती लक्षात घ्यावी, त्रिक् स्थाने व विरोधी स्थाने तपासावी व त्यानंतरच कोणत्याही निर्णयास यावे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे…


विषय : हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे …

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्वयंस्फुर्ती व स्व अभ्यास

खरच भारत हे एकमेव राष्ट्र आहे, जेथे अनेक देवदेवता प्रत्येकाच्या हृदयात वास करतात. या देशाला धर्म कार्याची प्राचीन परंपरा आहे. हेच ते राष्ट्र जेथे अनेक प्रेषित जन कल्याणा चे काम अंत्यंत तन्मयतेने आणि भक्तिभावाने कित्येक शतके पार पाडत आले आहेत.आणि चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचेच प्रकाश दानाचे कार्य व समाजातील अंध रुढींचा नायनाट करण्याचे कार्य लखलखत ठेवणार आहेत.

लाखो देशभक्तीपर गाणी असताना नेमके हेच गाणे का आठवले याचे कारण अगदी सोपे आहे. ज्योतिष अभ्यासक म्हटल्यावर त्याला सगळीकडे चंद्र सूर्य, ग्रह गोल असेच दिसत राहते ना…

अशा या विविधतेतून एकता साधणाऱ्या भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे तिरंगा.

त्यातील पहिला पट्टा आहे केशरी रंगाचा. केशरी रंग प्रतिक आहे त्यागाचा, धैर्याचा, शौर्याचा, ज्ञानाचा.

ज्योतीषी च्या दृष्टीकोनातून केशरी रंग पाहिल्यास सर्व प्रथम डोळ्यासमोर येते ते अग्नी तत्व. अग्नीतत्व आपल्याला असीमित उर्जा दर्शवते. अग्नीतत्वाच्या राशी जरी डोळ्यासमोर आणल्या तर तुम्हाला लक्षात येईल की,

अग्नितत्वाची मंगळाचे अधिकारातील मेष रास जी धैर्य, शौर्य, धाडस प्रदान करते, जी अवघ्या जगाला निक्षून सांगते की येणारा काळात भारताच्या वाटेस जाल तर, अग्नी दिव्यास सामोरे जावे लागेल. कठोर मेहनत, दुर्दम्य आत्मविश्वास, असामान्य धाडस यामुळे आम्हास चंद्र व मंगळ सुद्धा जवळचे वाटू लागतात व अवकाश क्षेत्रातील धडाडी पाहून भलेभले दिग्गज देशसुद्धा अचंबित होताना दिसतात.

अग्नितत्वाची सूर्याचे अधिकारातील सिंह रास जी नेतृत्व गुण, प्रशासकीय योग्यता, ज्ञानसंपन्नता, वैद्यकीय कौशल्य ई. दर्शवते. म्हणून भारत देश हा जगावर नेतृत्व करण्याची क्षमता ठेवतो. फक्त विध्वंसक शस्त्रांनीच नव्हे, तर आज जगाकडे नजर फिरवून बघा आज अमेरिका असू दे, इंग्लंड असू दे नाहीतर आणखीन कोणता देश असू दे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात भारतीय ज्ञान कौशल्याने व प्रशासकीय गुणांनी उच्च पदस्थ म्हणून मिरवताना दिसेल. कोविड सारख्या जागतिक महा संकटात तर भारताने दाखवून दिले की, आमचे औषध निर्माण क्षेत्रातील अफाट बुद्धिमत्ता, वेळेचे व्यवस्थापन, व्यावसायिक कौशल्य व सक्षम नेतृत्व या अंगभूत गुणांनी आम्ही आत्मनिर्भर तर झालोच पण त्या सोबत सूर्याप्रमाणे अवघ्या जगाला मदतीचा हात आम्ही दिला. जे बघून सर्वांचे डोळे दिपले. जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली. आज विविध जागतिक संघटनाच्या व्यासपीठावर, जागतिक राजकारणात भारताची उपस्थिती नोंद घेण्यासारखी आहे.

अग्नितत्वाची गुरुचे अधिकारातील धनु रास जी ज्ञान, गुरु, अध्यात्मिकता, नैतिकता, प्रगती, कीर्ती, आत्मसंयम ई. दर्शवते. यातून आम्ही जगाला हेच दाखवून देतो की, आम्ही सर्व बाबतीत ज्ञान संपन्न असलो, प्रगतीशील असलो, कीर्ती सर्वदूर पसरत असली तरी आम्ही नैतिकतेची आणि आत्मसंयमाची पाठराखण करतो. खुमखुमी म्हणून किंवा लालसेपोटी कधीच आमचे शक्तीचा माज करत नाही. सायकल वर सुट्टे भाग नेऊन आम्ही महाविस्फोटक अणू बॉम्ब बनवण्याची क्षमता राखत असून देखील अणू बंदीचा पुरस्कार करणारे देखील आम्हीच आहोत. शांती चा सूक्ष्म अर्थ आम्हाला शतकानुशतके आमचे दैवत व प्रेषित, संतवचणे आम्हाला बिंबवत आले आहेत. फक्य आमच्या संयमाची परीक्षा पाहायला जाऊ नका. जशास तसे आम्हालाही वागता येते.

केशरी रंग हा तयार होतोच मुळी सूर्य मंगळाच्या लाल व गुरूच्या पिवळ्या रंगाच्या मिश्रणाने.

मधला पट्टा आहे पांढऱ्या रंगाचा. पांढरा रंग प्रतिक आहे निर्मळता, पावित्र्य, सत्य, विचार स्वातंत्र्य, सहिष्णुता, संयम आणि समर्पणाचा.

हे सर्व गुण पाहिल्यावर चंद्र डोळ्यासमोर नाही आला तरच नवल. केशरी रंग जसे तारा बळ दाखवतो तसे पांढरा रंग चंद्र बळ दाखवतो. चंद्र मातृ कारक आहे. सूर्य पित्याचे कर्तव्य पंर पाडतो, तसे चंद्र मातेचे कर्तव्य पार पाडतो. अग्नीतत्व युक्त तेजस्वीपणा जेवढा महत्वाचा, पण त्या तेजाला संवेदनशीलता, हेतूची निर्मळता, विचारांचे पावित्र्य, संयम आणि सहिष्णुता, मातेच्या हृदयाची आपल्या मुलाबाळांसाठी स्वत:स समर्पित करण्याची वृत्ति हे गुण जोडीस असणारी एकमेवाद्वितीय भारतीय संस्कृती आहे. चंद्र भावनांचा कारक ग्रह आहे. सुजलाम सुफलाम अशा या धरणी मातेला व भारत हि माझी मातृ भूमी आहे हे म्हणताना नकळत आपला ऊर भरून येतो.

जलतत्वाची आठवण करून देणारा चंद्र व त्याचा पांढरा रंग.

जलतत्वाची चंद्राचे अधिकारातील कर्क रास जी मातेच्या मायेचा ओलावा, ममता दर्शवते. एकमेकांच्या भावनेचा व विचारांचा आदर करायला शिकवते.

जलतत्वाची मंगळाचे अधिकारातील वृश्चिक रास जी, मुलांच्या मांगल्यासाठी प्रसंगी मायेचा ओलावा सोडून कठोर बोलणे सुचवते. वेदनेचे, दु;खाचे, अपयशाचे कटू घोट पचवल्याशिवाय, विपरीत परिस्थितीशी सामना केल्याशिवाय, ज्ञानरूपी पित्यासारखी प्रगती, कीर्ती, भाग्य लाभणार नाही हेच मंगळाची पण जलतत्वाची ही रास आपल्याला आईच्या आर्ततेने सुचवत असेल.

एवढे करून मातेचे समाधान झाले तर नवल.

जलतत्वाची गुरुचे अधिकारातील मीन रास जी, प्रसंगी माशां सारखी आपली तडफड बाजूला ठेवून सतत आपल्या मुलाबाळांसाठी सेवा वृत्तीने झटत असते. त्यांना हेच ज्ञानरूपी संस्कार करत असते कि, बाळा आपल्या दोन घासातील एक घास गरजूंना द्यावा. गांजलेल्यांची सेवा करावी. कमाई तील काही हिस्सा दान करावा, तर वासनेने बरबटलेले मन निर्मळ व पवित्र होऊन मुक्त होईल.

एकाच मातेचे किती हे विलोभनीय अविष्कार.

पांढरा रंग हा तयार होतोच मुळी सप्तरंग चक्र प्रवाही गतीने फिरवल्यावर.

तिसरा पट्टा आहे हिरव्या रंगाचा. हिरवा रंग प्रतिक आहे सुफलतेचा, समृद्धीचा, प्रगतीचा, धनिकतेचा, बुद्धी प्रगल्भतेचा,

बुधाचा रंग हिरवा. बुधाची मिथुन रास वायुतत्वाची तर कन्या रास भूमी तत्वाची. भारतीयांनी आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर सर्व ऋतू मानांचा सखोल अभ्यास करून, वायुतात्वाचा लहरीपणा सहन करत, त्याचा शुक्राच्या तुळ राशीप्रमाणे तुलनात्मक अभ्यास करून, शनीप्रमाणे कर्मास प्राधान्य देऊन कन्या राशीप्रमाणे हवामान व जनजीवन याची गणिते मांडून वृषभ राशीचा संयम व कठोर परिश्रम अंगी बाळगत जमीन कसली आणि शनीसारखे लांब पल्ल्याचे उद्दिष्ट ठेवून शेवटी बळीराजाने शेतीमध्ये प्राविण्य मिळवत आपल्या धरणी मातेला पाचूचा हिरवा शालू भेट दिला. भारताला ऋषि प्रधान देश म्हणून गणले जाऊ लागले. या सर्व गोष्टींची आठवण करून देणारा रंग. सर्व तत्वांचा एकत्रित बुद्धी कौशल्याने ज्ञानाची जोड देत आकाशाला गवसणी घातली आणि आकाशाप्रमाणे विशाल यश मिळवले, याचे स्मरण करून देणारा हा रंग.

हिरवा रंग हा तयार होतोच मुळी शनीच्या कष्टात ज्ञानाचा पिवळा रंग मिसळून.

या सर्वांच्या मधोमध अशोक चक्र त्याच्या चोवीस आरे सकट विराजमान आहे. आकाशाचा निळा रंग विशालता, शांती दर्शवते, तर २४ आरे असलेले हे चक्र सम्राट अशोकाप्रमाणे धर्म चक्र किंवा काल चक्र दर्शवते. जे आपल्याला संदेश देते की, २४ तास सतत कार्यरत राहा, प्रगती करत राहा, पण आपल्या मूळ धर्माची कास सोडू नका, तरच तुम्हाला शांती व आकाशाप्रमाणे विशालत्व प्राप्त होईल.

आकाशाचा निळा रंग हा मूळ रंग आहे. म्हटले तर आकाशाचा रंग निळा भासतो, पण मुळात आकाश म्हणजे नक्की काय आहे, पोकळी… जी अमर्याद आहे. कुंडलीत सुद्धा आकाशतत्व हे सूक्ष्म रूपाने असतेच.

असाच आपला भारत विविधतेतून समता साधलेला एकमेव देश आहे. त्यास माझे त्रिवार वंदन..

तर असा हा माझ्या अल्प बुद्धीने आपल्या भारताच्या ध्वजाचा ज्योतिष अभ्यासाशी सांगड घालण्याचा एक प्रयास. कदाचित चुकले असेल काही तर क्षमा करा, पण एवढे मात्र नक्की की, आपल्या मातृभूमीच्या जाज्वल्य अभिमानातून व स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण काहीतरी लिहावे या उर्मीतून अंतस्फुर्तीतून हा लेख झरझर उतरत गेला आहे. बस्स…

आपण सर्वांना  स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

जयहिंद… जय भारत !!!

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

आर्द्रा नक्षत्र विचार


विषय : आर्द्रा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण आर्द्रा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

६. आर्द्रा नक्षत्र :

आर्द्रा नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील ६ वे नक्षत्र आहे. इंग्रजी नाव ‘ग्यामा जेमिनोरम’ असे आहे.

आर्द्रा म्हणजे ओलावा. सूर्य या नक्षत्री आला की, वसुंधरेला भिजवणारा पाऊस पडून जिकडे तिकडे आर्द्रता येते. तप्त होऊन तहानलेली पृथ्वी शांत होते. म्हणूनच या नक्षत्राला आर्द्रा असे नाव पडले. आर्द्रा नक्षत्राचे तारे कोणते धरावेत याविषयी मतभेद आहेत. काही जण मृग नक्षत्राच्या पुढील दोन पायांपैकी पूर्वेकडील पायाच्या तेजस्वी व लाल रंगाच्या ताऱ्यालाच आर्द्रा म्हणतात. तर काहींचे मिथुन राशीतल्या पाच सरळ रेषेतील ताऱ्यांचे जे दोन पुंज आहेत त्यांनाच आर्द्रा म्हणावे असे मत आहे. हे पुंज म्हणजे जणू काही रुद्राने पसरलेले दोन हातच आहेत अशी कल्पना करून या पुंजास बाहू असे म्हणतात. म्हणून आर्द्रा म्हणजे बाहू असेही समजतात.

आर्द्रा नक्षत्र तीष्ण, दारुण, ऊर्ध्वमुखी, मध्यलोचनी व मनुष्यगणी आहे. नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र असून ४ ही चरण मिथुन राशीत येतात. या ४ चरणांवर अनुक्रमे गुरु, शनी, शनी व गुरुची सत्ता आहे. नक्षत्र स्वामी राहू, राशी स्वामी बुध व दैवत शिव असल्यामुळे या नक्षत्रात राहूचा पराक्रम व कुटीलपणा, बुधाचे चातुर्य व फसवेगिरी व शंकराचा रुद्रावतार व प्रसन्नता अशा सत्व-रज-गुणांचे मिश्रण आढळून येते.

या नक्षत्रामध्ये एकच तारा असून तो तेजस्वी व रंगाने लालभडक आहे. आकृती ठळक (चकाकणाऱ्या) मण्यासारखी आहे. कार्तिक, मार्गशीर्ष किवा पौष महिन्यात ते रात्रभर आकाशात दिसते. तारा तेजस्वी असला तरी हे नक्षत्र साधारण आहे. जाताकांस फार मोठ्या पदाला नेणारे नाही.

नक्षत्र तीष्ण व दारुण असल्याने हे जातक कठोर, निश्चयी, हट्टी, दुराग्रही, कृतघ्न, अविचारी व हिंसक असू शकतात. रंगेलपणा अधिक असू शकतो. प्रसंगी खोटी कामे करण्यास, फसवण्यास व विश्वासघात करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

मात्र बुद्धिमत्तेला व विद्वतेला हे नक्षत्र फारच चांगले. विशेष करून स्मरण शक्ती व पाठांतर शक्ती उत्तम असते. कोणत्याही विषयाचे आकलन यांना चटकन होते. संशोधन करण्याची फार आवड असते. राहूचे नक्षत्र असल्याने यांत्रिक कामाचा उपयोग करावयाचे कलाकौशल्य, फोटोग्राफी, ड्राईंग, कोरीव काम, आर्किटेक्ट यांना चांगले. या नक्षत्राचे दैवत शिव असल्याने शंकराच्या कृपेने (भक्तीने) कृपाप्रसाद देणारे आहे. अचानक लक्ष्मीची प्राप्ती होणे, प्रसंगी एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत मिळणे वा कल्पनेत नसलेली शुभ गोष्ट होणे हे या नक्षत्राचे वैशिष्ट्य आहे. हे जातक बुद्धिमान असले तरी अतिशय स्वार्थी, चैनी, आत्मकेंद्रित, ऐषारामी व लोभी असतात. या व्यक्तींना रेस (घोडे) व पत्त्यांचा जुगार यांचा फार नाद लागू शकतो

या नक्षत्रावर जन्मलेल्या जाताकांची शरीर प्रकृती व बांधा सामान्य असतो. जातक उंच, लांबट, हाडापेराने मजबूत व काटक असतात. शरीरात रक्त व हाडपेर चांगले पण अंगावर मांस कमी असते. सहनशीलता व सोशिकपणा चांगला असतो. शारीरिक शक्ती, जीवनशक्ती व रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असते. स्त्रियांपेक्षा पुरुषांना या नक्षत्राचे महत्त्व जास्त असते. कारण पुरुषांमध्ये आढळणारे धाडस, साहस, स्वातंत्र्य, प्रेम, शौर्य, धैर्य, अधिकार लालसा व कठोरपणा हे गुण या नक्षत्रांमध्ये दिसून येतात.

स्त्री जातकांना हे नक्षत्र सौंदर्य, स्वभाव व संसाराच्या दृष्टीने फारसे अनुकूल नसते. मात्र शारीरिक व बुद्धिमत्तेच्या दृष्टीने चांगले. बांधा उंच, सडपातळ व काटक असतो. दिसण्यात ऐटबाज असतात. मात्र चेहरा जरा उग्र व रागीट असतो. प्रकृती चिवट असते. डोळे भेदक व तीष्ण असतात. या स्त्रिया स्वभावाने मात्र रागीट व बडबड्या असतात. विशेष करून या नक्षत्रात चंद्र मंगळ किंवा मंगळ बुध एकत्र असता अतिशय हट्टी, भांडकुदळ, तोंडाळ, वाचाळ, मत्सरी व उणेदुणे काढणाऱ्या असतात. क्षुल्लक कारणावरून त्या भांडणे उकरून काढतील व तोंडाचा पट्टा चालू करतील. अशा दोन भांडकुदळ स्त्रिया भांडायला लागल्या, म्हणजे आपल्या कर्कश आवाजाने आजूबाजूचा भाग दणाणून सोडतील. मात्र एखाद्या व्यसनी नवऱ्याला ताळ्यावर आणण्याचे काम त्या चांगल्या प्रकारे करू शकतात.

या नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे डॉक्टर, आर्किटेक्ट, बँकेत किवा खाजगी कंपनीत काम करणारे हिशेबनीस, फोटोग्राफर्स, हाफकिन इन्स्टिट्यूट किवा इतर वनस्पतीच्या औषधीसंबंधी निरनिराळी संशोधने करणारे संशोधक, रसायनशास्त्रवेत्ते छापखाने, कागद, स्टेशनरी यांचे व्यापारी तसेच लहान

प्रमाणात अधिकार गाजवणारे, अंमलबजावणी खात्यातील लोक, मांत्रिक, चोर, लुटारू, पाकिटमार व दरोडेखोर हे सर्व होत.

टीप : या नक्षत्रामध्ये जे ग्रह किंवा ग्रहांच्या शुभाशुभ युत्या असतील त्यावर वरील फलादेश अवलंबून राहील.

आर्द्रा नक्षत्री रवि फारसा शुभ नसतो. शारीरिक प्रकृती, विद्या, अधिकार योग या सर्व दृष्टीने मध्यमच असतो. स्वभाव क्रोधी व मानासाठी धडपडणारा असतो. बिघडला असल्यास रेस किंवा जुगाराचा नाद लागण्याचा संभव असतो. बऱ्याच वेळा दुःखदायक व अपमानाचे प्रसंग येतात. संकटे फार ओढवतात. आर्द्रा नक्षत्री चंद्र असता बुद्धिमान, हुशार पण स्वार्थी, मतलबी, खर्चिक व चैनी असतो.

आर्द्रा नक्षत्री मंगळ असता हाडापेराने मजबूत काटक असतो. पण स्वभावाने अतिशय कडक, दुराग्रही व हेकेखोर असतो. आर्द्रा नक्षत्री मंगळ शुभ असता स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता अतिशय प्रखर असते. डॉक्टरीकडे जाण्यास हा मंगळ फारच चांगला. त्या खालोखाल आर्किटेक्टला बरा. विद्वत्ता व बुद्धी पण चांगली असते आणि जमाखर्च विषय बरा असतो. मात्र जरा वाचाळ, स्पष्ट व्यक्त, कडक भाषा करणारा व टीकाकार असतो. बिघडला असता स्पष्ट व्यक्त व लोकांना तो फसवणारा असतो.

आर्द्रा नक्षत्री गुरु शरीरप्रकृतीला व धनालाही मध्यम. पण बुद्धिमत्ता व शिक्षणाला चांगला. विशेष करून व्याकरण, भाषा व जमाखर्च या विषयांना, तसेच शिक्षक व ओफेसर या व्यवसायाला बरा असतो. लेखन व प्रकाशन यांनाही बरा.

आर्द्रा नक्षत्री शुक्र शरीरप्रकृती बरी देईल. या व्यक्ती जरा रसिक, आनंदी पण चैनी, विषयासक्त, रंगेल व उधळ्या असतात. शुक्र रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, विज्ञान, आर्किटेक्ट या विषयांना चांगला. प्रेमाची आवड असते. पण प्रेमभंगाचे प्रसंग फार येतात.

आर्द्रा नक्षत्री शनि असता शरीरप्रकृतीने चांगला, सडपातळ, हाडापेराने मजबूत, अतिशय काटक, कणखर व चिवट असतो. बोलण्यात तोतरेपणा अथवा मुकेपणा असा दोष असतो.

आर्द्रा नक्षत्री शनि असता कोपराचा किंवा मनगटाच्या हाडांचा संधिवात. चंद्र-शनि युती असता फुफ्फुसांचा क्षय, दम, पक्षाघात. राहू असता विषारी प्राण्यांपासून दंश वगैरे.

स्त्रीच्या कुंडलीत आर्द्रा नक्षत्री चंद्र बिघडला असता, अनियमित मासिक पाळीचा त्रास व शुक्र बिघडला असता योनिमार्गाचा दाह होतो.

अंकशास्त्राप्रमाणे या नक्षत्रावर ६ किवा ८ या अंकाचे वर्चस्व व कैफियत वाटते. त्यापैकी ८ अंक जास्त पटतो. नक्षत्राचे रत्न राहूचे गोमेद किंवा बुधाचा हिरवा पाचू (पन्ना) आहे. हस्ताक्षर जरा बारीक, ठळक पण टोकदार असते. सरळ रेषेत न काढता जरा तिरके व वेडेवाकडे काढतील. लिहिताना जरा दाबून लिहितील. नक्षत्र मध्यलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती वस्तू दोन महिन्यांनी मिळण्याचा संभव असतो. वस्तू पश्चिमेस सापडू शकते.

मुहूर्त शास्त्रात हे नक्षत्र सर्व शुभ कार्याला वर्ज्य आहे. मात्र हे नक्षत्र दारुण व तीष्ण असल्याने शत्रूचा घात करण्यास, मंत्र तंत्र, जादूटोणा इत्यादी अघोरी विद्या शिकण्यास, पशूंना शिक्षा करण्यास चांगले आहे. नक्षत्र ऊर्ध्वमुखी असल्याने गृह, राजवाडा या संबंधी शोभादायक कृत्ये करणे, घराचा मजला वाढविणे या कार्याला चांगले तसेच सापाचे विष काढणे, लस तयार करणे, विषारी औषधे व केमिकल्स तयार करणे यांनाही चांगले.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)