
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : कर्म सिद्धांत (भाग १)
संकलक व स्वैर अनुवाद : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : THEORY OF KARMA (श्री हीराभाई ठक्कर)
नमस्कार,
आज आपण कर्म सिद्धांत या विषयाची क्रमश: व थोडक्यात माहिती घेणार आहोत.भगवान श्रीकृष्णानी भगवद्गीतेत सांगितले आहे की, “गहनो कर्मणो गति” कर्माची गति फार गहन आहे.
श्रीकृष्णांचा मित्र भक्त सुदामा कर्माच्या गहनतेचे वर्णन करताना म्हणतो की,
आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य ॥ श्रीकृष्ण झाला पृथ्वीपति । माझ्या घरांत खायला नाही माती ॥ गोकुळांत त्याने केल्या अलौकिक लीला । माझ्या बरोबर गुरुगृही आणितसे समिधा ॥आज तो बसला आहे सिंहासनावर । माझ्या हाती मात्र एकतारी नि चिपळ्या ॥
मनुष्य जन्म एकंदरीतच गूढ आणि गुंतागुंतीचा आहे. इथे प्रत्येकाची कर्मगती वेगवेगळी. एक माणूस दुःखी, तर दुसरा सुखी असें कां ? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जगांत जे लोक लांडया-लबाडया, काळा बाजार, लांचलुचपत असा अनीतीचा मार्ग बिन-दिक्कत स्विकारतात, ते सुखाने जगताना दिसतात. त्यांचे जवळ बंगला, मोटारी, इत्यादि चैनीच्या वस्तू असतात, त्यांचे जवळ लाखो रुपये असतात व मौज-मजा करताना दिसतात. पण याउलट, जे लोक सदाचारी, पापभीरु, प्रामाणिक पणे आयुष्य जगात आहेत, त्यांच्या आयुष्यात दु:खाचे भोग वाट्यास आलेले दिसतात. असे का ?, हा प्रश्न कधी ना कधी सर्वांनाच पडत असतो. जगांत असा विरोधाभास पाहिला, की देवावरची आपली श्रद्धा डळमळू लागते, वाटू लागते की ईश्वराच्या राज्यांत काही न्याय-नीती आहे का? का सर्व अंधेर नगरीच आहे ? परमेश्वराचे राज्यांत सर्वत्र अंधार भासू लागतो…
पण वस्तुस्थिती अशी आहे कीं ईश्वरी राज्यांत अंधारही नाही व अन्यायही नाही. ही गोष्ट योग्य रीतीने लक्षांत यावयास, कर्म फळ नियमांचा अभ्यास करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
कर्माचा अटळ सिद्धांत :
आपण पाहतो की, राज्य कारभार व्यवस्थित चालविण्यासाठी प्रत्येक सरकारी खात्यांत काही नियम केलेले असतात. पोलीस खात्यासाठी त्यांचे काही नियम (मॅन्युअल) ठरवलेले असतात. पी.डबल्यू.डी. साठीं, त्या खात्याचे काही नियम असतात. न्याय खाते चालविण्यासाठी इंडियन पीनल कोड, व अन्य अनेक कायदे आहेत. त्याच प्रमाणे रेल्वे, रेव्हिन्यू इत्यादि खात्यांचेही खातेनिहाय काही नियम केलेले असतात.
याचप्रमाणे अखिल सृष्टि व ब्रह्मांडाचे संचलन व्यवस्थित राहाण्यासाठी, सूर्य नियमित उगवतो व मावळतो, पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे याना पण ठराविक गति असते. ठराविक वेळी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू सुरु होतात व संपतात. या सर्व गोष्टी योग्यवेळी घडून विश्वाचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी निसर्गाचे काही नियम आहेत आणि यालाच कर्माचा कायदा म्हणतात.हे सर्व विश्व “कर्म-कायदाच्या” आधाराने व्यवस्थित चालते, आणि त्यांत कधीही घोटाळा होत नाही. या कर्म-कायद्दाचे एक खास असें वैशिष्ठय आहे. जगातील मानव निर्मित कायद्यांत, कांहीना काही अपवाद, पळवाट वगैरे असतात. पण या परमेश्वर निर्मित “कर्म नियमांत” (कायद्यांत) कोठेही, किंचितही अपवाद अथवा पळवाटा नाहीत.
राजा दशरथ हा प्रत्यक्ष भगवान रामचंद्राचा पिता, पण त्यालाही या कर्मसिद्धांतानुसार, पुत्र विरहामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. प्रभू रामचंद्र असे म्हणू शकले नाहीत की, राजे दशरथ माझे वडील असल्यामुळें, कर्म कायद्यांत थोडी सूट देऊन, मी वनवासांतून चौदा वर्षांनी परत येईपर्यंत त्यांचा मृत्यू थोडा पूढे ढकलण्यांत यावा. निर्गुण-निराकार, शुद्ध ब्रह्म पण जेव्हा सगुण-साकार बनून देह धारण करुन, रामचंद्र रुपाने या भूतलावर अवतरित होते, तेव्हां त्यालाही, या कर्म-कायद्याचें (सिद्धांताचे) तंतोतंत पालन करावेच लागते. कर्माचे कायद्यांत कोठेही विलंब नाही की पळवाट नाही.
कर्म म्हणजे काय ? कर्म कशाला म्हणतात ?
आपण जे जे काम (क्रिया) करतो, त्याला ‘ कर्म’ म्हणतात. उदाहरणार्थ खाणे, पिणे, स्नान करणे, धुणे, चालणे, बोलणे, उभे राहाणे बसणे, नोकरी-व्यवसाय करणे, झोपणे जागणे, पाहणे, ऐकणे, न ऐकणे, वास घेणे- वास न घेणे, स्पर्श करणे श्वासोच्छ् वास करणे, जन्मणे, जगणे, मरणे, इत्यादि सर्व शारिरीक व मानसिक क्रिया, या सर्व गोष्टी कर्मामध्ये मोडतात.
या प्रकारच्या सर्व कमांचे मुख्यतः तीन भाग करता येतातः(१) क्रियमाण कर्म, (२) संचित कर्म, (३) प्रारब्ध कर्म.
(१) क्रियमाण कर्म :
आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी काही कर्मे करतो, त्यां सर्वांचा “क्रियमाण कर्मात समावेश होतो. सकाळ पासून रात्री पर्यंत, सोमवार पासून रविवार पर्यंत पाहिल्या तारखे पासून शेवटच्या तारखेपर्यंत, चैत्रापासून, फाल्गुनापर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत, आपण जीं जीं कर्मे (क्रिया) करतो, त्यां सर्वाना, क्रियमाण कर्म म्हणतात.ही सर्व कर्मे केल्यावर, तीं करणारयाला फळ देऊनच शांत होतात. फळ दिल्याविना ती शांत होत नाहीत. क्रियमाण कर्मात त्या कर्माचे फळ भोगूनच सूटका होते.
उदा. : आपण तहान लागल्यावर पाणी पितो पाणी पिण्याचे ‘कर्म’ केले. तहान भागली म्हणजे पाणी पिण्याचे ‘कर्म’ त्याचे फळ त्वरित देऊन शांत झाले. आपल्याला भूक लागली खाण्याचे ‘कर्म’ केले, आपली भूक शमवून, इष्ट फळ देऊन, ते शांत झाले. आपण स्नान करण्याचे ‘कर्म’ केले, शरीर स्वच्छ झाले कर्म आपले फळ देऊन शांत झाले. आपण कोणाला शिव्या देण्याचे कर्म केले, त्याने आपल्या थोबाडीत मारली आणि आपल्याला कर्माचे फळ देऊन ‘कर्म’ शांत झाले.अशा प्रकारे प्रत्येक क्रियमाण कर्म फलद्रूप होतेच, व फळ भोगूनच आपल्याला त्यापासून मुक्ति मिळते.
(२) संचित कर्म :
कित्येक क्रियमाण कर्मे अशी असतात कीं, ती तत्काळ फळ देत नाहीत. त्यांचे फळ मिळण्यास काळ मध्ये जातो. त्या कर्माचे फळ पक्व होण्यास थोडाफार कालावधि लागतो, तोवर तीं कच्च्या स्वरूपात राहतात आणि जोपर्यंत फळ मिळत नाही, तोवर तीं जणू शिल्लक राहातात, संचित होऊन राहातात. अशा फळ न दिलेल्या कर्मानाच “संचित कर्म” म्हणतात.
ऊदा. तुम्ही आज परिक्षेचा पेपर लिहिलात, तरी फळ स्वरूप असा त्याचा परिणाम (Result) मिळण्यास काही कालावधि जावा लागतो.
तुम्ही कोणाला शिवीगाळ, मारहाण करून पळून गेलात, नंतर दहा बारा दिवसानी, संधि साधून तो मनुष्य तुमच्या त्या कर्माची सव्याज परतफेड करतो म्हणजे तुमचे कर्म पक्व होण्यास दहा बारा दिवस लागतात व मग ते तुम्हाला (फळ) देऊन शांत होते.
तुमच्या तरुण वयात तुम्ही आपल्या मातापित्याना दुःख दिलेत, परिणामस्वरूप तुमच्या वृद्धावस्थेत तुमची मुले तुम्हाला दुःख देतात व तुमच्या पूर्व कर्माचे फळ, मध्ये बराच काळ लोटला तरी, याच जन्मांत तुम्हाला मिळतें.
तुम्ही या जन्मी, संगीत साधना केलीत तर कदाचित पुढील जन्मी, लहानपणीच तुम्ही संगीतात नैपुण्य दाखवाल.
अशा प्रकारे कित्येक क्रियमाण कर्मे तात्कालीक फळ न देता कालांतराने ती जेव्हा पक्व होतात, तेव्हा तुम्हाला फळ देऊन शांत-समाप्त होतात आणि तोपर्यंत “संचितकर्म” म्हणून तुमच्या खाती जमा राहातात.
बाजरी पेरल्यानंतर तीन महिन्यानी पीक तयार होते, गव्हाला चार महिने लागतात. आंबा लागवडीस येण्यास ५-६ वर्षे लागतात, अन्य काही फळ झाडे दहा किंवा त्याहून अधिक वर्षांनी फळ देऊ लागतात. ‘क्रियमाण कर्माचे ज्या स्वरूपाचे बीज, त्या प्रमाणे त्याचे फळ मिळण्यास, मध्ये कमी अधिक काळ लोटावा लागतो. जीवात्म्याची अशी अनेक कर्मे संचित म्हणून त्याचे खातेवहीत ‘जमा म्हणून भोगण्यासाठी शिल्लक राहिलेली असतात.
उदा. समजा की आज तुम्ही १००० क्रियमाण कर्मे केलीत, त्यातील ९०० कर्मे अशी होती, की जी तात्कालीक फळ देऊन शांत झाली- समाप्त झाली, परन्तु राहिलेली १०० क्रियमाण कर्मे अशी असतील की ती पक्व होऊन, फळ देण्यास काही काळ लागेल, व तोवर ती संचित कर्म म्हणून तुमच्या खाती जमा राहातील, अशा तरहेने आज १०० कर्मे संचित झाली, उद्या कदाचित १२५ कर्मे संचितात जमा होतील, पर्वाच्या दिवशी, आजच्या व उद्याच्या संचित कर्मा पैकी ८० कर्मे पक्व होऊन, फळ देऊन शांत झाली, व राहिलेली ८०-९० कर्मे संचित म्हणून जमा राहिली अशा प्रकारे, आठवडे अखेर ३००-४०० कर्मे शिल्लक फळ न देवां संचित म्हणून तुमचे खाती जमा राहिली. महिने अखेर, १०००-१५०० क्रियमाण कर्मे फळ न देतां, संचित म्हणून राहिली वर्ष अखेर काही हजार शिल्लक.अशाप्रकारे आयुष्य संपून जाते, पण संचित कर्मे संपत नाहीत. तुम्ही पुढील जन्म घेता-पुन्हा पुढील जन्मी आणखी काही लाखांची शिल्लक वाढली. अशा प्रकारे अनादि काळापासून जमा होत राहिलेल्या कर्माचे, जणू कित्येक हिमालय पर्वतावढे संचित कर्म प्रत्येक जीवात्म्याचे खाती भोगण्यासाठीं जमा होऊन राहिलेले असतात. कोणते ही क्रियमाण कर्म, जे संचितांत जमा होऊन राहिलेले असतें, ते फळ दिल्यावाचून समाप्त होत नाही या नियमानुसार, अर्शी जन्मोजन्मी जमा होत आलेल्या कर्माची फळे, या जन्मी, पुढील जन्मी भोगून संपविल्या शिवाय माणसाची त्या पासून सुटका नाही, या गोष्टीचा माणसाने विचार केला तर त्याचा थरकाप उडेल परंतु अविद्येने, अज्ञानाने व्यापलेला जीव, याचा कधीं विचारच करीत नाही.
राजा दशरथाने श्रवणकुमाराची हत्या चुकून केली तेव्हा त्याच्या वृद्ध माता- पित्यानी “तुझा मृत्यूही पुत्र-विरहाने होईल” असा राजा दशरथाला शाप दिला. पण राजांचे हे हत्या करणाचे क्रियमाण कर्म शापा प्रमाणे तत्काळ फळ कसे देणार? कारण त्यांवेळी राजाला मुलगाच झालेला नव्हता, म्हणून हे क्रियमाण कर्म फळ देऊन शांत न होता त्याच्या संचितात जमा राहिले.कालांतराने राजाला, एकच काय, पण चार पुत्र झाले. ते मोठे झाले. त्यांची लग्ने झाली, आणि जेव्हा राम-राज्याभिषेकाचा दिवस उगवला, त्यां वेळी पूर्वीचे ते क्रियमाण कर्म पक्व होऊन फळ देण्यास सज्ज झाले आणि राज्याभिषेकाच्या मंगल दिवशींच राजाला पूर्व शापानुसार मृत्यूचे फळ देऊन शांत झाले. त्यांत क्षणाचाही विलंब झाला नाहीं. वास्तविक श्रीराम हा भगवंताचा अवतार. प्रत्यक्ष परातत्पर, परब्रहम, राम-रुपाने सगुण साकार रुप धारण करून पृथ्वीतलावर अवतीर्ण झाले होतें. ज्या रामाच्या केवळ चरण स्पर्शीने शापित शीलेची पुन्हा शापमुक्त आहिल्या झाली, ज्याच्या केवळ चरण-रज-स्पर्शाने दगडाचा उद्धार होऊन अहल्येला जीवदान मिळाले, अशा परब्रह्म असलेल्या रामाने स्वतःच्या पित्याला आपण वनवासातून परत येई पर्यंत मृत्यूपासून चौदा वर्षाचे जीवदान देता आले असते. पण कर्मफल-कायद्याचे चोख, तंतोतंत पालन झालेच पाहिजे, त्यांत कोणतीही ढवळाढवळ चालत नाही.
थोडक्यांत सांगायचे म्हणजे परमेश्वराच्या राज्यांत ना अंधार, ना अन्याय ना दिरंगाई. राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धांत मारले गेले, तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारलें की असे कां व्हावे ? माझ्या सबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळया-देखत पाहून, त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावें ? तेव्हा भगवान श्रीकृष्णानी राजाला. आपले पूर्व जन्म पाहाण्याची दिव्य दृष्टि दिली.राजाने दिव्य दृष्टि द्वारा पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्यांने एक वृक्षाला आग लावली होती. आग लागताच वृक्षावरील बरेचसे पक्षी पळून गेले, मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले, तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. राजाचे हे त्या जन्मीचे क्रियमाण कर्म, फळ देण्याची योग्य संधि पाहात संचित रूपांत शिल्लक राहिले, आणि या जन्मांत, राजाला त्याच्या काही अन्य पुण्याईचा फलस्वरूप जेव्हा शंभर पुत्र झाले, तेव्हा ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यास सज्ज झाले. परिणामतः राजा आंधळा जन्मला, व त्याचे शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मरण पावल्याचे दुःख राजाला अनुभवावे लागले. पन्नास जन्मापूर्वीच्या क्रियमाण कर्माने, इतका दीर्घकाल लोटला तरी, राजाचा पिच्छा सोडला नाही, राजाची एका जन्मांत शंभर पुत्र होण्याची पुण्वाई होई पर्यंत ते कर्म दबा धरून बसले, संधि मिळाल्याबरोबर त्याला फळ देऊन शांत झाले.
परमेश्वराचा राज्यांत ना अंधार, ना अन्याय… क्रियमाण कर्म ‘संचित रूपाने शिल्लक राहातें, व संधि मिळतांच फळ देऊन शांत होते.
(३) प्रारब्ध कर्म :
जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात (प्रारब्ध सुरु झालेले)अनादि काळापासून, जन्म-जन्मांतरातील संचित कर्माचे असंख्य हिमालयसदृश पर्वत जीवात्मांच्या खात्यांत जमा झालेले असतात. त्या पैकी जी संचित कर्मे पक्व होऊन फळ देण्यायोग्य होतात, तेवढी प्रारब्ध कर्मे भोगण्यास अनुरूप असे शरीर जीवात्म्यास प्राप्त होते, आणि त्या जीवन काळांत भोगण्यासाठी तयार झालेली सर्व प्रारब्ध कर्मे भोगल्यानंतरच त्याचे शरीर सुटते. प्रारब्ध भोगण्यास अनुरूपा असा देह आरोग्य, स्त्री-पुत्रादिक, नातलग, सुख-दुःख ई. त्या जीवनकाळ दरम्यान जीवाला प्राप्त होतात, आणि सर्व प्रारब्ध कर्म पूरेपूर भोगल्यातरंच त्याचा देह सुटतो म्हणजे तो जीवात्मा त्या देहातून सुटतो..
म्हातारपणी एकाद्याला अर्धांग वायु होऊन या कुशीचे त्या कुशीस होता येत नाही, स्वच्छतेच्या अभावी अंगाला दुर्गंधी सुटलेली असते, अशा अंथरूणात पडलेल्या अवस्थेत, भले तो वारंवार परमेश्वराला हाका मारुन देवा सोडव या यातनांतून. तुझ्या पायाशी यावयास मी केव्हाही तयार आहे.” असे वारंवार बोलून देवाची कितीही आळवणी करीत असो, तरीपण, या जन्मी भोगण्याचे निर्धारीत प्रारब्ध जोवर पूर्ण भोगून संपत नाही, तोवर त्याने काहाही केले, तरी त्याचा देह सुटत नाही. पण ज्या क्षणी ते पुरें होतें, त्यानंतर मुलाने तोंडात घातलेल्या गंगाजलाचा एकही थेंब पोटांत न जाता नाकावाटे बाहेर येतो, व एकही ज्यादा श्वास न घेता त्याचा अंत होतो.
व कर्म सिद्धांताप्रमाणे या सर्व हिशोबाचे संचित कर्म घेऊन उरलेले प्रारब्ध भोगण्यासाठी जीवात्म्यास परत नवीन अनुरूप असा नवा देह त्याला पुनः प्राप्त होतो. अशा रीतीने तो जीवात्मा, जन्म मरणाच्या चक्रात सतत फिरत असतो. अनादि काळापासून जन्म जन्मांतरातील संचित कर्मे भोगण्याचे हे चक्र अव्याहतपणे चालत आलेले असते. जोवर तो या चक्रातून सुटत नाही तोवर त्याला मुक्ति नाही.
म्हणूनच श्रीमद् आद्य शंकराचार्य म्हणतात :
पुनरपि जननं पुनरपि मरणं । पुनरपि जननी जठरे शयनं ॥
इह संसारे, बहु दुस्तारे । कृपयापारे पाहि मुरारे ॥
अशा प्रकारे अनेक योनीमध्ये जीव भटकत असतो. मनुष्य योनीत असता केलेल्या क्रियमाण कर्मातील अनेक अपरिपक्व कर्मे संचित म्हणून जमा होत राहातात त्यापैकी काही काळांतराने पक्व होऊन फळ देऊन शांत होतात. पण एकंदरीत जीवाचा संचित कर्म साठा प्रत्येक जन्मात वाढतच राहातो व या कारणे जीवात्मा मोक्षापासून दूर दूर लोटला जातो.
तुम्ही कर्म केलेंत की त्यांचे फळ तुम्हाला चिकटलेच समजा. फळ भोगल्याविना तुमची सुटकाच नाही. परिणामातून सूटण्यासाठी कितीही खटपटी- लटपटी केल्यात, तरी त्याचे परिणाम भोगल्याशिवाय त्यातून तुमची सुटका कदापि नाही.
राजा अंबरीषाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषिच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र जसे तीन लोकांत ते पळाले, तरी त्यांचा सतत पाठलाग करीत राहिले, त्यां प्रमाणे तुमचे कृत कर्म तुम्ही जाल तेथे तुमचा पिच्छा सोडणार नाही, आणि तुम्हाला भोग देऊनच ते शांत होणार.
कदाचित तुम्ही आपल्या द्रव्यबळावर या जगांतील कोणी नामवंत वकील देऊन, निर्दोष सुटका करून घेतलीत, तरी वरील कोर्टात परमेश्वराच्या न्यायालयांत तुम्ही कदापि सुटू शकत नाही. तेथे हुशार, चलाख वकीलाचा युक्तिवाद तुमच्या मदतीस येऊ शकणार नाही.
फार वर्षापूर्वीची सत्यघटना. अहमदाबादला एक विद्वान, अनुभवी सत्र- न्यायाधीश (Session Judge) होते. वेदांताचे गाढे अभ्यासी, कर्मसिद्धांतावर त्यांचा जबर विश्वास होता. एका गावी कोर्टाचे काम चालू असतां, सत्र न्यायाधीश एकदा नदीकांठी फिरावयास गेलेले असताना, जवळूनच एक माणूस पळताना व त्याच्यापाठी सुराधरी दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना व त्याचा खून करताना त्यानी पाहिले. खुनी माणसाचा चेहरा जज्ज साहेबानी बरोबर पाहिला. ते घरी आले पण या घटनेसंबंधी कोणाशीही अवाक्षर बोलले नाही.
पुढे पोलीस तपास होऊन, पाच-सहा महिन्यानी तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला व कर्म धर्म संयोगाने त्याच सत्र न्यायाधिशांपुढे सुनावणीस आला. परंतु कोर्टापुढे खुनाचा आरोपी उभा करण्यात आल्यावर न्यायाधीश साहेबांच्या लक्षांत आले की, त्यानी त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाऐवजी, आरोपीच्यां पिंजर्यात संशयित म्हणून उभा केलेला माणूस कोणीतरी भलताच होता.पोलिसानी सदर आरोपी विरुद्ध इतका ठोस आणि सबळ पुरावा दाखल केला, की आरोपीच खरा खुनी होता असे साक्षी पुराव्यावरून सिद्ध झालें.जज्ज साहेब मनोमन निश्चित जाणत होते की पिंजर्यातील बनावट आरोपी खरा खुनी नव्हता, कारण खरूया खुनी माणसाला त्यानी स्वतः चे डोळयानी पाहिलेला होता. न्यायाधिशाला पुराव्याचे आधारावरच निकाल छावा लागतो, पुरावा इतका ठोस होता की त्या आधारावर आरोपीला फाशीची शिक्षांच देणे अपरिहार्य होते.
परंतु प्रस्तुत न्यायाधीश गाढे वेदांती व कर्मसिद्धांतावर त्यांचा गाढा विश्वास होता. ते निश्चितपणे जाणत होते की खरा खुनी वेगळाच होता. पण समोरच्या पुराव्यानुसार एका निरपराध माणसाला फाशीची शिक्षा ठोठावण्याशिवाय त्यांच्या समोर अन्य मार्गच नव्हता. म्हणून शिक्षा फर्माविण्यापूर्वी न्यायाधिशानी सदर आरोपीला आपल्या चेंबर मध्ये खासगीत बोलण्यासाठी बोलावले. बनावटी आरोपी रडूं लागला व म्हणाला, महाराज मी पूर्ण निर्दोष आहे, खून मी केलेला नाही, व मी नाहक मारला जात आहे. न्यायाधीश त्याला म्हणाले, ही गोष्ट मी स्वतः जाणतो, तू या खटल्यातला खरा खुनी नाहीस. परंतु तुला फाशीची शिक्षाच देणे मला भाग आहे, माझ्यापुढे दुसरा पर्याय नाही. परंतु परमेश्वर निर्मित कर्माचा कायदा आहे, त्यांत काही गफलत तर नाहीना याचा मला शोध घ्यावयाचा आहे. त्या कायद्यानुसार माणसाला केवळ त्याच्या कर्मानुरोधाने फळे भोगावीच लागतात. तू निरपराधी असूनही कसा गोवला गेलास हे जाणण्यासाठी मला खासगीत तुला एक प्रश्न विचारावयाचा आहे, त्याचे तू ईश्वराला स्मरून खरे खरे उत्तर दे. मरणा पूर्वी खोटे बोलण्याचे पातक करू नकोस.
माझा प्रश्न असा आहे की “भूतकाळांत तू कोणाचा खून केला होतास का?खुनाच्या आरोपीने रडत रडत सांगितले की त्याने पूर्वी एक सोडून दोन खून केलेले होते, त्याच्यावर दोन्ही वेळा खटला पण भरला गेला होता, परंतु त्या वेळी त्याला पैशाचे पाठबळ असल्याने, त्याने दोन्ही वेळा नामवंत हुशार वकील नेमले होते व पोलीस खात्यांतही खूप पैसा पेरला होता, त्यामूळें त्यां दोन्ही खटल्यांत त्याची निर्दोष म्हणून सुटका झाली होती, पण आतां त्याची सांपत्तिक स्थिति खालावल्यामुळें, तो तसे करू शकत नव्हता, व पूर्ण निर्दोष असूनही या वेळी तोच खुनी असे सिद्ध करण्यात आले आहे.
सेशन जज्जांची पुरी खात्री झाली की परमेश्वराच्यां “कर्म-सिद्धांत” कायद्यात कोणतीही त्रुटी वा गफलत नाही. पूर्वीच्या खटल्याचे वेळी आरोपीची पुण्याई सबळ असल्यामुळे, त्याच्या क्रियमाण कर्माला फळ देण्यास विलंब झाला, व ते “संचित” कर्मात त्याचे खाती जमा राहिले. व आता त्याच्या पुण्याईला ओहोटी लागल्याने, या खेपेस तो पूर्ण निष्पाप असूनही त्याचे पूर्वीचे “संचित कर्म” प्रारब्ध म्हणून फळरूपाने त्याचेसमोर उभे राहिले, आणि आतां त्याला फासावर लटकण्या-शिवाय गत्यंतर नाही.
कर्त्याच्या पुण्याईचा जोर असल्याने संचित कर्म पक्व होण्यास विलंब लागतो, त्यां मुळें जगाच्या दृष्टिने तो दोषी असूनही काही काळ तो प्रतिष्ठित म्हणून उजळ माथ्याने जगू शकतो, पण पुण्याईचा जोर ओसरतांच, त्याचे संचित कर्म फळ देण्यास समर्थ होतें व फळ देऊन, आपला प्रभाव दाखवून शांत होतें.
म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी, माणसाने हजार वेळा विचार करावा एकदां कर्म केल्यावर, त्याचे फळ आज नाही उद्यां भोगलेच पाहिजे व त्यां वेळी छाती पुढे करून माणसाने त्यास सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. हसत हसत केलेले पाप, रडत रडत भोगावेच लागते.
आज येथेच थांबतो.
या पुढील विवेचन आपण पुढील भागांत पाहू.
क्रमशः ……….
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : उत्तराफाल्गुनी नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण उत्तराफाल्गुनी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. उत्तराफाल्गुनी नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील १२ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राला इंग्रजीत ‘डेनिबोला’ असे म्हणतात. या नक्षत्राची आकृती शय्येसारखी असून त्यात दोन सुरेख व ठळक तारे आहेत. ताऱ्यांचा रंग जरा पांढरट निळा असून ते बरेच तेजस्वी आहेत. फाल्गुनी महिन्यात हे नक्षत्र रात्रभर दिसू शकते.
नक्षत्राचा १ ला चरण सिंह राशीत व पुढील चरण कन्या राशीत येत असल्याने हे नक्षत्र त्रिपाद आहे, तसेच ते ऊर्ध्वमुखी, स्थिरमिश्र, मनुष्यगणी व अवलोचनी आहे. नक्षत्र स्वामी रवि, राशी स्वामी रवि व बुध व दैवत सूर्यदेवत असल्याने या नक्षत्रात प्रामुख्याने रवीचे विविध गुणधर्म आढळून येतात. विशेषतः रवीची कर्तबगारी व कर्तृत्व, उदात्तपणा, राजाचे शुभ गुण व बुधाचा चुटचुटीत व चुणचुणीतपणा यांचा सुंदर मिलाफ झालेला दिसून येतो. अग्नीसारखा प्रखर रवि या नक्षत्रात शीतल फलादेश देतो.
उत्तराफाल्गुनी नक्षत्र सात्त्विक प्रवृत्तीचे तसेच थोडे पराक्रमीदेखील आहे. तसेच सेवावृत्तीचे असून आश्रित आहे. थोरामोठ्यांच्या साहाय्यानेच हे जातक पुढे येतात. उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेले जातक सत्वगुणी, सभ्य, शांत, नम्र, विनयशील, उदार व उदात्त आचारविचाराच्या, हौशी, रसिक, विद्याव्यासंगी, टापटीप, नीटनेटकेपणा, स्वच्छता यांची आवड, थोडे शूर, पराक्रमी, आनंदी व संतोषी प्रवृत्तीचे असतात. हे नक्षत्र स्त्री व पुरुष दोघांनाही अनुकूल असते. कारण स्त्री व पुरुषांना लागणाऱ्या गुणाचे मिश्रण या नक्षत्रात दिसून येते. पुरुषांना शरीरप्रकृतीच्या दृष्टीने हे नक्षत्र अनुकूल आहे.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या पुरुष जातकांचा बांधा, उंच, सडपातळ, सडसडीत, अंगाखांद्याने मजबूत व काटक असतो. शारीरिक उर्जा व रोग प्रतिकारक शक्ती चांगली असते. दिसण्यात हे पुरुष जातक साधारण असतात. अधिकार मिळाल्यास त्याचा जनतेसाठी, लोकांसाठी किंवा समाजासाठी चांगला उपयोग कसा करता येईल, याकडे या जातकांचे लक्ष असते. उत्तराफाल्गुनी नक्षत्रावरचे अधिकारी प्रजाहित दक्ष, लोकांच्या अडचणी सोडवणारे, कार्यतत्पर व कर्तव्यनिष्ठ असतात.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्री जातकांसाठी हे नक्षत्र शरीर प्रकृती, सौंदर्य, कला, विद्या, शुभगुण या दृष्टीने अनुकूल असते. मात्र वैभव, श्रीमंती व राजयोग यांना फारसे अनुकूल नसते. या नक्षत्राची स्त्री मध्यमवर्गीय कुटुंबाची राणी असते. प्रमाणशीर उंच, रेखीव, आकर्षक बांधा थोडासा बारकट, कंबर बारीक पण कमाणीय असतो. हे स्त्री जातक फार काटक किंवा राकट वा नाजूकही नसून मध्यम असतात. चेहरा सुंदर पण मादक नसतो. तेजस्वी असतो पण रागीट नसतो. हे स्त्री जातक नेहमीच हसरे, आनंदी आणि समाधानी दिसतात. चेहऱ्यावर रवीचे सात्विक तेज व प्रसन्नता दिसून येते. चेहरा थंडीच्या दिवसात पूर्वेला उगवणाऱ्या सूर्यासारखा कोमल, प्रसन्न व ऊबदार असतो. त्यांच्या स्वभावात स्त्री-पुरुषाच्या गुणांचे मिश्रण दिसून येते. त्या शांत, आनंदी, समाधानी, संतोषी, संसारी, कर्तव्यदक्ष, चतुर, व्यवहारकुशल, कष्टाळू व सेवावृत्तीच्या असतात. मनाने कोमल, दयाळू व भावनाप्रधान असल्या तरी प्रसंगी कठोर, शिस्तप्रिय, बाणेदार असतात. रसिक, होशी व कलाप्रिय असल्या तरी चैनी किंवा उधळ्या नसतात. उत्तराफाल्गुनीची स्त्री खेळकर व मिळून मिसळून राहणारी, बोलण्यात मधुरता व नम्र, विनयशील, साधी व हौशी असते. थोडी स्वप्नात रंगणारी अथवा संकटाला घाबरून न रडता धैर्याने तोंड देणारी असते धाडसी व सज्ज असते. उत्तराफाल्गुनी एक आनंद निर्माण करणारी आदर्श गृहिणी आहे. उत्तराफाल्गुनीची स्त्री संसारातील रखरखत्या व तणावाच्या वातावरणात आपल्या सेवेने व गुणाने घरातील वातावरण प्रसन्न व आनंदी करून टाकते.
उत्तराफाल्गुनी नक्षत्र सरकारी किंवा खाजगी कंपनीतील दुय्यम अधिकारीवर्ग, हिशेबनीस, सचिव, लहान लहान व्यापारी, छापखान्यात काम करणारा वर्ग, लेखक, लहान लहान शेतकरी वर्ग, आर्किटेक्ट, कलाकार, वकील, इंजिनिअर्स, धान्य, गवत व कागदाचे व्यापारी, तलाठीवर्ग, म्युनिसिपालटी, ग्रामपंचायती, स्थानिक समित्याचे पदस्थ, समाजसेवक पुढारी ई. दर्शवते
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात रवि शुभ व चांगली फळे देतो. उत्तराफाल्गुनी नक्षत्रात रवि असता शरीरसौष्ठव उत्तम असते. उंच, हाडापेराने मजबूत, काटक, ऐटबाज बांधा असतो. लहान प्रमाणात अधिकारयोग मिळतो. कीर्ती, प्रसिद्धी, मानसन्मान चांगला मिळतो.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात चंद्र अनुकूल असतो. शरीरप्रकृती, सौंदर्य व कला यांना अनुकूल असतो. हे जातक देखणे, प्रसन्न, आनंदी, हौशी कलाकार व गुणी असतात. तसेच सधन, बुद्धिमान, उदार व थोड्या ऐषोआरामी असतात.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात मंगळ मध्यम शरीरप्रकृती देतो पण जातक काटक, शूर, धडपड्या, चळवळ्या असतो. आर्किटेक्टला उत्तम व अधिकार बरा.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात बुध चांगला असतो. मध्यम, उंच, आडवा, थोडा भरलेला बांधा असतो. हे जातक चपळ व तरतरीत असतात. बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, प्रतिभाशक्ती चांगली असते. हे जातक थोडे खोडकर असतात. लेखन, वाचन, साहित्य यांची आवड असते. व्यापाराला बरे.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात गुरु बांधा प्रमाणशीर, उंच, बारीक, चेहरा सात्विक, सुंदर, प्रसन्न व समाधानी वृत्ति देतो. हे जातक बुद्धिमान, हुशार, विद्याव्यासंगी व शिक्षित असतात. उच्च मध्यमवर्गात मानसन्मान मिळतो. मात्र गुरु सांपत्तिक व अधिकारदृष्ट्या मध्यम असतो.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात शुक्र रूप, कला यांना अनुकूल असतो. पैसा, मान, विद्येच्या दृष्टीने साधारण असतो. शुक्र असता बांधा उंच, गोंडम व सुडौल, ललितकला, आर्किटेक्ट यांना चांगला.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात शनि साधारण असतो. शरीरप्रकृती बरी असते. हाड व शिरा जास्त दिसतात. श्रम, कष्ट, धडपड जास्त, पण त्या प्रमाणात धन मिळत नाही. संकटे भोगणारा व दुःखी असतो.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात राहू शरीरप्रकृती, कला यांना अनुकूल. बुद्धिमत्ता व हुशारी बरी असते. ड्रॉईंग, फोटोग्राफी व आर्किटेक्ट ई. चांगले जमते. मानसन्मान, साधारण कीर्ती, पण धन चांगले मिळेल.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात केतू शरीरप्रकृतीच्या दृष्टीने बरा असतो. कला, बुद्धिमत्ता यांसाठी प्रतिकूल.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात हर्षल असता जातक बुद्धिमान, कर्तबगार व हरहुन्नरी असतो. संशोधन चांगले होते.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात नेपच्यून असता जाताकास शरीरप्रकृती बरी, आनंदी चेहरा, आनंदी, संतोषी व समाधानी वृत्ति प्रदान करतो. अंतःस्फूर्ती, प्रतिभाशक्ती, अंतर्ज्ञान, आत्मज्ञान, ध्यानधारणा चांगली असते.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर होणारे आजार फारसे दाहक नसून सौम्यच आहेत. यांना उत्तरार्थात जास्त आजार संभवतात. डोके दुखणे, अर्धशिशी, उष्णतेचा त्रास, कंबर दुखणे, पोटाचे विकार, चक्कर किंवा भोवळ येणे, उतार वयात रक्तदाब वाढणे ई या आजार हे नक्षत्र दर्शवते.
उत्तराफाल्गुनी हे त्रिपाद नक्षत्र असल्याने थोडेसे आरिष्टदायक आहे. सीतेचा विवाह या नक्षत्रावर झाल्याने तिच्यावर विवाहानंतर तिच्यावर बरीच आरिष्टे आली. या नक्षत्रावर जन्म झाला व इतर आरिष्ट योग असल्यास शांती करण्यास सुचवले जाते.
उत्तराफाल्गुनी नक्षत्र ठळक व सुंदर असल्याने हस्ताक्षरही मोठे, गोल व ठळक आढळते. लिहिताना हे जातक सरळ व एका रेषेत लिहितात. गति मध्यम असते.
उत्तराफाल्गुनी नक्षत्रावर १ व ३ या अंकाचे वर्चस्व असते. रविचे माणिक किंवा बुधाचा पाचू लाभदायक असू शकतो. अंधलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती लवकरच पूर्व दिशेला सापदु शकते.
उत्तराफाल्गुनी नक्षत्र मुहूर्त शास्त्रात महत्वाचे मानले जाते. हे नक्षत्र शुभ असल्याने विवाह, उपनयन अशा शुभ कार्याला चांगले. स्थिर नक्षत्र असल्याने वस्तू, गृहप्रवेश, घर बांधणे, कोनशिला बसविणे यांना चांगले. ऊर्ध्वमुखी असल्याने घरचा मजला वाढवणे, छप्पर घालणे, देवालयावर कळस चढवणे यांनाही चांगले. तसेच या नक्षत्रावर बारसे, राज्याभिषेक, बी पेरणे, बाग लावणे, औषधी झाडे लावणे, विहिर खणणे, नाक कान टोचणे, शांतिकर्म, शेतकामास आरंभ व विद्याभ्यास या कार्याला योग्य आहे.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : ग्रह विचार- नेपच्युन
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : प्रेडीक्टिव्ह स्टेलर ॲस्त्रॉलॉजी रीडर
नमस्कार,
आज आपण नेपच्युन या ग्रहाविषयी माहिती घेणार आहोत.
नेपच्युन क्रमांक २ चा मोठा ग्रह आहे. हा आकाशामध्ये फारच दूर असल्यामुळे शक्तिशाली टेलीस्कोपच्या शिवाय दृष्टीस पडू शकत नाही. हा सूर्यापासून साधारण २,५९,३०,००,००० मैल दूर असून याचा व्यास २७,६०० मैल आहे. नेपच्युनचे वजन पृथ्वीपेक्षा १७ पट अधिक आहे. नेपच्यूनला १४ ओळखलेले आहेत, ज्यामध्ये ट्रिटन सर्वात मोठा आणि प्रसिद्ध आहे. हा ग्रह एक आइस जायण्ट म्हणून श्रेणीबद्ध आहे. नेपच्यूनमध्ये मुख्यत्वे हायड्रोजन आणि हेलियम, मेथेन आणि अमोनिया मोठ्या प्रमाणात आहे. अशा या नेपच्यूनचा शोध जर्मन खगोलशास्त्रज्ञ जोहान गॉटफ्रीड गॅल आणि त्याच्या सहायक हेनरिक लुई डारेस्ट यांनी २३ सप्टेंबर, १८४६ रोजी लावला. नेपच्युनला राशीचक्र मध्ये मध्ये एक फेरी पूर्ण करण्यास १४६ वर्ष लागतात.
राशीचक्रा मध्ये नेपच्यून ला मीन राशिचे स्वामीत्व देण्यात आले आहे. नेपच्यून संवेदनशीलता, सहानुभूती, आणि कृपाबुद्धी, सृजनात्मक प्रवृत्ती, कला प्रेरणा आणि आपल्या डोक्यातील विलक्षण कल्पना, आध्यात्मिक विकास, अद्वैत वाद, भ्रम, भ्रांती, अतिरेकी भावना ई गुण दर्शवतो. नेपच्यून आध्यात्मिक गोष्टी मध्ये कार्य करतो जातकास दिव्य बनवितो. नेपच्यून मनोवैज्ञानिक क्षमता, भावना, प्रेरणा व विचार उत्पन्न करतो व जातकाचे भावनांमध्ये वाढ करतो. हा दूरदर्शीपणा प्रदान करतो जातक Crystal gazing (काचेच्या गोळ्यामध्ये विविध दृश्ये पाहणे) चा अभ्यास करु शकतो. हिप्नोटिज्म, विचार अध्ययन, प्रेम सल्लागार, आत्मिक गोष्टींचा निरीक्षक ई कार्य करू शकतो, कारण नेपच्यून जातकास विलक्षण कल्पनाशक्ति प्रदान करितो. हा कवि, संगीतज्ञ, कलाकार, पेंटर ई. करता लाभदायक आाहे.
नेपच्यून जातकास स्वप्नमय, कल्पनायुक्त अथवा काळी जादू माहित असणे अथवा अति धार्मिक होणे, अथवा विलक्षण कल्पनाती प्रेमासंबंधी मामल्यामध्ये अधिकाधिक रसिक बनवितो. गुप्त संबंध राखण्यात रुची असू शकते. नेपच्यून प्रधान जातकांना समजणे फार कठिण असते.
नेपच्यून अनिष्ट असेल, तर तो जातक अस्थिर असेल. नेहमी परिवर्तनाचा शौकीन, अविश्वसनीयअसू शकतो. ते फक्त वरिष्ठाबद्दल विचार करतील, षडयंत्रकारी व दुस-यांना नुकसानदायक प्रयत्न करतात. ते दुस-याना जास्त मात्रेत औषध, विष नशीला पदार्थ अथवा अफू सारखे पदार्थ देऊ शकतात.
शारीरिक आकृती : नेपच्यून नाडी मंडळ, रेटीना व डोळ्याच्या नसा ई. दर्शवतो.
आजार : डोळ्यांचे त्रास, मेंदूचे विकार, शिथिलता, मूर्च्छा, मानसिक व्यवधान, वेड, जलोदर, मादक पदार्थ, कोड, एलर्जी ई.
व्यवसाय : ज्योतिषी, जादूगार, दार्शनिक, अध्यात्मिक गुरु, कवि, संगीतज्ञ, सितार, वाद्य संगीत, नाटक, सिनेमा, आर्ट, पेन्ट, ड्रगिस्ट, मादक पेय, पदार्थ, तंबाखु, अफूचा व्यापारी, गैस प्लांट, विमान, जहाज, मासे, दवाखाना, आश्रम, कारागृहात मध्ये नोकरी, चहा बागायत, पेट्रोल, खाण मध्ये नोकरी, तेल किंवा क्लोरोफार्मचा व्यापारी, ईश्वर, नकली रेशीम, कोल्ड ड्रिंक व्यापारी ई.
स्थान : हवाई मार्ग, जलमार्ग, बंदर, कस्टम, एक्साइज, मत्स्य गृह, दारू, मादक पदार्थ, दवाखाना, कारागृह, आश्रम, गुप्त संस्था, शरणार्थी कैम्प, दुष्काळी छावण्या, साम्यवाद ई.
उत्पादक : चहा, विषारी औषधी, तेल, पेट्रोल, कलोरोफार्म, अफू, देवाच्या मुर्त्या, कलाकृती, नायलान, जेरेनियम ई.
शुभ रंग : चमकता गुलाब किंवा फिक्कट पिवळा रंग.
शुभ अंक : ७, १६, २५, ३४ इत्यादि.
शुभ दिवस : सोमवार, गुरुवार.
हस्ताक्षर : अस्थिर, मोडकया, वाकड्या रेषा, वादळासारखे अनिश्चित हस्तलेखन असते.
नेपच्यूनची राशी स्थित स्थूल फळे :
मेष राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर विचार व भावना तीव्र बनवितों, धार्मिक, उत्साही, शक्ति संपन्नता, साहसी, रहस्यमय, अनुभव व विश्वास, यात्राचा शौकीन, सहानुभूतिवाला, व दानशूर असतो. नेपच्यून पीडित असेल, तर समाजाशी वैर, प्रसंगी चाकूने हत्या करण्यास मागे-पुढे न पाहणारा, एखाद्यास पळवून नेणे ई. अवगुण असतील.
वृषभ राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर जातकाचे प्राप्ति मध्ये वृद्धि, बचत, व्यापार, सौंदर्य प्रेमी, दयाळू, मित्रांची आवड, संगीत मध्ये विशेष रूपाने वाद्य संगीतामध्ये रुची व कार्य, विनोदी, जमीन जुमल्याची प्राप्ति, भवन, मीठा द्वारे प्राप्ति व लाभ ई. नेपच्यून पीडित असेल, तर शत्रुमय, वैवाहिक आयुष्यात निराशा, जोडीदाराची कमी, धोका व भयंकर घटना होतात.
मिथुन राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर असामान्य बुद्धि, अंतर्ज्ञान, दूरदर्शिता, असाधारण तेज, उत्तम वक्ता, विलक्षण तर्कबुद्धी, ज्योतिषाचा विकास, आत्म- निरीक्षण, प्रेरणा, कल्पनाशक्ति, प्रवासाची आवड, उत्तम मैकेनिक अथवा उत्तम गणितज्ञ ई. नेपच्यून पीडित असेल, तर अस्थिरता, अनिश्चितता, आरामहीन, चतुर घोडेस्वार ई.
कर्क राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर दयाळू, सहानुभूतिपूर्ण, प्रेमी, अंतर्ज्ञानी, दुःखी लोकांना मदत करणारा, आत्मिक बळाच्या विकासा करिता मदत करणारा, मनोवैज्ञानिक शाखा द्वारे लाभ, सुखी पारिवारिक वातावरणाचा शौकीन, नेहमी घर बदलणारा ई. नेपच्यून पीडित असेल, तर भूतबाधा असलेल्या घरात वास्तव्य.
सिंह राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर क्रियाशील मेंदू, भावनायुक्त, अत्यधिक प्रेमी, सहयोगीचा शौकीन, समाजप्रिय,खेळाची आवड, उदार व शैक्षणिक कार्यामध्ये लाभदायक, संगीत, पेटिंग, सिनेमा, नाटक, कविता मध्ये सफलता, नेपच्यून पीडित असेल, तर प्रेमात निराशा व संतति मध्ये निराशा, लाजाळू, नम्र व भित्रा, अस्थिरतावादी, अनिश्चयी ई.
कन्या राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर अतिशय बुद्धिमान, अंतर्ज्ञानी, प्रेरणायुक्त, भविष्यवेत्ता, भक्ती व आत्मचिंतन, जहाज, इंजीनियरिंग, क्लर्क, नर्स, गणित, अकाउन्ट्स, ऑडिट, जन स्वास्थ्य कार्यामध्ये उत्तम सफलता ई. नेपच्यून पीडित असेल, तर अनेक आजारांनी ग्रस्त व त्रस्त, प्रेमात अतिरेकी भावूक ई.
तुळ राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर अध्यात्मिक दलाचा विकास, संगीत, पेटिंग, नृत्य, कविता ई. मध्ये निपुण, सहयोगिच्या संगती मध्ये राहून जीवनाचा आनंद घेतो, उत्तम कल्पना, सुंदर विपरित यौनद्वारे आकर्षित, नेपच्यून पीडित असेल, तर कधीही जोडीदाराशी प्रतारणा, अवैध संबंध ठेवणारा, जोडीदारास धोका देणारा, पति अथवा पत्नी अविश्वसनीय ई.
वृश्चिक राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर विचार व भावना अत्यधिक असेल, शक्ति व उत्साह प्रदान करतो. विज्ञानाकडे ओढा, रहस्यमय विज्ञानामध्ये संशोधन, प्रकृतिचे रहस्य उकल करण्याची शक्ति, विज्ञानी जीवन, दारुडा, पार्टनरशिप मध्ये लाभ, विमा, पैतृक संपत्ति व आत्मशक्ति, रहस्यमय विज्ञानाचा व्यावहारिक प्रयोग ई. नेपच्यून पीडित असेल, तर बुडणे, दुर्घटना होणे, अथवा औषधा मुळे मृत्यु होतो.
धनु राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर वास्तविक, भक्ति, प्रेरणा, धार्मिकता वादी, भविष्य कथन, संतांची स्वप्ने, वास्तविक दृष्टिकोण, लांबचा प्रवास, संतोषकारक सुख, मनोवैज्ञानिक अनुभव ई. नेपच्यून पीडित असेल, तर वाईट स्वप्न, खतरनाक दृष्टिकोण, आरामहीन, प्रवासामध्ये विघ्न, व राजनीति मध्ये असफलता ई.
मकर राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर योजनाबद्ध मेंदू, मनन करणारे डोके, गंभीर प्रकृति, ध्यान करिता उत्तम, मोठा आघात, एक चांगला टेहळणीखोर, गंभीर समस्या सोडवू शकणारा, रहस्यमय व वैज्ञानिक शाखा संशोधन, कला व संगीत द्वारे लाभ ई.
कुंभ राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर अंतर्ज्ञानी, अनुभवी, प्राकृतिक दृष्याचा शौकीन, आशावादी, स्वप्न मुक्त, आदर्शवादी, सामाजिक सफलता, मानसिक विकास, मानवीय सहानुभूतिपूर्ण, चांगल्या दृष्टीत असेल तर, मित्र द्वारे लाभ व वाईट दृष्टि नुकसान, बेअब्रू, अपकीर्ति, अडचणी, निराशा ई.
मीन राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर चांगला विचारक, उतम कल्पना, गंभीर दृष्टिकोण, प्रेरक, मध्यस्थताचे गुण, रहस्याचा शोध, शुभ दृष्टि जहाज द्वारे लाभ दर्शवतो नेपच्यून पीडित असेल, तर तो गुप्त शत्रु, धोका, प्रेतात्मक द्वारा कष्ट, कारावास, दारू सारख्या व्यसना पासून कष्ट ई.
नेपच्यूनची स्थित स्थानानुसार स्थूल फळे :
१ ले स्थान : मध्यस्थवादी, स्वप्न, मूर्च्छा, प्राण्याची भावना, चांगली प्रेरणा, दूरदर्शिता ब्रम्हसंबंधी शक्ति, जहाज अथवा तरळ पदार्थ द्वारा लाभ, कला मध्ये चांगली रुचि,
२ रे स्थान : तरळ पदार्थ द्वारा लाभ, साधारण, जीवनावश्यक वस्तु द्वारे लाभ, गुप्त व रहस्याचे मामले, शुम दृष्टि आर्थिक सफलता, दवाखाना, आश्रम, स्वास्थ्य गृह व जहाज, जलतरण, संरक्षित खाजगी सोसायटी ई. मध्ये नोकरी दर्शवतो. जर पीड़ित असेल, तर कधीही व्यापार करू नये, हा चुकीची संगत देतो. धोका व षडयंत्राद्वारे हानि,
३ रे स्थान : प्रेरक, लेखणी व पत्र-व्यवहार उच्च, आदर्श, संबंधी द्वारे अडचणी, अनेक लहान यात्रा, जर पीडित असेल तर दुस-याचे जागा, घोड्यापासून धोका ई.
४ थे स्थान : पारिवारिक जीवनामध्ये आध्यात्मिक वातावरण, निवास मध्ये परिवर्तन व तीर्थ यात्रा.
५ वे स्थान : उत्तम जलतरणपटू, भावुक, प्रेमी, लैंगिक आनंद, तेल कंपनी, शेअर वा जहाज द्वारे लाभ
६ वे स्थान : ब्रम्ह संबंधी शाखा, गुप्त प्रेतात्मा द्वारा धोका, नोकरा द्वारे हानि, जुने व लवकर बरे न होणारे आजार, शरिराला पोखरणारे आजार, मादक पदार्थ, व्यसने बंद करा तर स्वास्थ्य उत्तम राहील. कोंबडी पालन व पशु करिता प्रतिकूल.
७ वे स्थान : जर पीडित असेल तर तो अविश्वसनीय, जोडीदाराचे आजारपण, धोका, चालबाजी, पारिवारिक कष्ट, प्रेमात शंका, दोन प्रेमिका अथवा दोन विवाह
८ वे स्थान : पत्नी द्वारा लाभ, विचित्र, भयंकर, ब्रम्ह संबंधी स्वप्नाचे अनुभव, बुडणे अथवा विषाद्वारे अथवा मुर्छे चा धोका
९ वे स्थान : आध्यात्मिक ज्ञान, दर्शनशास्त्र, दीर्घयात्रा, करणी, पत्नीचे संदर्भात मुकादमाचे भय
१० वे स्थान : महत्वाकांक्षी, प्रेरक, नेतृत्व, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, कला व विज्ञानामध्ये निपुण, आध्यात्मिक पदाकडे जोड़ा, पैतृक संपत्ति द्वारे लाभ, तरळ पदार्थ, दवाखाना, खाजगी सुरक्षित सोसायटी, समुद्र व संगीत, मासे, लेखन ई.
११ वे स्थान : इच्छापूर्ती, चांगले मित्र, कवि करिता उत्तम, संगीतज्ञ, नाईट क्लब, समुद्र जलतरण पटू, मासेमारी ई.
१२ वे स्थान : विज्ञान रहस्य संशोधन, मोठ्या संस्था, दवाखाना, आश्रम, कारागृह ई. मध्ये नोकरी, जर पीडित असेल, तर धोका, कलंक, दु:ख, गुप्त शत्रु कारावासाची भीती ई.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : नक्षत्र गोचरी पद्धत
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : कुंडलीची गोलंदाजी
नमस्कार,
भविष्य कथनाच्या अनेक विविध पद्धती ज्योतिष शास्त्रात पूर्वापार चालत आलेल्या आहेत. कोणी दशा पद्धत वापरेल, काहीजण राशी गोचर ला महत्व देतील, कोणी अंक शास्त्र, कोणी कृष्मुर्ती पद्धत उपयोगात आणेल. कोणी दिन वर्ष पद्धतीचा वापर करतो.
अशीच एक जुनी व सहज सोपी पद्धत आज पाहणार आहोत ती म्हणजे नक्षत्र गोचरी.
क्रांतीवृत्ताचे ३६० अंशाचे १२ विभाग केले असता राशी चक्र तयार होते, तसेच ३६० अंशाचे २७ नक्षत्रांमधे विभाजन करून नक्षत्र चक्र तयार होते. एका ग्रहाच्या मालकीची ३ नक्षत्रे असतात. या नक्षत्र चक्र आणि राशी चक्राची फ़ार सुंदर गुफ़ण करण्यात आली आहे. थोड्क्यात १ नक्षत्र म्हणजे १३ अंश २० कला चा एक विभाग. सहाजिकच राशीफ़लात सुक्ष्मता आणण्यासाठी नक्षत्र विभागाचा उपयोग होतो. या नक्षत्रांचा क्रम ठरलेला असतो. मेष राशीतील अश्विनी हे पहिले नक्षत्र जे केतूचे आहे तिथुन सुरु होऊन केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध व परत केतू पासून बुध पर्यंत अशा क्रमाने ३ वेळा ९ ग्रह मिळून २७ नक्षत्रांचे एक चक्र पूर्ण होते. थोडक्यात ९ ग्रहांची एक माला १२० अंशात पूर्ण होते. १२० अंश गुणिले ३ माला बरोबर ३६० अंश.
जातकाचे जन्माचे वेळी ज्या नक्षत्रात असतो ते तुमचे जन्म नक्षत्र मानले जाते. हे नक्षत्र फार महत्त्वाचे असते. नक्षत्रावरुन रास समजते, राशिवरुन चंद्र समजतो त्यावरुन मन व मनावरुन वासना सर्व गोष्टी मनावर अवलंबून असतात. मनाचे समाधान म्हणजे सर्वसमाधान, मन, वासना व देह हे त्रिकुट रोजचे जीवन जगत असते. त्याच्याशी निसर्गाचा व समाजाचा संबंध येऊन अडचणी व दुःखे येतात.
ही नक्षत्र गोचरी एका दृष्टीने राशिगोचरी पेक्षाही अधिक महत्त्वाची आहे. राशि हा ३० अं. भाग आहे व नक्षत्र १३ अं. २० क. चा भाग आहे. म्हणजे एकाराशीत २। नक्षत्रे येतात. नक्षत्र राशीपेक्षा जास्त सूक्ष्म भाग असल्याने फलादेशातही अधिक सूक्ष्मता येते. नक्षत्रांचे नऊ नऊ नक्षत्रांचा एक असे तीन वर्ग करून जन्म नक्षत्रापासून दर एक नक्षत्रास निरनिराळे फल खालीलप्रमाणे कल्पिले आहे.
जन्मसंपद्विपत्कोमः प्रत्वरः साधकस्त्या । नैधनो मित्रवर्गश्च परमो मैत्र एवच ।।
जन्म नक्षत्रापासून
१ ले नक्षत्र : उत्पत्तिकर
२ रे नक्षत्र : संपत्कर
३ रे नक्षत्र : विपत्तिदायक (अनिष्ट)
४ थे नक्षत्र : क्षेमकर
५ वे नक्षत्र : प्रयाणदर्शक (अनिष्ट)
६ वे नक्षत्र : साधकतादर्शक
७ वे नक्षत्र : मृत्युदायक (अनिष्ट)
८ वे नक्षत्र : मित्र प्राप्ती दर्शक
९ वे नक्षत्र : नक्षत्र : परममित्ररुप.
असा हा फळदर्शक क्रम आहे. नऊ नक्षत्रांचा एक क्रम पूर्ण झाल्यावर याच क्रमाने १० व्या पासून सुरुवात करावयाची. जातकाच्या जन्मनक्षत्रापासून ३ ५ ७ वे नक्षत्रात ज्यावेळेला गोचर ग्रह येतात, तेव्हा ते त्रासदायक ठरतात. मंद ग्रहांच्या वक्री ग्रहांचा परिणाम जास्त होतो. पंचांगात प्रत्येक ग्रहांचा नक्षत्र प्रवेश दिलेला असतो. त्याचा अभ्यास करावा.
मानवाला नेहमी प्रकाशाचा प्रभाव असावा असे वाटते. अंधाराचा प्रभाव सहन होत नाही. ठराविक काळात माणसाच्या बुध्दीला जडत्व येऊन विचार सुचत नाही. बुध्दी ठाम निर्णय घेऊ शकत नाही, संभ्रम होतो. जन्म नक्षत्रापासून ३-या, ५व्या, ७व्या, नक्षत्रात नुसते चंद्राचे भ्रमण झाले, तरी मनाच्या विरुध्द घटना घडतात, असा अनुभव येतो. पापग्रहांचे भ्रमण त्रासदायक जाते.
जन्मनक्षत्रापासून ३,५,७, वी दशा किंवा अंतर्दशा त्रासदायक जातात. जन्म नक्षत्र निश्चित माहित असले की, या गोष्टी पाहणे फार सोपे जाते. हा नऊ, नऊ नक्षत्राचा एक गट प्रभावीपणे मार्गदर्शक ठरतो.
जन्मचंद्रापासून रवि ३,५,७ व्या नक्षत्रात असल्यास व वर्षाने परत त्याच नक्षत्रात येतो त्यावेळेस जन्मतः जो ऋतु असतो त्या ऋतुसंबंधी प्रकृतीस त्रासदायक होतो. सर्व जगाच्या पाठीवर ऋतु मुख्यधरुन सण येत असतात म्हणुन ज्योतिष शास्त्र दृष्ट्या ऋतुमानाप्रमाणे आरोग्याबद्दल विचार करावयाचा म्हणजे रविच्या भ्रमणाचा परिणाम इतर ग्रहांच्या तुलनेने करावा लागेल. कारण रविच्या भ्रमणामुळे ऋतु आढळून येतात. आपले जन्मनक्षत्र समजले म्हणजे त्या त्या तक्त्यात प्रत्येक नक्षत्रात रवि केंव्हा येतो हे समजते उदा.- रविचे भ्रमण मेष राशीत आहे म्हणजे अश्विनी, भरणी, कृत्तिका ह्या नक्षत्रातून आहे. इंग्रजी महिन्याप्रमाणे एप्रिल मध्यापासून मे मध्यापर्यंत असते. त्यावेळी उष्णतासुध्दा सारखी वाढत्या प्रमाणात असते अशावेळी मंगळ सुध्दा मेषेला असल्यास उष्णतेचे प्रमाण भयंकर असते त्यावेळी ज्यांचे ३, ५, ७, नक्षत्रे येत असल्यास त्यांना सनस्ट्रोक, आगी लागणे वगैरे त्रास होतो रक्तदाब वाढतो. काही वेळेस मेंदूमध्ये सुध्दा रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. मेष ही चर राशी असल्यामुळे रविचे त्यातील नक्षत्राचे आस्तित्वामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊन गोवर कांजिण्या सारखे सांसर्गिक रोग संभवतात व सामुदायिक रित्या ते ते नक्षत्र त्या मुलांना वाईट असते. असा अनुभव त्या त्या काळात येतो. सामुदायिक अपघाताच्या बाबतीतसुध्दा या नुसार संशोधन झाले पाहिजे. म्हणून प्रत्येकाने पावसाळा, उन्हाळा, हिवाळा ह्या तीन नक्षत्रांचा अभ्यास केला तरी बरेच काही हाती येईल. अनुभवांती व सरावाने आपल्या जन्मनक्षत्राप्रमाणे तक्त्यातील ९,९ गट पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यांत कसे येतात व त्यातील रविचे भ्रमण ३,५,७ नक्षत्रामध्ये असतांना कसा त्रास होतो हा अभ्यासाचा विषय आहे. माझ्या अल्पमतीने ह्यावर मी विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे ह्यावर प्रत्येकाने अनुभव घेऊन संशोधन करावे ही विनंती.
९ या अंकाला जन्मापासूनच महत्त्व आहे. एखाद्या जातकाचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर झाला म्हणजे बुधाची नक्षत्रे आश्लेषा, जेष्ठा आणि रेवती या नक्षत्रावर अगर पुष्य हा परममित्र नक्षत्रावर गर्भधारणा झाली असे समजावे. सर्वसाधारण ९ महिने ९ दिवसानी बालकाचा जन्म होतो ते २७९ दिवस येतात त्याची बेरीज ९ च येते. नव ग्रहांना विंशोत्तरी दशेत स्थान देण्यात आले आहे. ९ ग्रहांचे ३ मालिका मिळून २७ नक्षत्रांचे चक्र पूर्ण होते. २७ ची बेरीज ९ च येते. २७ नक्षत्रे ३६० अंशात समाविष्ट असतात, ३६० याची बेरीज ९ च येते. अधिक सूक्ष्मता येण्यासाठी नवमांश स्वामी देखील अभ्यासावा. तो जन्म नक्षत्रापासून कितव्या नक्षत्राचा स्वामी आहे त्यावरून फळ शुभ अथवा अनिष्ट असेल हे ठरवता येईल. प्रत्येक नक्षत्रात ४ चरणे अशी २७ नक्षत्रे मिळून १०८ चरण होतात, ज्याची बेरीज देखील ९ येते. त्यामुळे जप माळ १०८ मण्यांची असते. ९ वे स्थान हे भाग्याचे, उपासनेचे, धार्मिकतेचे, प्रगतीचे आयुष्यातील महत्व दर्शवणारे स्थान असते. याच पध्दतीवर हल्लीच्या राशिगोचरी आलेली आहे. सूक्ष्मतेने पाहिले तर ६/८/१२ ही त्रिक स्थाने नेहमी अशुभ मानतात. जन्मलग्नापासून किंवा जन्मराशी पासून ६व्या राशीच्या आरंभी तिसरे म्हणजे विपत्तिदायक नक्षत्र येते. आठव्या राशीच्या प्रारंभी दुसऱ्या क्रमातील सातवे किंवा नैधन (वध) नक्षत्र येते. १२ व्या राशीच्या आरंभी २५ वे म्हणजे तिसऱ्या क्रमातील ७वे किंवा पुनः नैधन नक्षत्रच येते ही सर्व नक्षत्रे अशुभ फलदर्शक आहेत. हीच स्थिती शुभयोगांची. जन्मस्थ लग्न किंवा चंद्रापासून ५ वी ९ वी त्रिकोणराशि असल्याने शुभ असते. या राशीच्या प्रारंभी जन्म, कर्म म्हणजेच शुभ नक्षत्रे येतात.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)