Category: Uncategorized

नक्षत्रे-पाऊस पीकपाणी आणि म्हणी


विषय : नक्षत्रे-पाऊस पीकपाणी आणि म्हणी

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : ज्योतिष विषयक मासिकातील एक लेख

मुळ लेखक : डॉ. वा. ल. मंजूळ

नमस्कार,

पावसाळा तोंडावर आहे आणि अशातच एक या संदर्भात डॉ. वा. ल. मंजूळ यांचा एक मजेशीर परंतु माहितीपूर्ण लेख वाचनात आला. त्याचा मूळ गाभा तसाच ठेवून आपल्या माहितीसाठी देत आहे.

ज्यावेळी हवामान खात्याचे वैज्ञानिक अंदाज उपलब्ध नव्हते, त्यावेळी अनुभवातील म्हणीवरून शेतकरी पीकपाण्याची व्यवस्था पाहात असत. आता पंचांगात देखील पर्जन्य विषयक ज्योतिष अंदाज उपलब्ध असतो, तसेच अनेक ज्योतिषीदेखील यावर भाष्य करू लागले आहेत.

शरद ऋतुमध्ये मेघ केवळ गर्जना करतात पण थेंबभर पाऊस पडत नाही, तर वर्षाऋतुमध्ये आवाज न करणारे मेघ, म्हणजे मुके ढग जोरदार वर्षाव करून जातात. त्यामुळेच मराठी भाषेत म्हण आली आहे. ‘गर्जेल तो पडेल काय?’

पीक पाण्यावर अशा अनेक म्हणी आहेत. पीकपाण्याच्या म्हणी हा आमचा प्राचीन ठेवा आहे. इ. स. १८९९ साली एका ब्रिटिश संशोधकाने अशा म्हणीचे संकलन करून विषयवार मांडणी केली. आजच्या प्रगत ज्योतिष शास्त्राआधी ‘शकुनंति’ ‘सहदेव भाडळी’ यांसारखे ग्रंथ याबाबत मार्गदर्शन करीत असत आणि त्याची सत्यताही प्रत्ययाला येत असे. या दोन संस्कृत–प्राकृत ग्रंथांचे हस्तलिखिते पुण्यातील मराठी हस्तलिखित संग्रहालयात आज पहावयास मिळतात. मराठीतील नक्षत्रे-पाऊस पीकपाणी या संदर्भातील म्हणींचा थोडक्यात आढावा घेऊ.

१) ‘सत्ताविसातून नऊ जाती तर बाकी धूळ देती।’

नक्षत्रांची संख्या एकूण २७ आहे. पण त्यातील केवळ नऊ नक्षत्रेच पावसाचा अनुभव देतात. ती जर वाया गेली तर शेतकऱ्याच्या वाट्याला शेतीतील मातीची धूळ राहते. (म्हणजे पिकाऐवजी दुष्काळ)

२) ‘मृगाची लावणी आणि हस्ताची उगवणी।’

मृगनक्षत्रावर पेरणी करावी. साधारणपणे जून महिन्यात ते येते. तर पीक कसे आले याची पाहाणी हस्त नक्षत्रावर म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात करावी.

३) ‘मघा आणि चुलीपाशी हगा (शौचाला बसा) नाही तर वरती बघा।’

मघा नक्षत्र खूप पाऊस पाडते. अगदी नैसर्गिक विधीसाठीही बाहेर पडता येत नाही. तर हेच मघा नक्षत्र पाऊस पाडू शकले नाही तर आशाळभूत दृष्टीने आभाळाकडे बघत राहावे लागते.

४) ‘मृगाचे आधी पेरावे आणि बोंबेचे आधी पळावे।’

नेहमी पेरणी मृग नक्षत्राचे आधी करावी. संकटात बोंब मारण्यापूर्वीच पळून जावे.

५) ‘पडेल हत्ती तर पाडेल भिंती

हस्त नक्षत्राचा धोऽधो पाऊस अगदी पार घराच्या भिंती पाडून टाकील.

६) ‘रोहिणी डागे, मृग गाजे, आर्द्रा वाहे पूर।

सहदेव कहे भाडळी घरघर वाजे।’

जर रोहिणी नक्षत्रात उकाडा झाला, मृग नक्षत्रात गडगडाट झाला आणि आर्द्रा नक्षत्रात पूर आला तर सहदेव आपल्या भाडळी ग्रंथाला म्हणतो जर या क्रमाने नक्षत्रे फळे देतील तर घराघरात हाताला काम मिळेल, यश मिळेल

७) ‘पडेल हस्त तर कुळंबी मस्त’

हस्त नक्षत्राचा पाऊस रब्बी पिकाला उत्तम असतो, पोषक असतो. त्यामुळे हस्ताचा पाऊस झाला की, शेतकरी मस्त जगेल.

८) ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती, पण कापूस न मिळे वाती।’

असे म्हणतात स्वाती नक्षत्राच्या पावसामुळे शिंपल्यामध्ये मोती तयार होतात. पण हाच स्वातीचा पाऊस कापसाचे पीक धुवून नेतो. अगदी देवापुढे समई लावायला वातीपुरता देखील कापूस मिळत नाही.

९) ‘पडतील उत्तरा तर अन्न न खाई कुतरा’

उत्तरा नक्षत्राचा पाऊस चांगला झाला तर भाताच्या पिकाचे वाटोळे होते. म्हणजे पाळलेल्या कुत्र्याला घास भरविण्याइतका भात घरात नसेल.

१०) ‘लागत नसे मघा तर आकाशाकडे बघा’

मघा नक्षत्र शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे, ते जर बरसले नाही तर आकाशाकडे डोळे लावून बघत बसा (आतुरतेने)

११) ‘न पडतील चित्रा तर भात ना मिळे पितरा’

चित्रा नक्षत्राचा पाऊस (सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये) न झाल्यास पितरांच्या (भाद्रपदातील) श्राद्धाला पिंडासाठी भात कसा मिळणार.

१२) ‘चित्राच्या तापाने हरणांच्या पाठी काळ्या’

चित्रा नक्षत्र पावसाळ्याच्या शेवटी येते. पण येताना प्रचंड उष्णता घेऊन येते. त्यामुळे जंगलातील हरिणांची कोवळी कातडी काळी पडते.

१३) ‘आर्द्रा आणि पाडी गरदाडा’

सत्तावीसातले पावसाळी सहावे नक्षत्र आर्द्रा, हे जोरदार पडले तर घरांच्या भिंतीना भगदाडे पाडून हाहाकार माजवते.

१४) ‘उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी, अन हिवाळा भोगी’

उन्हाळ्यात आपण कमी कपडे वापरून उघडेच राहातो. (संन्यस्त वृत्तीने) पावसाळ्यात थंडी-ताप- खोकला-सर्दीने रोगी बनतो. तर हिवाळ्यात छान-छान खातो, पितो आणि भोगतोही.

१५) ‘धारण-मरण आणि पाऊस कोणाच्या हाती नाही’

बाजारभाव (चढउतार) केव्हाही येणारा मृत्यू आणि पाऊस हे कोणाच्याच हाती नसते एवढे मात्र खरे.

१६) ‘ वळवणी आले आणि तळवणी घेऊन गेल

वळवाचा पाऊस आला आणि तळ्यातले शिल्लक पाणीही घेऊन गेला.

१७) ‘पाऊस पडेल तर पाणी साचेल’

एक अर्थ पाण्याचा साठा करण्यासाठी पावसाची गरज आहे तर दुसरा अर्थ मिळकत केली तर शिल्लक साठेल

१८) ‘माहो आणि हिवाचा लाहो’

माघ महिन्याची थंडी ही अधिक कडाक्याची असते

१९) ‘पुस (पौष) आणि घरोघरी हुस्स’

पौष महिना लागला की, थंडीमुळे हुश्य करावे लागते.

२०) ‘पाऊस पडे आणि माती तुडे’

पाऊस पडला तर मातीचा चिखल होतो आणि तुडवला जातो.

२१) ‘थंडी गेली बंडी केली’

थंडीमध्ये जाड कपडे वापरतो. ती गेली की, उन्हाळ्याचे बंडीसारखे (मलमलचे बिना कॉलर, अर्ध्या बाह्याचे कपडे) कपडे वापरतो.

२२) ‘चैत्र गळे, कुणबी पळे’

चैत्रात सहसा पाऊस येत नाही. त्यावेळी मशागती उघड्यावर चालतात पण त्याचवेळी पाऊस कोसळला तर शेतकऱ्याला धावाधाव करावी लागते.

२३) ‘धोंडा आणि पिकाचा लोंढा’

धोंडा महिना म्हणजे अधिक महिना त्यामुळे शेतात पिकाला उत येतो.

२४) ‘दुष्काळात तेरावा महिना’

अधिक महिना वर्षात तेरावा महिना असतो. तो जर दुष्काळात आला तर सर्वांनाच त्रास होतो.

२५) सुना आल्या सळा-सळा, सासुबाई पळा

मघा आणि पूर्वा नक्षत्राचे नाते सून सासूचे मानतात. त्यामुळे जर मघा (सुना) सळासळा आल्या तर पूर्व (सासू) पळापळा

२६) ‘म्हाताऱ्याने टेकली काठी, नाही तर साडेसाती

पुष्य नक्षत्र (म्हातारा) थांबले म्हणून साडेसातीचे संकट टळले.

२७) ‘गरजतो तो बरसतो का ?’

हस्त नक्षत्र केवळ गडगडाट करून गेले तर थेंबभर पाणी पडणार नाही.

पावसाची नक्षत्रे त्यांच्या वाहनावर वावरतात. त्यामुळे त्यांचे प्रमाण कमी जास्त मानले जाते. अशीही नक्षत्रे आणि त्यांची वाहने.

१) मृग नक्षत्र : गाढव वाहन, पावसाचे प्रमाण जूनमध्ये कोठे कमी कोठे जास्त

२) आर्द्रा नक्षत्र : वाहन कोल्हा पावसाचे प्रमाण कमी जास्त आणि हुलकावणी देणे.

३) पुनर्वसु : वाहन म्हैस, जुलैमध्ये जोरदार पावसाचे प्रमाण

४) पुष्य नक्षत्र : वाहन घोडा, जुलैमध्ये संमिश्र पावसाचे प्रमाण

५) आश्लेषा नक्षत्र : वाहन मोर, पावसाचे प्रमाण ऑगस्टमध्ये उघड-झाप करते.

६) मघा नक्षत्र : वाहन गाढव. पाऊस ऑगस्टमध्ये कुठे कमी, कुठे जास्त.

७) पूर्वा नक्षत्र : वाहन मेंढा ऑगस्ट सप्टेंबर जोरदार पाऊस

८) उत्तरा नक्षत्र : वाहन म्हैस, सप्टेंबर महिन्यात पाऊस जोरदार

९) हस्त नक्षत्र : वाहन कोल्हा, पाऊस सप्टेंबर-ऑक्टोबर हुलकावणी

१०) स्वाती नक्षत्र : वाहन हत्ती, ऑक्टोबर-नोव्हेंबर जोरदार वृष्टी

.लोकभाषेत नक्षत्रांना टोपननावाने खेड्यातून ओळखतात.

१) मृग : खरीप

२) पुनर्वसु : तरणा

३) पुष्य : म्हातारा

४) आश्लेषा : आसळका

५) मघा : सासूबाई

६) पूर्वा : सूनबाई

७) उत्तरा : रब्बी पाऊस

८) हस्त : हत्तीचा पाऊस

तर अशी ही नक्षत्रे-पाऊस पीकपाणी आणि म्हणी यांची गावरान मेजवानी.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

गोचर फलादेश कार्यशाळा संपन्न


अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्था (मुंबई) तर्फे गोचर फलादेश या विषयावर दि. १९/६/२०२४ रोजी सायं. ५ वा. विनामूल्य कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

सूत्र संचालन संचालिका सौ.समीक्षा ताई दारवलिकर यांनी केले.

ज्यो.अनिल महामुनी, ज्यो.ज्योतिष मित्र मिलिंद, ज्यो.सौ.समीक्षा ताई दारवलिकर यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.

२६ उपस्थितांनी याचा उत्स्फूर्तपणे लाभ घेतला.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

वक्री गुरु आणि त्याचे परिणाम


विषय : वक्री गुरु आणि त्याचे परिणाम

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

संदर्भ ग्रंथ : द फैसिनेटिंग ज्युपिटर

मुल लेखक : ज्यो. डॉ. एल.आर.चौधरी

नमस्कार,

वक्री ग्रह या शब्द प्रभावाने आपण जेव्हा एखादा ग्रह वक्री असतो, तेव्हा त्याचे मालकी, बळ, स्थिती इत्यादी विचारात न घेता तो दुर्बल ग्रह मानला जातो आणि त्याचे परिणाम प्रतिगामी असल्याचे आपण मानायला लागतो.

वक्री ग्रह परिस्थिती आत्म निरीक्षण करण्यासाठी आणि आपल्या भावनांवर परिणाम न होऊ देता काय करावे हे ठरवण्यासाठी वेळ देतो. सावधगिरी बाळगण्याची ही वेळ असते. ग्रह मार्गी होईपर्यंत आवश्यक  नियोजन करा, म्हणजे जेव्हा ते पुन्हा मार्गी होतील, तेव्हा तुम्ही फळांचा आनंद घेऊ शकता.

सामान्य तत्त्वे अशी आहेत की, जेव्हा ग्रह वक्री होतात, तेव्हा ग्रहाचा प्रभाव कमी होतो. वक्री चाल  ग्रहाच्या नियमित दिशेच्या विरुद्ध आहे आणि त्या संदर्भात वाईट समजले आहे.

जेव्हा अशुभ ग्रह प्रतिगामी होतात, तेव्हा वाईट प्रभाव वाढतात.

एखादा ग्रह, तो बलहीन असला, तरी चांगल्या घरामध्ये वक्री असेल आणि अस्तंगत नसेल, तर तो जातकाचा दर्जा उंचावतो, व जीवनात खूप उच्च पद आणि स्थान प्राप्त देतो.

जेव्हा एखादा ग्रह त्याच्या नकारात्मक किंवा शत्रू राशीत वक्री असतो, तेव्हा जातक वाईट कृत्यांमध्ये गुंतून जाईल. त्याच्या संबंधांमुळे त्याची निंदा होईल. परदेशात राहून दुसऱ्याच्या हाताखाली सेवक होईल.

वक्री ग्रहांच्या दशा कालावधीचे परिणाम जर तो बलवान राशीत, स्वराशीत अथवा मित्र राशीत किंवा ६ ८ १२  व्या व्यतिरिक्त स्थानात असेल, तर चांगले होतील. आणि जर अंतर्दशेच्या काळात एखादा ग्रह वक्री असेल किंवा त्याच्या स्वतःच्या किंवा ग्रहातून निघून गेला असेल तर उच्च राशीत परिणाम चांगले होतील.

वक्री ग्रह आणि गोचर

जेव्हा एखादा नैसर्गिक लाभदायक ग्रह अनुकूल स्थानात १ ४ ५ ७ ९ १० मध्ये भ्रमन करतो, तर अधिक चांगले परिणाम देईल. परंतु जेव्हा लाभदायक वक्री ग्रह ३ ६ ८ ११ १२ मध्ये संक्रमण करतात, तेव्हा वाईट परिणाम कमीतकमी कमी होतील.

जेव्हा एखादा अशुभ ग्रह वक्री असतो आणि वरीलप्रमाणे अनुकूल घरातून मार्गक्रमण करतो, तेव्हा त्या घराचे चांगले परिणाम निरस्त होतात. परंतु कूट वक्री ग्रहाच्या अशुभ घराचे संक्रमण करताना, त्या घराचे दुष्ट परिणाम अधिक वाईट होतील.

नेपच्यून, युरेनस, शनी, गुरू आणि मंगळ हे प्रमुख ग्रह, जेव्हा अंशात्मक संवेदनशील बिंदूंमधून जातात,  तेव्हा जातकाच्या जीवनावर आणि भविष्यावर प्रशंसनीय प्रभाव पडतो.

वक्री गुरु :

होरासार या ग्रंथामध्ये वक्री गुरु जर त्याच्या नकारात्मक राशीत नसेल, तर बलवान असल्याचे प्रतिपादन केले आहे. वक्री ग्रहाच्या दशेमध्ये त्याला पराक्रमासह सन्मान मिळेल आणि धनप्राप्ती होईल

परंतु जातक तत्व सांगते की, वक्री ग्रहाच्या दशेत अवनती होते, सन्मानाची हानी होते, आनंदात घट होते.

सारावली आणि जातक तत्वाने सूचित केले आहे की वक्री आणि बलवान ग्रह राज्य आणि संपत्ती प्रदान करतील. वक्रीपणातील दोषांमुळे दुःख आणि अनावश्यक प्रवास घडतील.

जेव्हा गुरु वक्री होतो किंवा मार्गी होतो, तेव्हा व्यक्ती आणि राष्ट्रांसाठी दिवस खूप महत्त्वाचा असतो.

गुरु हा सर्वात फायदेशीर ग्रह आहे, अगदी पूर्वगामी स्थितीतही कुंडलीतील मालकी, स्थान आणि स्वभावाच्या अधीन राहून खूप इच्छित परिणाम देऊ शकतो.

२ ४ ५ ७ ९ या स्थानातील ग्रहाचे वक्री होणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते.

परंतु १ ३ ६ ८ १२ या स्थानातील वक्री ग्रह आजारपण वाढवण्याची शक्यता असते.

वक्री गुरु जातकाला त्याच्या सर्व अग्निपरीक्षेमध्ये टिकवून ठेवतो, मग त्याची दशा असो वा नसो, लग्न स्थानी असो, किंवा १० व्या, ५ व्या किंवा ९ व्या किंवा अगदी ११ व्या स्थानामध्ये असला, तरी अशा परिस्थितीत होणारे वाईट गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

वक्री गुरुचे गोचर परिणाम

१. चंद्र राशीत वक्री गुरु : प्रकृती अस्वास्थ्यामुळे जातक खूप चिंता करतो. अस्वस्थता हा नियम आहे. व्यक्ती कफ आणि चिडचिड होते. गुरू दर्शित आजार होतील. काही कारणास्तव ऍलर्जी देखील होते आणि जातक अस्वस्थ होतो.

२ रे स्थानात : आरोग्य सुधारेल. शांतता आणि माणूस शांतपणे निर्णय घेतो. गुरु हा मारक नसावा.  प्रवासादरम्यान चांगले आरोग्य लाभेल. त्याचा जोडीदार बिकट स्थितीतून बाहेर येईल.

गोचर दरम्यान २ ऱ्या घरातील वक्री गुरु कर्जे गोळा करण्याची, भूतकाळातील खात्यातून जाण्याची आणि मागील देय कर्जासाठी किंवा कर परतफेडीसाठी अर्ज करण्याची वेळ दर्शवते. जेव्हा गुरु या घरात मार्गी  असतो, तेव्हा नवीन आर्थिक उपक्रमांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची, पगार वाढवण्याची, चांगल्या नोकरीसाठी अर्ज करण्याची आणि केलेल्या कामासाठी चांगले वेतन मागण्याची वेळ असते. आर्थिक संधी उपलब्ध होतील. २ रे घरातील उच्चच आणि वक्री गुरु सूचित करतो की, जातकामध्ये पैशाच्या, आर्थिक बाबतीत मूल्यांची चुकीची भावना बाळगण्याची प्रवृत्ती असेल. गुरुच्या दशा अंतर्दाशेतील त्रासांचा अंदाज लावता येतो. प्रतिष्ठा आणि न्याय याचा क्झुकीचा अर्थ घेतला जातो. एखाद्याचा स्वभाव विलक्षण असेल. अशाप्रकारे मोठे उत्पन्न असूनही, एखाद्याला आर्थिक परिणाम म्हणून मोठा खर्च करावा लागतो. जातक व्यर्थ बोलत राहील आणि शब्दांबाबत बेफिकीर असेल..

३ रे स्थानात : भाऊ आणि सासरे यांचे आरोग्य सुधारेल. पण या काळात जाताकास भीती वाट राहील.

४ थे स्थानात : आईची तब्येत सुधारेल आणि आपल्या कामात अधिक आत्मविश्वास वाढेल.

५ वे स्थानात : चांगल्या भावना दर्शवते, बुद्धी तीक्ष्ण होते, मुले चांगले राहतील, तो आनंदी मूडमध्ये असेल. सट्टेबाजीत किरकोळ फायदा.

६ वे स्थानात : काही गुप्त आजार, गंभीर स्थिती नसून देखील चिंता निर्माण करेल. इतर सांसारिक अपयश त्याच्या दुःखात भर घालतात.

७ वे स्थानात : पुन्हा आनंदाची वेळ. दुसरा मधुचंद्र असेल. व्यावहारिकदृष्ट्या सर्व चिंता दूर होतील. चेहरा तेजोमय होईल. चपळता आणि जोम वाढेल. तसेच आजारांपासून मुक्त होईल.

७ व्या घरातील वक्री गुरु सूचित करतो की तो त्याच्या जोडीदाराला नव्हे तर इतर सर्वांनाही शांत करण्यासाठी प्रयत्नांचे टोक गाठतो. इतरांच्या कल्पनांना खूप महत्त्व दिले जाते, परंतु प्रत्येकजण खूश होऊ शकत नाही हे समजून घेण्याच्या अक्षमतेमुळे काहीही साध्य होत नाही.

८ वे स्थानात : हे यातना वाढवणारे घर आहे. कोणताही मंद गतीने जाणारा ग्रह वक्री होतो तो नेहमी विद्यमान आजारांना अधिकच बिघडवतो आणि परिणामी प्रचंड खर्च आणि चिंता निर्माण होतात.

९ वे स्थानात : ट्रांझिटमधील सर्वोत्तम वेळ. जन्मजात ग्रह सुद्धा वक्री असेल, तर त्याची दशा उत्तम असेल. सर्व फायदे आणि रोगांपासून मुक्त.

१० वे स्थानात : आळस कारणीभूत ठरतो. शनीच्या घरामध्ये त्याचे शुभ प्रभाव नष्ट होतात. जन्मजात चार्टमध्ये तो १० व्या क्रमांकावर असूनही काही चांगले होणार नाही. व्यवसायात खूप अस्वस्थता आणि व्यवसाय. कोणताही गंभीर आजार नाही पण मनाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटते.

११ वे स्थानात : सर्व चांगल्या गोष्टी घडतील. जातक चांगली संपत्ती, स्त्री आणि सौख्य यांचा आनंद घेतात. ११ व्या घरातील वक्री गुरु जातकास सामाजिक गटांमध्ये मान सन्मान मिळवून देतो. परंतु जातकास  अव्यवहार्य आणि हट्टी बनवतो. त्याचा स्वतःचा मार्ग असेल. जर वृषभ राशीत असेल तर, जातक वरचढ असेल, त्याच्या ठामपणामुळे त्याची उर्जा वाया जाते. त्याचे वर्तन सतत आग्रही ठरते आणि शेवटी त्याचे सर्व मित्र आणि शुभचिंतक लांब जातात. हे सर्व असूनही वक्री गुरु त्याची स्थिती, शक्तीचा प्रभाव कमी होऊ देत नाही.

१२ वे स्थानात : झोप आणि शयन सुखात कमतरता आणि निराशामुळे काही तडकाफडकी कृती आणि परिणामी त्रास होतो. १२ व्या घरात गुरु वक्री असल्यास, उत्साह बहुतेक वेळा कमी होतो. स्वत:ची ओळख तयार करण्यात अडचणी येतात.

कुंडलीमध्ये. २ ४ ५ ७ ९ ११ या घरामध्ये वक्री होणे सामान्य आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. परंतु १ ३ ६ ८ १२ व्या घरामध्ये अस्तित्वात असलेल्या आजारांच्या वाढीचे संकेत मिळतात.

जन्मकुंडलीतील वक्री गुरु : 

गुरु जन्मपत्रिकेत वक्री असतो, तेव्हा जाताकास सहसा इतरांच्या अपयशात यश मिळते. अशा बिंदूपासून सुरुवात होते जिथे इतर निरुत्साहित होतात आणि ज्या प्रकल्पांना सोडले गेले आहे त्यात यशस्वी होण्याची अद्वितीय क्षमता असते. जेव्हा संधी मिळते तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. काही लोक अयशस्वी कंपनीचे पुनरुज्जीवन करतात आणि लपविलेल्या मालमत्तेचा पर्दाफाश करतात किंवा दुसऱ्या शब्दात ते काही उल्लेखनीय काम करतात, जे इतर लोक करू शकत नाहीत. हे जातक लाभाच्या स्पष्ट संधींना उत्साहाने प्रतिसाद देत नाहीत. परंतु तज्ञांना अशा निराशाजनक परिस्थितीतून नफा मिळविण्यासाठी त्वरित सतर्क होतात. ते संशयास्पद नजरेने विश्वासार्ह गुंतवणूक मानू शकतात. अनेकदा आश्चर्यकारक सत्तापालट करतात. व्यक्तिनिष्ठ दूरदृष्टी असल्याने, हे जातक काळाच्या बरोबरीने चालताना दिसतात. ते आपत्तीचे भाकीत करतात, जेथे इतरांना यश दिसते आणि त्याउलट. अज्ञात घटक, संधी घटक यांचा समावेश असलेल्या परिस्थितीत ते विशेषतः चांगले आहेत. अज्ञात घटकामुळे शक्य होणारी स्थिरता ही यशाची गुरुकिल्ली बनते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)