
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : शेतीकाम, फळबाग, फार्म हाऊस, परस बाग, कुक्कुट पालन, पशु पालन, दुग्ध व्यवसाय यासाठी उपयुक्त होरा.
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : प्रेडिक्टिव्ह स्टेलर ॲस्ट्रोलॉजी रीडर
नमस्कार,
मध्यंतरी होरा विषयी माझा एक लेख प्रकाशित झाला होता. तेव्हा काही जणांनी पिके किंवा शेतीसाठी कोणता होरा उपयोगी असेल अशी विचारणा केली होती.
शेतकरी हा भारताचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे. शेतकरी आहेत म्हणून आपला देश सुख समृद्ध आहे. अनिश्चित हवामान वातावरणात वर्षभर कष्ट उपसायचे आणि कोणते ना कोणते निमित्त झाले की प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन जोपासलेल्या पिकाचे नुकसान सहन करायचे. पण हार न मानता परत वर्षानुवर्षे परत जिद्दीने कामाला लागायचे. खरंच सोपे नाही, आपण तासभर घराच्या अंगणातील माती फावड्याने बाजूला केली तर हाताला घट्टे येतात, पोटऱ्या, पाठ बोलायला लागते. मग यांचे काय.
अशा शेतकऱ्यास माझा आदरयुक्त प्रणाम 🙏
मी काही शेती तज्ञ नाही, सहदेव भाडळी आदींनी शेती व अनुमान विषयक लेखन केले आहे. पंचांगात सुद्धा काही भाकिते दिलेली असतात. पण ज्योतिष च्या अनुषंगाने होरा विभागात काही शेत कामा संबंधी माहिती मिळते का याचा शोध घेतला असता काही माहिती मिळाली. त्याचेच संकलन येथे देत आहे.
आशा करतो, ही माहिती शेतीकाम, फळबाग, फार्म हाऊस, परस बाग, कुक्कुट पालन, पशु पालन, दुग्ध व्यवसाय आदि.साठी उपयुक्त ठरेल.
जर तुम्ही शेतकरी असाल अथवा फार्म हाऊस असेल, तर पूर्ण सिंचित जमीनीची शेती, झाडे, झुडपे लावणे, विहिरीची स्वच्छता ई. कामे, कालवा खोदणे चंद्र होरा मध्ये करू शकता.
शुक्रवारी चंद्र होरा ऊस कापणी करिता शुभ असतो.
बैल जंपणे, पशु चिकित्सा, कुक्कुट पालन, पशुपालन, खाद्य, धान्य, फळे, फुल बागा, शेती यासाठी शुक्रवार वा शुक्र होरा चांगला असेल. तांदूळ व्यापारासाठी मंगळवारी शुक्र होरा उपयोगी ठरेल.
जर तुम्ही दुध वा दुधा संबंधी पदार्थ, डेरी फार्म ई. व्यवसाय करत असाल, तर रविवार, मंगळवार व गुरुवार ला चंद्राच्या होऱ्या मध्ये गरम दूध विकणे शुभ असते. शुक्रवार शुद्ध दूध विकणे करता शुभ आहे. सोमवार ला कमी प्रतीचे दूधा करिता व शनिवारी आइस्क्रीम साठी शुभ आहे.
जी व्यक्ति राळ, हिरव्या भाज्या, खाद्य पदार्थ, गुळाचे व्यापार करितात ते आपला व्यापार चंद्र होरा मध्ये प्रारंभ करू शकतात. चंद्र होरा सोमवार व रोहिणी नक्षत्रामध्ये विशेष रूपाने आदर्श असते.
खतांचा उपयोग करण्यासाठी सोमवारी मंगळ होरा शुभ असतो. शेतीची विकत औजारे घेण्याकरता मंगळ होरा उपयुक्त ठरतो.
शेतीसाठी शासकीय योजना लाभ ई. कामे साठी गुरू होरा, कीटकनाशक फवारणी साठी रवी होरा, पीक कापणी साठी शनिवारी गुरू होरा योग्य.
विमा वर अधिकारी सहीसाठी शनी व मंगळ होरा उपयुक्त त्याचा शेतकऱ्यास लाभ होईल.
जमीन मालकी साठी पत्र व्यवहार, कंदमुळे, बटाटा, शेवगा शेंगा, भुईमूग, तेल बियाणे यांची पेरणी करण्यास शनी होरा उपयोगी आहे.
टीप : लेखात ज्या ग्रहांचा होरा सांगितला आहे, त्यांचे वार, तिथी, नक्षत्र, दशा अंतर्दशा गाठून होराचा उपयोग केला तर जास्त प्रभावी ठरेल, असे मला वाटते.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : राशी चक्रातील १२ राशींचे वर्गीकरण व प्रभाव (भाग ४)
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : प्रेडीक्टीव्ह स्टेलर ॲस्त्रोलॉजी रीडर
नमस्कार,
राशी वर्गीकरण भाग १, २ व ३ मध्ये आपण राशींचे १३ विभागात केलेले वर्गीकरण व सकारात्मक व नकारात्मक राशि, उतरी व दक्षिणी, विषुवीय, अयन वृत्तिय राशि,अग्नी, पृथ्वी, वायु, जल राशि, चर, स्थिर व द्विस्वभाव राशी या बद्दल जाणून घेतले.
आज आपण (५) फलदायी व निष्फल राशी (६) मूक राशि (७) हिंसक राशि (८) मानवीय राशि (९) स्वर राशि (१०) चतुष्पाद राशि (११) द्विसंख्या राशि (१२) द्वि तनु राशि (१३) लघु व दीर्घ उदित राशि या बद्दल माहिती घेणार आहोत.
(५अ) फलदायी राशि :
कर्क, वृश्चिक व मीन या राशि फलदायी म्हटल्या जातात. वृषभ, तुळ, मकर व धनु या राशि अर्ध फलदायी राशी आहेत. ५ व ७ वे स्थानामध्ये फलदायी राशि असेल व त्यांचे राशी स्वामी फलदायी राशि मध्ये असेल तर विवाह लवकर होतो. निष्फळ राशि ५ वे लग्न स्थानी असतील (व इतर सूचक ग्रह स्थिती व घटक) हे दर्शवते की, योग्य समयी विवाह होणार नाही. फलदायी राशि ११ व ५ वे स्थानी असतील व त्याचे राशी स्वामी फलदायी राशि मध्ये असतील तर संतती होते.
(५ब) निष्फळ राशि :
मेष, मिथुन, सिंह व कन्या राशि निष्फळ अथवा वांझ राशी म्हटल्या जातात. लग्न स्थानी, ५ वे व ११ वे स्थानी निष्फळ राशि असेल, अथवा त्यांचे राशी स्वामी निष्फळ राशिमध्ये असतील, चंद्र फलदायी राशि मध्ये नसेल अथवा कोणताही फलदायी ग्रह ५ वे व ११ वे स्थानी नसेल, तर संतान योग कमी करतो.
(६) मूक राशि :
सर्व जल राशि कर्क, वृश्चिक व मीन राशि मूक राशि आहेत. जर बुध ६ वे स्थानाचा अधिपती असून २ रे स्थानी मूक राशि मध्ये स्थित असेल आणि बुध कुठेही मूक राशीत स्थित असेल व मंगळ व शनि ने पीडित असेल, तर अडखळत बोलणे, तोतरे बोलणे असू शकते. या वर मंगळाची अशुभ दृष्टी पडत असेल, तर जातक खूप जलद घाईत बोलणारा, बोबडा, चुकीचे शब्दोच्चार करणारा असू शकतो. बुध मूक राशीत चंद्राच्या प्रतियोगात असेल तर वाणी मध्ये दोष असू शकतो. लग्न स्थानी मूक राशीतील शनि वाचा दोष देऊ शकतो. २ रे स्थान स्वर इंद्रिये दर्शवते. जर २ रे स्थानी स्वर राशी मध्ये विशेष करून शुक्र वा बुध कोणत्या अशुभ दृष्टी विना स्थित असतील, तर वक्तृत्वाची अथवा विशेष आवाजाची देण दर्शवते. गुरु सल्ला व उपदेशात्मक आवाज (मग तो व्यवसाय असला नसला तरी) अथवा भाषण देणारा दर्शवतो.
मंगळ व गुरु दृढ़ वक्ता बनवितात व तो व्यक्ति आपल्या उतेजक वाणी द्वारा सभेमध्ये बदल घडवून आणू शकतो. बुध व शनि हे दाखवितात, की ती व्यक्ति काल प्रसंगानुसार वा समूहाच्या मानसिकतेनुसार आपल्या बोलण्यामध्ये बदल वा सुधारणा करतात.
(७) हिंसक राशि :
मेष व वृश्चिक राशि हिंसक राशि म्हणविली जाते, ते भयहीन असतात. हे जातक सर्व साहसी कार्य हिमतीने व आत्मविश्वासाने करितात. हे जातक संकटाचा सामना करण्यास सक्षम असतात.
(८) मानवीय राशि :
मिथुन, कन्या, कुंभ व धनु राशीचा पहिला अर्ध भाग मानवीय राशि मध्ये येतात. यांची राशी चित्रे मानवीय आकृती युक्त आहेत. काही लेखक तुळ राशि ला ही मानवीय राशि मानतात. होरा सार १ ला श्लोक अध्याय ११ मध्ये पृथुयास चे म्हणणे आहे की, या राशि बलवान असतील जर लग्न मानवीय राशि मध्ये असेल अथवा कोणत्याही जातकाच्या कुंडली मध्ये प्रमुखग्रह मानवीय राशि मध्ये नसेल, तर तो सामाजिक नसतो. अधिक मानवीय पण नसतो. जर लग्न अथवा प्रमुख ग्रह मानवीय राशि मध्ये नसेल तर तो जातक स्वतः स्वभावाने विकृत असू शकतो.
(९) स्वर राशि :
मिथुन, तुळ व कुंभ या वायुमय राशि आहेत, त्याना स्वर जथवा संगीतमय राशि म्हणतात. काही पश्चिमी विद्वान कन्या व धनु राशिला स्वर राशि मानतात. काही वृषभला पण मानतात. स्वरा करिता वायुचे माध्यम आवश्यक आहे, म्हणून स्पर वायु राशिना स्वर राशि मानतात.
(१०) चतुष्पाद राशि :
मेष (मेंढी), वृषभ (बैल), सिंह (सिंह), मकर (बकरी) व धनू राशीचा उत्तरार्ध पशुच्या चित्राच्या आधारित चतुष्पाद वा पशु राशि म्हणतात.
पृथुयासच्या अनुसार या राशि जर १० वे स्थाना मध्ये असतील, तर शक्तिशाली म्हणविल्या जातात. जातकाच्या लग्न स्थानी या राशी असतील, तर त्या त्या पशुच्या गुणानी युक्त असू शकतात. सिन्हा प्रमाणे दृढ़, बकरीचाप्रमाणे विलासप्रिय ई.
(११) दिसंख्या राशि :
मिथुन, धनु व मीन या जुळ्या चिन्ह वाल्या राशि आहेत यांना का द्विसंख्या राशि म्हणतात.
(१२) द्वितनु राशि :
राशी चिन्हात मिथुन एक मुलगा एक मुलगी, धनु चा पूर्वार्ध धनुष्य व बाण युक्त व्यक्ती (धनुर्धारी) व मीन राशि दोन एकत्र बांधलेले मासे दर्शवतात. या राशि द्वितनू राशी मानल्या आहेत.
(१३अ) लघु उदीत राशि :
दक्षिण गोलार्धात मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ व मिथुन लघु उदित राशि आहेत, कारण या पुष्कळ कमी वेळात उदय पावतात.
(१३ब) दीर्घ उदीत राशि :
उत्तर गोलार्धात कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक आणि धनु या राशि अन्य राशिंपेक्षा उशीरा पर्यंत उदित राहतात, म्हणून दीर्घ उदीत राशी मानल्या जातात.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : षष्ठी-पूर्ती विधी आणि ज्योतिष शास्त्र
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : रिप्लिकेबल ॲस्त्रॉलॉजी टेक्निक्स
नमस्कार,
वयाची साठ वर्षे हा एखाद्या हिंदू व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. षष्ठी-पूर्ती, म्हणजे ६० वे वर्ष पूर्ण होणे हे हिंदूंमध्ये साजरे केले जाते.
“साठी शांत ” हा विधी हिंदू धर्मीय लोक करतात. ६० वयाची अवस्था येईपर्यंत आपल्या हातून आपल्या सांसारिक, सामाजिक जीवनात ज्या काही जाणते अजाणते पणी चुका, पाप, अयोग्य गोष्टी किंवा दुर्वर्तन आपल्या स्वतःच्या किंवा कुटुंबियांच्या बाबतीत किंवा समाजा संदर्भात घडलं असेल, त्याचं परिमार्जन व्हावं, त्यातून पाप मुक्त व्हाव आणि दोष निवारण व्हावं. अशा प्रकारची भावना या शांती विधी मध्ये असते. आणि यापुढंचंही आयुष्य चांगलं जावं यासाठी प्रार्थनापूर्वक देवाला विनवणं ही भावना त्यात असते.
एकसष्ठी साजरी करण्यामागे केवळ एक प्रथा किंवा काहीतरी “विधी” अशी कुटुंबीयांची भावना असू नये, तर सर्वप्रथम त्यांना नमस्कार करुन, आपल्याला जे जसे वाढवले त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत. त्यांनी ऐन उमेदीच्या काळात आपल्याला सक्षम बनविण्यासाठी उपसलेल्या कष्टांची, प्रसंगी केलेल्या सुखाच्या त्यागाची जाण दाखवावी व कृतज्ञता पूर्वक उत्तम आयुष्य व आरोग्य लाभावे म्हणुन अभिष्टचिन्तन करावे. जोडीस एखादी सुंदर उपयोगी भेटवस्तू द्यावी आणि आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही व केवळ अपेक्षांचे ओझे तुमच्यावर टाकत नाही, उलट आपण प्रेमादरास पात्र असुन आता आमच्याकडुन तुमच्या काय अपेक्षा आहेत ते विचारावे.
एक पथ्य मात्र आवर्जून पाळावे की, कोणत्याही परिस्थितीत, त्यांच्या वाढत्या वयाचा उल्लेख करू नये. उलट आजही तुम्ही आमच्या तेवढेच उपयोगी आहात, तुमचे तुमच्या अनुभवांच्या शिदोरी सकट हवे आहात व आम्हाला तुमचा मोठा आधार आहे असे हे त्यांना सांगा.
हल्ली एकसष्ठी हा एक उत्सव असतो. छान हसत खेळत, आपल्या जवळच्या माणसांसोबत मस्त खात पित हॉटेलिंग करत छान आनंदात वेळ घालवला जातो. आणि काळानुसार त्यात काही गैर ही नाही. त्यामागील योग्य भावना महत्त्वाची आहे.
आपल्याकडे साठी बुद्धी नाठी अशी एक म्हण आहे, जिचा वापर आपण पाणउतारा करण्यासाठी वापरतो. हिंदी भाषेत सठिया गया है असा शब्द प्रयोग केला जातो. खरेच असे शब्द का वापरले जातात. कारण वयाची साठ वर्षे पूर्ण होत असताना आपण सर्वच जण आजूबाजूला असणारे ज्येष्ठ नागरिक बघतो की सर्वसाधारण पणे हळूहळू त्यांची शारीरिक शक्ती कमी होत चालली आहे, दृष्टी, ऐकू येणे, उत्साह मंदावत चालले आहे.
या सार्वत्रिक अनुभवाचा ज्योतिष शास्त्रात काही संबंध आहे का, हे तपासले असता काही तथ्य समोर आले.
६० या आकड्याचे महत्त्व अथवा उपयोग बघितला तर पूर्वीच्या काळी काळ मापणासाठी ६० घटी, ६० विघटी असा केला जायचा. नंतरच्या काळात ६० मिनिटे, ६० सेकंद असा केला जाऊ लागला.
हिंदू ज्योतिषशास्त्रामध्ये १२० वर्षांचे जास्तीत जास्त आयुष्य मानून ९ नक्षत्रांच्या आधारे १२० अंश विभाजित केले गेले. व त्यानंतर परत त्याच क्रमाने १२० अंशाची नक्षत्र साखळी एकूण ३ वेळा मिळून २७ नक्षत्रांसह ३६० अंशाचे राशीचक्र पूर्ण केले.
आपणास माहीत असेल की आकाशात सर्व ग्रह त्यांच्या निर्धारित गतीने परिभ्रमण करत असतात.
लग्न स्थान साधारण २ तास असते, त्यापासून कुंडलीत सूर्य कोणत्या स्थानात किती अंशावर आहे या गणिताने जन्म वेळ समजते.
चंद्र व सूर्याच्या मधील कुंडलीतील अंतरावरून जन्म तारीख अथवा तिथी मोजता येते. ( अमावस्येला चंद्र व सूर्य एकत्र असतात तर पौर्णिमेला प्रतियोग असतो.)
सूर्याच्या परिभ्रमण वरून जन्म महिना मोजता येतो. कारण सूर्य साधारण १ महिना एका राशीत असतो. व १४ जानेवारी दरम्यान मकर राशीत प्रवेश करतो. त्यावरून सूर्य कोणत्या राशीत आहे त्यावरून जन्म महिना समजतो.
तसेच एखाद्याचे वय मोजताना शनी आत्ता कोणत्या राशीत आहे. व जन्मस्थ शनी स्थिती पासून किती पुढे आला आहे यावरून वय समजते. शनी एका राशीत २.५ वर्षे असतो. यात अचूकता साठी शनी व गुरूचे देखील परिभ्रमण विचारात घेतले जाते.
शनि राशी व नक्षत्र चक्र पूर्ण करून मूळ स्थितीला यायला ३० वर्षे लागतात (१२ राशी एक्स २.५ वर्ष) आणि गुरूला १२ वर्षे लागतात.
नीट निरीक्षण केले तर आयुष्याची जास्तीत जास्त मर्यादा १२० वर्षे चा वेळी शनी व गुरू त्याच्या मूळ स्थितीला परत आलेले असतात. त्यापुढे नवीन आयुष्याची सुरुवात होणार असते. यांच्या राशीच्या पूर्ण चक्रातील ही ग्रह स्थिती वयाच्या ६० व्या वर्षी सुद्धा आलेली असते. १२ वर्षे व ३० वर्षे याचा ल.सा.वी.( लघुतम साधारण विभाज्य) ६० येतो. म्हणजेच ६० वर्षे ही आयुष्याची कमीत कमी मर्यादा दर्शवते. म्हणून, व्यक्तीसाठी हा एक प्रकारचा दुसरा जन्म आहे.
आता तुमच्या लक्षात आले असेल की षष्ठी-पूर्तीला हिंदू धर्मात एवढे महत्त्व का प्राप्त झाले आहे. धन्य ते आपले पूर्वज ज्यांनी आयुष्याचा एवढा सखोल अभ्यास ज्योतिष शास्त्र द्वारे केला होता.
(टीप : ग्रहाच्या इतर घटक युती, दृष्टी, वक्री ई. मुळे या मर्यादेच्या अलीकडे, मध्ये व पलीकडे आयुष्य असू शकते. पण सर्वसाधारपणे वरील मर्यादा अनुभवास येते.)
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)