Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

भाकूट दोष विचार


विषय : भाकूट दोष विचार

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : प्रेडिक्टिव्ह स्टेलर ॲस्ट्रॉलॉजी रीडर

नमस्कार,

मुले हाता-तोंडाशी आली की, बहुतेक पालकांची लवकरात लवकर त्यांचे दोनाचे चार हात करायची लगबग सुरु होते. आणि सुरु होतो डोक्याला शीण आणणारा योग्य वधू/वर संशोधनाचा सारीपाट. आपल्याकडील हे संशोधन म्हणजे स्थळ जुळण्यापेक्षा नाकारण्यातच निम्म्याहून अधिक स्थळे खर्ची पडतात. कधी रंग रूप जुळत नाही, तर कधी सामाजिक परिस्थिती, मुळ गाव, शिक्षण, गोत्र, देवक अशा अनेक गोष्टी स्थळाचा खातमा करायला तलवार उपसून उभ्या असतात. त्यात अजून भर म्हणजे अष्टकुट गुणमेलन हा आपल्याकडील एक प्रकार. मंगळ दोषा इतकाच विवाह जमान्यात अडथळे निर्माण करणारा एक प्रभावी प्रकार. त्यातील भाकुट आणि नाडी दोष तर ३६ गुणांपैकी १५ गुण व्यापतात. म्हणजे साधारण ४० % स्थळे या दोन प्रकारात बळी पडू शकतात.

आज आपण त्यातीलच भाकुट या बद्दल माहिती घेणार आहोत.

जन्मकुंडलीत चंद्र ज्या स्थानामध्ये असतो, त्या घराला कुंडलीचा भाकू म्हणतात. भाकू म्हणजेच जन्म चंद्र राशी. विवाह मेलनात एकमेकांच्या कुंडलीत भाकू अनुकूल असणे या भाकुट मेलन म्हणतात. प्रतिकूल असेल तर दोष समजला जातो. पारंपारिक गुणमेलनात हा एक अतिशय गंभीर दोष मानला जातो आणि बहुतेक ज्योतिषी कुंडली जुळत नसल्यास लग्न न करण्याचा सल्ला देतात. कारण यावरून प्रेम, वैवाहिक सौख्य तपासले जाते, त्यासाठी अष्टकूटमध्ये भाकूट जुळणे देखील आवश्यक आहे, अन्यथा तो भकूट दोष बनतो व घटस्फोट आणि वैवाहिक जीवनात प्रेमाचा अभाव यासारख्या समस्या उद्भवू शकतात असे मानले जाते.

भाकूट दोष :

१) जर वराची चंद्र रास वधूच्या राशि पासून २ री येत असता, त्यांचे वैवाहिक आयुष्य दीर्घ काळ टिकण्यात अडथळे येतात.

२) जर वधूच्या चंद्र राशी पासून वराची चंद्र रास ३ री येत असता, वैवाहिक आयुष्य सुखाचे होत नाही, आरोग्यात बिघाड, वैचारिक मतभेद ई. मुळे इतर गुण मेलन झाले, तरी वैवाहिक आयुष्यात ते दु:खी असतील.

३) जर वधूची जन्मराशि वरांच्या राशिपेक्षा ४ थी येत असता, विवाह सांपत्तिक स्थिती खालावण्यास कारणीभूत ठरेल आणि कठीण परिस्थिती निर्माण होईल.

४) जर वधूच्या जन्म राशी पासून वराची जन्म रास ५ वी येत असता, पती दीर्घायुषी असणार नाही व वधूस अल्पायु मधे दुर्दैव भोगावे लागेल.

अपवाद : जर वधूत्रा जन्म मेष व कर्क राशी मध्ये असेल व वराची तिच्या जन्म राशी पासून ५ वी रास येत असेल, तर अनिष्ट परिणाम समाप्त होऊन उत्तम मेलन होऊ शकते.

५) जर वराची जन्मराशि ६ वी येत असेल, तर संतती करता प्रतिकूल असते. थोडक्यात षडाष्टक योग तयार होतो. वर-वधूची चंद्रराशींमध्ये षडाष्टक असल्यास विचारधारा भिन्न राहून नेहमी वाद निर्माण होतील व दु:खी राहतील.

अपवाद : बारा राशिना दोन गटा भध्ये विभाजित केले आहे. मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु व कुंभ या विषम राशि, अथवा सकारात्मक राशि म्हटल्या जातात. वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर, मीन यांना समराशि अथवा नकारात्मक राशि म्हटल्या जातात. हे सांगितले गेले आहे की, विषम अथवा सकारात्मक राशीत जन्मलेल्या मुली करिता षडाष्टक दोष नसतो. तसेच जर मुलीच्या कुंडतीमध्ये चंद्र राशीचा स्वामी वृषभ अथवा वृश्चिक मध्ये असेल, तर त्याचे सहावे स्थान वाहेत तूळ व मेष, वृषभ ई. येऊन त्यांचा अधिपति एक येत असल्याने हा दोष येत नाही.

वराचे चंद्र राशी सम राशी असता व जर ते वधूच्या जन्मराशी पासून २ री येत असता, अनिष्ट परिणाम समाप्त होतील व चांगला मेळ होऊन दीर्घायू जीवन व्यतीत करतील.

याशिवाय, दोन्ही तक्त्यामध्ये नाडी दोष तयार होत नसल्यास, भकुट दोष तयार झाल्यानंतरही त्याचा प्रभाव कमी मानला जातो.

वैदिक काळापासून विवाह वगैरे जुळवण्याची पद्धत प्रचलित आहे आणि बहुतेक आधुनिक ज्योतिषीही कुंडली जुळवण्याच्या अष्ट कुट पद्धतीला खूप महत्त्व देतात. परंतु दशा अंतर्दशा, नवमांश कुंडली, लग्न, पंचम, सप्तम, लाभ स्थान व त्यांचे स्वामी, ई. गोष्टी तपासणे देखील महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त, दोन्ही कुंडलीतील शुभ अशुभ ग्रहांमुळे निर्माण झालेल्या योग-कुयोग किंवा दोषांचा विचार करणे आवश्यक आहे आणि बहुतेक प्रकरणांमध्ये, गुण मिलन किंवा अष्टकूट जुळण्यापेक्षा ते अधिक निर्णायक ठरतात असा माझा अनुभव आहे.

दोषांचे थोडक्यात परिणाम :

भकुट दोषाच्या प्रस्थापित मान्यतेनुसार, वधू किंवा वर यांपैकी एकाचा षडाष्टक भाकुट दोष असल्यामुळे मृत्यू संभवतो, नवव्या-पाचव्या भाकुट दोषामुळे, दोघांनाही मूल होणे कष्टप्रद होते. द्वि-द्वादश दोष, लग्नानंतर वधू-वरांना गरिबीला सामोरे जावे लागते. 

जन्मकुंडली जुळवणे किंवा मालमत्ता जुळवणे यासारख्या प्रक्रिया भारताव्यतिरिक्त जवळजवळ कोणत्याही देशात वापरल्या जात नाहीत. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की जन्मकुंडली जुळण्याच्या वेळी निर्माण झालेल्या अनेक दोषांपैकी भकुट दोष हा फक्त एक दोष आहे आणि जन्मकुंडलीच्या जुळणीत तयार होणारे अनेक दोष जसे की नाडी दोष, गुण दोष, काल सर्प दोष, मांगलिक दोष इ. प्रत्येक दोष आहे. हे सर्व दोष लक्षात घेऊन, असे म्हणता येईल की जगातील जवळजवळ प्रत्येक विवाहाला घटस्फोट किंवा वैधता यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल कारण त्याच्या प्रचलित व्याख्येनुसार, यापैकी एक किंवा अधिक दोष जवळजवळ प्रत्येक कुंडलीशी जुळतात. ही वस्तुस्थिती वास्तवापासून खूप दूर असल्याने, असे गृहीत धरले पाहिजे की भकुट दोष आणि असे इतर दोष असा विवाह मोडण्यास एकेकटे सक्षम नसून आणि हे घडण्यासाठी ग्रहाने निर्माण केलेला दुसरा गंभीर दोष अथवा इतर अनिष्ट ग्रहस्थिती ई. सुद्धा अनिष्ट परिणाम सूचक असावी. केवळ भकुट दोषामुळे वैवाहिक जीवनात कोणतीही गंभीर समस्या उद्भवत नाही आणि मी अनेक विवाहित जोडप्यांना ओळखतो ज्यांना जुळण्याच्या वेळी भकुट दोष असतो, परंतु तरीही असे विवाह झाले आहेत. जवळपास प्रत्येक क्षेत्रात वर्षानुवर्षे यश मिळवले आहे, हेच कारण आहे की, या सर्व प्रकरणांमध्ये वधूच्या कुंडलीत असे काही योग आहेत जे लग्नाचे शुभ परिणाम सांगतात, ज्यामुळे या कुंडलींवर भकूट दोषाचा प्रभाव जवळजवळ नगण्य असतो. कोणत्याही कुंडलीत ग्रहामुळे निर्माण होणारे कोणतेही शुभ किंवा अशुभ योग हे अष्टकूट मुळे निर्माण झालेल्या दोषांपेक्षा जास्त बलवान असतात आणि दोघांमध्ये संघर्ष झाल्यास, अशा वेळी कुंडलीमध्ये तयार झालेले शुभ किंवा अशुभ योगच असतात.

मुळे कुंडलीतील विवाहसंबंधित योगासारखे कोणतेही शुभ योग भकुट दोष किंवा जुळणीतील इतर दोषानंतरही राशीला यशस्वी आणि आनंदी वैवाहिक जीवन देण्यास सक्षम ठरतात.

म्हणून, लग्नासाठी अस्तित्वात असलेल्या भावी वधू किंवा वराने केवळ भकुट दोष तयार झाल्यामुळे आशा सोडू नये आणि तिच्या जन्मकुंडली केवळ अष्टकूट जुळण्याव्यतिरिक्त इतर पद्धतींनी पूर्णपणे जुळल्या पाहिजेतकारण निर्माण झालेले इतर दोष अशा विवाहाला विशेष हानी पोहोचवू शकतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)