
ग्रहांनुसार कडे वा ब्रेसलेट घालणे ठरते कोणांस फ़ायदेशीर?
फॅशन हा या युगाचा परवली चा शब्द आहे. तशी फॅशन ही पूर्वापार चालत आलेली आहे फक्त थोडेफार स्वरूप बदलून परत येते एवढेच. पुरुष मंडळी सुद्धा यात मागे नाहीत बरे का.
अशीच एक गोष्ट पूर्वी फार प्रचलित होती. ते म्हणजे हातात धातूचे कडे घालणे. आज ही बरेच जणांना आवडत असेल, त्याची जागा ब्रेसलेट ने ही बरेच अंशी पटकावली आहे. असो.
फॅशन म्हणून कडे घालणे वेगळं आणि एखाद्या ग्रहावरील उपाय वा अनुकूलते साठी कडे हातात घालणे वेगळं.
हातात तांबे, पितळ, चांदी, सोने अथवा लोखंडाचे कडे कडे हातात दिसायला जरी चांगले दिसत असले तरी ते घालण्याचेही काही नियम आहेत. तसेच हे कडे प्रत्येकाला लाभेल असे नाहीजाणकार ज्योतिषाने सुचवलेले नियम न पाळता कडे घातल्यास नुकसान देखील होऊ शकते.
कडे घालणे हे जानवे घालण्यासारखे आहे. यासाठी कडे घातल्यानंतर यज्ञोपवीतचे नियम पाळले पाहिजे. मांस-दारू तसेच तामसी भोजन करताना कडे घालण्याऱ्या व्यक्तीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. शत्रु ग्रह प्रतिकूल फळ देऊ शकतो. ग्रहांची कुंडलीतील स्थिती पाहून त्याप्रमाणे कडे घालावे.
अंगळ्यांमधील रत्ने/खडे घालणे आणि कडे घालणे यामगील तत्व सारखेच आहे.
१. एखाद्याच्या कूंडलीमधे रवी (सूर्य) जर कमजोर असेल तर त्यांस बलवान बनवण्यासाठी सोन्याचे कडे सूचवले जाते.
२. मंगळाची शक्ती मिळवण्यासाठी तांब्याचे कडे उपयोगी पडते.
३. चंद्र बळ वाढवण्यासाठी चांदीचे कडे उपयोगी सिद्ध होते.
४. गुरु बळ प्राप्तीसाठी पितळेचे कडे जातकांस सांगितले जाते.
५. शनी बळ प्राप्त करण्यासाठी लोखंडाचे/स्टील चे कडे घालावे.
६. मिश्र कडे घालण्यामुळे काही नुकसान होणार नाही. पितळ, तांबे आणि चांदीमिश्रित कडे घातल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. यात सर्व धातू समप्रमाणात मिश्र केलेले असले पाहीजे. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीमध्ये कोणताही फरक पडत नाही.
७. भूत बाधा, निराशा ई. नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी पितळ अथवा तांबे मिश्रित कडे लाभदायक ठरते
८. अनेक व्याधीं पासून मुक्ती मिळवण्यासाठी अष्टधातूचे कडे घातले जाते. यामुळे सततच्या आजारांपासून संरक्षण मिळते.
कडे हे हनुमानाचे प्रतीक मानले जाते.
उजव्या हातात मंगळवारी हे कडे बनवण्यास द्यावे. शनिवारी हे कडे खरेदी करुन हनुमान मंदिरात त्याचे चरणावर हे कडे ठेवावे. हनुमान चालिसाचे पठण करावे. यानंतर हनुमानाला थोडा शेंदूर लावावा. हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त करावा आणि हे कडे धारण करावे. असे सांगितले जाते.
धातूचेकडे घालण्याआधी जाणकार ज्योतिषांचा सल्ला जरूर घ्या. तसेच धातूची शूद्धता देखील तेवढीच महत्वाची ठरते.
ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in
👌🏻👍🏻
LikeLiked by 1 person
👍🏻👌🏻
LikeLiked by 1 person
👍👌
LikeLiked by 1 person
Nice 👍👍
LikeLiked by 1 person