
विवाहित जोडपे ज्याला इंग्लिशमध्ये “soul mate” म्हटले जाते. म्हणजेच ज्यांचे आत्मा/अंतःकरण एकरूप होतात. ज्योतिष शास्त्रात सूर्यास आत्माकारक ग्रह मानतात. चला तर मग
आपले विवाह कोणत्या सुर्यराशीच्या महिन्यात झाले आहेत, याचा आपल्या नात्यावर कसा प्रभाव पडत असेल. हे ढोबळमानाने जाणून घेऊ…थोडी रंगत थोडी गंमत आपल्या वैवाहिक नात्याबद्दल
😊
टीप : हे ढोबळ अनुमान असून परस्पर पुरकता जाणून घेण्यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक असते.
१४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी :
या दरम्यान झालेल्या विवाहावर मकर राशीचा प्रभाव असतो अर्थात असे जोडपे खूप जबाबदारीने वागणारे असू शकते पण त्यांच्यात प्रणय रसिकता थोडी कमी असू शकते.
😊
१४ फेब्रुवारी ते १३ मार्च :
या कालावधीत झालेले विवाहांवर कुंभ राशीचा प्रभाव असतो. अर्थात असे जोडपे जगावेगळे असतात. हे सकारात्मक विचारी आणि नेहमी आकर्षणाचे केंद्र असू शकतात.
😊
१४ मार्च ते १३ एप्रिल :
या दिवसांत झालेले विवाह मीन राशीने प्रभावित असतात. हे जोडपे भावुक असून एकमेकांवर खूप प्रेम करतात, पण दाखवणे जमेल असे नाही
😊
१४ एप्रिल ते १३ मे :
या दरम्यान झालेले विवाहांवर मेष राशीचा प्रभाव असतो. असे जोडप्यांच्या प्रणयाविषयी कल्पना स्पष्ट असू शकतात. दोघांमध्ये प्रेमही असतं पण एकमेकांशी तुलना केल्याने काही मतभेद देखील होऊ शकतात.
😊
१४ मे ते १३ जून :
या काळातील विवाह हे वृषभ राशीने प्रभावित असतात. या एक प्रभुत्व गाजवणारा तर दुसरा जुळवून घेणारा असेल तर हे नातं सुरळीत राहू शकते.
😊
१४ जून ते १३ जुलै :
या काळातील विवाह मिथुन राशीने प्रभावित असतात. प्रत्येक गोष्टीत अतीपणा उतू जातो, प्रेम करताना अगदी आकंठ प्रेमात बुडतात आणि भांडतात तेव्हा अगदी हमरीतुमरीवर येऊ शकतात.
😊
१४ जुलै ते १३ ऑगस्ट :
या दरम्यान चे विवाह कर्क राशीने प्रभावित असतात. पती-पत्नी घराचा व सुखाचा विचार करत असतात. दोघं कधी प्रेमात दंग होतात, पण कामाची जबाबदारी आठवताच प्रणयातून भानावर येतात.
😊
१४ ऑगस्ट ते १३ सप्टेबर :
या काळातील विवाह सिंह राशीने प्रभावित असतात. या जोडप्यात अहंकारामुळे वाद होऊ शकतात. एकमेकांच्यात प्रेम आणि काळजी असते, पण रागात सगळ्याचा विसर पडू शकतो.
😊
१४ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर :
या दरम्यान चे विवाह कन्या राशीने प्रभावित असतात. हे जोडपे खूप संवेदनशील असू शकते पण काहीसे गोंधळलेले असू शकतात.
😊
१४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेबर :
या दरम्यान झालेले विवाह तूळ राशीने प्रभावित असतात. या जोडप्यात प्रत्येक गोष्ट खूप संतुलित असते. म्हणून मेड फॉर इचं आदर असू शकतात.
😊
१४ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर : या काळातील विवाह वृश्चिक राशीने प्रभावित असतात. असे जोडपे प्रणयासक्त असू शकते व वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगतात, पण याची पूर्ती न झाल्यास असमाधान निर्माण होऊ शकते.
😊
१४ डिसेंबर ते १३ जानेवारी :
या काळातील विवाह धनू राशीने प्रभावित असतात. हे जोडपे हट्टी असू शकतात तरी एकमेकाला समजून घेतात आणि नातेबंध जपतात.
टीप : हे ढोबळ अनुमान असून परस्पर पुरकता जाणून घेण्यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक असते.
-ज्योतिषमित्र मिलिंद
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क :
7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in
मिलिंद भाई खुप च छान ऊत्त्ं म वेध् क माहीति 👌🏻
– विजय भापकर, पुणे
LikeLiked by 1 person
👍
-Deepa K.
LikeLiked by 1 person