गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… आज अनंत चतुर्दशी! श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेश भक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया…
आज मन यापूर्वी च्या गणपती बाप्पाला निरोप देतानाच्या आरोळी नी दुमदुमतेय..मन भरून आले आहे. काही आरोळी लिहितोय…
१. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
३. अली में ढोल गली में ढोल, गणपती बाप्पा लवकर बोल
४. एक दोन तीन चार, गणपती चा जयजयकार…
तुम्हाला अजुन आठवत असतील तर तुम्ही ही लिहा…
-ज्योतिषमित्र मिलिंद
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only) contact@jyotishmitramilind.in jyotishmitramilind.in
गुरु २ रे स्थानात असेल किंवा २ रे स्थानाचा अधिपती असेल तर :
नेकलेस, साखळी सोन्याची घातल्यास धनप्राप्ती, कौटुंबिक सौख्य साठी उपयुक्त
गुरु ३ रे स्थानात असेल किंवा ३ रे स्थानाचा अधिपती असेल तर :
ब्रेसलेट, बांगड्या, घडयाळ सोन्याची घातल्यास कर्तुत्व, संपर्क, भावांशी सबंध साठी उपयुक्त
गुरु ४ थे स्थानात असेल किंवा ४ थे स्थानाचा अधिपती असेल तर :
छातीवर येणारी साखळी, गंठण, हार सोन्याची घातल्यास मालमत्ता, सुख, वाहन, मातृ सुख साठी उपयुक्त
गुरु ५ वे स्थानात असेल किंवा ५ वे स्थानाचा अधिपती असेल तर :
लटकन सोन्याची घातल्यास विद्या, प्रेम, संतती, कला साठी उपयुक्त
गुरु ६ वे स्थानात असेल किंवा ६ वे स्थानाचा अधिपती असेल तर :
सोने घालणे शक्यतो टाळावे, सुवर्ण दान करावे
गुरु ७ वे स्थानात असेल किंवा ७ वे स्थानाचा अधिपती असेल तर :
कंबर पट्टा सोन्याची घातल्यास विवाहासाठी उपयुक्त
गुरु ८ वे स्थानात असेल किंवा ८ वे स्थानाचा अधिपती असेल तर :
सोने घालने शक्यतो टाळावे
गुरु ९ वे स्थानात असेल किंवा ९ वे स्थानाचा अधिपती असेल तर :
मांडीवर कशिदा कारागिरी सोन्याची घातल्यास उपयुक्त
गुरु १० वे स्थानात असेल किंवा १० वे स्थानाचा अधिपती असेल तर :
छातीवर येणारी साखळी, गंठण, हार सोन्याची घातल्यास व्यवसायासाठी उपयुक्त
गुरु ११ वे स्थानात असेल किंवा ११ वे स्थानाचा अधिपती असेल तर :
पैंजण सोन्याचे घातल्यास लाभ होतील
१२ वे स्थानात असेल किंवा १२ वे स्थानाचा अधिपती असेल तर :
सोने घाळणे शक्यतो टाळावे, सुवर्ण दान करावे
टीप : हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, वरील सूचना जे रोज सोने घालतात त्यांचेसाठी आहे, तसेच गुरु शुभ असून कोठे स्थित आहे त्यानुसार हे वर्णन केले आहे. गुरुची स्थिती, भावेश ई. गोष्टी ज्योतिष जाणकारा कडून जाणून घेऊन मगच वापर करावा. कधीतरी सोने घालून मिरवणाऱ्या मंडळींनी याचा फारसा विचार करू नये.
जेव्हा मनुष्य अंतर्मुख होतो तेव्हा, माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी हे प्रश्न जरुर डोक्यात येतात. त्यांची उत्तरे संक्षिप्त रुपात येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.
१. आयुष्याचा हेतू काय आहे ?
आयुष्याचा हेतू त्या चैतन्यास जाणून घेणे आहे, जे जन्म आणि मृत्यू च्या बंधनाच्या परे आहे. हे जाणून घेणे म्हणजेच मोक्षप्राप्ती आहे.
२. जन्म आणि मृत्यू च्या बंधनापासून कोण मूक्त आहे ?
ज्याने त्या परम आत्म्यास जाणले जो जन्म आणि मृत्यू च्या बंधनापासून मूक्त आहे तो.
३. संसारात दू:ख का आहे ?
मोह, स्वार्थ आणि भीती हे संसारातील दू:खाचे मूख्य कारण आहे.
४. देवाने दू:खाची रचना का केली ?
देवाने संसाराची रचना केली आणि मनुष्याने आपल्या विचाराने आणि कर्माने सुख-दू:खाची रचना केली.
५. देव आस्तित्वात आहे का ? कोण आहे ? कसा आहे ? स्त्री आहे की पुरुष ?
कोणत्याही कारणाशिवाय कार्य नाही. हे जग त्या कारणाच्या आस्तित्वाचे प्रमाण आहे. तुम्ही आहात म्हणून तो आहे, त्या परमोच्च कारणास अध्यात्मात देव संबोधले आहे. तो न स्त्री आहे न पुरुष.
६. भाग्य काय आहे ?
कोणतीही कृती हा कार्याचा एक परिणाम आहे. परिणाम हा चांगलाही असू शकतो किंवा वाईटही असू शकतो. या परिणामाचे दुसरे नाव भाग्य आहे, तुम्ही आज कर्म पेरलेत तर कालांतराने तुमचे भाग्य म्हणून उदयास येईल.
७. या जगातील सर्वात मोठे आश्चर्य कोणते ?
या जगात रोज हजारो लोक मृत पावतात हे आपण सर्वजण पाहतो, तरीही जास्त काळ जगण्याची धडपड करत राहतो यापेक्षा मोठे आश्चर्य काय असू शकते.
८. कोणत्या गोष्टीचा त्याग करुन माणूस धनवान बनू शकतो ?
लोभाचा त्याग करुन माणूस धनवान बनू शकतो.
९. सुखी होण्याचा एकमात्र उपाय कोणता ?
चांगला स्वभाव हाच सुखी होण्याचा एकमात्र उपाय आहे.
१०. कोणती गोष्टी गेली की माणसास दू:ख नाही होत ?
राग गेला की माणसास दू:ख नाही होत.
११. कोणती गोष्ट या जगात धर्मापेक्षा मोठी आहे ?
या जगात दया ही धर्मापेक्षा मोठी गोष्ट आहे.
१२. कोणती गोष्ट ईतरांना अजिबात देऊ नये ?
दू:ख व धोका ईतरांना अजिबात देऊ नये.
१३. कोणती गोष्ट ईतरांकडून अजिबात घेऊ नये ?
ईतरांचा तळ्तळाट अजिबात घेऊ नये.
१४. कोणती गोष्ट आयुष्यात सर्व काही करायला भाग पाडते ?
मजबुरी आयुष्यात सर्व काही करायला भाग पाडते.
१६. कोणती गोष्ट या जगात सर्वात जास्त विकली जाते ?
या जगात खोटेपणा सर्वात जास्त विकला जातो.
१७. कोणती गोष्ट या जगात सर्वात जास्त समाधान देते ?
या जगात परोपकार सर्वात जास्त समाधान देतो.
१८. कोणती गोष्ट मनुष्यास सर्वात घातक आहे ?
मनुष्यास मोह हा सर्वात घातक आहे.
१९. सर्वात मोठे पडलेले स्वप्न कोणते ?
आयुष्य हेच सर्वात मोठे पडलेले स्वप्न आहे.
२०. या जगात न बदलता येणारी गोष्ट कोणती ?
मृत्यू ही या जगात न बदलता येणारी गोष्ट आहे.
२१. अशी कोणती गोष्ट आहे जी स्वत:ला लवकर समजत नाही ?
स्वत:चा मूर्खपणा स्वत:ला लवकर समजत नाही.
२२. अशी कोणती गोष्ट आहे जी चिरंतन आहे ?
आत्मा व ज्ञान चिरंतन आहे.
२३. अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही थांबत नाही ?
काळ कधीही थांबत नाही.
मी स्वत: हे व अशा अनेक प्रश्नांची उकल करुन ती आयुष्यात अंगिकारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात किती यशस्वी होईन ते येणारा काळ च ठरवेन. आपण ही आपले प्रश्न व त्याची उत्तरे शोधा व अध्यात्मिक प्रगती करा. इथे लिहिले तर ईतरांना त्याचा त्यांचा प्रकाश मार्ग शोधण्यासाठी उपयोग होईल.
प्रत्येकालाच उत्सुकता असते की आपल्या जीवनसाथी, जोडीदार आपल्याला मनापासून स्वीकारणारा आणि जुळवून घेणारा असावा. ज्योतिष शास्त्र नुसार कोणत्या राशीचा जोडीदार कोणासाठी कसा असेल हे सांगता येते. पण कुंडलीत राशीबरोबर च सर्व ग्रह, त्यांच्या दशा, स्थान, दृष्टी ई. गोष्टीसुद्धा लक्षात घ्याव्या लागतात. त्यामुळे कोणत्याही निर्णयास येताना जाणकार ज्योतिष मार्गदर्शन जरूर घ्यावे.
Know suitable zodiac sign of Life Partner/Lover
-ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)
For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp) contact@jyotishmitramilind.in jyotishmitramilind.in
“सिद्धी” हा शब्द अध्यात्मिक मार्गातील तसेच सामान्य लोकांच्या ही परिचयाचा व आकर्षणाचा एक विषय आहे. सिद्धी या शब्दालाच एक गूढ व गहन वलय प्राप्त आहे. अनेक लोकांची ईच्छा असते की आपणांस सिद्धी प्राप्त व्हावी आणि मग आयुष्य एक्दम सुखाचे होईल. मुळातच हा एक गैरसमज आहे. सिद्धी प्राप्त होणे हे अतिशय खडतर व कठीण साध्य आहे. अनेक जण वर्षानुवर्षे सिद्धी प्राप्तीसाठी खुप झटतात तरी मुळात हेतू चुकीचा असल्याने अपयशी ठरतात किंवा प्राप्त झाली तरी जास्त काळ टिकत नाही व चुकीच्या मार्गाने वापर केल्याने लयास जाते. आणि सिद्धी प्राप्ती ही स्वत: निर्मोही राहून लोककल्याणाकरता तिचा वापर व्हावा हा अलिखित संकेत आहे. आज आपण सिद्धी या विषयी सामान्य माहिती सादर करणार आहोत. सिद्धी प्राप्ती ही अध्यात्मिक मार्गातील महत्वाची पायरी समजली जात असली तरी, ते अंतिम ध्येय परमेश्वर प्राप्ती मधील एक अडथळा ठरु शकते. कारण सिद्धी प्राप्ती चा योग्य वापर ही एक परीक्षाच असते कारण अनेक सिद्ध पुरुष सिद्धी प्राप्त झाल्याने स्वत:स महान समजू लागतात व स्वत:स प्रतिपरमेश्वर समजू लागतात. अशा रीतीने अहंकाराने अंध झाल्यावर त्या सर्वशक्तीमान निर्गुण निराकाराचे दर्शन कसे बरे होईल.
सिद्धी’ चा शाब्दिक अर्थ ‘परिपूर्णता’, ‘प्राप्ति’, ‘यश’ इ. आहे. हा शब्द महाभारतात आढळतो. पंचतंत्रात कोणतीही असामान्य कौशल्य किंवा क्षमता संपादन करण्यासाठी त्याला ‘ सिद्धि’ असे म्हणतात. मनुस्मृतिमध्ये ‘कर्ज फेडण्यासाठी’ या अर्थाने वापरले जाते. सांख्यकार आणि तत्व कारां मध्ये, म्हणजे तांत्रिक शाखेत याचा विशिष्ट अर्थ आहे – चमत्कारी मार्गाने ‘अलौकिक शक्तींचे अधिग्रहण’. उदाहरणार्थ : दैवी दृष्टी, उड्डाण करणारे हवाई, एकाच वेळी दोन ठिकाणी उपस्थित इ. गेल्या जन्म घटनास्मृती प्राप्त मध्ये सर्वदर्शन संग्रह चे माधवाचार्य देखील ‘सिद्धी’ त्याच अर्थाने वापरले जाते. योगसूत्र पतंजली मध्ये : जन्मऔषधीमंत्रतपसमाधीसिद्धयाः (त्या जन्मद्वारे, औषधद्वारे, मंत्र द्वारे, प्रायश्चित्त करून आणि समाधी द्वारे, सिद्धी प्राप्त केली जाऊ शकते.) सिद्धी अनेक प्रकारच्या आहेत. आज आपण १६ सिद्धींविषयी जाणून घेणार आहोत. १. वाचा सिद्धी: जे काही शब्द बोलले जातात, ते व्यवहारात पूर्ण सत्य होतात. हा शब्द कधीच व्यर्थ ठरत नाही. प्रत्येक शब्दाला एक महत्त्वाचा अर्थ असतो, वाचा सिद्धी असलेल्या व्यक्तीला शाप / वरदान देण्याची क्षमता प्राप्त असते. २. दिव्य दृष्टि सिद्धि : जेव्हा एखादे व्यक्तीस दिव्य दृष्टी प्राप्त होते, तेव्हा ज्याच्याबद्दल विचार करेल त्याचे भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान पूर्णपणे प्रकट होते, तेव्हा पुढे काय करायचे आहे, कोणत्या घटना घडणार आहेत, हे जाणू शकतो. ३. प्रज्ञा सिद्धि : शहाणपणाचा अर्थ बुद्धिमत्ता म्हणजे स्मृती, बुद्धिमत्ता, ज्ञान इ. जो आपल्या बुद्धीमध्ये ज्ञानाचे सर्व विषय आत्मसात करतो. त्याला शहाणे म्हणतात. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित ज्ञानाने, चैतन्याचा किरण आत जागृत होतो. ४. द्वार श्रवण सिद्धि : याचा अर्थअसा की भूतकाळातील कोणतीही घटना, संभाषण पुन्हा ऐकण्याची क्षमता. ५. जलगमन सिद्धी : ही सिद्धि निश्चितच महत्त्वाची आहे. ज्या योगीने ही सिद्धि प्राप्त केली आहे, तो जमिनी वरून चालत असल्याच्या थाटात पाण्यात, नदी, समुद्रावर चालू, फ़िरु शकतो. ६. वायुगमन सिद्धी : याचा अर्थ असा आहे की एखाद्याचे शरीर सूक्ष्म स्वरुपात रूपांतरित केल्याने एखादी व्यक्ती एका जगातून दुसर्या जगात जाऊ शकते, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी सहज संचार करु शकते. ७. अदृश्य सिद्धी : आपल्या स्थूल शरीरावर सूक्ष्मरूपात रुपांतर करून स्वत : ला अदृश्य करु शकतात. ज्यामुळे इतरांना त्यांच्या इच्छेशिवाय ते दिसू शकत नाही. ८. विशोका सिद्धि : याचा अर्थ स्वतःचे रूपांतर अनेक रूपांत होत आहे .. एका ठिकाणी वेगळे रुप प्रकट आहे, दुसर्या ठिकाणी वेगवेगळे रूप आहेत. ९. देव कृष्णदर्शन सिद्धि : या क्रियेचे पूर्ण ज्ञान असल्यास एखाद्याला विविध देवतांची मैत्री मिळू शकते. त्यांना पूर्णपणे सुसंगत करून योग्य सहकार्य घेतले जाऊ शकते. १०. कायाकल्प सिद्धी : कायाकल्प म्हणजे शरीर परिवर्तन. काळाच्या परिणामामुळे शरीर जर्जर होते, परंतु कायाकल्प करणारा माणूस नेहमीच रोगमुक्त आणि तरूण राहतो. ११. संमोहन सिद्धि : संमोहन म्हणजे प्रत्येकाला स्वतःस अनुकूल बनवण्याची कृती. माणूस किंवा प्राणी असो, ही कला पूर्ण करणारी व्यक्ती ही निसर्गास अनुकूल बनवते. १२. गुरुत्व सिद्धि : गुरुत्व म्हणजे मोठेपण, ज्याला प्रतिष्ठा आहे ती व्यक्ती. ज्ञानाचा भांडार आहे आणि देण्याची क्षमता आहे, त्याला गुरू म्हणतात आणि भगवान प्रभू कृष्ण यांना जगद्गुरुम्हणतात. १३. पूर्ण पुरुष सिद्धी : याचा अर्थ अतुलनीय शौर्य आणि निर्भय आणि सामर्थ्यवान असणे. ही सिद्धि लहानपणापासूनच श्री कृष्णा मध्ये होती. यामुळे त्याने ब्रजभूमीमध्ये असुरांचा वधकेला. त्यानंतर, कंसांचा वध करताना, आयुष्यभर शत्रूंचा नाश करून पुन्हा त्याने आर्यभूमीत धर्म स्थापित केला. १४. सर्वगुणसंपन्नासिद्धि : जगातील सर्व उदात्त गुण, सर्वकाही त्या व्यक्तीमध्ये असते, जसे की दया, दृढता, तेज, सामर्थ्य, इ. या गुणांमुळेच तो संपूर्ण जगातील सर्वोत्तम आणि अनन्य मानला जातो आणि त्याच प्रकारे हे विशेष कार्य करून तो जगातील लोककल्याण आणि लोककल्याणकारी काम करतो. १५. इच्छा- मृती सिद्धि : जो व्यक्ती या कलांनी परिपूर्ण आहे तो कालातीत आहे, त्याच्यावर वेळेचे कोणतेही बंधन नाही, तो आपले शरीर सोडून त्यागू शकतो आणि जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा नवीन शरीर घेऊ शकतो. १६. अणुर्मी सिद्धि : अणुर्मी अर्थ असा आहे – ज्यावर भूक-तहान, थंड-ताप आणि भावना-द्वेषाचा कोणताही परिणाम होत नाही.
-ज्योतिषमित्र मिलिंद
For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp) contact@jyotishmitramilind.in jyotishmitramilind.in
4. काळ्या कुत्र्याला पाळा अथवा त्याला जेवण खाऊ घाला.
5. आंधळ्या लोकांची मदत करा
6. मांस- मासे, मद्यपान इत्यादी मादक पदाथाांचे सेवन करू नका
7. भ्रष्टाचारापासून सदैव दूर रािा
8. निर्धन व्यक्तीस आर्थिक रूपात मदत करा
9. लोखंडाचा छल्ला अथवा कडे घालणे लाभदायक ठरेल.
राहूची अनिष्टता दूर करण्यासाठी प्रभावी उपाय – –
) राहूची अनिष्टता दूर होण्यासाठी एक लोखंडी खिळा, तांब्याचा पैसा व लाकडी कोळसे सव्वा किलो या तीन वस्तू वाहत्या पाण्यात सोडाव्यात.
) पंचम स्थानी राहू असेल, तसेच पत्नी व संतती या दोघांच्या सुखात अडथळे येत असतील तर त्याच पत्नीशी पुन्हा विधिपूर्वक लग्न लावावे. वडिलोपार्जित घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर चांदीचे स्वास्तिक ठोकावे.
३) अनिष्ट राहूमुळे सडकून ताप येतो. शत्रू वाढतात. विनाकारण भटकावे लागते. मानसिक तोल ढळतो अशा वेळी अ) सकाळी लवकर उठून मसूर डाळ व काही नाणी भंग्याला द्यावीत. आ) जवसाचे काही दाणे उशाला ठेवून झोपावे व सकाळी लवकर उठून पक्ष्यांना खायला घालावेत.
इ) जवसाचे काही दाणे दुधाने धुऊन वाळवून वाहत्या पाण्यात सोडावेत.
ई) क्षयरोग झाला असेल तर जवसाचे काही दाणे गोमूत्राने धुऊन वाळवून लाल फडक्यात बांधून ही पुरचंडी नेहमी जवळ बाळगावी. रोज सकाळी गोमूत्राने दात स्वच्छ करणे.
४) कोर्ट-कचेरीची लफडी चालू असतील व त्यामुळे वैताग आला असेल, दंड होण्याची शक्यता असेल तर स्वत:च्या वजनाएवढे कोळसे वाहत्या पाण्यात प्रवाहित करावेत.
५) राहू जर द्वादश स्थानात असेल, आणि व्यर्थ खर्च अचानक उद्भवत असतील भांडणतंट्यामुळे त्रास होत असेल, चोरी व खोट्या आरोपांची धास्ती वाटत असेल व नेहमी आर्थिक चणचण भासत असेल तर अशा जातकाने स्वयंपाक घरात बसूनच जेवावे. आपल्या झोपण्याच्या खोलीचे व दरवाजांचे पडदे लाल रंगाचे वापरावेत. फर्निचरही लाल रंगाचे असावे. गादीवरील चादर व उशांचे अभ्रेसुद्धा लाल रंगाचे असावेत.
६) एक नारळ समुद्रात सोडावा.
७) ब्राह्मणाला नमस्कार करावा.
८) चांदीची भरीव गोळी सदैव जवळ बाळगावी.
९) चांदीच्या ग्लासामधून पाणी प्यावे.
१०) पायात पादत्राणे न घालता फिरू नये.
११) गळ्यात पिवळा धागा बांधावा.
१२) एक खोटे नाणे अधेली, पावली ४३ दिवस रोज एक याप्रमाणे वाहत्या पाण्यात सोडावे. १५) काळे कुत्रे पाळावे.
१३) चांदीचा एक चौरस तुकडा नेहमी खिशात ठेवावा.
१४) मुलगी व बहीण यांना खुश ठेवावे.
१६) शरपुंखा वनस्पतीच्या मुळ्या अंघोळीच्या पाण्यात घालून अंघोळ करावी
-ज्योतिषमित्र मिलिंद
For any query or Astrological guidance feel free to contact on 7058115947 (whatsapp) contact@jyotishmitramilind.in jyotishmitramilind.in