ग्रहांनुसार कडे वा ब्रेसलेट घालणे ठरते कोणांस फ़ायदेशीर?
फॅशन हा या युगाचा परवली चा शब्द आहे. तशी फॅशन ही पूर्वापार चालत आलेली आहे फक्त थोडेफार स्वरूप बदलून परत येते एवढेच. पुरुष मंडळी सुद्धा यात मागे नाहीत बरे का.
अशीच एक गोष्ट पूर्वी फार प्रचलित होती. ते म्हणजे हातात धातूचे कडे घालणे. आज ही बरेच जणांना आवडत असेल, त्याची जागा ब्रेसलेट ने ही बरेच अंशी पटकावली आहे. असो.
फॅशन म्हणून कडे घालणे वेगळं आणि एखाद्या ग्रहावरील उपाय वा अनुकूलते साठी कडे हातात घालणे वेगळं.
हातात तांबे, पितळ, चांदी, सोने अथवा लोखंडाचे कडे कडे हातात दिसायला जरी चांगले दिसत असले तरी ते घालण्याचेही काही नियम आहेत. तसेच हे कडे प्रत्येकाला लाभेल असे नाहीजाणकार ज्योतिषाने सुचवलेले नियम न पाळता कडे घातल्यास नुकसान देखील होऊ शकते.
कडे घालणे हे जानवे घालण्यासारखे आहे. यासाठी कडे घातल्यानंतर यज्ञोपवीतचे नियम पाळले पाहिजे. मांस-दारू तसेच तामसी भोजन करताना कडे घालण्याऱ्या व्यक्तीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. शत्रु ग्रह प्रतिकूल फळ देऊ शकतो. ग्रहांची कुंडलीतील स्थिती पाहून त्याप्रमाणे कडे घालावे.
अंगळ्यांमधील रत्ने/खडे घालणे आणि कडे घालणे यामगील तत्व सारखेच आहे.
१. एखाद्याच्या कूंडलीमधे रवी (सूर्य) जर कमजोर असेल तर त्यांस बलवान बनवण्यासाठी सोन्याचे कडे सूचवले जाते.
२. मंगळाची शक्ती मिळवण्यासाठी तांब्याचे कडे उपयोगी पडते.
३. चंद्र बळ वाढवण्यासाठी चांदीचे कडे उपयोगी सिद्ध होते.
४. गुरु बळ प्राप्तीसाठी पितळेचे कडे जातकांस सांगितले जाते.
५. शनी बळ प्राप्त करण्यासाठी लोखंडाचे/स्टील चे कडे घालावे.
६. मिश्र कडे घालण्यामुळे काही नुकसान होणार नाही. पितळ, तांबे आणि चांदीमिश्रित कडे घातल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. यात सर्व धातू समप्रमाणात मिश्र केलेले असले पाहीजे. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीमध्ये कोणताही फरक पडत नाही.
७. भूत बाधा, निराशा ई. नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी पितळ अथवा तांबे मिश्रित कडे लाभदायक ठरते
८. अनेक व्याधीं पासून मुक्ती मिळवण्यासाठी अष्टधातूचे कडे घातले जाते. यामुळे सततच्या आजारांपासून संरक्षण मिळते.
कडे हे हनुमानाचे प्रतीक मानले जाते.
उजव्या हातात मंगळवारी हे कडे बनवण्यास द्यावे. शनिवारी हे कडे खरेदी करुन हनुमान मंदिरात त्याचे चरणावर हे कडे ठेवावे. हनुमान चालिसाचे पठण करावे. यानंतर हनुमानाला थोडा शेंदूर लावावा. हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त करावा आणि हे कडे धारण करावे. असे सांगितले जाते.
धातूचेकडे घालण्याआधी जाणकार ज्योतिषांचा सल्ला जरूर घ्या. तसेच धातूची शूद्धता देखील तेवढीच महत्वाची ठरते.
ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only) contact@jyotishmitramilind.in jyotishmitramilind.in
एकदा नवजात बालकाचा जन्म झाला की तयार करुन घेतलेल्या जन्मकुंडली वरील धूळ बरेच वेळा जेव्हा ते नवजात बालक लग्नाच्या वयाचे होते किंवा त्याला शिक्षण, नोकरी-व्यवसाय, आरोग्य ई. या बाबतील अडचणी येतात तेव्हाच झटकली जाते.
जन्मपत्रिकेचा विषय मुख्यत्वे मुलगी/मुलगा लग्नाचा झाला व स्थळे बघण्याची वेळ आली कि निघतो. मग अनेक प्रश्न डोक्यात फ़ेर धरु लागतात. विवाहयोग कधी आहे? स्थळ कसे मिळेल? परदेशातले मिळेल कि भारतातले? असे अनेक प्रश्न मनात यायला लागतात. मग आस्थेने आई-वडील गुरुजीचा किंवा ज्योतिषाचा रस्ता धरतात.
सर्वसाधारणपणे पारंपारिक ज्योतिषी विवाहाचा विचार करताना सप्तमेश, सप्तमातील ग्रह तसेच विवाहाचा कारक ग्रह म्हणून शुक्र तसेच मुलीची पत्रिका असेल तर रवि इ. गोष्टीचा विचार करतात. विवाह योग लवकर वा उशिरा ह्याचा अंदाज साधारण सप्तमेश, सप्तमातील ग्रह, तसेच विवाह विलंब वा लवकर घडवून आणणारे योग ह्यावरून घेता येतो. महादशा, गुरु भ्रमण इ. चा विचार करून मग साधारण काळ काढतात.
विवाहास विलंब करणारे योग : बहुतेक वेळेस शनि-शुक्र युती, चंद्र-शनि युती, पंचमात शनि, सप्तमेश निर्बली, सप्तमात पापग्रह (मंगळ, .शनि, हर्षल), शुक्र निर्बली, मुलीच्या पत्रिकेत रवि-शनि युती यापेकी काही ग्रहयोग असतील तर बहुतेक वेळा उशिरा विवाह होतो किंवा काही वेळेस विवाह योग येतच नाही. विवाह लवकर होण्याचे योग: शुभ ग्रहाचे एकमेकाशी शुभ संबंध असतील उदा. शुक्र , बुध, चंद्र,गुरु यापैकी ग्रह युतीत असणे, लग्नेश-सप्तमेश युती असणे.
.मी जेव्हा एखाद्या विवाहाचा विचार करतो तेव्हा अशी व्याख्या करतो की विवाह ही अशी घटना आहे की ज्यात आयुष्यात एक जोडीदार प्राप्ती होते ( सप्तम स्थान ) ज्यामुळे कुटुंब सदस्यात वाढ होते ( व्दितीय स्थान ), स्थायी मित्रत्वाचे नाते प्रस्थापित होते ( लाभ स्थान ) व संतती सुख प्राप्ती साठी ( पंचम स्थान ) संसार केला जातो. या सर्वांचा व ईतर अनुकुल व प्रतिकुल घटकांचा एकत्रित विचार करुन मग विवाह योगापर्यंत येतो.
सप्तम वा सप्तमेष बरोबरील ग्रहावरून जोडीदाराच्या बाबतीत भाकिते वर्तवता येतात. उदा. जर शनि संबंध असेल तर मुलीस जोडीदार वयात जास्त अंतर असलेला मिळतो. मुलाच्या बाबतीत समवयस्क किंवा वयाने जास्त असलेली वधु मिळते. जर चंद्र, शुक्र, बुध संबंध असेल तर जोडीदार वयात कमी अंतर असलेला मिळतो. रवि, मंगळ असेल तर जोडीदाराच्या वयात मध्यम अंतर असते . सप्तमाचा कोणत्या स्थानाशी घनिष्ठ संबंध आहे त्यावरून लग्न कसे ठरेल हे ठरवता येते. उदा. तृतीयाचा कार्येश असेल तर विवाह संस्था, शेजारी, जाहिरात देऊन, तृतीयाचा कार्येश असेल तर मातुल घराच्या, आत्या, मामाच्य ओळखीतून, नोकरीतील सहकारी ने सुचवलेले ई., बाराव्या स्थानाचा कार्येश असेल तर लांबच्या प्रदेशात राहणारे, परदेशातील, पंचमाचा कार्येश असेल तर प्रेमविवाहाची शक्यता असते (अर्थात त्या करता पत्रिकेत शुक्र, मंगळ, हर्षल ई. ह्याचे योग लागतात. राहू विवाहातील वैचित्र्य दाखवतो ई.)
वरील सर्व योगाचा, महादशा,अंतर्दशाचा सुक्ष्म अभ्यास करून मग विवाह योग कधी आहे ते ठरवावे लागते.
अभिनव कृत्रिम विवाह विलंब योग
आता वरील कुंडली अभ्यास जरा बाजूला ठेवून जे सध्याच्या तथाकथित वर्गाने व अति उत्साही पालक मंड्ळींनी काही गोष्टीचे अवास्तव स्तोम माजवले आहे. की ज्या गोष्टींनी विवाह ठरण्यापेक्षा विवाह लांबत चालल्याची यादीच जास्त फ़ुगत चालली आहे. हा एक अभिनव कृत्रिम विवाह विलंब योग च म्हणायला हवा. माझे विचार वाचा, पटतेय का बघा, नाहीतर सोडून द्या.
१. गुणमेलन : अनेक वर्षे लग्न जमवण्यासाठी प्रचलित असलेला गुणमेलन हा प्रकार. ३६ पैकी किती गुण जुळतात. ग्रहमैत्री जमतेय का, एक नाड तर येत नाही ना, मग रक्त गट वेगळा आहे का, गण कोणते आहेत, विवाह संबंधांना आवश्यक भुकुट चे गुण मिळताहेत का ई. अनेक गोष्टी यात समाविष्ट असतात. तटस्थ पणे जर विचार केलात तर तुम्हाला सत्य लक्षात येईल की ७०% हुन अधिक उत्तम स्थळे या गुणमेलन पायी न बघता, न भेटताच नाकारली जातात. बर पत्रिका न बघताही, पत्रिकाच काय जुन्या जमान्यातील चेहरासुद्धा न बघता लग्न करुन सुद्धा तो यशस्वी झाल्याची व ३६ च्या ३६ गुण जुळुन सुद्धा काडीमोड झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या अवती भोवती आहेतच की. तर हा सर्वात मोठा कृत्रिम विवाह विलंब योग आहे असे मला वाटते.
२. मंगळाची पत्रिका : अनेक वर्षे लग्न जमवताना प्रचलित असलेला हा अजून एक भयंकर प्रकार. ५०% हुन अधिक उत्तम स्थळे या मंगळाच्या भीती पायी न बघता, न भेटताच नाकारली जातात. १, ४, ७, ८, १२ या स्थानी मंगळ असेल तर ती मंगळाची प्राथमिक पत्रिका ठरते. मग नंतर मंगळ निर्दोष आहे का, सौम्य आहे का, अस्तंगत आहे का अशा पळवाटा शोधल्या जातात. तुम्हीच विचार करा कुंडलीतील १२ स्थानांपैकी पाच स्थाने एकटा मंगळ खाऊन टाकतो, तुमच्या हाती काय उरणार. तर हा अजुन एक मोठा कृत्रिम विवाह विलंब योग आहे असे मला वाटते.
३. क्रूर ग्रह शांती : हा एक या कृत्रिम विवाह विलंब योग मालिकेतील अजून एक महागडा उपाय. अहो तुम्ही शांती केल्याने मनाचे समाधान मिळेल आणि भाव असेल श्रद्धा असेल तर फ़ळ मिळेल. ग्रह उलटा नाही फ़िरायला लागणार. कृष्णाने सांगितले आहे ते तोडपाठ आहे सर्वांचे की कर्म करा, फ़ळाची अपेक्षा करु नका. आमची फ़ळाकडे आधी नजर मग जे प्रत्यक्षात कर्म करायचे ते राहूनच जाते.
या सर्व गोष्टींनी लग्नाच्या बाजारात गोंधळून गेलेले आई वडील अजूनच धास्तावतात. व अनेक वर्षे यंदा कर्तव्य आहे बर्र असे सांगून सांगून थकून निराश होतात.
मी सुद्धा एक ज्योतिषी आहे. योग्य मार्गदर्शनाचे मानधन सुद्धा घेतो. पण प्रत्येक ज्योतिषाची दृष्टी ही गोंधळलेला जातकास योग्य मार्गदर्शना बरोबरच त्यास चिंतामुक्त करुन व समुपदेशनाव्दारे त्यास प्रोत्साहित करणारी व सकारात्मकता प्रदान करणारी हवी. दुर्दैवाने जातकाच्या कमजोर मनस्तिथीचा गैरफ़ायदा घेऊन त्यांना अजुन घाबरवून सोडून आपली पोळी कशी भाजून घेता येईल असा असेल तर हे मात्र वाईटच.
यावर काय करता येईल :
यावर एक करा. जाणकार ज्योतिषाचा सल्ला जरुर घ्या पण नंतर. जेव्हा तुम्ही संभाव्य जोडीदारास भेटून, बोलून, त्याचे विचार, कौटुंबिक वातावरण, जीवन शैली, स्वभाव हे सर्व जाणून घ्या.
अनुकुलता असेल तर मग संभाव्य मतभेदांचा काळ जाणून घ्या. त्यानुसार दोघे वा घरचे मिळून चर्चा करुन त्याचे साठी काय मानसिक बैठक मजबूत करता येईल यावर भर द्या. एकमेकांच्या विरोधी गुणांचा आदर करुन परस्पर समन्वय कसा साधता येईल हे बघा. रात गयी बात गयी हे धोरण स्वीकारुन व वादात एक्मेकांना दूर करण्यापेक्षा वाद दूर ठेवण्याची कला शिकलात तर सौख्य लाभेल.
लक्षात घ्या ग्रह हे तुमच्या मानसिकतेवर परिणाम करत असतात. तुम्ही मानसिकता भक्कम ठेवलीत तर सर्व अडचणींवर मात करुन यशस्वी व्हाल ही खात्री बाळगा आणि या साठी आवश्यक तेथे जाणकार ज्योतिषी वा समुपदेशकाची मदत घ्या.
मनापासून लिहिलेय. पटतेय का बघा, नाहीतर सोडून द्या.
ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only) contact@jyotishmitramilind.in jyotishmitramilind.in
आजच्या जगात गुरुबळ कमी होत चालले आहे आणि शुक्र बलवान होत चालला आहे.
हे किती यथार्थ निरिक्षण नोंदवले आहे आदरणीय कै. ज्यो. कृष्णमूर्ती यांनी.
पूर्वीच्या काळी कोणतेही शुभकार्य, विवाह जमवताना ई. गोष्टी करताना गुरुबळ बघितले जायचे. कारण गुरू हा ज्ञानाचा कारक ग्रह, विवाहाचा नैसर्गिक कारक ग्रह. गुरू सालस, सुसंस्कृत, धार्मिक, अध्यात्मिक, सज्जन, नेक व्यक्ती घडवणारा ग्रह. तसेच काल पुरुषाच्या कुंडलीतील ९ व १२ व्या स्थानाचा अधिपती. ९ वे स्थान हे भाग्य, कीर्ती, प्रगती, धार्मिकता, पितृ या गोष्टींचे कारक स्थान तर १२ वे स्थान हे मोक्ष, मुक्ती, दानशूरता, सेवा या गोष्टींचे कारक स्थान. मग असे गुण असलेला जोडीदार आपल्या पाल्यास मिळावा म्हणजे सुखी संसार होईल असे वाटणे साहजिकच होते.
पण आजकलच्या पालकांकडे आणि पाल्यांकडे एक सूक्ष्म नजर टाकली तर तुम्हाला तर सहज लक्षात येईल की वर लिहिलेला आदर्शवाद आज फक्त शिकण्याकरिता व दुसऱ्याला उपदेश करण्या पुरता राहिला आहे. म्हणजेच गुरूचे बळ कमी होताना दिसत आहे.
आता आपण शुक्रा कडे वळू या. शुक्र हा भौतिक सुखांचा कारक ग्रह. शुक्राच्या कारक्तवाकडे किंवा शुक्र उल्लेख असलेले शब्द नुसते चाळले तरी शुक्र समजेल. शुक्र संपत्ती, दागदागिने, महागड्या वस्तू, उंची द्रव्ये, अत्तरे, कपडे, सिनेमा, स्त्रिया, शरीर सुख, वैवाहिक सुख, चैन, विलासीपणा या व अशा अनेक गोष्टी दाखवतो. राक्षसांचा शिक्षक कोण होता तर शुक्राचार्य. संतती साठी योग्य हवे काय तर शुक्राणू…
आजचे पालकांच्या मुलींच्या अपेक्षा बघा,
मुलगा किती पॅकेज घेतो?
स्वतः चे घर आहे का?
घरात DUST BEEN (वृद्ध बिनकामाचे आई वडील) नाहीत ना?
संन्यासा चा नव्हे तर राजा राणीचा संसार हवा…
आजचा एक च फंडा आय टी तील मुलांचा दिसतो. तो म्हणजे … D I N K. आता हे डिंक काय प्रकरण आहे. ऐकून तुम्ही ही चकित व्हाल माहित असून ही. याचा अर्थ आहे… Double Income No Kid.
म्हणजे मजा तर हवी आहे पण जबाबदारी नको. दुसरीकडे Leave in relation, Companion हे शब्द भुरळ पाडत आहेत. असे हे आजचे भोगवादी, चंगळवादी वातावरण.
म्हणून हेच जाणवतेय की
आजच्या जगात गुरुबळ कमी होत चालले आहे आणि शुक्र बलवान होत चालला आहे.
ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only) contact@jyotishmitramilind.in jyotishmitramilind.in
दत्तक पुत्र योग ( Child Adoption ) एखाद्या जोडप्याने मूल दत्तक घ्यायचे ठरवणे आणि दत्तक घेणे यात खूप अंतर आहे. अत्यंत संवेदनशील व मनोधैर्य ची सत्व परीक्षा पाहणारा विषय आहे. आजकाल मूल दत्तक घेण्यासाठी चे नियम देखील काटेकोर करण्यात आले आहेत. उद्देश हाच की या निर्णयाचा त्या जोडप्याला लाभ होत असताना त्या लहानग्या जीवाची आबाळ तर होत नाही ना.
ज्योतिष शास्त्रानुसार दत्तक योग बघताना पुत्रकारक ग्रह वां स्थाने ही मूल होण्या दृष्टीने कमजोर आहेत का हे आधी पाहिले जाते. बहुतांशी जर काही नैसर्गिक समस्या नसतील तर, दत्तक घेणे ही आजही शक्यता फार कमी आहे. त्यामुळे दत्तक योग कमी-अधिक प्रमाणात ५ व्या (संतती स्थान) आणि 9व्या (पितृ स्थान) यांचे संबंधित ग्रह राशी कमजोर असतील निपुत्रिक योग असण्याची शक्यता जास्त असते. त्या जोडीला सहाय्यक २रे (कुटुंब स्थान) व ११ वें लाभ स्थान (जोडीदाराचे ५वें स्थान) सुद्धा तपासणे गरजेचे आहे. तसेच ७ व्या स्थानावरून प्रजनन क्षमता वा शरीरसंबंध शक्ति जाणून घ्यावी लागते. ५ व्या भावात शनि आणि मंगळाचा अशुभ प्रभाव मुलांच्या सुखावर प्रतिकूल परिणाम करतो.
वांझ राशिंमध्ये ५ व्या घराचा स्वामी, म्हणजेच शनि आणि बुधशी संबंधित असतील म्हणजेच जन्मकुंडलीतील पाचव्या घरात मिथुन, कन्या, मकर किंवा कुंभ राशी पुत्र होण्यात प्रतिकुलता प्रदान करते. याचा अर्थ असा आहे की कुंभ, वृषभ, कन्या, तुला या लग्न राशीचे लोक इतरांपेक्षा मूल दत्तक घेण्याची अधिक शक्यता असते.
७ व्या स्थाना संबधित अशुभ ग्रह वा राशी हे प्रजनन करण्यास असमर्थता देतात. लग्नाच्या स्वामीचा बुधाशी संबंध देखील प्रजनन करण्यास असमर्थता दर्शवू शकतो.
दत्तक घेतल्यावर एखाद्या व्यक्तीला स्वतःचे म्हणवून घेण्यासाठी मूल होणार असल्याने, ५ व्या घरावर किंवा त्याच्या स्वामीचा शुभ प्रभाव असणे आवश्यक आहे.
५ व्या घरावर प्रभाव टाकणारा हा लाभदायक गुरू म्हणजे नैसर्गिक पुत्रकारक वा चंद्र किंवा शुक्र असेल तर, विविध पाराशरी योगांमधून दिसून आल्याप्रमाणे हा प्रभाव मुले जन्माला येण्याची पुष्टी देतो.
तसेच या स्थानाचे व्यय स्थान पाय खेचत नाहीत ना हे तपासणे गरजेचे असते.
तरी हा एक क्लिष्ट अभ्यास व जिव्हाळ्याची समस्या असल्याने या बाबतीत जाणकार ज्योतिष सल्ल्याची नितांत आवश्यकता असते.
ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only) contact@jyotishmitramilind.in jyotishmitramilind.in
महाशिवरात्री साजरी करण्यामागील आख्यायिका व पौराणिक कथा
महाशिरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
सत्य हे शिव आहे व शिव सुंदर आहे. महाशिवरात्री माघ वद्य चतुर्दशीला साजरी केली जाते. प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व जे अव्यक्त दिव्यत्वाचे तेज आहे ते मानवाच्या भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीतलावर अवतीर्ण होते.
म्हणून या दिवशी भगवान शिव प्रसन्न व्हावेत यासाठी भक्त जन पूर्ण श्रद्धेने उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना, साधना, ध्यान ई. करून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करतात अशी या मागची धारणा आहे.
महाशिवरात्री विषयी पुराणातील काही आख्यायिका, कथा पूर्वापार प्रसिद्ध आहेत.
काही पुराणांनुसार माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि पार्वती देवी यांचा विवाह संपन्न झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते.
काही पुराण अभ्यासक सांगतात की
समुद्र मंथन समयी राक्षस आणि देव यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या मंथनात प्राप्त झालेला सगळा ऐवजाची समान वाटणी करण्यात आली होती. पण अमृत कोणी घ्यायचं यावरून, वाद विकोपाला पोचला होता. कारण हे अमृत जो कोणी प्राशन करेल तो कायमचा अमर होणार होता. परंतू समुद्र मंथनातून अमृत बाहेर काढत असतांना सुरवातीला विष बाहेर पडून सगळीकडे पसरत होते. त्यामुळे देव, साधू, संन्यासी प्रचंड घाबरले होते, शेवटी हे सगळे भगवान शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले. यावर तोडगा म्हणून शंकराने ते सगळं विष स्वतः पिऊन आपल्या गळ्यात थोपवून ठेवलं, त्यावेळी शंकराचा गळा निळा दिसत असल्याने शंकर नीळकंठ म्हणून प्रसिद्ध पावले. शंकरांनी स्वत: सगळं विष पिऊन ही मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशात म्हणजेच त्या रात्री शंकराचे गुणगान गायले गेले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात.
या महाशिवरात्री संबंधी अजून एक कथा सांगितली जाते
एकदा ब्रह्मा आणि विष्णू हे दोघांपैकी श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून भांडायला लागले. त्यामुळे सगळीकडे प्रचंड कोलाहल निर्माण झाला. हे भांडण वाढत खूप विकोपाला गेले. सगळे देव चिंताग्रस्त झाले व त्यांनी शंकराच्या कानावर ही गोष्ट घातली. तेव्हा भगवान शिव एका मोठ्या अनादि अनंत पिंडीच्या स्वरुपात प्रकट झाले. ब्रह्मा आणि विष्णू हे महाकाय रूप पाहून गोंधळून गेले. तेव्हा ब्रम्हदेवाने सुरवात शेवट शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्यानंतर विष्णू ने हंस रूप धारण करून पिंडीची सुरवात आणि शेवट शोधून काढण्याचा प्रयत्न केला. तो ही व्यर्थ ठरला. शेवटी दोघांनी त्या पिंडी समोर हात जोडले व शरण गेले. हात जोडताच त्यातून ऊॅं ध्वनी ऐकू येऊ लागला. त्यानंतर ब्रह्म आणि विष्णू यांच्या लक्षात आले की, पिंडीच्या उजव्या बाजूला आकार, डाव्या बाजूला उकार आणि मध्यभागात मकार आहे आणि स्फटीकाच्या रुपात भगवान शंकर आहेत. हे पाहून विष्णू आणि ब्रह्मा शंकराची अनन्य भावाने पूजा करू लागले. पहिल्यांदाच भगवान शंकर पिंडीच्या रुपात माघ वद्य चतुर्दशीला प्रकट झाल्याने या रात्रीस महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते.
तर या लेख लिहिण्याचे प्रयोजन एवढेच की, अनादि अनंत असे हे अव्यक्त दिव्यत्व असे शिवतेज जो या सृष्टीचा परम आत्मा आहे तोच मात्र केवळ एक सत्य आहे बाकी सर्व नश्वर गोष्टी ही माया आहे. मग अहंकार कशाचा बाळगायचा? त्यामुळे महाशिरात्रीनिमित्त मात्रे का होईना त्या परम सत्यास शरण जावे व अनन्य भावाने अध्यात्मिक प्रगती वा मोहापासून मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी आराधना करावी.
लहानपणी आपण अकबर बिरबलाच्या गोष्टी अगदी आवडीने वाचल्या आहेत. अकबराच्या दरबारात जे नवरत्न मंत्री मंडळ होते, त्या पैकी बिरबल हा सर्वात प्रसिद्ध झाला, कारण बिरबलाकडे अशी एक गोष्ट होती जी इतरांपेक्षा विशेष नजरेत भरणारी होती ती म्हणजे ती म्हणजे त्याचे बुद्धीचातुर्य.
एका दोरीवर काही कपडे वाळत घातले आहेत तर समजा १ ड्रेस व १ शर्ट वाळायला १५ मिनिटे लागतात, तर ४ ड्रेस व ४ शर्ट वाळायला किती वेळ लागेल? या प्रश्नाचे उत्तर बिरबलाने तात्काळ दिलेच असते वर अजून ४ कोडी आपल्याला घातली असती आणि निरुत्तर केलं असतं.
ही प्रचंड बुद्धिमत्ता व तल्लखपणा देणारा सुर्याच्या दरबारातील बिरबल रुपी रत्न म्हणजे बुध.
आपल्या अवती-भोवती जी काही बुध्दीमान, चतुर, चलाख, धुर्त मंडळी ई. वावरत असतात, त्यांचा ‘बुध’ हा ग्रह सुस्थितीत असतो. बुध ‘चांगला’ म्हणजे काय? हे विस्तृत पणे जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करावा लागेल, पण इथे या गोषवारा जरी कळला तरी पुरेसं आहे.
बुध म्हटले की बुद्धी व धुर्तपणा आपल्याला नजेरेसमोर येत असला तरी बुधाच्या कारकत्वाखाली बुद्धी, वाकचातुर्य, संपर्क, अनेकत्व, ई अनेक गोष्टी येतात.
त्यातीलच एक गोष्ट म्हणजे ‘अनेकत्व’ एखादया व्यक्ती बाबतीत तुम्ही बघितलं असेल की त्याला एका वेळेला कामाच्या दोन चांगल्या संधी चालून येतात आणि मग त्यातली कुठली निवडावी हा प्रश्न पडतो, किंवा लग्नाच्या जोडीदाराचा शोध चालू असताना दोन उत्तम स्थळे एकाच वेळेला चालून येतात आणि कोणांस होकार दयावा, हा प्रश्न पडतो. काही वेळेला एकच स्थळ हे काही काळाने परत सांगुन येतं. एखादया व्यक्तीचे ‘एकापेक्षा अधिक’ उदयोगधंदे असतात, म्हणजेच धन प्राप्तीचे स्त्रोत (Source of income) हे ‘एकापेक्षा अधिक’ असतात. अशा सर्व गोष्टी बुधाच्या अंमलाखाली येतात. बुध हा बुध्दीमत्ता देतोच पण त्यात देखील उत्तम ‘आकलनं शक्ती’ (Grasping Power) आणि तर्ककला (Logic) देतो. विनोदबुध्दी, मिस्किलपणा हे सुद्धा बुधाचेच गुण. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ही म्हण बुध व्यक्ती सार्थ ठरवतो.
एका नवरोजी ला कोर्टात वाद चालू असताना एका वकिलाने प्रश्न विचारला की, ‘तुम्ही तुमच्या बायकोला पूर्वी इतकीच सध्या मारहाण करता का? फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ मधेच उत्तर दया’ नवरोजी ची पंचाईत झाली. ‘हो’ उत्तर दिलं तरी पंचाईत ‘नाही’ उत्तर दिलं तरी पंचाईत.
बुधाच्या अंमलाखाली येणारी कार्यक्षेत्रे म्हणजे सॉफ्टवेअर व त्या संबंधातील सर्व क्षेत्रं, कॉल सेन्टर्स, बीपीओ, इलेक्ट्रॉनिक्स. इथ पासून ते लेखन, साहित्य, प्रकाशन, प्रिंटिंग, वधुवर सूचक, ज्योतिष ई. अनेक कार्यक्षेत्र येतात..
बुधाचा अजून एक गुण म्हणजे परिवर्तन. बुध हा सतत बदल घडविणारा ग्रह आहे. असे उदयोगधंदे की, ज्यात समोरचा ‘ग्राहक’ हा सारखा बदलत असतो. उदाहरणार्थ- दुकान किवां तत्सम व्यवसाय हे बुधच्या अंमलाखाली येतात. बुधाच्या अंमलाखाली येणारं सॉफ्टवेअरचं क्षेत्र हे सतत बदलणारं क्षेत्र आहे. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर क्षेत्रात नोक-या बदलण्याचं प्रमाण हे खूप अधिक आहे. ज्या व्यक्तीचं कामाचं स्वरूप हे सतत बदलत असतं ते देखील बुधामुळेच.. शेअर बाजार हा देखील बुधाच्याच अंमलाखाली येतो. तिथे तर रोज नविन चित्र असतं, सतत बदल, व चढ उतार. बुधाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे एकाच कामासाठी अनेक वेळा किंवा एकापेक्षा जास्तवेळा प्रयत्न करावे लागतात. पहिल्याच फटक्यात काम होत नाही. बुधवारी किंवा बुधाचं नक्षत्र असणा-या दिवशी एखादं काम करायला गेल्यास बहुतेकवेळा त्याच कामासाठी परत जावं लागतं. म्हणजेच पहिल्याच फटक्यात काम होत नाही.
बुधाच्या अधिपत्याखाली येणा-या दोन राशी म्हणजे ‘मिथून’ व ‘कन्या’ या दोन्ही राशी जरी बुधाच्याच अधिपत्याखाली येत असल्या तरी या दोन्ही राशीत बुधाच्या गुणधर्माची वेगवेगळी झलक पहायला मिळते. दोन्हीही राशी बुध्दीमान आहेत पण मिथून राशीत बुधाचा चलाखपणा, वाक्चातुर्य, विनोदबुध्दी, धुर्तपणा हया गोष्टी अधिक आहेत.
कन्या राशीत बुधाची आकलंन शक्ती, चिकित्सकवृत्ती कुठल्याही गोष्टीचा अतिविचार, काही वेळेला या अतिविचारामुळे कन्याराशी निर्णय घ्यायला प्रचंड वेळ लावते. समोरचा माणूस वैतागून जातो, तरी यांचा निर्णय अजून झालेला नसतो. हयांना निर्णय घेण्यासाठी सतत कोणाच्या तरी आधाराची गरज असते. कन्या ही अत्यंत शास्त्रीय पध्दतीने विचार करणारी राशी आहे. प्रत्येक गोष्ट सिध्द व्हावी लागते. थोडीशी अतिशयोक्ती म्हणजे, समजा कन्या व्यक्तीने ‘पिवळा’ शर्ट घातलेला असेल तरी ते एकदा समोरच्या माणसाला विचारतील की मी कुठल्या रंगाचा शर्ट घातलाय? समोरच्या व्यक्तीने एकदा ‘पिवळा’ म्हटलं की मग हयांची खात्री पटते. मिथून ही वायु तत्त्वाची रास असल्याने सतत विचार ‘बदलणारी राशी’ आहे हे लोक त्याचे निर्णय सतत ‘बदलत’ असतात. सकाळी संध्याकाळी फ़िरायला जाऊ. दुपारी म्हणतील घरीच आराम करु.
संदेशवहनाचा’ कारक देखील बुधच! त्यामुळे आपल्या हातातला ‘भ्रमणध्वनी’ (मोबाईल) हा देखील बुधाच्याच अधिपत्याखाली येतो. बुध हा बुध्दीचा कारक आणि बुध्दी जिथे साठवली जाते त्या मेंदुचे देखील ‘दोन’ भाग आहेत, मोठा मेंदू व छोटा मेंदू! हयात देखील बुधाचं ‘एकापेक्षा अधिक’ हे कारकत्व चुकलेलं नाही!
बुधा संबंधी इतक्या अनेक गोष्टी आहेत त्या सगळया गोष्टीचा एकाच लेखात उल्लेख करणंही अवघड आहे.
‘रवि’ला ज्योतिषशास्त्रात ‘राजा’ म्हटलेलं आहे आणि ‘बुध’ हा सूर्यमालेतील रविच्या म्हणजे सुर्याच्या सगळयात जवळचा ग्रह आहे. अकबर बादशहा देखील बिरबलाला कायम त्याच्याबरोबर ठेवत असे, म्हणूनच बुध्दींच्या कारक बुधाला नवग्रह मालेतील बिरबल हे नाव सार्थ वाटते..
(मध्यंतरी वाचनात आलेल्या एका लेखाचा स्वैर अनुवाद)
ज्योतिष मित्र मिलिंद (jyotish mitra milind)
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only) contact@jyotishmitramilind.in jyotishmitramilind.in
फ़ार पूर्वीपासून माणसाला अनेक प्रकारची चित्र-विचित्र स्वप्ने पडत आली आहेत आणि नेहमीच या स्वप्नामागे काय अर्थ दडलेला असावा ही उत्सुकता वाटत आली आहे. याला मी तरी कसा अपवाद असेल. सगळ्या प्रकारची स्वप्ने मला नक्कीच पडलेली नाहीत त्यामुळे प्रतेक स्वप्न व त्याचा अर्थ एका माणसाला पडताळून पाहणे एका माणसाला शक्य नाही. तरी मित्रांनो आज अशीच काही स्वप्ने आणि त्यांचा काय अर्थ असावा याचे संग्रहित केलेले संक्षिप्त अर्थ वा फ़ळ इथे देत आहोत.
अनु. क्र.
स्वप्न ( स्वप्नात आलेली गोष्ट )
स्वप्न संक्षिप्त अर्थ वा फ़ळ
001
पान / दही / दूध पाहणे
लवकरच धनलाभ होईल
002
बूट / चप्पल पाहणे
लवकरच प्रवास होईल
003
चारपाई पलंग पाहणे
खोटेपणा समोर येईल
004
चारपाई पलंगावर झोपलेले पाहणे
व्यर्थ क्लेश होतील
005
माणूस पाहणे
सामान्य
006
लहान मुलगा पाहणे
योग्य काळ येईल
007
स्त्री / जुळी मुले पाहणे
लवकरच धनलाभ होईल
008
मुलगी पाहणे
लवकरच चांगले दिवस येतील
009
वाळू पाहणे
लवकरच धनलाभ होईल
010
तार पाहणे
समृद्धी वाढेल
011
दंडुका पाहणे
निंदा वाट्यास येईल
012
दिवा पाहणे
संकट टळेल
013
देवता / देवी पाहणे / साधू पाहणे / साधूचा आश्रम पाहणे
आनंद व शांती लाभेल
014
कोणाची चांगली प्रतिमा पाहणे
आयुष्य वाढेल
015
पान खाणे
समाजात मान वाढेल
016
पान थुंकने / फ़ेकणे
समाजात मानहानी होईल
017
सामानाची पेटी पाहणे
सुविधा प्राप्त होतील
018
सामानाची पेटी हरवणे
अडचणी येतील
019
पुस्तक पाहणे / पुस्तक मिळणे
समाजात मान वाढेल
020
पुस्तक हरवणे
समाजात मानहानी होईल
021
उपाशी पाहणे
संततीविषयी अडचणी
022
जळता कंदील पेटलेली विजेरी पाहणे
अडचणीतील परिवाराशी संपर्क
023
कबुतर पाहणे
व्यावसायिक लाभ होईल
024
तळ्घर पाहणे
हीन व्यक्तीशी संबंध येईल
025
पतंग कापलेला पाहणे
धनहानी होईल
026
उडता पतंग
धनलाभ होईल
027
समारंभ पाहणे
अविवाहित चे लग्न जमेल
028
चंद्र पाहणे
चांगली मैत्री लाभेल
029
समई पाहणे
भाग्यवृद्धी होईल
030
नग्न पाहणे
अशुभ काळ येईल
031
औषध घेणे
वाईट गोष्टी दूर होतील
032
ओळखीचा संभोग
आरोग्याच्या अडचणी
033
अनोळखी संभोग
आकर्षण वाढेल
034
पार्सल येणे
भाग्यवृद्धी होईल
035
पार्सल पाठवणे
हानी होईल
036
दुर्घटना पाहणे
आरोग्याच्या अडचणी
037
दुर्घटनेतून वाचणे
आरोग्य सुधारेल
038
मूंगी पाहणे / मारणे
संघर्षातून सफ़लता
039
अनेक मुंग्या पाहणे / मारणे
अडचणी येतील
040
दाढी वाढलेली पाहणे
अशुभ संकेत
041
सफ़ेद दाढी वाढलेली पाहणे
शुभ संकेत
042
प्रशंसा पाहणे
अधोगती होईल
043
अपमान पाहणे
प्रगती होईल
044
स्त्रीस अलिंगण पाहणे
प्रगती होईल
045
स्तन पाहणे
शुभ संकेत
046
दस्ताऐवज पाहणे
व्यावसायिक लाभ होईल
047
प्रसव पीडा पाहणे
समृद्धी वाढेल
048
शौचालय पाहणे
योजना सफ़लता
049
परिचारिका दिसणे
रोगमुक्ती
050
नळ पंपातून पाणी पाहणे
धन/ व्यावसायिक लाभ होईल
051
कोरडा नळ पाहणे
धन/ व्यावसायिक हानी होईल
052
तीर्थ यात्रा पाहणे
भाग्यवृद्धी होईल
053
आवडती मूर्ती चोरी होणे / तुटणे
अशुभ संकेत
054
चिखल पाहणे
अडचणी येतील
055
पाणी पाहणे
लवकरच धनलाभ होईल
056
दात / केस पाहणे
शुभ संकेत
057
दात पडणे / केस तुटणे पाहणे
अशुभ संकेत
058
पितृ पाहणे
शुभ संकेत
059
साप चावणे
लवकरच धनलाभ होईल
060
तलाव दिसणे
शुभ संकेत
061
जेवन करणे
मानसिक रोग
062
जेवन फ़ेकणे
रोगमुक्ती
063
चिमणी पाहणे
अशुभ संकेत
064
तिजोरी पाहणे
लवकरच धनलाभ होईल
065
स्वच्छ आकाश पाहणे
प्रगती होईल
066
पोहताना पाहणे
प्रगती होईल
067
उडताना पाहणे
लाभदायक प्रवास
068
शाळा पाहणे
विशेषता लाभेल
069
परी पाहणे
चमत्कारी प्रगती
070
कात्री पाहणे
व्यावसायिक लाभ होईल
071
रडताना पाहणे
सुखाचा काळ येईल
072
चिंता करताना पाहणे
प्रगती होईल
073
यात्रा करताना पाहणे
कार्यसिद्धी होईल
074
भाजीपाला पाहणे
समृद्धी दर्शक
075
पत्नीचे दर्शन होणे
सौभाग्य दर्शक
076
अंगठी दिसणे
लवकरच धनलाभ होईल
077
अंगठी हरवणे
धनहानी
078
अंडे दिसणे
सफ़लता प्राप्ती
079
शवयात्रा दिसणे
पारिवारीक संकटे
080
आरसा दिसणे
प्रसन्नता दर्शक
081
तुटका आरसा
अप्रसन्नता दर्शक
082
तांदुळ भात दिसणे
दु:ख समाप्ती
083
चक्की दिसणे
संकटाची चाहुल
084
आंबा दिसणे
लवकरच धनलाभ होईल
085
ढग दिसणे
प्रगती होईल
086
पिंजरा दिसणे
कष्ट्दायक काळ
087
विंचू चावणे
धनलाभ
088
म्हैस दिसणे
संकटावर मात
089
रेडा दिसणे
अडचणींत वाढ
090
ताईत दिसणे
क्लेष दर्शक
091
ताईत हरवणे
संकट मूक्ती
092
मद्य प्राशन दिसणे
भौतिक समृद्धी दर्शक
093
प्रार्थना / पूजा / प्रसाद / स्वर्ग दिसणे
शांती लाभ
094
नरक दिसणे
दु:खदायक
095
शिडी दिसणे / शिडीवर चढणे
प्रगतीकारक
096
शिडी वरुन उतरणे
अवनती कारक
097
घर कोसळणे / पहाड दिसणे / उतरणे
अडचणींत वाढ
098
पहाड चढणे
संकटावर मात
099
तरतरीत नाक दिसणे
समाजात मान वाढेल
100
बेढब नाक दिसणे
समाजात मानहानी होईल
(टीप : स्वप्नांचे अर्थ पाहून त्यासंबंधी फ़ळाचे व काळाचे अनुमान काढताना जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.)
-ज्योतिषमित्रमिलिंद
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन साठी संपर्क :
(७०५८११५९४७) (Whatsapp/Text Only)
For More info Visit : jyotishmitramilnd.in
Collection of 500 Dreams and their Meanings @ Rs.99/-
माणसाची प्रसंगाकडे बघण्याची, ती समजण्याची दृष्टी आणि ईश्वरीय दृष्टीकोन हे एकदम भिन्न असतात. बरेच वेळा आपल्या मनाप्रमाणे गोष्ट घडत नसेल तर आपण नशिबाला दोष वा देवाविषयी शंका घ्यायला सुद्धा कचरत नाही. आपण ईश्वराची न्याय जाणण्यात, समजण्यात अपुरे आहोत. आपण आपल्या त्यागाचे गुणगान करतो, परंतु ईश्वर आपल्या त्यागाची तुलना आपले भोग आणि कर्म याच्याशी करून यथोचित निर्णय घेत असतो.
हे महत्त्वाचे नाही कि आपण किती श्रीमंत आहोत, महत्त्वाचे हे आहे कि आपल्या सेवाभावी कार्यात त्याग किती आहे. याच संदर्भात सुनील इनामदार यांची एक व्हॉट्स ॲप पोस्ट वाचनात आली, त्यातील “देवाचे गणित” जसे च्या तसे इथे देत आहे
देवाचे गणित…..
एकदा दोघेजण एका मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते. अंधार पडू लागला होता आणि ढग जमा होऊ लागले होते. थोड्या वेळाने तेथे आणखी एक माणूस आला आणि तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला.
थोड्या वेळाने तो माणूस म्हणाला त्याला खूप भूक लागली आहे, त्या दोघांनाही भूक लागायला लागली होती.
पहिला माणूस म्हणाला माझ्याकडे ३ भाकर्या आहेत, दुसरा म्हणाला माझ्याकडे ५ भाकर्या आहेत, आपण तिघे मिळून वाटून घेऊ आणि खाऊ.
आता प्रश्न आला कि ८ (३+५) भाकर्या तिघांमध्ये कशा वाटायच्या ? पहिल्या माणसाने सुचविले कि प्रत्येक भाकरीचे ३ तुकडे करुया, अर्थात ८ भाकर्यांचे २४ (८ x ३) तुकडे होतील आणि आपल्या तिघात ८ – ८ तुकडे समसमान वाटले जातील.
बाकी दोघांना त्याचे मत पटले आणि ८ भाकर्यांचे २४ तुकडे करुन प्रत्येकाने ८ – ८ तुकडे खाऊन भूक शांत केली आणि मग पावसामुळे मंदिराच्या आवारातच ते सारे झोपी गेले.
सकाळी उठल्यावर तिसर्या माणसाने पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि भाकरीच्या ८ तुकड्यांबद्दल प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांना ८ सुवर्णमुद्रा देऊन तो आपल्या घरी गेला.
तो गेल्यावर दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला की आपण दोघे ४ – ४ मुद्रा वाटून घेऊ. पहिल्या माणसाने याला नकार दिला आणि म्हणाला की माझ्या ३ भाकर्या होत्या आणि तुमच्या ५ भाकर्या होत्या, म्हणून मी ३ मुद्रा घेईन आणि तुम्ही ५ मुद्रा घेतल्या पाहिजेत.
यावर दोघांची वादावादी चालू झाली. यातून समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघे मंदिराच्या पुजार्याकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या सांगितली व ती सोडविण्याची प्रार्थना केली.
हे दोघेही दुसर्याला जास्ती देण्यासाठी भांडत आहेत हे पाहून पुजारीपण चक्रावून गेला. त्याने त्या दोघांना सांगितले की या मुद्रा माझ्यापाशी ठेवून जा आणि मला विचार करायला वेळ द्या, मी उद्या सकाळी उत्तर देऊ शकेन.
पुजार्याला खरेतर दुसऱ्या माणसाने सांगितलेली ३ – ५ ची वाटणी ठीक वाटत होती, पण तरीसुद्धा तो खोलवर विचार करीत होता. विचार करता करता त्याला गाढ झोप लागली. थोड्या वेळात त्याच्या स्वप्नात देव प्रगट झाला, तेव्हा पुजार्याने देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना केली. माझ्या दृष्टीने ३ – ५ अशी वाटणीच उचित आहे असेही त्याने देवाला सांगितले.
देवाने स्मित करुन म्हटले, “नाही, पहिल्या माणसाला १ मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला ७ मुद्रा मिळाल्या पाहिजेत.” देवाचे म्हणणे ऐकून पुजारी चकीत झाला आणि त्याने आश्चर्याने विचारले, “प्रभू, असं कसं ?”
देव पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला: यात काही शंका नाही की पहिल्या माणसाने आपल्या ३ भाकर्यांचे ९ तुकडे केले, परंतु त्या ९ पैकी त्याने फक्त १ वाटला आणि ८ तुकडे स्वतः खाल्ले. म्हणजेच त्याचा त्याग भाकरीचा फक्त १ तुकडा एव्हढाच होता. म्हणून तो फक्त १ मुद्रेचा हक्कदार आहे. दुसऱ्या माणसाने आपल्या ५ भाकर्यांचे १५ तुकडे केले, ज्यातले त्याने स्वतः ८ तुकडे खाल्ले आणि ७ तुकडे वाटून दिले. म्हणून न्यायधर्मानुसार तो ७ मुद्रांचा हक्कदार आहे. हेच माझे गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे.
देवाच्या न्यायाचे हे अचूक विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला.
विवाहित जोडपे ज्याला इंग्लिशमध्ये “soul mate” म्हटले जाते. म्हणजेच ज्यांचे आत्मा/अंतःकरण एकरूप होतात. ज्योतिष शास्त्रात सूर्यास आत्माकारक ग्रह मानतात. चला तर मग आपले विवाह कोणत्या सुर्यराशीच्या महिन्यात झाले आहेत, याचा आपल्या नात्यावर कसा प्रभाव पडत असेल. हे ढोबळमानाने जाणून घेऊ…थोडी रंगत थोडी गंमत आपल्या वैवाहिक नात्याबद्दल
😊
टीप : हे ढोबळ अनुमान असून परस्पर पुरकता जाणून घेण्यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक असते.
१४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी : या दरम्यान झालेल्या विवाहावर मकर राशीचा प्रभाव असतो अर्थात असे जोडपे खूप जबाबदारीने वागणारे असू शकते पण त्यांच्यात प्रणय रसिकता थोडी कमी असू शकते. 😊
१४ फेब्रुवारी ते १३ मार्च : या कालावधीत झालेले विवाहांवर कुंभ राशीचा प्रभाव असतो. अर्थात असे जोडपे जगावेगळे असतात. हे सकारात्मक विचारी आणि नेहमी आकर्षणाचे केंद्र असू शकतात. 😊
१४ मार्च ते १३ एप्रिल : या दिवसांत झालेले विवाह मीन राशीने प्रभावित असतात. हे जोडपे भावुक असून एकमेकांवर खूप प्रेम करतात, पण दाखवणे जमेल असे नाही 😊
१४ एप्रिल ते १३ मे : या दरम्यान झालेले विवाहांवर मेष राशीचा प्रभाव असतो. असे जोडप्यांच्या प्रणयाविषयी कल्पना स्पष्ट असू शकतात. दोघांमध्ये प्रेमही असतं पण एकमेकांशी तुलना केल्याने काही मतभेद देखील होऊ शकतात. 😊
१४ मे ते १३ जून : या काळातील विवाह हे वृषभ राशीने प्रभावित असतात. या एक प्रभुत्व गाजवणारा तर दुसरा जुळवून घेणारा असेल तर हे नातं सुरळीत राहू शकते. 😊
१४ जून ते १३ जुलै : या काळातील विवाह मिथुन राशीने प्रभावित असतात. प्रत्येक गोष्टीत अतीपणा उतू जातो, प्रेम करताना अगदी आकंठ प्रेमात बुडतात आणि भांडतात तेव्हा अगदी हमरीतुमरीवर येऊ शकतात. 😊
१४ जुलै ते १३ ऑगस्ट : या दरम्यान चे विवाह कर्क राशीने प्रभावित असतात. पती-पत्नी घराचा व सुखाचा विचार करत असतात. दोघं कधी प्रेमात दंग होतात, पण कामाची जबाबदारी आठवताच प्रणयातून भानावर येतात. 😊
१४ ऑगस्ट ते १३ सप्टेबर : या काळातील विवाह सिंह राशीने प्रभावित असतात. या जोडप्यात अहंकारामुळे वाद होऊ शकतात. एकमेकांच्यात प्रेम आणि काळजी असते, पण रागात सगळ्याचा विसर पडू शकतो. 😊
१४ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर : या दरम्यान चे विवाह कन्या राशीने प्रभावित असतात. हे जोडपे खूप संवेदनशील असू शकते पण काहीसे गोंधळलेले असू शकतात. 😊
१४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेबर : या दरम्यान झालेले विवाह तूळ राशीने प्रभावित असतात. या जोडप्यात प्रत्येक गोष्ट खूप संतुलित असते. म्हणून मेड फॉर इचं आदर असू शकतात. 😊
१४ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर : या काळातील विवाह वृश्चिक राशीने प्रभावित असतात. असे जोडपे प्रणयासक्त असू शकते व वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगतात, पण याची पूर्ती न झाल्यास असमाधान निर्माण होऊ शकते. 😊
१४ डिसेंबर ते १३ जानेवारी : या काळातील विवाह धनू राशीने प्रभावित असतात. हे जोडपे हट्टी असू शकतात तरी एकमेकाला समजून घेतात आणि नातेबंध जपतात.
टीप : हे ढोबळ अनुमान असून परस्पर पुरकता जाणून घेण्यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक असते.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… आज अनंत चतुर्दशी! श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेश भक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया…
आज मन यापूर्वी च्या गणपती बाप्पाला निरोप देतानाच्या आरोळी नी दुमदुमतेय..मन भरून आले आहे. काही आरोळी लिहितोय…
१. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
३. अली में ढोल गली में ढोल, गणपती बाप्पा लवकर बोल
४. एक दोन तीन चार, गणपती चा जयजयकार…
तुम्हाला अजुन आठवत असतील तर तुम्ही ही लिहा…
-ज्योतिषमित्र मिलिंद
ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी संपर्क : 7058115947(whatsapp only) contact@jyotishmitramilind.in jyotishmitramilind.in