
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : न्यूरो तंत्रज्ञान आणि ध्यान
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : मनशक्ती दिवाळी अंकातील श्री. चंदने यांचा लेख
नमस्कार,
काय ध्यान आहे हा मुलगा… ध्यान कुठे आहे रे तुझे… आत मी ध्यानाला बसणार आहे, मध्ये व्यत्यय आणू नकोस… किती सहज हा शब्द आपण बोलण्यात वापरत असतो.
योगाभ्यासात मनाकडून आत्म्या पर्यंतचा प्रवास हा ध्यानाचा हेतू आहे. आजच्या स्पर्धेच्या, धकाधकीच्या जीवनात अनेक ताण आपल्यावर आहेत. दुसऱ्या बाजूने माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मन भरकटलेलं आहे अशी भावना प्रबळ होते आहे. स्वतःची ओळख आपण विसरत चाललेलो आहोत. एका ठिकाणी एकाग्र होण्याची क्षमता कमी झालेली आहे. या सगळ्यातून मार्ग काढून आपण आत्मशोध घ्यायला हवा. आनंद आणि शांती ही मनाच्या खोल गाभाऱ्यात आहे, तो मनाच्या शुद्धीत आहे. अशुद्ध, विकारसहित आत्मा म्हणजे मन, आणि विकार रहित शुद्ध मन म्हणजे आत्मा. मन आणि आत्मा ह्यात गुणात्मक फरक आहे. एखाद्या काचेच्या चकचकीत ग्लासामध्ये काठोकाठ शुद्ध पाणी भरलं तर लांबून त्या ग्लासामध्ये पाणी आहे हे समजत नाही. परंतु त्यात विविध रंग, गढूळता, मचुळता टाकली तर त्या ग्लास मध्ये पाणी आहे हे आपल्याला समजतं. ग्लासमधलं अशुद्ध पाणी म्हणजे मन, पण त्या पाण्यातली गढूळता, मचूळता काढली तर जे शुद्ध स्वच्छ पाणी राहील तो म्हणजे आत्मा, जो आनंदमय, निर्मळ, निरामय आहे.
तैतेरीय उपनिषदात भृगु ऋषींच्या बालपणाची एक सुंदर कथा सांगण्यात आली आहे. एकदा गुरु आणि वडील वरुण ऋषी यांना त्यांचा शिष्य व पूत्र भृगु शंका विचारतो की, आपण सगळे कशाचे बनलेलो आहोत आणि ह्या सृष्टीचे मूलतत्त्व काय आहे? त्यावर वरुण ऋषीनी ज्ञानोपादेश देऊन त्यांस सांगितले की,’ ते समजण्यासाठी साठी एकांतात कठोर तप करून आत्मशोध घ्यायला पाहिजे. त्यानुसार भृगुनी एकांतात तपाचारणाद्वारे आत्मशोध घेतला व वडिलांकडे येऊन म्हणाला,
सगळं विश्व हे अन्नमय आहे. हे विश्व कणांचे म्हणजेच जड (matter) चे बनलेले आहे. सगळ्या वस्तुजाताचं पोषण अन्नाद्वारे (पंचमहाभूते) होतं असून पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश यांचं विश्व बनलेलं आहे. आणि त्याचा लयदेखील अन्नात म्हणजे पंचमहाभूतातच होतो.
भृगु चे हे उत्तर ऐकून आपल्या मुलाला स्थूलाच्या मूलभूत गोष्टीचा शोध लागला यामुळे वरूण ऋषि आनंदित झाले. परंतु ते भृगुला म्हणाले की, ज्याचा शोध लागला आहे, त्यापेक्षाही काहीतरी सूक्ष्म आहे, तू त्याचा शोध घे.
वरुण ऋषींच्या सांगण्याप्रमाणे भृगु खूप संशोधन करून बऱ्याच दिवसांनी परत आले व वरुण ऋषींना सांगितले की, अन्नमय कोषावर ती प्राणाची सत्ता आहे. पंच प्राण हे अन्नमय कोषास हलवतात. प्राण, उदान, समान, व्यान आणि अपान या पंच प्राणांनी अवघी सृष्टी व्यापली आहे.
वरुण ऋषि आपल्या मुलाची प्रगती पाहून आनंदित झाले, पण त्यास म्हणाले की, आता ह्या पंच प्राणांच्या मागे अजून एक सूक्ष्म शक्ती ह्या पंच प्राणाच्या माध्यमातून कार्य करते, याचा तू शोध घे.
भृगु परत एकदा कठोर तप, स्वाध्याय करून आले आणि आत्मशोध सांगितला.
‘मन’ हे या सगळ्याचा स्रोत आहे. मन, मनातल्या इच्छा, भावना, विकार हे ह्या प्राणमय आणि अन्नमय कोषाकडून क्रिया करून घेतात. सुख-दुःख, प्रेम-द्वेष, आवड-नावड ह्या आणि अशा अनेक गोष्टीं ज्या मनोमय कोषाच्या भाग आहेत, त्यातून ह्या सृष्टीचे चलन वलन चालते. ‘मन’ अदृश्य असले, तरी पण तेच या सगळ्याला कारणीभूत आहे.
वरुण ऋषी म्हणाले, तू योग्य मार्गावर आहेस, पण आता ह्या मनोमय कोषावर ज्याची सत्ता आहे, त्याचा तू शोध घे. भृगु पुन्हा तपश्चर्या करून सूक्ष्मतेचा शोध घेऊन परत आले.
” ‘ज्ञान’, ‘विवेक’ जो ह्या मनोमय कोशावर नियंत्रण ठेवू शकतो. हा विवेक, संयम, ज्ञान जिथे जागृत होतं ते ‘विज्ञानमय कोश’.
भृगुना अवगत झालेले ज्ञान पाहून वरुण ऋषी खूष झाले व त्यापुढील जी सूक्ष्मता आहे त्याचा अनुभव घेन्यास सांगितले. या वेळेला भृगु तपासाठी गेले आणि ते खूप दिवस उलटून गेले, तरी पुन्हा आलेच नाहीत. आपला मुलगा अजून का आला नाही हे बघण्यासाठी वरुण ऋषी जंगलात गेले आणि भृगुना बघून आश्चर्यचकित झाले. त्यांना भृगु हे पूर्ण आनंदमय, शांत आणि समतेत आणि परमानंदात विलीन झालेले असे दिसले. नक्की काय शोध लागला हे सांगायला भृगुंचं मी पण संपून गेलं होतं. आनंदमय कोशात ते विलीन झाले होते.
भृगुंनी अनुभवलेली आनंदमय, प्रशांत, शांत अशी अवस्था ही आपल्या अस्तित्वाची खरी अवस्था आहे. ही मनाची उत्कट अशी अवस्था आहे. परंतु मनात गडबड झाली कि समस्या निर्माण होते. याबाबत योगशास्त्रात छान विचार आला आहे. प्रकट होणाऱ्या ‘व्याधी’ ही नंतरची पातळी आहे. व्याधींच्या अगोदरची पातळी म्हणजे ‘आधी’ होय. आनंदमय कोशात व्यक्ती ही संपूर्ण आरोग्यपूर्ण, समतोल अशी असते. मनोमय कोशात पहिल्यांदा विकार, आवड निवड, सुख दुःख हा असमतोल निर्माण होतो. मधुमेह असतानाही पथ्यास न जुमानता गुलाबजाम खायचाय ही इच्छा मनात असमतोल निर्माण करते. ह्या प्रकारच्या विकारग्रस्त असमतोल म्हणजेच ‘आधी’. आधीचं मूळ कारण म्हणजे स्वतःच्या संपूर्ण आनंदमय स्थितीचं अज्ञान. ती आनंदमय स्थिती सोडून विकारांच्या आधीन होऊन ज्या मनाचा ताबा घेऊन तशा कृती करायला भाग पाडतात त्या ‘आधी’. ह्या पातळीवर त्याचे शरीरात म्हणजेच अन्नमय आणि प्राणमय कोशात व्याधींच्या रूपाने तत्काळ परिणाम दाखवत नाहीत, पण हळूहळू ह्या ‘आधीं’ चे प्रकटीकरण शरीरात दिसायला लागत. आणि व्याधीत रूपांतर होतं.
आपल्याला जडणाऱ्या व्याधींपैकी सुमारे ८० टक्के व्याधी या सायको सोमॅटिक म्हणजेच मनोकायिक प्रकारात मोडतात. याचा अर्थ अशा व्याधी की, ज्या निर्माण होण्यासाठी कुठलाही बाह्य विषाणूची गरज लागत नाही. केवळ मनातून, ताणातून, विचारातून निर्माण होणाऱ्या व्याधी त्याला मनोकायिक आजार असं म्हणतात.
ज्या शरीरात व्याधी निर्माण होतात ते शरीर ‘जड’ आहे. जर जड शरीराच्या मागे मन, मनातली ऊर्जा किंवा शक्ती नसेल तर ते निर्जीव आहे. ह्या ऊर्जेच्या किंवा शक्तीच्या माध्यमातून तर मन आपल्या इच्छा शरीराच्या माध्यमातून पूर्ण करू शकतं. आपल्या शरीराची रचना बघितली, तर लक्षात येईल की मन हे शरीराचा राजा आहे. तर मेंदू हा शरीराचा प्रधान आहे. सगळ शरीर मज्जारज्जूला जोडलेले आहे. मज्जारज्जू हा मन मेंदू यामार्फत येणाऱ्या आज्ञा शरीराकडे पोहोचवतो आणि शरीराकडून मिळणारी माहिती मेंदूकडे आणि पर्यायाने मनाकडे पोहोचवण्याचे कार्य करत असतो. थोडक्यात संपूर्ण शरीराची आणि मन मेंदूची मध्यस्थी करण्याचं काम मज्जारज्जूकडे आहे.
आपल्या पूर्वजांनी देखील ही गोष्ट बरोबर ओळखली होती. म्हणूनच त्यांनी मज्जारज्जूतील मुख्य स्थाने म्हणजे चक्र यांना महत्व दिलं. योगशास्त्रातील चक्र ही कल्पित आहेत. ती प्रत्यक्ष दिसत नाहीत. योगशास्त्रातील चक्रे आणि शरीरशास्त्रातील प्लेक्सीस ही शरीरातील महत्वाची ठिकाणं, किंवा असे चौक आहेत की, तेथून माहितीचं, आज्ञांचं, शक्तीचं वहन सगळ्यात जास्त होत असतं. ह्या सगळ्या निरोपाची देवाण घेवाण चालते ती विद्युत शक्तीच्या माध्यमातून. इलेक्ट्रिकल इम्पल्स किंवा विद्युत प्रवाहांचं वहन हे पेशी, मज्जापेशी यांच्या माध्यमातून होतं. ह्या विद्युत शक्तीचं वहन चक्र किंवा प्लेक्सिसच्या ठिकाणी सगळ्यात जास्त असतं. त्या त्या चक्रांना किंवा प्लेक्सेसला शरीराचे ठराविक भाग किंवा ग्रंथी आणि त्याची कार्ये जोडलेली आहेत. त्या त्या चक्रांशी संबंधित शारीरिक मानसिक क्षमता ह्या मुख्यतः त्या चक्रांच्या अखत्यारीतला भाग असतो.
षडचक्र आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक स्थितीशी संबंध असतो.
१. मूलाधारचक्र :
संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : अॅडरेनल ग्रंथी, हालचाल ऊर्जा याचा स्त्रोत, पाय, पावले, अस्थी, मोठे आतडे, मज्जारज्जूचा खालचा भाग, रक्ताभिसरण संस्था
शारीरिक व्याधी : स्थूलता, भूक न लागणे मलावरोध, सायटिका, स्टॅमिना कमी होणे, अशक्तपणा, थंडीशी जुळवणूक करण्याची क्षमता कमी, शारीरिक हालचाली करण्यास त्रास, समन्वय व रक्ताभिसरण समस्या
मानसिक समस्या : भित्रेपणा, निरुत्साह, प्रेरणाहीन, लोभीपणा, अशक्तता, कर्मठपणा, वास्तवाचे भान व जुळवणूकीची क्षमता कमी व अकार्यक्षम
मानसिक क्षमता : जगण्याची उमेद, एखाद्या गोष्टी टिकून राहणे, शक्ती स्थिरता याचा मूळ स्त्रोत.
२. स्वाधिष्ठान चक्र :
संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : जनन ग्रंथी, गर्भाशय, जननेंद्रिय, किडणी, मूत्राशय, कंबर ओटीपोटाशी संबंधित अवयव, मोठे आतडे, प्रजननाशी संबंधित अवयव.
शारीरिक व्याधी : जनन व उत्सर्जन संस्था निगडित व्याधी
मानसिक समस्या : सृजनशीलता अभाव, निष्क्रियता, अति कामुकता, अपराध भावना, स्पर्श संबंधित सुख, विवेकशून्य सुख घेण्याची इच्छा, भावनिक आधार शोधणे ई.
मानसिक क्षमता : अति भावनाशीलता, संवेदनशीलता, सृजनशीलता.
३. मणिपुर चक्र :
संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : पेंक्रियाज, अॅडरेनल, पचन संस्था, यकृत, गॉल ब्लॅडर, शक्ती निर्मितीचे केंद्र, अन्न शक्तीचे रसशक्तीत रूपांतर करणारे केंद्र, शरीरातल्या संस्थांशी संबंध, चयापचय, पोट, छोटे आतडे, लिव्हर, पेंक्रियाज प्लिहा, प्रतिकारशक्ती, त्वचा, मज्जासंस्था, व्यवस्थित कार्यरत राहण्यास मदत.
शारीरिक व्याधी : पचन विकार, उच्च रक्तदाब, निरंतर थकवा
मानसिक समस्या : न्यूनगंड, निरुत्साह, भित्रेपणा, निष्क्रियता, संदिग्ध, शरणागती पत्करणारा, आत्म प्रतिष्ठेचा अभाव, बळी गेल्याची भावना, अधिकार नसल्याची भावना
मानसिक क्षमता : आशावाद, उत्स्फूर्तता, समंजसपणा, लवचिकपणा, आनंद, विनोदबुद्धी, हास्य, भावनांचे केंद्र, बल आणि सत्ता नियंत्रण भावना, बदल करण्यासाठीची प्रेरणा देणारे, स्वतःमध्ये तसेच आजूबाजूला बदल साधणारे केंद्र, प्रभुत्व गाजवणे, आक्रमकता, अधिकार गाजवणे.
४. अनाहत चक्र :
संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : थायमस, फुफ्फुसे, हृदय, रक्ताभिसरण संस्था, हात, सात चक्रांचे मध्यवर्ती चक्र, डायफ्राम, हात, तळवे, श्वसन वाढ व विकास
शारीरिक व्याधी : अस्थमा, हृदयविकार, फुफ्फुसाचे विकार
मानसिक समस्या : असंवेदनशील, अक्षमाशील, कोरडेपणा, अलिप्त राहणे, अंतर राखणे, प्रेमातिरेक
मानसिक क्षमता : समतोल, समानता, प्रेम, बदलाला स्वीकाराची क्षमता, बदलाला संलग्न होण्याची क्षमता, काळजी घेणे, इतरांशी संबंध प्रस्थापित करणे, जुळवणूकीची क्षमता, शिस्त, दैनंदिन कार्यामध्ये बांधीलपणा, स्थिरता आणि शिस्त आणणे, व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित सर्व बाजू, स्वतःचा मार्ग शोधण्याची व सांभाळण्याची क्षमता, शांती, सहनशक्ती, स्वप्नदृष्टी, इतरांच्या गरजा व स्वतःच्या गरजा कळणे, आपली दिशा माहीत असणे, आत्मविश्वास, क्षमाशीलता.
५. विशुद्ध चक्र :
संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : थायरॉईड ग्रंथी, पॅराथायरॉईड, घसा, कान, मुख, खांदे, मान, हात
शारीरिक व्याधी : अस्थमा, हृदयविकार, फुफ्फुसाचे विकार, घशाचे विकार, मानदुखी, खांदेदुखी, थायरॉईडच्या व्याधी, मानेचे विकार, कानाच्या समस्या, टॉन्सिल्स
मानसिक समस्या : सृजनशीलता व संवादाचा अभाव, आत्मकेंद्री, नैराश्य, लाजाळू, भिडस्त, समजून व ऐकून घेण्याचा अभाव, अति वाचाळता, अहंगंड, न सुचणे, प्रेरणेचा अभाव, संवाद प्रस्थापित करण्यात अडचणी, व्यक्तित्वात प्रकटीकरण करण्यास अडथळे, व्यक्तित्व दबून राहणे, व्यक्त होण्यास अडचण
मानसिक क्षमता : संवाद, आंतरिक ओळख टेलिपॅथी, वक्तृत्व, सृजनशीलता, आत्मप्रतिष्ठा, संवाद कौशल्य,
६. आज्ञा चक्र :
संलग्न ग्रंथी, अवयव, संस्था, क्रिया : पीनियल, नेत्र, भुवया, कवटीचा तळभाग
शारीरिक व्याधी : दृष्टी मंदावणे, डोकेदुखी, भयंकर स्वप्न पडणे, दृष्टी मध्ये बिघाड
मानसिक समस्या : निर्णयक्षम नियोजन क्षमतेचा व अंमलबजावणीचा अभाव, वैचारिक गोंधळ, नवकल्पना यांच्याबाबतीत अलवचिक, मनोराज्यात रमणे, अति ध्येयासक्त, विचारांवर मळभ येणे, व्यावहारिक निर्णय घेता न येणे, आंतरज्ञानाची किंवा सहजस्फूर्तीने होणारी संवेदना कमी होणे, भयानक स्वप्न पडणे
मानसिक क्षमता : बुद्धी, समज, विश्वास, समजून घेण्याची कुवत, वास्तवाचे विश्लेषणाची ताकद, अंतर्मुखता, नेतृत्व, नेत्र आणि मेंदूचे जाणीवपूर्वक चालणारे काम यावर प्रभाव असणे, ज्ञानेंद्रियांकडून आलेल्या संवेदनांचे माहितीत रूपांतर करणे, स्मृती आणि नियोजनाचे काम, स्थळकाळाचे भान विसरणे, अधिक उन्नत जाणीव, या चक्रात स्थिर स्वरूपाची शक्ती, आंतरस्फुरण, आंतर प्रेरणा, आंतरज्ञान, दूरदृष्टी आणि कल्पकता.
जेव्हा एखादी शारीरिक व्याधी किंवा मानसिक समस्येचा उद्भव होतो तेव्हा त्याचं मूळ मनात असतं किंवा त्या भावना, विकारांमध्ये असतं पण त्याचं प्रकटीकरण त्या त्या चक्रांशी संबंधित अवयवात किंवा भागात होतं. त्या चक्रात असमतोल निर्माण होतो. तो असमतोल सुधारला, तर ती शारीरिक किंवा मानसिक व्याधी कमी होऊ शकते किंवा संपुष्टात येते. त्यासाठी ह्या चक्रांच्या माध्यमातून शरीरातल्या त्या त्या अवयवांशी, कार्याशी, पेशी समूहाशी आणि पेशींशी संवाद साधायला हवा. तसेच तिथल्या शक्तीचं संतुलन करायला हवं.
न्युरो तंत्रज्ञानाचा वापर करून हे संतुलन साधायला सुलभ जाते. व्यक्तींच्या प्रकृती परीक्षणाद्वारे शारीरिक आणि मानसिक ‘आधी’ ‘आणि ‘व्याधी’ काय आहेत ते तपासलं जातं. कफ, पित्त, वात यापैकी कुठलं प्राबल्य आहे तसेच पंचवायू पैकी कुठला वायू दोष आहे हे तपासलं जातं. प्राण, अपान, समान, व्यान, उदान ह्या पंचवायूचा चक्रांशी सुद्धा संबंध आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रकृती परीक्षणावरून तसेच स्वभाव परीक्षणावरून कुठल्या चक्राशी संबंधित कमी जास्त पणा आहे हे कळतं. त्यानंतर प्रत्यक्ष ध्यानाची प्रक्रिया सांगितली जाते व शारीरिक मानसिक समतोल साधला जातो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य एका स्थिर पातळीवर येण्यासाठी न्यूरोतंत्रज्ञान उपयुक्त ठरते.
ध्यानाचा मेंदूशी संबंध आहे. आपल्या मेंदूतून सतत मेंदूलहरी बाहेर पडत असतात. इ.इ.जी मशीनवर त्या मोजता येतात. डेल्टा, थिटा, अल्फा, बीटा या मेंदूतून निघणाऱ्या प्राथमिक लहरी आहेत.
१. डेल्टा लहर : १ ते ४ आवर्तन प्रति सेकंद. गाढ झोपेच्या अवस्थेत मेंदूतून निघणारी लहर
२. थिटा लहर : ४ ते ८ आवर्तनं प्रति सेकंद. स्वप्नावस्थेत किंवा ध्यानाच्या अवस्थेत निर्माण होणारी लहर
३. अल्फा लहर : ८ ते १३ आवर्तनं प्रति सेकंद. जागृत, सुख दुःख, जागृत अवस्थेत निर्माण होणारी लहर
४. बीटा लहर : १३ ते ३० आवर्तन प्रति सेकंद संताप, भावनिक उद्विग्नता, चिंता ह्या भावनांमध्ये निर्माण होणारी लहर
ध्यानावस्थेत मेंदूतून निघणाऱ्या लहरींपैकी अल्फा-थिटा लहरीं विशिष्ट प्रमाणात निर्माण होत असतात. ह्या अल्फा-थिटा लहरींचा रेशो मोजला तर, सदर व्यक्ती ध्यानावस्थेत आहे किंवा नाही, तसेच किती प्रमाणात ध्यानावस्थेत आहे हे समजू शकत. बऱ्याच वेळा ध्यान करताना मन भटकत असतं. त्यावेळी अल्फा थिटा रेशो कमी असतो. ज्या वेळी व्यक्ती ध्यानावस्थेत समशांती अनुभवत असते तेव्हा मेंदूलहरीत बदल होतो. अल्फा थिटा रेशो वाढतो. त्यावरून ती व्यक्ती ध्यानावस्थेत आहे किंवा ताणमुक्त समशांत अवस्था अनुभवते आहे, असं समजू शकत.
हे सर्व मोजण्याची यंत्रणा माळवली येथील मनशक्ती केंद्रात उपलब्ध आहे. इ.इ.जी. चा बँड वापरून सहभागी व्यक्तीने ध्यान करायचे असते. ध्यान झाल्यावर ताबडतोब त्या व्यक्तीला प्रत्येक चक्रावर किती टक्के ध्यान झालं, तसंच एकूण किती टक्के ध्यान झाल हे समजतं. त्या व्यक्तीची षड्चक्रांपैकी कुठली चक्र जास्त प्रभावी आहेत, कुठली कमजोर आहेत ते कळतं. कमजोर चक्राच्या ध्यानाची टक्केवारी कमी असते व अशा चक्रावर ध्यान करताना व्यत्यय जास्त येतो आणि मन जास्त विचलित होते. त्या चक्राशी संबंधित साधना करणे, त्या चक्राशी संबंधीत असलेल्या भावना विकारांना संयमित करणे, त्यासाठी त्यागवताचा आधार घेणे अशा उपायांनी व्याधी आणि आधी कमी होतात. बऱ्या होतात.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : अँजीओप्लास्टी एक केस स्टडी
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : स्व अभ्यास
नमस्कार,
परवा एका जातकाचा फोन आला की माझी १५ जुलै, २०२३ ला अचानक अंजिओप्लास्टि झाली. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की, अचानक हे सर्व कसे काय घडले? हे योग जन्म कुंडलीत दिसत आहेत का?
त्याची जन्म कुंडली मांडून तपासले असता त्यात काहीसे तथ्य आढळून आले. ते निरीक्षण येथे देत आहे. जाणकारांनी त्यांची निरीक्षणे जरूर मांडावीत, त्यामुळे एक दिशा मिळेल…
सर्वात प्रथम मी अंजिओप्लास्टिची एक जुजबी व्याख्या तयार केली.
असा आजार ज्यात हृदयाकडे रक्त नेणाऱ्या अर्टीलरी अरुंद होतात व पुरवठ्यावर परिणाम होतो, रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे शस्त्र क्रिया द्वारे रुंद करून एक जाळी असलेली नळी (स्टेंट) बसवला जातो.
नंतर या व्याख्येची माझ्या ज्योतिष अभ्यासानुसार मीमांसा केली.
१. हृदय साठी ४ थे स्थान विचारात घ्यावे लागेल.
२. मंगळ लाल रंग, रक्त, शस्त्र याचा कारक ग्रह याचा ४ थे स्थानाशी संबंध
३. शनि आर्टिलरी आकुंचन पावण्याचा कारक ग्रह याचा ४ थे स्थानाशी संबंध
४. या सर्वांचा त्रिक स्थाने (६, ८, १२ शी संबंध)
५. या सर्वांचा मारक स्थाने (२, ७) शी संबंध
६. या सर्व कारक ग्रह संबंधित दशा अंतर्दशा
जन्मकुंडलीचे निरीक्षण केले असता खालील गोष्टी समोर आल्या-
१. वृश्चिक लग्नाची कुंडली त्यामुळे ६ वे स्थानी मंगळाची मेष राशी
२. ३ रे व ४ थे स्थानी शनि ची मकर व कुंभ राशी
३. ४ थे स्थानी ७ व १२ व्या स्थानाचा स्वामी शुक्र गुरूच्या नक्षत्री स्थित
४. ४ थे स्थानी २ व ५ व्या स्थानाचा स्वामी गुरू राहूच्या नक्षत्री स्थित
५. ८ वे स्थानी षष्ठेश मंगळ व तृतीयेश व चतुर्थेश शनि मिथुन राशीत युतीमध्ये
६. अष्टमेश बुध षष्ठात मंगळाच्या मेष राशीत केतूच्या नक्षत्री
व या काळी या सर्व गोष्टींचे कारक ग्रह बुध महादशा शनि अंतर्दशा गुरु प्रत्यंतर व शनि सूक्ष्म दशा चालू होती.
व मंगळाचे मृग नक्षत्र होते.
तर आपण ही आपली निरीक्षणे मांडलीत तर, सर्वांना उपयुक्त ठरतील.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : पीडा निवारण्यासाठी शांती
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : प्रेडिक्टिव स्टेलर ॲस्ट्रोलॉजी
नमस्कार,
ज्योतिष शास्त्र हे प्रकृतिच्या नियमाची व्याख्या व मीमांसा करणारे पुरातन शास्त्र आहे. त्याचे जोडीस हे शास्त्र विज्ञानातील न्यूटनच्या गती तेथे प्रतीगती या तिस-या नियमाचे देखील समर्थन करते. प्रत्येक कार्यास त्याची प्रतिक्रिया ही होत असते. हे मात्र नक्की की कोणतेही कार्य बेकार नष्ट होत नाही. त्या मुळे ज्योतिष शास्त्र एक विश्वसनीय शास्त्र आहे. त्यामुळे ज्योतिषी द्वारा केलेली गेलेली कुंडलीची योग्य मीमांसा नेहमी उपयुक्त ठरत असते. पण हे मात्र तितकेच खरे कि प्रत्येक पापाचे प्रायश्चित द्शांती हे असू शकत नाही. पण लोकांचा या गोष्टीवर ठाम विश्वास असतो आणि आम्ही ज्योतिष मंडळी पण हा त्यांना ठाम विश्वास देतो की, की शांती केली कि सर्व संकटे दूर होतात.
मग असे आहे तर, आमच्या प्राचीन ऋषि मुनींनी शांती का करावयास सांगितली आहे?
जर प्रत्येक कार्याची प्रतिक्रिया होत असते, तर शांती देतील पापाचा नाश केल्या शिवाय कशी राहील?
हिन्दू ईश्वराची व ग्रहांची पूजा, हवन ई. करवितात. मोफत दवाखाने, धर्मशाळा, अन्न छत्र ई. निर्माण करवितात. गरीब व अनाथ लोकांना जेवण देतात व अडचणीत असलेल्याची मदद करतात. पण हे हे तितकेच खरे आहे की, हे सर्व कार्य करणाऱ्या सर्वांच्याच पीड़ा कमी करू शकत नाही. अन्य देशामध्ये होम-हवन प्रचलित नाही, तरी देखिल तेथेसुद्धा गोर गरीबाना सहायता देत असतात. मानवता वादी दृष्टीकोनातून केलेले हे सत्कर्म विदेशी लोकांना विश्वास असो वा नसो ते ह्या अश्या त्यागपूर्ण कार्याने त्याचे पाप दूर होण्यास मदत होणार नाही काय ?
ज्योतिष शास्त्र हे सांगते की भाग्यास बदलले जाऊ शकत नाही, पण भाग्याचा नीट व स्पष्ट अर्थ फक्त एक जाणकार, अभ्यासू ज्योतिषीच समजू शकतो. जे कर्म पूर्वजन्मी केले गेलेले आहे त्या सर्व कर्माचे फळ भाग्य मध्ये लिखित असते, कोणाचे भाग्य त्याला शांती करण्याकडे घेऊन जाऊ शकते, ज्यामुळे पुढे होणान्या पापास दूर करून, त्यास संरक्षण मिळू शकेल. काही निश्चित मर्यादे मध्ये शांती करण्या करता नाही म्हणता येते. भाग्य काही परिवर्तनाचे असे काही परिणाम दर्शवते, की ते फक्त अनुभव करण्यालायक असतात व तेव्हा त्या घटनांना आपली तर्कबुद्धी लागू पडत नाही. लोकांना आपल्या पूर्वकर्माधीन रहावे लागते व हेच भाग्य होय.
अश्या प्रकारे जातकांचे विभाजन चार समूहात केले जाते.
१. जातक जे शांति करतात व इच्छित फळ प्राप्त करतात. हे शांतीचे फायदे सांगतात.
२. जातक जे शांति करतात, तरी पण दु:खी राहता व कितीही शांती करेली, तरी आम्हास फळ काही मिळाल्रे नाही, हे सांगतात.
३. जातक जे शांति करत नाही व त्या मध्ये विश्वास ही करत नाहीत. तरी प्रसन्नता पूर्वक राहतात व धनवान असतात. नेहमी सफलता मिळत राहते.
४. जातक जे शांति करीत नाही व तरीहि दुःखी राहतात.
बिकट परिस्थितीमध्ये कोणी जातक अडकला असेल, तर तो सामान्यपणे संकटमुक्त होण्यासाठी शांती करतो. खरे तर सर्व परिणाम पूर्व जन्मातील कर्मानुसार होतात. व हे परिणाम जन्मकुंडली द्वारे माहित केले जाऊ शकतात. जाणकार ज्योतिषास पूर्वजन्माची वास्तविकता ओळखणे संभाव आहे. नदी ग्रंथामध्ये मध्ये पूर्व जन्मानुसार शाति करण्याचा सल्ला दिला जातो.
स्थूलमानाने कर्माचे तीन भाग पडतात.
१. धृत कर्म
२. धृत-अधृत कर्म
३. अधृत कर्म
धृत कर्म म्हणजे कोणतेही पूर्व जन्माचे मोठे पाप किंवा मोठी चूक जिचे गंभीर परिणाम कितीही शांती केली नाही केली, सत्कर्म केर्ले तरी या जन्मात वाईट फळ नष्ट करू शकत नाही.
उदा. हत्या, आई वडिलांची उपेक्षा, भावंडांना धोका देणे, लहान श्रमिकांना गंडा घालणे, मालकाचा सेवकांवर अत्याचार, बेईमानी इत्यादि.
धृत-अधृत कर्म म्हणजे पूर्व जन्माचे पाप किंवा चूक जिचे परिणाम शांती अथवा सत्कर्माने सौम्य करता येतात, तरी कोणतेही पूर्वकर्म त्याचा परिणाम सौम्य का होईना दिल्याशिवाय समाप्त होऊ शकत नाही. किंवा असे पाप केले जे क्षमा करणे योग्य आहे, त्यांना दया दाखवली जाऊ शकते व जर त्याने शांती अथवा सत्कर्म केले, तर त्याची पीडा निवारण होऊ शकते.
उदा. दोघांनी रु.५००००/- उधार घेतले एकाने ते परत न करता फसवणूक केली व दुसर्याने रु.४५०००/- फेडले, पण बाकीचे इच्छा असूनही फेडू शकला नाही. म्हणून फसवणार्याचे भाग्यात त्याचे दंड भोगणे लिहिले जाते व त्याने कितीही शांती, सत्कर्म केले, तरी त्याची पीडा कधीही संपत नाही. ती अटळ असते. पण दुसर्याचे भाग्यात त्याचे भोग सौम्य असतात व शांती व सत्कर्मा द्वारे त्याचे दुर्भाग्य संपून तो भाग्यवंत होऊ शकतो.
परमात्मा फार दयाळू आहे, पण तो त्याच्या न्यायाबद्दल फार जागरुक पण आहे व तो प्रत्येकाच्या पूर्व कर्माबाबत पूर्ण सजग आहे. प्रकृतीच्या नियमानुसार प्रत्येकास भोग हे भोगावेच लागतात. कोण शांती करेल व फलप्राप्ती करेल हे त्या नियमांनुसार भाग्यात लिहिलेले असते.
ज्या जातकांनी पूर्वजन्मी धृत कर्म केले आहेत, त्यांच्या जन्म कुंडली मध्ये दशा स्वामी, अंतर्दशा स्वामी, लग्न व चंद्र व ९ वे स्थानाचा स्वामी हे सर्व गुरूच्या शुभ दृष्टिमध्ये नसतात. कारण हे सर्व जातकाच्या पूर्व कर्माबद्दल सांगतात.
ज्या जातकांनी पूर्वजन्मी धृत-अधृत कर्म केले आहेत, त्यांच्या जन्म कुंडली मध्ये दशा स्वामी, अंतर्दशा स्वामी, लग्न व चंद्र व ९ वे स्थानाचा स्वामी हे सर्व गुरूच्या शुभ दृष्टिमध्ये असतात व अशा स्थितीमध्ये जातकाचे शांती, सत्कर्म द्वारा पीडा निवारण होऊन भाग्यस्वरूप बदलू शकते.
अधृत कर्म म्हणजे पूर्व जन्माचे पाप किंवा चूक जिचे परिणाम शुल्लक असतो. त्याचे मनात वाईट कर्माची इच्छा वा वासना निर्माण खालेली असते, पण प्रत्यक्षात कृती करत नाही.
उदा. एखादा वाटसरू थकून सावली साठी एका बहरलेल्या आंब्याच्या झाडाखाली उभा राहतो. त्याची नजर त्या झाडाच्या रसरशीत आंब्यांवर पडते व तो चोरून खाण्याची वासना निर्माण होते. पण त्या झाडाचा मालक आपण घेतलेल्या कष्टाची रखवाली करीत असतो. व त्याचा आवाज ऐकून तो वाटसरू आंबा चोरून न खाता आपल्या वाटेने निघून जातो.
ज्या जातकांनी पूर्वजन्मी अधृत कर्म केले आहेत, त्यांच्या जन्म कुंडली मध्ये गुरु अथवा ९ वे स्थानाचा अधिपती लग्नी किंवा चंद्र, दशा स्वामी, अंतर्दशा स्वामी बरोबर असतो. हे जातक नेहमी आनंददायी राहतात, मग ते पुण्य, शांती, सत्कर्म करो अथवा न करो.
यालाच आपण म्हणतो कि सर्व विधिलिखित आहे. आणि जाणकार ज्योतिषी हे सर्व व जन्मकुंडलीतील इतर ग्रहस्थिती व घटक तपासून योग्य तो उपाय अथवा शांती सुचवत असतो, ज्याद्वारे जातकास त्याचा लाभ होऊन त्याचे आयुष्य सुखकर होईल.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विषय : मूळब्रह्म, मनश्चक्र, शरीरातील तत्त्व व त्रिविध ताप
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : ॐ हा गुरु
ॐकार हे सर्व विश्व व्यापून आहे. ॐ हेच एक अक्षर ब्रह्म आहे. हा शब्द आपल्याला आत्मस्वरूपाची जाणीव करून देतो. या शब्द ब्रह्माचे अनेक संत विभूतींनी मुक्त कंठाने वर्णन केले आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘शब्द हा बहु-उपकाराचा रासी’.
भगवद्गीतेतही ‘शब्द हे परब्रह्म’ असे म्हटले आहे.
संत एकनाथ म्हणतात ‘शब्द हाचि थोर जगताचा आधार’
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ‘पै ब्रह्मवीजा जाहला अंकुरू । घोष, ध्वनी, नादाकारू। तयाचे भुवन गा जो ॐकारू । तोही मी गा।’
आता हे शब्दब्रह्म ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत कसे आले ते पहा. मूळ ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान नाही. जाणीवेच्या पातळीवर सर्व शून्य आहे. म्हणूनच शून्यास ब्रह्म व पूज्य अशी नवे आहेत. आकाश, प्रकाश, प्रेम हेच मूळ ब्रह्म. या आकाशात शब्द आहे, पण तो प्रकट नाही. जेव्हा तो प्रकट होतो तेव्हा घोष, ध्वनी, नाद होतो व आनंदलहरी निर्माण होतात. ज्यावेळी आनंदाची हालचाल होते, त्यावेळी त्यातून वायू निर्माण होतो, त्यातूनच अहंकार निर्माण होतो व तेच ब्रह्म मायारूपाने जीव बनून गुणांत येते. गुणांतून तत्त्वात येते व तत्त्वातून शब्दात येते. तेच ब्रह्म अष्टदिशांना बाहेर, तेच शरीरात अष्टवृत्ती, परमार्थात अष्टसिद्धी व शरीरातील मनशक्रात, अष्टदशकमळ कसे चालविते ते दिव्य पहा –
१. निर्गुण ब्रह्म : आकाश, प्रकाश, प्रेम ही अजःन शक्ती आहे. याला ज्ञान अज्ञान नाही.
२. जीवब्रह्म : घोष, ध्वनी, नाद यातूनच आनंद व नंतर जीवरूप आकारास येते.
३. मायाब्रह्म : जीवरूपातून अहंकार निर्माण झाला व तो वायुरूपात मिळून मायारूप झाला.
४. गुणब्रह्म : मायारूपाने अहंकार घेतल्याने तीन गुणांत विश्वनिर्मितीची इच्छा झाली.
५. तत्त्वब्रह्म : विश्वनिर्मितीची इच्छा झाल्याने गुणब्रह्मानेच पंचतत्त्वे निर्माण केली.
६. शब्दब्रह्म : या पंचतत्त्वातून जे आकार निर्माण झाले त्यांच्या व्यवहारासाठी हेच शब्दरूपाने नटले.
७. अन्न हे पूर्णब्रह्म : या सर्व अकारी जीवांना जगविण्याकरिता तेच अन्नब्रह्मरूपाने नटले.
८. नादब्रह्म : जगताकार जीव, त्यात नादब्रह्म हीच त्या ब्रह्माची संपत्ती आहे.
सर्व एकातच आहे, तो व मी एकच आहोत. हेच ज्ञान झाले म्हणजे आत्मज्ञान होते. ‘सोऽहं’ या दोघांचा उच्चार करताना मध्ये जो ‘अ’ आहे तोच आत्मा आहे. श्वास घेताना व सोडताना ‘सोऽहं’ असा ध्वनी होतो. म्हणून ‘अहं ब्रह्मास्मि’, ‘अयं ‘आत्मा’ असे म्हटले आहे. ‘अ’ म्हणजे अंतरीचा आत्माराम! हेच गुह्य, हेच आत्मज्ञान व हेच आपले स्वरूप! हे अनुभवाचे बोल आहेत.
संत कबीर म्हणतात, ‘हौ नाही के बीचमें साहेब समा रहा हैं।’
तसेच संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘मी तू हा भेद विवेके शोधणे। गोविंदा माधवा याच देही ।”
जोपर्यंत जीवन हे बाह्याधारी असते तोपर्यंत देव भेटणार नाही. याला उदाहरण द्यायचे म्हणजे द्रौपदीचे वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदी जोपर्यंत स्वतः बचावाचा प्रयत्न करीत होती तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण गप्प बसले. कारण ती स्वतःचा आधार घेत होती. मात्र शेवटी जेव्हा ती पूर्णपणे निराधार झाली व देवाचा धावा आक्रोशाने करू लागली तेव्हाच देवाने वस्त्रे पुरविली व तिची लाज राखली, म्हणून सर्व काही त्याच्यावर सोपवा.
काम ही मनाची वृत्ती आहे. पण प्रेम ही मनोवृत्ती नाही. प्रेम जीवाचा स्वधर्म- स्वभाव आहे. कोणत्याही वस्तूची अपेक्षा न करता तो आनंद भोगत आहे. प्रेम हे ब्रह्म आहे. आत्म्याच्या ओळखीसाठी हा शब्द आहे. तेच ब्रह्म स्फूरण पावले व नंतर मानसिक ‘आनंदस्वरूप जीव पण तो झाला, तोच या देहात रमला. नंतर जेव्हा त्याला वाटले की आपण या विश्वात अन्य वस्तूंमध्ये आनंद भोगावयास जाऊ. तेव्हा तो आशेने, – मनाच्या द्वारे व इंद्रियांच्या आधारे आनंद लुटण्यामागे सैरावैरा पळत सुटतो; पण क्षणांत आनंद तर क्षणांत दुःख असा अनुभव त्याला येतो. शेवटी त्याला ज्ञान होते की बाहेर भोगात सुख नाही तर त्यागात सुख आहे. बाहेर नाही तर आत आत्मज्ञान आहे व अशा आत्मज्ञानाच्या अनुभवात नित्य आनंद आहे. यास्तव यालाच नित्य ‘सत्यब्रह्म’ म्हणतात. हेच सत्य व जगत् मिथ्या ! म्हणूनच सर्व जीवांवर प्रेम करण्यास शिकले पाहिजे. सर्व जीवांमध्ये तो प्रेमप्रभू सर्वत्र समान आहे हा अनुभव येईल. तो केव्हा तर जेव्हा आपण शुद्ध प्रेमभावाने वागू तेव्हा. म्हणून वाचेने गोड बोला. समदृष्टीने पहा, अंतरी दयाभाव ठेवा. समोर दिसणारे प्रत्येक रूप ‘तोच प्रभू’ या रूपाने नटलेला आहे हे ओळखून वागा. हाच तो शुद्ध प्रेमभाव.
‘जेये ज्याचा भाव लक्षिला । तेथे त्यासि देव भेटला ।’ आता सांगा, ‘तेथे काय उणे आम्हासी ?”
जोपर्यंत अंतःकरण मीलन आहे म्हणजे जो पर्यंत पापवासनायुक्त, विक्षेपसहित व चंचल असते तोपर्यंत आत्मज्ञान होणार नाही.
आता मनःश्चक्राबद्दल काही माहित करून घेऊ.
मनश्चक्र
मनुष्याच्या उजव्या बाजूला स्तन व कंठ यांच्या मधोमध जे हृदय आहे त्याच्या मागे म्हणजे पाठीच्या बाजूला मनश्चक्र आहे. त्याला आठ पाकळ्या आहेत त्याच त्या अष्टवृत्ती व तेच विचार. जागृत अवस्थेत आपले मन याच पाकळ्यांतून भ्रमण करते व पाकळीनुसार वृत्ती उद्भवते.
१) पूर्वपाकळी : रंग पांढरा
येथे मनाने प्रवेश केला असता धैर्य, औदार्य, धर्मबुद्धी, येईल तो लाभ अशा वृत्ती उठतात.
२) आग्नेय पाकळी : रंग रक्त
येथे मनाने प्रवेश केला असता उद्वेग, आळस, निद्रा या वृत्ती उठतात.
३) दक्षिण पाकळी : रंग काळा
येथे मनाने प्रवेश केला असता द्वेष, क्रोध, दुष्टबुद्धी उद्भवते
४) नैऋत्य पाकळी : रंग निळा
येथे संसारासक्ती व स्त्री-पुत्रादिकांविषयी अत्यंत प्रेम या वृत्ती उठतात.
५) पश्चिम पाकळी : रंग धूम्रवर्ण
अज्ञानानंद, हास्य, विनोद व सुखमयता या वृत्ती उठतात.
६) वायव्य पाकळी : रंग श्याम
तीर्थयात्रा, सत्संग या वृत्ती उठतात.
७) उत्तर पाकळी : रंग पिवळा
अष्टभोगांबद्दल प्रिती निर्माण होते.
८) इशान्य पाकळी : रंग गौर
येथे मनाने प्रवेश केला असता कृपा, क्षमा, शांती ज्ञान, किर्तन श्रवण या वृत्ती उठतात.
शरीरातील तत्त्व विभागणी व दैवत
शरीराचा प्रत्येक भाग तत्वांच्या अधिकाराखाली असतो. व प्रत्य्रेक तत्वासाठी एक इष्ट देवता असते.
१. भूमितत्त्व : पायापासून गुडघ्यापर्यंत, दैवत : चतुर्भुज ब्रह्मा
२. जलतत्त्व : गुडघ्यापासून नाभीपर्यंत, दैवत : पीतांबरधारी नारायण
३. अग्नितत्त्व : नाभीपासून हृदयापर्यंत, दैवत : त्रिलोचन महारुद्र
४. वायुतत्त्व : हृदयापासून भ्रुकुटीपर्यंत, दैवत : सर्वशक्तीमान ईश्वर
५. आकाशतत्त्व : भ्रुकुटीपासून शेंडीपर्यंत, दैवत : गौरवर्ण महादेव
त्रिविध ताप
त्रिविध ताप ही एक महान शक्ती आहे. त्यातून कोणीही सुटत नसतो. ती शक्ती केव्हा आक्रमण करेल हे कोणालाही सांगता येत नाही. याच शक्ती मध्ये आपण सर्व गुरफटलो आहोत.
संत रामदास म्हणतात, ‘त्रिविध तापे बहु तापलो मी रामराया ।’
आधिभैतिक, आध्यात्मिक व आधिदैविक असे तापांचे तीन प्रकार आहेत.
आधिभैतिक तापाचा संबंध नेत्रांशी आहे. म्हणजेच अग्नितत्त्वाशी आहे. या लोकांना भयानक दृश्य पाहिले असता परिणाम होऊन मृत्यू भय राहते.
आध्यात्मिक तापाचा संबंध वाचेशी आहे. म्हणजे भूमितत्त्व व जलतत्त्व यांच्याशी आहे. या तत्त्वाच्या लोकांना कटू शब्दामुळे परिणाम होऊन दुःख होते व मृत्यू भय राहते.
आधिदैविक तापाचा संबंध कानाशी आहे. म्हणजेच वायूतत्त्वाशी आहे. या लोकांना अचानक वार्ता ऐकून धक्का बसतो व मृत्यू भय राहते.
या तापांपासून मुक्त होण्यासाठी खालीलप्रमाणे साधना कराव्यात.
आधिभौतिक तापाचा संबंध अग्नितत्त्वाशी म्हणजे मेष, सिंह, धनु या राशींशी आहे. या राशींच्या लोकांनी डोळे मिटून हृदयामध्ये ‘राम’ आठवावा.
आधिदैविक तापाचा संबंध वायुतत्त्वाशी म्हणजेच मिथुन, तुळ व कुंभ या राशीशी येतो. या राशींच्या माणसांनी या तापापासून मुक्त होण्यासाठी नासाग्री दृष्टी ठेवून अंतर्मुख होऊन समचरण आठवावे किंवा ‘ळ’ हे अक्षर हृदायात आठवावे.
आध्यात्मिक तापाचा संबंध भूमितत्त्वाशी म्हणजे वृषभ, कन्या व मकर व जलतत्त्वाच्या राशी म्हणजे मीन, वृश्चिक व कर्क अशा सहा राशींशी येतो. या सहा राशींच्या लोकांनी याचेमध्ये ‘हरि ॐ’ म्हणावे.
ॐॐॐ
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)