Category: Uncategorized

अंश सूत्र


विषय : अंश सूत्र

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : प्रश्न मार्ग

नमस्कार,

आज आपण एका प्रश्न कुंडली मांडल्यावर झटपट अंदाज देणाऱ्या एका अंश सूत्राची माहिती घेणार आहोत.

केरळीय प्रश्न ज्योतिष पद्धतीत अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास केला गेला आहे. प्रश्न मार्ग या पुस्तकात केरळीय प्रश्नज्योतिषा वरील ग्रंथाचे संक्षिप्त भाषांतर व टीका मराठीत दिलेली आहे. या त्रिस्फुट पासून सूत्र पंचक पर्यंत व अनेक प्रश्नाचा खूप सुंदर उहापोह केला आहे. मुळातूनच हे पुस्तक वाचण्यासारखे आहे व संग्राह्य आहे. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष मा.श्री अनिल चांदवडकर गुरुजींचे आभार, ज्यांनी हे पुस्तक भेट म्हणून दिले.

सहाव्या अध्यायात सूत्रपंचकाची मांडणी करताना पाच सूत्र व त्यांची पंचमहाभूत तत्त्वांशी जोडणी केली आहे. त्यातील अंश सूत्राचा व्यवहारात अनुभव अधिक येतो. याचे नैसर्गिक कारण असे की जो घटक जास्त वेगवान असतो व लवकरात लवकर बदलतो, तो घटक ज्योतिषात सूक्ष्म निर्णयात अधिकतर निर्णायक होतो.

उदा. एका राशीत शनी अडीच वर्ष असतो. त्यापेक्षा गुरूचा १२ ते १३ महिन्यांचा एका राशीतील काळ जास्त स्पष्ट फरक दाखवू शकेल. तर त्याहीपेक्षा महिनाभर रवीचा काळ महिन्यातील बारीक सारीक घटनांचा जास्त खुलासा करेल. याच न्यायाने चंद्र एक दोन दिवसातील घटना सांगू शकेल, तर लग्नभाव दोन तासातील घटनांमधील फरक सांगेल व साहजिकच नवांश १० – १५ मिनिटांतील घटनांचाही परिणाम दाखवेल. तेव्हा नवांशाचे फल केव्हाही अधिक सूक्ष्म असेल.

ह्याच्या पलीकडे सूक्ष्म भेद कृष्णमूर्ती पद्धतीत उप नक्षत्र रूपाने दाखविला आहे, तर नाडी ग्रंथात १२ कलांपर्यंतचा भाग जो लग्न भावात ४० सेकंदात बदलेल इतके सूक्ष्म विवेचन आहे.

अत्यंत झटपट निर्णय घेण्यास अंशसूत्राचा फार चांगला उपयोग होतो. या पद्धतीत जीव, रोग व मृत्यू हे शब्द सांकेतिक स्वरूपात वापरले आहेत. आहे.

जीव म्हणजे जीवकारक. याचा अर्थ फक्त आयुष्य न घेता, शक्ती, बळ धन ई. यात वृद्धी व व्यावहारिक उपयोग असा घेतला जातो.

रोग म्हणजे रोगकारक. याचा अर्थ फक्त आयुष्य न घेता, आजारपणा बरोबरच अडथळे, संघर्ष, पीडा, मनोबल कमी असणे ई. असा घेतला पाहिजे.

मृत्यू म्हणजे मृत्युकारक. याचा अर्थ फक्त मृत्यू असा न घेता, धननाश, पीडा, भय व कार्यनाश ई. अत्यंत नुकसानदायी अशा रीतीने घेतला पाहिजे. कंठभरणातील त्रिसूत्रीचा येथे उपयोग केला आहे.

१) या साठी सुरुवातीस स्पष्ट लग्नाची प्रश्न कुंडली मांडण्याची आवश्यकता आहे.

सध्या लग्र साधनसाठी पुस्तके व पंचांग उपलब्ध असल्याने सोफट वेअर उपलब्ध असल्याने सोयीचे झाले आहे.

२) कृष्णमूर्ती अयनांश वापरणे जास्त सयुक्तिक ठरेल.

३) प्रश्न कुंडली चर लग्नाची असल्यास, लग्न नवांश चर आल्यास तो जीवकारक असेल.

४) प्रश्न कुंडली चर लग्नाची असल्यास, लग्न नवांश स्थिर आल्यास तो रोगकारक असेल.

५) प्रश्न कुंडली चर लग्नाची असल्यास, लग्न नवांश द्विस्वभाव आल्यास तो मृत्युकारक असेल.

६) प्रश्न कुंडली स्थिर लग्नाची असल्यास, लग्न नवांश द्विस्वभाव आल्यास तो जीवकारक असेल.

७) प्रश्न कुंडली स्थिर लग्नाची असल्यास, लग्न नवांश चर आल्यास तो रोगकारक असेल.

८) प्रश्न कुंडली स्थिर लग्नाची असल्यास, लग्न नवांश स्थिर आल्यास तो मृत्युकारक असेल.

९) प्रश्न कुंडली द्विस्वभाव लग्नाची असल्यास, लग्न नवांश स्थिर आल्यास तो जीवकारक असेल.

१०) प्रश्न कुंडली द्विस्वभाव लग्नाची असल्यास, लग्न नवांश द्विस्वभाव आल्यास तो रोगकारक असेल.

११) प्रश्न कुंडली द्विस्वभाव लग्नाची असल्यास, लग्न नवांश चर आल्यास तो मृत्यूकारक असेल.

एकदा कशा प्रकारचे फळ मिळू शकते याचा अशा रीतीने अंदाज आल्यावर प्रश्न कुंडलीतील ग्रहस्थिती, नवांश राशी व लग्न राशी यांचे तील इष्ट अनिष्ट संबंध, स्वभाव, तत्वे, गुणधर्म, ई घटकांचा वापर करून कालनिर्णय व स्वरूप जातकास सांगू शकतो. 

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

जुळ्या मुलांची कुंडली


विषय : जुळ्या मुलांची कुंडली

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्व अभ्यास

नमस्कार,

आज जुळ्या मुलांच्या कुंडल्यांबाबत थोडे लिहावेसे वाटले.

जुळ्या मुलांच्या कुंडल्या सोडवताना नवीन अभ्यासकास प्रश्न पडतो, की दोघांच्या व्यक्तिमत्त्वातील भिन्नता शोधायची कशी? तर यासाठी येथे काही टिप्स देत आहे.

१. ग्रहांची स्थिती

व्यावहारिकदृष्ट्या, त्या दोन पाच मिनिटांमध्ये ग्रहांची स्थिती बदलण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ग्रहांची स्थिती सारखीच राहील आणि जन्मपत्रिकेत फरक होणार नाही.

२. लग्न भाव

साधारण दोन तासांतून एकदा लग्न भाव बदलतो. उदाहरणार्थ, ज्या वेळेस लग्नभाव बदल १८.०६ वाजता होणार असतो, आणि जुळ्यांपैकी एकाचा जन्म १८.०३ वाजता होतो आणि दुसरा १८.०८ वाजता जन्मतो, तेव्हा दोन्ही कुंडलींचा लग्नभाव भिन्न असेल आणि अशा प्रकारे दोन्ही जुळी मुलांच्या कुंडलीत भिन्न फळे प्राप्त होतील.

३. लग्न नवमांश :

लग्न नवमांश तपासून पहा. नवमांश वेगळा आला, तरी त्यानुसार तुम्हाला दोन्ही मुलांचे स्वाभव भिन्नत्व तपासता येईल. पण जन्म वेळेत अंतर फारच थोडे असेल, तर नवमांश कुंडली देखील सारखीच येण्याची शक्यता असते.  

३. षश्ठ्यमांश :

पारंपारिक ज्योतिष शास्त्रात जर लग्न भाव किंवा ग्रहांच्या स्थितीमुळे कोणताही बदल होत नसेल, तर षश्ठ्यमांश हा विभागीय वर्ग तपासतो.  तक्ता जीवनाचा मूळ उद्देश दर्शवतो असे मानले जाते. हे लोकांचे कर्म प्रतिबिंबित करते आणि त्यांना ते कसे पूर्ण करावे लागेल. याचा लग्न भाव चार्ट दर २ मिनिटांनी बदलतो आणि जन्माला आलेल्या बहुतेक जुळ्या मुलांसाठी हे वेगळे असेल अशी अपेक्षा आहे. जुळ्या मुलांचे जीवन वेगळे करण्यासाठी हा तक्ता सर्वोत्तम साधन आहे.

विभागीय तक्ते जुळ्या मुलांच्या जीवनाचा अंदाज लावण्यात महत्त्वाची भूमिका कशी बजावतात हे उघड आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि ते त्यांच्या समान/अज्ञात जुळ्यांपेक्षा वेगळे कसे असेल हे जाणून घेण्यास मदत करते. जुळ्या मुलांचे भविष्य वर्तवताना, केवळ जन्मजात तक्त्याचा विचार करणे योग्य नाही कारण अंदाज अचूक करण्यासाठी अनेक विभागीय तक्ते आहेत.

४. कृष्णमुर्ती पद्धत :

या पद्धतीचा उगमच मुळात जुळ्या मुलांच्या भविष्यकथन बाबत विचार करण्यात आहे. या पद्धतीत नक्षत्राचे विमशोत्तरी दशेच्या प्रमाणात केलेले उपविभाग (उपनक्षत्र) व उप उप विभाग (उप उप नक्षत्र) विचारात घेतात व त्यातील भिन्न्तेनुसार भविष्य कथन करतात. ही पद्धत देखील अचूक मार्गदर्शन करते.

५. तृतीय भाव : मध्यंतरी माझी व बडोद्याचे ज्योतिषी श्री. हेमंत उपासनी यांचे बरोबर अशीच जुळ्या मुलांच्या बाबतीत चर्चा झाली होती, तेव्हा हा मुद्दा मांडला होता, की, ३ रे स्थान धाकटे भावंड दर्शवते. मग काही मिनिटे नंतर जन्मणारा भाऊ हा धाकटा भाऊ ठरत असल्याने ३ रे स्थान लग्न भाव मानून कुंडल्या मांडल्या, दोन्ही कुंडली मध्ये रास, नक्षत्र ई. सारखेच आले, तरी स्थान भिन्नत्व झाल्याने तर दोघांचे चित्र व इतर गोष्टी स्पष्ट करता येतील.

आणि कर्म धर्म संयोगाने १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेचे वार्षिक संमेलन व पदवीदान समारंभ बोरीवली येथे झाला, तेव्हा महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष मा. श्री.अनिल चंदवडकर गुरुजींनी अगदी याच पद्धतीने दोन जुळ्या मुलांचे भविष्यकथन तृतीय स्थानाचा वापर करून सांगितले आणि ते खरे ठरले, हा त्यांचा अनुभव कथन केला.

तर अशा विविध पद्धतीने अधिकाधिक अभ्यास करून सरावाने सुलभ रीतीने भविष्यकथन करता येईल. यात तुमची योग्य दिशेने वापरलेली तर्क पद्धती अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यास नक्कीच सहाय्यभूत ठरते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेचे (मुंबई) वार्षिक स्नेहसंमेलन (द्वितीय) व पदवीदान समारंभ


अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेचे (मुंबई) वार्षिक स्नेहसंमेलन (द्वितीय) व पदवीदान समारंभ

रविवार दि.१८ फेब्रुवारी २०२४ रोजी राधा कृष्ण बँक़्विट, बोरीवली येथे आयोजित करण्यात आला होता.

उत्कृष्ट नियोजन आणि त्या नुसार सर्व व्यवस्था असल्यामुळे एक अतिशय उत्कृष्ट, संस्मरणीय कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री.अनिल चांदवडकर गुरुजी यांनी भूषविले. तसेच ज्योतिष मान्यवर श्री. विजयानंद पाटील, डेस्टिनी व्यवस्थापन चे श्री. योगेश्वर गौडा, डॉ.भारती खटावकर, हर्षल पुस्तकाचे लेखक श्री. अजिंक्य नलोले, ज्येष्ठ ज्योतिषी अनंत आठल्ये, ज्योतीशाचार्या सरिता गंभीर ताई, प्रसिद्ध वास्तू तज्ञ धनंजय चौगुले, प्रसिद्ध अष्टक वर्ग तज्ञ श्री.हेमंत उपासनी, व्यवहार ज्योतिष कुशल श्री.ज्योतिष मित्र मिलिंद, प्रसिद्ध पूजा उपासना मार्गदर्शक श्री. मनीष गोसावी, ज्योतिषाचार्य श्री.महेंद्र जोशी, ज्योतिषाचार्य देवेंद्र उपासनी, प्रसिद्ध पुरोहित श्री. सतीश गुरुजी आदी मान्यवरांची उपस्थित होते. मान्यवरांचे विविध विषयांवरील मार्गदर्शन संमेलनाची शोभा वाढवणारे ठरले. समारंभाचे व्यासपीठ महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री.अनिल चांदवडकर गुरुजी, ज्योतिष मित्र मिलिंद, श्री. विजयानंद पाटील व श्री.मनीष गोसावी आदी मान्यवरांनी भूषविले.

यासेच नवोदित ज्योतिषी सौ.सोनल पंडित यांचे नाक्षात्राधारीत संशोधित उदबत्ती तयार करणे ई. गोष्टी हम भी कुछ कम नाही हे सर्वांना दाखवून देणारे होते.

तसेच या समारंभासाठी बडोदा, बंगलोर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा विविध कानाकोपऱ्यातून सर्वजन आवर्जून संमेलनास आले होते.

बाहेरगावाहून बरेचसे जन आले असल्यामुळे सकाळी १० वाजता गरमागरम नाश्ता व चहापान आयोजित केले होते.

त्यानंतर १०.30 वाजता मा. अध्यक्षपद महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री.अनिल चांदवडकर गुरुजी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून प्रमुख कार्यक्रमास सुरुवात झाली. मा. अध्यक्षांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केल्यानंतर मा.श्री.अनिल चांदवडकर गुरुजी यांचे बहुमुल्य ज्योतिष मार्गदशन सर्वांना ज्योतिषाची वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरले. त्यानंतर पहिल्या व दुसर्या सत्रात डेस्टिनी व्यवस्थापन चे श्री. योगेश्वर गौडा, ज्योतिष मित्र मिलिंद, डॉ.भारती खटावकर, हर्षल पुस्तकाचे लेखक श्री. अजिंक्य नलोले, श्री. विजयानंद पाटील, ज्येष्ठ ज्योतिषी अनंत आठल्ये, ज्योतीशाचार्या सरिता गंभीर ताई, ज्यो.सोनल पंडित ई. ची त्यांच्या अभ्यासातून व अनुभवाने समृद्ध अशी मौलिक मार्गदर्शन सत्रे झाली. एक २० वर्षीय चुणचुणीत एम.सी.ए. करत असलेली चुणचुणीत मुलगी हीना हाते हिने प्रभावीपणे ज्योतिषांना काळाच्या अनुसार तंत्रज्ञानाचा व वेबसाईट चा कसा वापर वाढवला पाहिजे, याबद्दल दिशा दिली.

दुसरे सत्रात पदवीदान समारंभ झाला. यशस्वी ज्योतिर्विद्या वाचस्पती विद्यार्थ्यांचा मा.श्री.अनिल चांदवडकर गुरुजी यांचे हस्ते पुणेरी पगडी, प्रमाणपत्र, शाल, चांदीचे लक्ष्मीचे नाणे, स्मृतीचिन्हे ई. देऊन कौतुक करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व अनिरुद्ध संस्थेच्या संस्थापिका, अध्यक्ष व सर्वेसर्वा डॉ.सौ. समीक्षा दारवलिकर यांना सत्कार करून प्रश्न मार्ग हे ज्योतिष पुस्तक भेट देण्यात आले.

दोन सत्रांच्या मध्ये उत्कृष प्रीती भोजनाची चोख व्यवस्था होती. व त्यानंतर चहापान झाल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे डॉ.सौ. समीक्षा दारवलिकर यांनी अथक प्रयत्नामुळे व यशस्वी व काटेकोर नियोजन. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच. तसेच या स्नेह संमेलनामुळे. सर्वांना मान्यवरांच्या अनुभवातून ज्योतिष अभ्यासास नविन दिशा व प्रेरणा मिळाली. सर्वजण एकत्र येऊन ओळख झाली व एकमेकांच्या विचारांचे आदान प्रदान करण्यास एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले.

असा हा सोहळा नित नेटका, हसता खेळत ज्योतिष ज्ञान देणारा एक संस्मरणीय सोहळा ठरला.

जय ज्योतिष 🚩

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)