Category: Uncategorized

पारंपारिक व कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीचे एक अवलोकन


विषय : पारंपारिक व कृष्णमूर्ती पद्धतीचे एक अवलोकन

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : कृष्णमूर्ती पद्धती एक चिकित्सा

मूळ लेखक : गजानन तेंडूलकर

नमस्कार,

आपला नेहमीचा अनुभव आहे की, ज्योतिष अभ्यासकांमध्ये आपण स्वीकारलेली भविष्य कथन पद्धत च कशी श्रेष्ठ आहे हे सांगण्याची चढाओढ लागलेली असते. पण काळाच्या ओघात आधीचे संशोधन काल बाह्य तरी होत असते किंवा विकसित तरी होत असते. पण श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या नादात सर्वजन हे विसरतात की, आज सचिन तेंडूलकरने केलेला विश्वविक्रम पुढे जाऊन कोणी विराट हा मोडणार असतो. पण कीर्ती मात्र भारताचीच होणार असते. तुम्ही या ज्योतिष शास्त्रासाठी किती योगदान दिले आहे, हे महत्वाचे नाही का. तसेच मूळ पारंपारिक ज्योतिष शास्त्र हा आदिवृक्ष आहे आणि इतर ज्योतिष पद्धती या त्याच्याच विकसित शाखा आहेत.

येथे पारंपरिक ज्योतिष व कृष्णमूर्ती पद्धतिचे विश्लेषण करण्याचा एक प्रयत्न केला आहे.

पा. प. १) लग्नकुंडली बरोबरच राशीकुंडली व नवमांश कुंडलीही पाहातात.

कृ. प. १) पाश्चात्य पद्धतीप्रमाणे फक्त जन्म कुंडलीलाच विचारात घेतात.

पा. प. २) बारा भाव, बारा राशी व नऊ ग्रह (दाक्षिणात्य ज्योतिषी मांदी व गुलिक हे ग्रहही घेतात) शिवाय आधुनिक ज्योतिषी हर्शल, नेपच्यून व प्लूटो हे ग्रहही घेतात.

कृ. प. २) बारा भाव, बारा राशी व नऊ ग्रह या घटकांना महत्त्व. हर्शल, नेपच्यून व प्लूटोना विंशोत्तरी दशेत स्थान नसल्याने नक्षत्र ज्योतिषातही स्थान नाही.

पा. प. ३) बारा राशी व सत्तावीस नक्षत्रे यांच्या संयोगावरून पडणारे १०८ नवमांश याना महत्त्व आहे. सुरवातीस कृष्णमूतीही नवमांश विभागाला महत्त्व देत.

कृ. प. ३) सत्तावीस नक्षत्र विभाग व विंशोत्तरी, दशेच्या प्रमाणावर आधारित राशीचक्राचे २४९ उपनक्षत्रविभाग याना अनन्य- साधारण महत्त्व आहे.

पा. प. ४) ग्रहबलाच्या कुंडल्यांना महत्त्व आहे. दृष्टीने षोडशवर्ग कुंडल्यांना महत्व आहे.

कृ. प. ४) जन्मलग्नकुंडलीखेरीज इतर वर्गाना स्थान नाही.

पा. प. ५) ग्रहांचे बलाबल ठरविणारे उच्च – नौचत्व, मित्रशत्रूत्व, समतत्त्व इ. राशीस्थित अवस्थांना फार महत्त्व असते. जसे-तूळेत शनी उच्च, मकरेत गुरू नीच, कुंभेत मंगळ शत्रुगृही, घनेत रवी मित्रगृही.

कृ. प. ५) ग्रहांचे बल प्रत्येक भावाच्या कार्येशाच्या प्रतवारीवर ठरत असते. जसे- कोणत्याही भावामध्ये असलेल्या ग्रहांच्या नक्षत्रातील ग्रह त्या भावाचा नंबर एकचा बलवान कार्येश असतो.

पा. प. ६) ग्रहांच्या कारकत्वाला महत्त्व असते. जसे – रवी-पितृकारक, चंद्र-मातृकारक, गुरू-पुत्रसंततीकारक, शुक्र-पत्नीकारक, मंगळ-भातृकारक इत्यादी. संतर्तीसाठी पंचमस्थानाबरोबर गुरूची स्थिती पाहातात.

कृ. प. ६) कृ. प. मध्ये ग्रहांच्या कारकत्वास दुय्यम वा नगण्य महत्त्व, जसे-संततीसाठी गुरुच्या स्थिती-पेक्षा पंचम भावाच्या उपनक्षत्र स्वामीची स्थिती प्रामुख्याने महत्त्वाची असते.

पा. प. ७) लग्न, चतुर्थ, सप्तम व दशम या भावांखेरीज इतर भावबिंदू श्रीपती पद्धतीप्रमाणे घेत असतात. काही प्रख्यात ज्योतिषी लग्नापासून तीस अंशांचे समभाव घेतात; स्पष्ट दशमबिंदूचा वापर बिलकूल करीत नाहीत.

कृ. प. ७) भावसाधन राफेलने स्वीकारलेल्या प्लॅसिडस याच्या सेमी-आर्कपद्धतीने केले जाते. या पद्धतीसाठी राफेलच्या कोष्टकांऐवजी एस. बालसुंदरम् व बी. बाला यांचे ‘युनिव्हर्सल टेबल्स ऑफ हाऊसेस’ हे पुस्तक उपयुक्त आहे.

पा. प. ८) इष्ट सांपातिक कालावरून येणारे लग्नादींचे अंश-कला-विकला भावमध्य म्हणून वापरले जातात. प्रत्येक भावाचा आरंभ हा मागील भावमध्यापासूनच्या अंतरावरून ठरतो. उदा. लग्न मेष १६ अंश व द्वादश मीन १२ अंश हे भाव मध्य असल्यास या दोघामधील अंतराच्या निम्म्या (३४÷२) म्हणजे १७ अंश अंतरावर अर्थात् मीनेच्या २९ अंशापर्यंत द्वादशभाव असतो व लग्नभाव सुरू होतो. मीन २९ च्यापुढे असलेला ग्रह लग्न भावचे फल देतो. श्रीपती पद्धतीचे भावमध्य लग्न- चतुर्थ, दशम-लग्न या अंतराचे तीन सारखे भाग करून ते अंतर अनुक्रमे लग्न व दशम यामध्ये मिळवून साधता येतात. ही प्रसिद्ध व अत्यंत सोपी अशी जुनी पद्धती आहे. जुने व पारंपरिक ज्योतिषी ही पद्धती वापरतात. काही ज्योतिषी राफेल्सचे कोष्टक वापरतात. परंतु भावमध्य धरून घेतात. लग्नबिंदूपासून तीस अंशांचे समभाव वापरणाऱ्या ज्योतिष्यात भावारंभ व भावमध्य असे भेद करणारे ज्योतिषी आहेत. काही ज्योतिषी ‘तारतम्य’ वापरून ग्रहांचे भावफल ठरवतात. काही अंश दीप्तांश घेतात.

कृ. प. ८) इष्ट सांपातिक काल घेऊन राफेलच्या ‘टेबल्स ऑफ हाऊसेस’ या जंत्रीवरून बारा भाव घेता येतात किंवा वर उल्लेखलेल्या दुसऱ्या पुस्तकावरून अंश-कलात्मक भाव काढता येतात. कृष्णमूर्ती पद्धतीत हे पाश्चात्य पद्धतीचे भाव त्या भावाचे आरंभ असतात. उदा. प्रथम भाव मेष १६ अंश २० कला आहे. द्वितीय भाव वृषभ २४ अं. १२ कला आहे. प्रथमभावाची व्याप्ती मेषेच्या १६०-२०’ पासून वृषभेच्या २४०- १२८ पर्यंत राहील. एखादा ग्रह वृषभ २४०- ११ असला तरी तो प्रथमस्थानी असेल तर मेषेत १६०-१९ असल्यास बाराव्या स्थानात समजला जातो. एवढी सूक्ष्मता या पद्धतीत असते. पाश्चात्य पद्धतीने जरी हे तत्त्व मांडले असले तरी असंख्य कुंडल्यांचे पाश्चात्यांचे विवेचन भाव- मध्याजवळचा ग्रह तारतम्याने घेताना आढळते. उदा. वरील उदाहरणाप्रमाणे मेष ११ अंशातील ग्रह लग्नस्थानचे फल देताना विवेचन केलेला आढळतो. शिवाय पाश्चात्य ज्योतिषांत भावस्फुट साधनाच्या अनेक पद्धती आढळतात. केवळ राफेलचे कोष्टक आयते तयार असल्याने ते सर्रास वापरले जाते.

पा. प. ९) भारतीय ज्योतिषातील दृष्टीयोग अंशात्मक असले पाहिजेत असा नियम नाही. प्रत्येक ग्रहांच्या सातव्या स्थानावरील पूर्ण दृष्टीखेरीज मंगळ, गुरू व शनी याना विशेषाधिकार आहेत. हे पूर्ण दृष्टीचे अधिकार इतर ग्रहांचे बाबतीत प्रतवारीने कमी आहेत. मंगळास ४,८ गुरुस ५,९ शनीस ३,१० या स्थानांवर पूर्ण दृष्टिबल आहे. हे बल इतर ग्रहांच्या बाबतीत अनुक्रमे ३/४, १/२ व १/४ इतके आहे. युतीयोग अर्थात् महत्त्वाचा असतो. हे योग ढोबळ मानाने पाहिले जातात. मेषेत १ अंशात असलेला ग्रह तूळेच्या ३० व्या अंशातील ग्रहास पूर्णदृष्ट्या पाहातो. या उलट तूळेच्या ३० व्या अंशातील ग्रहाची वृश्चिकेतील पहिल्या अंशातील ग्रहाशी युती समजली जात नाही. एखाद्याचे मेष लग्न २७ अंश असेल व समोर तूळेत ५व्या अंशात ग्रह असेल तरी त्याची लग्नावर पूर्ण दृष्टी असते असे समजले जाते. शेवटी दृष्टियोग राशीपासून मोजले जातात हेच खरे. अंशाना किंमत नसते. काही ज्योतिषी राहू-केतूनाही विशेष दृष्टियोग देतात. परंतु हे चंद्राचे पातबिंदू असल्याने युतिखेरीज वा इतर ग्रहांच्या यांच्यावरील विशेष दृष्टिखेरीज इतर दृष्टीना महत्त्व नाही.

कृ. प. ९) कृष्णमूर्ती भारतीय पद्धतीच्या दृष्टीयोगांबरोबरच पाश्चात्य दृष्टियोगांनाही महत्त्व देतात. दोन ग्रहांमधील १८च्या पाढ्यामधील व २२॥ च्या पटीचे अंशात्मक कोन शुभाशुभ दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. त्यात ४५, ९०, १३५, १५०, १८० अंशांचे कोन हे विशेष अशुभ तर ६०, १२० अंशाचे विशेष शुभ असतात. इतर योग १८ व त्याच्या पटीच्या अंशांचे शुभ व २२ ॥ च्या पटीचे अशुभ परंतु कमी प्रतीचे आहेत. प्रत्येक योगाचे काही दीप्तांश असतात. त्यांचे प्रमाण वेगवान ग्रह व धीम्या गतीचे ग्रह यांच्यासाठी भिन्न असते. शिवाय अंतर जितके अधिक तितके दीप्तांश जास्त अनुभवास येतात. हा अनुभवाचा भाग आहे. स्वतः कृष्णमूर्तीनी सरधोपट दृष्टी मानली होती हे त्यांच्या विविध कुंडल्यांच्या स्पष्टीकरणावरून आढळते. दक्षिण भारतीय ज्योतिष्यांमध्ये दृष्टियोग ढोबळपणे स्वीकारतात. के.पी. मध्ये हीच पद्धत आहे. ग्रहांचे शुभाशुभत्व पाहाण्याची वेगळी रीत कृष्णमूर्तीनी दिली असताना त्यानी पाश्चात्य दृष्टियोगाना का महत्त्व दिले ते मात्र कळत नाही. राहू- केतूना विशेष दृष्टि असते असे ते मानीत नाहीत. तरी सप्तम दृष्टीचा विचार विवेचनात आढळतो.

पा. प. १०) ग्रहांचे शुभशुभत्व पाहाताना ६/८/१२ स्थानांचे स्वामी अशुभ समजले जातात. तसेच कोणत्याही स्थानाचा स्वामी ६/८/१२ मध्ये पडला की तो अशुभ असतो. तसेच नैसर्गिक पापग्रहांची दृष्टी अशुभ तर नैसर्गिक शुभ ग्रहांची दृष्टी शुभ असते. परंतु यामध्ये सुद्धा दोन प्रकारची भते आढळतात. तूळ लमास गुरू अशुभ फलदायी होतो. मग त्याची दृष्टी शुभ की अशुभ? तो कारकत्वाच्या दृष्टीने अशुभ की स्थानफलाच्या इटीने अशुभ ठरतो?

कृ. प. १०) कोणात्मक अंतरावरून शुभाशुभ मानण्याची पाश्चात्यांची पद्धत के.पी.मध्ये नाही. परंतु पाश्चात्य दृष्टियोगांचा उल्लेख आहे. शुभ स्थानाच्या अधिपतीचा अशुभ स्थानाच्या अधिपतीशी शुभ योग झाला की अशुभ फल मिळते व अशुभ योग झाला की शुभ फल मिळते अशा प्रकारचा विचार त्यानी केलेला आढळतो. ‘अॅडव्हान्स स्टेलर अॅस्ट्रॉलॉजी’ या ग्रंथात मात्र शुभाशुभत्वाची कल्पना वेगळ्या पद्धतीने मांडली आहे.

पा. प. ११) चंद, बुध, गुरु शुक्र शुभग्रह असून रवी, मंगळ, शनी, राह व केतू अशुभ ग्रह आहेत प्रत्येक ग्रह आपापल्या स्वभावाप्रमाणे शुभ वा अशुभ फल देतो. त्यांची दृष्टीही गुणधर्माप्रमाणे कार्य करते. ग्रहांच्या गुणधर्मांना येथे विशेष महत्त्व आहे. त्यांची शुभाशुभ फले देण्याची पद्धत स्वभावधर्माप्रमाणे असते. उदा. शनी ग्रहाचे गुणधर्म बव्हंशी अशुभ आहेत. जर तो योगकारक असेल तर जी शुभ फले मिळतील ती शनीच्या स्वभावानुसार मिळतील; ती गुरू-शुक्राच्या पद्धतीने मिळणार नाहीत. जसे-शुक्राचा अंमल असलेला पिता आपल्या मुलावरील प्रेमाचे प्रदर्शन करील. याउलट शनीप्रधान पितासुद्धा आपल्या मुलावर प्रेम करीत असतो परंतु त्याचे प्रदर्शन नसते. शनी ग्रहाला सत्ता द्यायची असल्यास तो दलित- पीडित-मागासवर्गीय-श्रमजीवी लोकां- कडून अथवा विधीनिषेधशून्य मागनि देईल; तो गुरू ग्रहाप्रमाणे सनदशीर साधनशुचितेच्या मागनि देणार नाही. याउलट वृषभ व तूळ लग्रास गुरू अशुभ फलदाता असतो. सत्ता, उच्च पद, अधिकार मिळाल्यास त्याचे जोडीस तितकेच जोरदार अशुभ फल मिळते. अचानक मुलाचा मृत्यू होणे, मुलगा बाईट मार्गास लागणे, संतती नसणे असे जोडफल अनुभवास येते. पाराशरी पद्धतीप्रमाणे प्रत्येक लग्राचे शुभाशुभ ग्रह ठरलेले असतात.

कृ. प. ११) प्रत्येक ग्रहामध्ये शुभाशुभ फले दण्याची पात्रता आहे हा पाश्चात्यांचा दृष्टिकोण के.पी. मध्ये आहे. मात्र ग्रह शुभ वा अशुभ ठरवणे हे विविध दृष्टियोगावर अवलंबून नाही, तर स्थानपरत्व त्यांच्या पात्रतेवर ठरते. के.पी मध्ये एकाचा लाभ तर दुसऱ्याची हानी हे तत्त्व लक्षात घेऊन शुभाशुभत्व ठरवले जाते. उदा. एखाद्याला लॉटरी लागली की समोरच्याला पैसे मोजावे लागतात. तसेच एखाद्या दशेत एखादी चांगली घटना घडली की घरातील अन्य नातेवाईकांच्या बाबतीत अशुभ घटना घडू शकते. हा दृष्टिकोण विचारात घेऊन प्रत्येक स्थानाचे बारावे स्थान हे त्या स्थानासंबंधी नकारात्मक असते, तर अकरावे स्थान लाभदर्शक असल्याने इच्छित शुभ फल प्राप्त होते या तत्वावर के. पी. फलादेशाची इमारत उभी आहे. नवमस्थानाचा गौरव पारंपारिक पद्धतीत कितीही केला असला तरी दशमस्थानाच्या दृष्टीने ते नकारात्मक ठरते. केंद्र- त्रिकोणाधिपती या दृष्टिने शुभ ठरतातच असे नाही. दशमकेंद्र कितीही बलवान असले तरी एकादश स्थानचे बारावे स्थान असल्याने त्या स्थानासंदर्भात अशुभच आहे. इथे पारंपरिक विचारांशी ते पूर्णतया फारकत घेतात. इथे योगकारकास स्थान नाही. पाराशरी पद्धतीला डावलून ग्रहांचे शुभाशुभत्व वरीलप्रमाणे ठरले जाते. मात्र अष्टम व द्वादश भावांचे अधिपती अशुभ समजले आहेत.

पा. प. १२) प्रत्येक स्थानासंबंधीची फले दोन्ही पद्धतीत साधारणपणे सारखी असली तरी शिक्षणस्थान व पितृस्थान दाक्षिणात्य ज्योतिषी अनुक्रमे चौथे व नववे घेतात, आपल्याकडे पाचवे व दहावे घेतात. जुन्या ग्रंथांतही याबाबत दुमत आहे.

कृ. प.१२) दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणे के.पी. मध्ये शिक्षणाचा विचार चतुर्थस्थानावर घेतात. उच्च शिक्षणास नवमस्थान हा पूरक भाव घेतात. पित्याचा विचार नवमावर होतो. कुंडलीतील मारकस्थाने व बाधकस्थाने पारंपारिक विचाराप्रमाणे घेतात.

पा. प. १३) विविध भावातील ग्रह आपल्या आधिपत्यानुसार, दृष्टियोग व राशी वर्गबलानुसार कोणते फल देणार हैं ठरवितात. त्यासाठी दशा व गोचर ग्रहांची स्थाने घेतात. विंशोत्तरी, अष्टोत्तरी, कालचक्र, योगिनी अशा विविध दशा घटनांचा काल ठरविण्यासाठी वापरतात. दिनवर्ष पद्धतीचा अभ्यास केलेले ज्योतिषी ती पद्धती निरयन ग्रहांना वापरतात. जोडीस गोचर ग्रहांची स्थाने पाहातात. पारंपरिक ज्योतिषात या दिनवर्ष-पद्धतीस स्थान नसून ती पाश्चात्यांकडून घेतली आहे. मात्र अलिकडील ज्योतिषी ती वापरतात.

कृ. प. १३) कृष्णमूर्ती पद्धतीत नक्षत्रांना प्राधान्य आहे. विशिष्ट भावातील ग्रह फल मिळण्याची दिशा (Source) दर्शवितो. ती फले कोणत्या स्वरूपाची असतील हे त्या ग्रहाचा नक्षत्रस्वामी दर्शवितो. त्याचा उपनक्षत्रस्वामी त्या घटनेसंबंधी शुभाशुभ फल दर्शवितो. म्हणजे दृशाधिपतीचा उपनक्षत्रस्वामी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. के.पी. च्या फलादेशाचा व रचनेचा पायाच विंशोत्तरी दशा असल्याने केवळ हीच दशा वापरणे क्रमप्राप्त आहे. ग्रहगोचरीशिवाय इतर कोणतीही कालनिर्णयपद्धती त्यानी स्वीकारली नाही.

पा. प. १४) गौचरीने भ्रमण करणारे ग्रह आपापल्या राशी, स्थान व दृष्टीप्रमाणे फले देतात. उदा. भाग्यस्थानातून भ्रमण करणारा शनी आपल्या मूळच्या स्थितीनुरूप जातकास फलप्रद ठरतो. मूळचा शनी उत्तम असेल तर त्याचे हे भ्रमण भाग्यदायक ठरते. मूळ कुंडलीत त्याचा संबंध भाग्यस्थानाशी असलाच पाहिजे असे नाही. समजा, एखाद्याचा शनी-रवी प्रतियोग आहे. गोचरीचा शनी वा रवी त्यांच्याशी अशुभ गोचर भ्रमणात असता अशुभ फल अनुभवास येते. उच्च जागेवरून पतन, मोठे आर्थिक नुकसान, वडिलांना अशुभ वगैरे शनी आपल्या स्वभावाप्रमाणे व कारकत्वाप्रमाणे फल देईल. यातही सूक्ष्मता त्यांच्या मूळ भावस्थितीप्रमाणे साधता येते.

कृ. प. १४) के.पी प्रमाणे गोचर फल ठरविण्यास दशा-अंतर्दशा स्वामी, रवी व चंद्र याना महत्त्व असते. या स्वामींच्या राशी- नक्षत्रानुसार त्यांचे व त्यांच्या बरोबर रवी- चंद्राचे भ्रमण घटना घडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. उदा. गुरू महादशेत शनी अंतर्दशा असता त्यानी दिग्दर्शित घटना गुरू व शनी यांच्या राशी व विशेषतः नक्षत्रे यामधून ते ग्रह स्वतः किंवा/आणि रवी चंद्राच्या भ्रमणाने घडतात. इतर ग्रहांना त्या घटने-संदर्भात महत्त्व नसते. त्यातूनही राशीपेक्षा नक्षत्रे महत्त्वाची. कारण विंशोत्तरी दशेचा आधारच नक्षत्रे आहेत; राशी नाहीत. रवीचे नक्षत्र-प्रवेश के.पी. अभ्यासकांना मुखोद्गत करायला हवेत. यासंबंधीचे विशेष विवेचन प्रकरण ६ मध्ये आहे.

पा. प. १५) ग्रहांची पंचधा मैत्री, त्यांचे स्थान- दिक्-काल-चेष्टादी बल, भावबल, विंशोपक बल इत्यादी गोष्टी पारंपरिक ज्योतिषात आहेत.

कृ. प. १५) के.पी.मध्ये हे सर्व बल जोखण्याचे प्रकार विचारात घेतले जात नाहीत. चार ‘गोल्डन रूल्स’ प्रमाणे ग्रहांचे बल ठरवले जाते.

पा. प. १६) जुन्या संस्कृत ग्रंथांमधील सुनफा अनफा, केमद्रुम, पंचमहापुरुष इत्यादी योगांचा वापर निष्णात ज्योतिषी करीत असतात.

कृ. प. १६) के.पी.मध्ये या शेकडो ग्रहयोगांना अजिबात स्थान नाही. ग्रंथांतर्गत राजयोगांचाही ते फलादेशाकरिता वापर करीत नाहीत.

पा. प. १७) संवत्सर, ऋतू, मास, पक्ष, तिथी, योग, करण, विषकन्यायोग, गंडान्त इ. पारंपरिक गोष्टींचा वापर काही ज्योतिषी करतात.

कृ. प. १७) के.पी.मध्ये फलादेश पाहाताना या सर्व घटकांना काहीही स्थान नाही. उपनक्षत्रस्वामींची स्थिती अभ्यासणे हा अखेरचा व प्रमुख पर्याय आहे.

पा. प. १८) अयनांश १९५६ च्या पंचांग सुधारणा शिफारशीनुसार इ.स.२८५ हे शून्य अयनांशवर्ष धरून अयनांश-निश्चिती | झाली, व त्यानुसार पंचांगे बनू लागली. बहुतेक ज्योतिषी हीच पंचांगे वापरतात. ज्यो. लाहिडी यांची पंचांगे तसेच आपल्याकडील पंचांगे हाच आधार घेतात. हे चित्रासन्मुख अयनांश म्हणून प्रसिद्ध आहेत. जुन्या कुंडल्या राफेल्सच्या एफेमरीजवरून काढून या अयनांशानुसार निरयन करून घेण्याकडे ज्योतिष्यांचा कल आहे. अॅस्ट्रॉलॉजिकल मॅगझीनमध्ये मात्र सुमारे दीड अंश कमी अयनांश आहेत. रेवती पक्ष (टिळक पंचागे) व चित्रापक्ष यात सुमारे चार अंशांचे अंतर आहे. तथापी चित्रापक्षाचे अयनांश बहुसंख्य ज्योतिषी वापरतात.

कृ. प. १८) पंचागसुधारणा होण्यापूर्वी ज्यो. केतकर यानीही चित्रा तारेच्या भोगावरून अयनांश घेऊन करणग्रंथ रचला. यावरूनच निर्णयसागर, जन्मभूमी इ. पंचांगे करीत. परंतु त्या वेळेच्या चित्रा तारेच्या गणितात सूक्ष्म फरक राहिल्याने शून्य अयनांश वर्ष इ.स.२९१ घेतले गेले. इ.स. १९५६ पर्यंत ही पंचागे ६ कला फरकाने अयनांश घेऊन केली आहेत. कृष्णमूर्तीना १९४० पासून वा त्यापूर्वी कित्येक वर्षे याच अयनांशाची ग्रहस्थिती उपलब्ध होती. त्यावरून त्यांचे संशोधन असल्याने १९५६ नंतरचा बदल त्यानी स्वीकारला नाही. आजतागायत के. पी. अयनांश सुधारित चित्रा अयनांशापेक्षा ६ कलांनी कमी आहेत. तथापी ते मूळचे चित्रापक्षाचे म्हणूनच घेतले होते.

पा. प. १९) भिन्न भिन्न अयनांशावरून षोडशवर्ग कुंडल्या भिन्न होतात; भोग्य दशा भिन्न असतात; त्यामुळे ग्रहदशांचे स्पष्टीकरण भिन्न होते. एकच अयनांश घेतल्यास संशोधनास योग्य असते. चित्रा पक्षाच्या अयनांशामुळे हे कार्य सुकर झाले आहे. या अयनांशावरून मांडलेल्या कुंडल्यावरून सुद्धा विदशांपर्यंत अचूक कालनिर्णय करता येतो असे विद्वान ज्योतिष्यांचे मत आहे. अयनांश भिन्नतेमुळे कित्येक ज्योतिषी विदशा पाहात नाही.

कृ. प. १९) अयनांशातील सहा कलांच्या फरकाने जन्मतः जर दीर्घ मुदतीच्या महादशा आल्यास १॥-१ ॥ महिन्यांचा फरक दशाकालात पडतो. या पद्धतीत त्या मागे येतात. त्यामुळे एखाद्या घटनेच्या स्पष्टीकरणात विदशा वेगळी येऊ शकते. शिवाय ६ कलांमुळे उपनक्षत्रस्वामी वेगळा येऊ शकतो. म्हणून के.पी. अभ्यासकानी ६ कला कमी असलेलेच अयनांश वापरणे योग्य. १ ते २४९ उपनक्षत्र विभागाना हा फरक महत्त्वपूर्ण ठरतो.

पा. प. २०) पारंपरिक पद्धतीत राहू-केतु हे छायाग्रह इतर ग्रहांप्रमाणे महत्त्वाचे आहेत. याना स्वतःच्या मालकीच्या राशी नसल्याने हे ज्या राशीत असतात व ज्या ग्रहांच्या युतीत असतात त्या ग्रहांचे फल देतात असे मानतात. काही ज्योतिष्यानी त्याना स्वगृहे व उच्च राशी बहाल केल्या आहेत. याना सर्वसाधारणपणे अशुभ ग्रह मानतात. लग्नबिंदूप्रमाणे हे चंद्राचे पातबिंदू अत्यंत संवेदनाक्षम आहेत. त्यामुळे त्यांच्याजवळ असलेला ग्रह अतिशय बलवान् ठरतो, व आपल्या स्थितीप्रमाणे जोरदारपणे शुभाशुभ फले देतो. ज्या स्थानात हे ग्रह असतात त्यासंबंधी दर्शित गोष्टींचा मानसिकदृष्ट्या फार परिणाम होतो. शनिवत् राहू व कुजवत् केतू’ हे तत्त्व फलादेशाच्या दृष्टीने विचारात घेतात. हल्ली पंचागात राहू-केतूंची स्पष्ट स्थिती दिलेली असते. तथापि जुने ज्योतिषी यांची मध्यम स्थितीच घेतात.

कृ. प. २०) के.पी. मध्ये या पातबिंदूना अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकेच नव्हे तर ग्रहांपेक्षाही या पातबिंदूना अधिक कार्यक्षम व प्रत्ययकारी मानले आहे. यांच्या युतीतील व यांच्यावर दृष्टी असलेल्या, यांच्या राशी-नक्षत्रस्वामी असलेल्या ग्रहांप्रमाणे यांची फलप्रदान करण्याची दिशा असते. एखाद्या घटनेच्या कार्येश ग्रहांच्या राशी वा नक्षत्रात हे पातबिंदू असतील तर त्या ग्रहांपेक्षा या छायाग्रहांना अधिक महत्त्व येते. विंशोत्तरी दशेसाठी यांचे नक्षत्रस्वामी महत्त्वाचे असतात. परंतु एखाद्या ग्रहाच्या राशीत हे असतील व तो ग्रह कार्येश असेल तर त्याच्या दशेऐवजी या छाया ग्रहांची दशा परिणामकारक असते. ‘शनिवत् राहू व कुजवत् केतू’ हा विचार के.पी. मध्ये ग्राह्य नाही. इतर स्पष्ट ग्रहांप्रमाणे राहू-केतूंची स्पष्ट स्थिती न घेता मध्यम स्थितीच फलादेशाकरिता घेतात.

पा. प. २१) वक्री ग्रहासंबंधी ज्योतिष्यात भिन्न मते आहेत. शुभ ग्रह वक्री असल्यास चांगला. वक्री पापग्रह अशुभ फलदर्शक असतो. काहीचे मत असे आहे की ग्रह वक्री झाला की त्याचे फल रोखले जाते; त्यात बाधा निर्माण होते. खगोलशास्त्रीय स्थितीप्रमाणे वक्री ग्रह म्हणजे पृथ्वीच्या व त्या ग्रहाच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे भूमध्यस्थ स्थितीत राशीचक्रात तो उलट भ्रमण करीत असल्यासारखा काही काळ भासतो. साधारणतः बाह्य ग्रह रवीच्या पंचम ते नवमस्थानापर्यंत वक्री असतात. परिणामतः पृथ्वीपासून त्यांचे अंतर कमी असल्याने जोरदार फल देण्यास समर्थ असतात. कुंडलीतील मूळच्या स्थिती प्रमाणे शुभाशुभ फल जोरदारपणे मिळते. मात्र त्यांच्या वक्री व मार्गी होण्याच्या तारखेस तसेच वक्री स्थितीतील राशी संक्रमणाच्या तारखेस ज्या स्थानामध्ये तो प्रवेश करतो त्यासंबंधी महत्त्वाचे अनुभव येतात.

कृ. प. २१) कृष्णमूर्ती पद्धतीत वक्री ग्रह अशुभ मानीत नाहीत. इतर मार्गी ग्रहांप्रमाणेच त्यांचे फल असते. प्रश्वजातकात मात्र वक्री ग्रह मार्गी झाल्यानंतर फलदायी ठरतो, वक्री ग्रहाच्या नक्षत्रातील ग्रह निष्फळ होतात. एखाद्या वेळेस अनेक ग्रह वक्री असतात त्यामुळे त्यांच्या नक्षत्रातील बहुतेक ग्रह निष्फळ ठरतील असे मानणे चुकीचे आहे. ग्रह ज्या अंशात वक्री होतो तो अंश महत्त्वाचा असतो. प्रश्नकुंडलीत वक्री ग्रह निष्फळ का समजावा ? काही ग्रह चार पाच महिने वक्री असतात. जर त्यांचा संबंध प्रश्नाशी निर्माण झाला तर बलहीन समजून तिकडे दुर्लक्ष केल्यास प्रश्नाचे उत्तर काय मिळेल ? वक्री ग्रहांचे अंश जसे महत्त्वाचे तसेच राश्यंतरही महत्त्वाचे असते. मागील राशीत प्रवेश करताना तो कार्यान्वित होतो. के.पी. मध्ये नक्षत्रांना प्राधान्य असल्याने राशीना गौण महत्त्व येते. मात्र शुभाशुभत्वाचा वक्री स्थितीशी संबंध नसतो.

पा. प. २२) पारंपरिक ज्योतिषी लग्नकुंडली, राशीकुंडली व नवमांशकुंडली याना’ अनन्यसाधारण महत्त्व देतात. दाक्षिणात्य ज्योतिषी तर कित्येक वेळा नवमांश कुंडलीला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतात. ग्रहांचे बलाबल ठरविताना नवमांशातील बल जास्त महत्त्वाचे ठरते. जन्मलग्न कुंडलीचे सर्व नियम नवमांश कुंडलीस लावतात. पाराशरी पद्धतीने ग्रहांचे शुभाशुभ फल ठरते. लग्नकुंडलीत शुभ ठरलेला ग्रह नवमांशकुंडलीत अशुभ ठरू शकतो, व ती कुंडली अधिक सूक्ष्म असल्याने अशुभ फलाचा अनुभव येतो. म्हणजे लग्न-कुंडलीतील ६/८/१२ च्या स्वामपिक्षा नवमांश कुंडलीतील ६/८/१२ च्या स्वार्मीना अधिक अशुभत्व असते. त्याचप्रमाणे जन्मलप्रकुंडलीतील ६/८/ १२ स्थानांतील ग्रहांपेक्षा नवमांश कुंडलीतील ६/८/१२ मधील ग्रह अधिक अशुभ ठरतात. लग्नकुंडलीतील शुभ ग्रह चंद्र-कुंडलीत अशुभ ठरू शकतो. कित्येक नामांकित ज्योतिषी लग्न, राशी व नवमांश कुंडल्यांचा एकत्र विचार करून फलादेश वर्तवितात.

कृ. प. २२) के.पी मध्ये लग्नकुंडली, ग्रहांची नक्षत्रस्थिती व उपनक्षत्रस्वामी याना उत्तरोत्तर महत्त्व आहे. उपनक्षत्रस्वामीमुळे फलादेशास अचूकता येते. अगदी वर्गोत्तम असलेले ग्रह उच्च वा स्वनवमांशी असले तरी जर ते भिन्न उपनक्षत्रस्वार्मीच्या विभागात असून एक शुभ व दुसरा अशुभ ठरत असेल तर भिन्न फले अनुभवास येतात; ती सर्वस्वी शुभच असतील असे नाही. म्हणजे उपनक्षत्रस्वामी जर त्या स्थानाचा व्ययेश असेल तर तत्संबंधी अशुभ फलदायी होईल. इथे एक विपरित नियम आढळतो. जर नक्षत्रस्वामी शुभदर्शक भावात असल्यास त्याच्या नक्षत्रातील ग्रह ६/८/१२ मध्ये असले तरी शुभ फले देतात. हा नियम उपनक्षत्र स्वामीस शह देणारा आहे. कारण वरील ग्रह अशुभ ‘सब’ मध्ये असल्यास शुभ फले कशी मिळतील? प्रत्येक भावाचा उप- नक्षत्रस्वामी सूक्ष्मता साधण्यास विचारात घेतात. तो नकारात्मक भावांशी संबंधित असल्यास तसेच ८ व १२ वा स्थानांशी संबंधित असल्यास त्या भावफलात अशुभत्व येते.

पा. प. २३) नक्षत्रांच्या गुणधर्मास व योगताऱ्यांस महत्त्व आहे. विंशोत्तरी दशा मानणारे ज्योतिषी नक्षत्रस्वामीसुद्धा विचारात घेतात; नक्षत्रविभागानुरोधाने ग्रहांचे फल घेतात.

कृ. प. २३) नक्षत्रांचे विंशोत्तरी दशेप्रमाणे असलेले स्वामी महत्त्वाचे असतात. त्यांच्या स्वभावानुसार नक्षत्रफल ठरते. योगताऱ्यांना अगर नक्षत्राच्या तीक्ष्णादी गुणधर्माना मुळीच स्थान नाही.

पा. प. २४) षष्ठ्यंशापर्यंत म्हणजे अर्धा अंश सूक्ष्मतेपर्यंत ग्रहबलाचा विचार केलेला आहे. षोडश वर्ग कुंडल्या मांडण्याचा खटाटोप करतात. परंतु त्यांचा उपयोग किती ज्योतिषी करतात हा प्रश्नच आहे. फारच थोडे ज्योतिर्विद नवमांशकुंडली पलिकडे विचार करतात. षोडशवर्गांची निर्मिती ग्रहांचे बलाबल पाहाण्यासाठी झाली असली तरी जन्म कुंडलीप्रमाणे कित्येक वर्ग-कुंडल्या मांडतात व त्याप्रमाणे स्थानांचा अभ्यास करतात.

कृ. प. २४) नक्षत्रांचे नऊ भाग व त्यांचे पुन्हा नऊ भाग म्हणजे नक्षत्राचे ८१ भाग काढून सूक्ष्मता साधण्याचा खटाटोप केला आहे. यामुळे जुळ्या मुलांचा प्रश्न सोडविता येतो. नक्षत्र = महादशा, उपनक्षत्रविभाग अंतर्दशा व उपउपनक्षत्र विभाग म्हणजे विदशा. नक्षत्राच्या ८०० कला विंशोत्तरी दशेच्या प्रमाणात विभागल्या आहेत. नक्षत्राच्या या येणाऱ्या उपविभागाचे पुन्हा नऊ विभाग त्याच प्रकारे करून सूक्ष्मता साधली आहे.

पा. प. २५) प्रत्येक स्थानावरून कोणत्या गोष्टी पाहाव्यात याचा उल्लेख सर्व प्राचीन / अर्वाचीन ग्रंथात आहे. जसे-सप्तम स्थानावरून विवाह, पंचम स्थानावरून संतती, दशमावरून नोकरीधंदा वगैरे.

कृ. प. २५) के.पी. मध्ये एखाद्या घटनेचे स्वरूप जाणायचे झाल्यास स्थानांचे गट तयार केले आहेत. जसे विवाह ७-२-११, संतती ५- २-११, प्रवास ३-९-१२ म्हणजे मुख्य व त्यास पूरक भाव घेतात.

पा. प. २६) रवीच्या जवळ असलेला ग्रह अस्तंगत होऊन निष्फळ समजतात. त्याचे फल अशुभ मानण्याकडेही कल आहे.

कृ. प. २६) अस्तंगत दोष मानीत नाहीत. रवीइतकाच त्याच्या युतीत असलेला ग्रह फलदायक असतो.

पा. प. २७) प्रश्नकुंडली मांडताना प्रश्न विचारण्याच्या वेळची तात्कालिन लग्न कुंडली मांडून उत्तर काढण्याची पद्धत आहे. प्रश्न प्रत्यक्षात न विचारताही त्याचे स्वरूप प्रश्नकुंडलीवरून ओळखतात.

कृ. प. २७) प्रश्नकर्त्याकडून १ ते २४९ यामधील अंक घेऊन त्या उपनक्षत्रविभागावरून लग कुंडली मांडायची, व प्रश्न विचारण्याच्या वा सोडवण्याच्या वेळचे स्पष्ट ग्रह घेऊन उत्तर शोधायचे.

पा. प. २८) विंशोत्तरी दशेसंबंधी स्वभुक्ती, दशाछिद्र इ. मते दाक्षिणात्य ज्योतिषी मानतात.

कृ. प. २८) के.पी. मध्ये विंशोत्तरी दशेसंबंधी संपूर्णतया वेगळीच बाटचाल आहे. अतएव जुनी मते त्याज्य आहेत.

पा. प. २९) जुने ज्योतिषी ग्रह व जन्मलग्न यांचे अष्टकवर्ग काढतात व त्यांचा फलादेशासाठी वापर करतात. मात्र फार थोडे ज्योतिषी यांचा उपयोग करताना आढळतात.

कृ. प. २९) कृ. प. मध्ये अष्टकवर्गपद्धतीचा वापर कृ. प. अभ्यासक करीत नाही.

पा. प. ३०) भविष्यकथनाकडे केवळ दैववादी दृष्टीने पाहात नाहीत; प्रयत्नास वाव आहे. दैव अटळ मानीत नाहीत.

कृ. प. ३०) कृ. प. त भविष्य हे अदृष्ट व अटळ आहे. ज्योतिषशास्त्राद्वारे हे अदृष्ट केवळ जाणता येते.

या अवलोकन मध्ये एक सर्वसाधारण कट्टरवादी दृष्टिकोन मांडला आहे. माझ्या मते एका ज्योतिषाने सर्व पद्धतीतील मग ते पारंपारिक असो कृष्णमूर्ती असो वा अष्टक वर्ग असो. त्या त्या पद्धतीची आपापली वैशिष्ट्ये आहेत व कुठल्याही पद्धतीला कमी न लेखता आवश्यक ठिकाणी त्या त्या पद्धतीचा उपयोग करावा अथवा दोन्ही तिन्ही पद्धतीने उत्तरास पुष्टी मिळते का हे तपासावे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻😊


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

भक्तीमार्गी आणि अध्यात्मिक प्रगतीच्या कुंडलीतील पाऊल खुणा


विषय : भक्तीमार्गी आणि अध्यात्मिक प्रगतीच्या कुंडलीतील पाऊल खुणा

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : कुंडलीची भाषा खंड ३ रा

मूळ लेखक : ज्यो. कृष्णराव वाईकर

नमस्कार,

आज आपल्याला बरेचसे जग भौतिक सुखांच्या प्राप्तीकरता धडपडताना दिसत आहे. पण असेही लोक आहे ज्यांना भक्तिमार्गाची, परमार्थाची, अध्यात्मिक प्रगतीची आस आहे. कुंडलीत या गोष्टींचा शोध घेत असताना ज्येष्ठ ज्योतिर्विद कृष्णराव वाईकर यांचा कुंडलीची भाषा खंड ३ रा हा ग्रंथ वाचनात आला. त्यात याबाबत माहिती दिलेली आहे. तीच येथे संकलित व स्वैर स्वरूपात येथे देत आहे.

भक्तीमार्गी

पंचमस्थान हे उपासनेचे स्थान आहे व व्यय स्थानावरूनवरुन अध्यात्मिक ज्ञान, तत्वज्ञान वगैरेचा बोध होतो. त्यामुळे

१) व्ययेश पंचमात असता, जातकाचा उपासना व ईश्वर भक्तीकडे कल असतो.

२) हाच योग पंचमेश शुभ ग्रह असून व्ययात शुभस्थिती असताही घडुन येतो.

उदा.- सिंह लग्र पंचमेश गुरु व्ययात उच्च, शुभग्रह संबंधीत असता श्रेष्ठ उपासना द्वारे जन्मभर मोक्षप्राप्तीच्या मार्गात हे जातक असतात.

३) नवमावर शुभदृष्टी असता जातक धर्मनिष्ठ व गुणवान असतो.

४) व्ययेश दशमात दशमेशयुक्त असता धार्मिक अगर धर्मदाय कामात खर्च करतो. व्यय-खर्च, दशम-कृती, दशमात बलवान झाल्यामुळे धर्मदाय कामात खर्च करतो.

५) व्ययस्थानावर शुभग्रहांची दृष्टी असता जातक एकांतवासाकडे वळतो व अध्यात्मिकाचा व्यासंगी असतो.

६) व्ययस्थान पापकर्तरीत व्ययेशावर पापग्रहाची दृष्टी अगर वास्तव्य असता क्षुद्र देवतांची उपासना व करणीसारखे प्रयोग करणे व शेवटी त्याच्यावर उलटणे अशा गोष्टी दिसून येतात.

७) व्ययेश लाभात लाभेशयुक्त असता धंद्यात पिछेहाट व तोटा देतो. ह्या भावात कोणत्या ग्रहाकडून लामेश व व्ययेश योग दुषित झाला असेल. त्या ग्रहाने दर्शविलेल्या व्यक्तीकडून तोटा सहन करावा लागतो.

पंचमेश असता पुत्रांच्या वागणूकीमुळे तृतीयेश संबंधीत असता बंधुकडून तोटा होतो. चतुर्थेश असता मातेकडून, सप्तमेश असता स्त्रीकडून तोटा होतो.

८) लग्न अगर लग्नेश बलवान असता व व्ययेश शुभ ग्रहयुक्त असता जावकपेक्षा आवक जास्त असते व शुभग्रहाच्या दशेत चांगल्या कामात पैसा खर्च होतो.

दयाळु परोपकारी व्यक्ती खालील योगावर जन्मास येतात :

या योगात चतुर्थ दशमाचे स्वामी केंद्रात शुभ स्थितीत असतात व व्ययेश हा गुरुने, नवमस्वामीने दृष्ट असतो. चंद्र अगर बुध शुभस्थितीत असतात.

चंद्र हे मन, बुध ही बुध्दी यांचे हे प्रेरक ग्रह आहेत. ते मनाचा व बुध्दीचा कल दाखवितात.

चतुर्थावरुन माणसाची विचारसरणी कळते. अंतःकरणातील विचार पक्के झाल्यावर ते कृतीत उत्तरतात. त्यावरुन खर्च करण्याची उदारताही व्ययस्थान दाखविते.

म्हणून ही स्थाने व ग्रह शुभसंबंधित बलवान असावी लागतात.

नवमस्थान हे परोपकारी दृष्टी देते.

चंद्र व बुध दुषित असता दानधर्म अगर परोपकारात नावलौकीक होण्याकरता दानधर्म करतो व परोपकाराचे बाह्य दिग्दर्शन फक्त होते.

लग्नेश भाग्येश परिवर्तनयोग परोपकार बुध्दीस चांगला असतो.

नवमेश व्ययात अगर नवमेश नवमांशात शुभगृही हे दानधर्मास पोषक आहे.

लग्नेश गुरु, नवमेश पाप नवमांशात अगर क्रूर षष्ठांशात दानधर्मात स्वतःचे नावलौकिक होण्याचा उद्देश असतो.

जैमिनी सूत्र नुसार :

जैमिनीसुत्राप्रमाणे आत्माकारक ग्रह हा कुंडलीत फार महत्वाचा आहे व त्याची जन्मकुंडलीतील व नवमांशामधील स्थितीही महत्वाची बाब ठरते. आत्माकारक नवमांशात मीन राशीत असता जातक सर्वसंगपरित्याग करील. कालपुरुषाच्या कुंडलीत मीन राशी ही मोक्षराशी ठरते.

मरणोत्तर परिस्थितीचा विचार या स्थानावरुन करतात.

व्ययस्थानात शुभ ग्रह असणे अगर व्ययभाव शुभकर्तरीत असता जातक मोक्षाप्रत जातो.

दशमेश गुरु असून व्ययात असता व शुक्र अगर पूर्ण चंद्राने दृष्ट असता अगर शुभसंबंधीत रविने दृष्ट असता जातक मरणोत्तर चांगल्या लोकांत जातो.

कारक अमांशाच्या व्ययात केतू असता कैवल्यधाम प्राप्त होते व पुनर्जन्म येत नाही. व्ययात केतू हा मोक्षकारक असतो.

अध्यात्मिक प्रगती :

अध्यात्मिक बाबतीत कुंडलीचा विचार करतांना कुंडलीचे महत्वाचे चार विभाग पडतात.

त्यांना धर्म त्रिकोण, अर्थ त्रिकोण, कामत्रिकोण व मोक्ष त्रिकोण अशी नावे आहेत. या चार पुरुषार्थापैकी धर्मत्रिकोण व मोक्ष त्रिकोण ही अनुक्रमे (१-५-९) व (४-८-१२) ही स्थाने अध्यात्मिक प्रगती करता उपयोगी पडतात. या स्थानातील ग्रह ही स्थाने व या स्थानाचे स्वामी व या स्थानात असलेले विशिष्ट ग्रह योग विचारात घ्यावे लागतात.

प्रत्येक योगाची फले साध्य होण्यास लग्न व लग्नेश बलवान असावयास पाहिजे.

राशींमध्ये धनु, मकर, कुंभ, मीन ह्या काळ पुरुषाच्या कुंडलीतल्या अध्यात्मिक राशी आहेत. ह्यांचे स्वामी हे गुरु शनि हे आहेत व ते अध्यात्मिक प्रगतीत मुख्य ग्रह ठरतात.

विशिष्ट परिस्थितीत राहूचाही विचार होतो. पण केतू हा मात्र मोक्षकारक मानला गेला आहे व व्ययस्थान हे त्याचे कारक स्थानच आहे. शिवाय आत्माकारक रवि, मनःकारक चंद्र, बुध्दिकारक बुध, उत्साह व शक्तीचा कारक मंगळ ह्यांची तपाचरण व प्रगती करण्यास साथ लागते.

स्थानामध्ये पंचम, नवम ही पूर्वपुण्य स्थाने आहेत.

पंचमावरुन उपासना भक्ती, पूर्वसुकृत, धर्म शास्त्र, मंत्रशास्त्र प्रगती वगैरे पहातात.

नवम स्थानावरुन धर्मश्रध्दा, धार्मिक आचार विचार, दानधर्म हे पहातात.

चतुर्थ हे मनातील विचारांचे स्थान आहे व विचार परिपूर्ण झाल्यावर ते कृतीत उतरतात. ते दशम स्थानावरुन समजते.

व्ययस्थानावरुन परोपकारवृत्ती व मोक्षप्राप्ती-सद्गती ईश्वरोपासना वगैरे पहातात.

पंचमेश व्ययेश संबंध अगर अन्योन्य योग ईश्वरभक्ती अगर उपासना ही श्रेष्ठ दर्जाची देतात.

अध्यात्मिकाच्या संबंधात गुरु हा पाया आहे. तो सत्वगुणप्रधान असून देवांचा गुरु आहे. तो आपल्या स्पर्शाने दृष्टीकटाक्षाने मातीचे सोने करण्याची किमया करणारा ग्रह आहे. हा कुंडलीत शुभस्थानी असता माणसे सद्‌गुणी व ईश्वरप्रणित होतात व जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात. हाच ग्रह भक्तीची प्रेरणा देणारा, परोपकार करणारा, सद्बुध्दी देणारा आहे. गुरु सचिदानंद आहे. त्याचे अधिष्ठान असल्याखेरीज अंतःकरणास खरे समाधान व शांतता मिळणार नाही. अध्यात्मिकाच्या बाबतीत याच गोष्टीची प्रामुख्याने आवश्यकता भासते. म्हणून शुभस्थितीतला गुरु हा जातकास अध्यात्मिकाचा पाया रचण्यास सर्वश्रेष्ठ गुरु आहे. गुरुविरहीत अध्यात्माची सर्व अंगे लंगडी पडतात.

लग्नातील गुरुपेक्षा चतुर्थ गुरु जास्त महत्वाचा आहे. याच स्थानातील गुरु मोक्षत्रिकोणात येतो व चतुर्थात राहून दोन अनिष्ठ स्थानावर पंचम व नवम दृष्टी ठेवतो व दशम ह्या कृती तपाचरण स्थानावरही सप्तम दृष्टीने पहातो.

अष्टम व्ययावरील दृष्टीमुळे गंगास्नान व उर्ध्वगतीला पोषक ठरतो.

सद्वर्तनाचा पाया जरी गुरुने दिला तरी कळसापर्यंत जाण्यास तपाचरण, कष्ट, सातत्य, एकाग्रता यांची जरुरी असतेच.

या सर्व गोष्टी शुभसंबंधित शनि सहजगत्या घडवून आणतो. ज्ञानयोग देणाऱ्या गुरुस ध्यानयोग देणाऱ्या शनिची जोड असल्याखेरीज खरा मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होणार नाही. याकरता शनिशी गुरुचा संबंध पाहिजे. मग तो राशी परत्वे असो नक्षत्रपरत्वे असो अगर दृष्टीपरत्वे असो पण शनि हा गुरुच्या पकडीत पाहिजे.

गुरुची शनिवर पकड नसता व शनिची गुरुवर पकड असता शनि हा गुरुला भौतिक वादाकडे ओढतो व गुरुच्या खऱ्या स्वरुपाचा लोप होतो. व शनि आपल्या स्थायी भावाप्रमाणे जडवादाकडे गुरुला खेचतो. असे लोक सत्प्रवृत्त व धार्मिक असले तरी ऐहिक संसारातून बाहेर पडत नाहीत व संसारात राहून संसाराचे धक्के खात जन्मभर बसतात. प्रवृत्ती सत्शील असल्यामुळे धर्म कर्म करीत राहतात. धर्मोपदेशक, प्रवचनकार, किर्तनकार या सदरात मोडतात किंवा मुमुक्षु अवस्था संपवून ते साधक दशेच्या कनिष्ठ पातळीवर घुटमळत असतात. त्यांचे स्थान कोणते हे समजून घेण्याकरता गुरु-शनि यांच्या बलाबलाचा विचार करावयास पाहिजे. गुरुचे प्राबल्य असून इतर काही अशुभ राशी, योगराशी, नक्षत्रपरत्वे असल्यास आत्मसाक्षात्कारापर्यंत जातात. पण ते पद टिकविता येत नाही. लहान लहान सिध्दीच्या मागे लागून व त्यातच गुरफटून सिध्दावस्थेऐवजी खालच्या पातळीवर येतात. शुभयोग असल्यास आत्मसाक्षात्कार झाल्यावर सिध्दपुरुष म्हणून जगत राहतात व दुःखी लोकांना मार्गदर्शन करतात.

अध्यात्मिक योग, संन्यासयोग, निवृत्तीयोग, प्रवज्या योग

केतू ज्या स्थानात असतो त्या स्थानाबद्दल ऐहिक दृष्टी विशेष चांगली फले देत नाहीत. त्याचा गुणधर्म ऐहिक सुख नष्ट करुन परमार्थ तृष्णा वाढवितो. हा ग्रह चंद्राच्या नवमांशात अगर कारक अंशात याच्या ५-९-१२ स्थानी असल्यास व गुरुच्या दृष्टीपथात असल्यास मनुष्य अध्यात्म मार्गाकडे वळतो.

योग –

१) केतू हा लग्नांच्या नवमात असून जर चंद्राच्या पंचमात गुरु दृष्ट असता अध्यात्मविद्येची प्राप्ती होतो. तसेच कारक अमांशाच्या व्ययातील केतू शुभ ग्रह दृष्टीयोगात असता मोक्षप्राप्ती अगर विदेही अवस्था देतो.

केतू हा एक अध्यात्मिक ग्रह ला मोक्ष कारक म्हटले आहे. हा समाधी व ध्यानधारणा देणारा ग्रह आहे. अध्यात्म बाबतीत हा नवम व गुरुदृष्ट असता अगर लग्नाच्या नवमात असून चंद्राच्या पंचमात व गुरुशी संबंध आल्यास श्रेष्ठ पारमार्थिक योग होतो.

वृषभ लग्न भाग्यात मकरेचा केतू व चंद्राच्या पंचमात असता त्याचा स्वामी शनि हा दशमात शुभस्थितीत पंचमेश बुधाने युक्त असून गुरुने दृष्ट असता अध्यात्मिक प्रगती वरच्या दर्जाची असते. हा योग वृषभ लग्नाला चांगला होतो.

२) पंचम दशमातले ग्रह, लग्न, नवम, दशमभाव हे बलवान असल्यास जातक चारीही वेद व धर्म शास्त्र यात पारंगत होतो. अंतर्ज्ञानी होतो.

३) दशमात तीन ग्रह उच्च, स्वगृही व शुभवर्गात व दशमेश बलवान असता जातक संन्यासी होतो.

४) चार ग्रह दशमात असता विरक्त होतो.

५) दशमेशासह पाच ग्रह केंद्र कोणात असता जीवनमुक्त महात्मा जन्मास येतो. या वरील दोन योगात (४-५ मध्ये) रवि असल्यास अस्तगंत योग झाल्यास जातक जरी धार्मिक व परलोक विद्येत पारंगत असला तरी संसार सोडणार नाही. जगाशी संपर्क राहिल.

६) लग्नेश फक्त शनिने दृष्ट असता जातक संन्याशी होतो. मात्र या योगात शनि हा कोणत्याही ग्रहाने दृष्ट नसावा व शनिच्या बलवत्तेचाही विचार करावयास पाहिजे.

७) लग्नेश शनिला पहात असता जातक संन्यासी होतो, पण लग्नेश मात्र कोणत्याही ग्रहाने दृष्ट नसावा व शनिच्या बलवत्तेचाही विचार करावयास पाहिजे.

८) शनिच्या राशीत चंद्र असून अगर शनिने अगर मंगळाने युक्त अगर दृष्ट असा द्रेष्काण कुंडलीत असता संन्यास योग होतो. (विवेकानंद यांच्या कुंडलीत हा योग होता.)

९) दशमस्थान मीनेचे असून व तेथे शनि असता जातक संन्यासी होतो. (पाराशरी प्रमाणे)

१०) शनि केंद्रात असून दुर्बल चंद्र स्वामीने दृष्ट असता प्रवज्या योग होतो.

११) जर लग्न चंद्र व गुरु हे शनिच्या दृष्टीत असल्यास जातक संन्यास मार्ग पत्करेल.

१२) दशमेश राहूने युक्त असता संन्यास योगाचा भंग होतो. संन्यास अगर प्रवज्या योगात शनि बलवत्ता महत्वाची आहे. लग्नी राहू हा संन्यास योग भंग करणारा आहे.

१३) पंचमेश व्ययेश संबंधित अगर पंचमेश व्ययेशाशी किंवा व्ययस्थ ग्रहाशी संबंधित असता ईश्वरभक्ती योग होतो.

१४) व्यय भावात शुभ ग्रह अगर व्यय भाव शुभ कर्तरित असता अगर व्ययात योगकारक ग्रह मीनेतल्या गुरुने दृष्ट असता श्रेष्ठ अध्यात्मिक योग होतो.

१५) कारक अमांशातील केतू व्यय स्थानात असता मोक्ष प्राप्त होतो. तसेच कारक अमांशात पापग्रहही निवृत्ती योग देतात.

१६) व्ययेश अष्टमात उच्च व भाग्येश व्ययात असल्यास प्रगती चांगली व उर्ध्वगती योग होतो.

१७) धर्मकर्माधिपयोग व्ययात व लग्नातील बुध गुरुने दृष्ट व लग्नेश मंगळाने दृष्ट असता श्रेष्ठ अध्यात्मिक योग होतो. हा योग वृश्चिक लग्नाला होतो.

अध्यात्मिकाच्या बाबतीत किंवा ईश्वर भक्तीमध्ये कारक आमांशाचा फार मोठा वाटा आहे. कुंडलीत जो ग्रह जास्त अंश गेलेला असतो त्याला आत्माकारक ग्रह म्हणतात. जैमीनी ह्या ग्रहाला अधिक ग्रह म्हणतो. पण ही पूर्व कल्पना पराशराचीच आहे. आत्माकारक ग्रह ज्या नवमांशात असतो त्या नवमांशातला कारक अमांश ही संज्ञा आहे व ह्या कारक अमांशाच्या १-५-९-१२ व्या स्थानी गुरुचे महत्य अध्यात्मिक बाबतीत फार आहे. कारक अमांशाच्या व्ययात गुरु शनि व मोक्ष कारक केतू असता अध्यात्मिक प्रगती फार दिसून येते. अष्टम, व्ययातला  गुरु हा अध्यात्म प्रगतीस चांगला समजावा. विरक्ती करता शनिचा आधार लागतो. संन्यास व विरक्तीचा शनि हा मुख्य व आधारभूत ग्रह आहे. शनिच्या सहाय्याखेरीज जातक संन्यासी होऊ शकत नाही. नवम स्थानाला एकटा शनि पाहात असता जातक घरदार सोडून निवृत्ती मार्गाकडे वळतो.

शुभं भवतु !!!

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

अतुल परचुरे यांना भावपूर्ण आदरांजली 🙏


सुन्न !!!
आधीच आमच्या पिढीमध्ये हयात आदर्श व्यक्तिमत्त्वांची कमतरता आहे. त्यातही जी व्यक्तिमत्त्वं आहेत ती एकेक सोडून जायला लागल्यावर आमच्या पिढीने कोणाकडे आशेने बघायचं? रतन टाटांचा धक्का नुकताच लोक पचवत होते. आणि अगदी कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्या वयामुळे कधी ना कधी ही वेळ येणार याची कल्पना होतीच. पण अतुल परचुरे? आधीच कॅमेरासमोर उभं राहून न विसरता वाक्य म्हटली म्हणजे अभिनय जमला असे मानणारे तरुण हौशी नट आणि अभिनयाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊनही वैश्य आणि वेश्या यातला फरक न समजणारे नट ( सन्माननीय अपवाद वगळता)यांच्या सद्दीत आम्ही असताना अतुल परचुरे सारखे अभिनेते नैसर्गिक अभिनय आणि अभ्यासू वृत्ती यांचा एक वस्तुपाठ घालून देत होते. कोणत्याही चित्रपटातली अतुल परचुरेची एका मिनिटाची भूमिका काढून पाहिली, तरी अभिनय काय असतो हे कळतं. मधुकर तोरडमलांनी अतुल असल्याशिवाय तरुण तुर्कचा प्रयोग करायचा नाही असं का म्हटलं असेल हे कुंदा भागवत पाहून कळतं. स्त्रैण भूमिका, शारीर होऊ न देता विनोदी कशी करायची हे कोणत्याही नटाने शिकावं असा कुंदा ! एखादी पंचलाईन सुद्धा शिळी होऊ न देता पूर्ण चित्रपटात कशी खुलवावी यासाठी गोलमाल (मराठी) मधला डिटेक्टिव्ह भाभि बघावा. मार खाऊन सुद्धा मजा आली…पण पूर्वीचा दम नाही राहिला तुझ्यात या लाईनवर लाफ्टर कसा काढावा यासाठी बे दुणे साडे चार मधला धोडपकर बघावा. काका किशाचा मधला विसरभोळा बापट, नवरा माझा नवसाचा मधला वॅकीचा मित्र, नारबाची वाडी‌मधला ज्योतिषी, वादळवाट, होणार सून मी, किती नावं घ्यायची…आणि अर्थात आमच्या पिढीसाठी पुलं पुन्हा जिवंत करणारा अभिनेता म्हणूनही त्याचं आमच्यावरचं ऋण मोठं आहे.
आधी रसिका जोशी आणि आता अतुल परचुरे…कर्करोगाने आमचे दोन लाडके मोती आमच्यापासून अकाली हिरावून घेतलेत, आधीच आमच्या पिढीत ज्यांचे पाय धरावेत असे लोक कमी, त्यात ज्यांचे पायही धरावे आणि गळाभेटही घ्यावी अशी ही माणसं जर अकाली हिरावून घेतली, तर उथळ मनोरंजनाच्या जमान्यात सकस खुराकाची कमतरता आमच्यासारख्यांनी कशी भरुन काढायची?
या प्रश्नांची उत्तरे कधीच न‌ मिळणारी आहेत. आणि काळ पुढे जाताना त्यात भरच पडत्ये.
श्रद्धांजली हा शब्द इतक्या लवकर अतुल परचुरेसाठी असूच शकत नाही.
एरंडाच्या झुडपांमधल्या मोजक्या कल्पवृक्षांपैकी एक होतात तुम्ही ! आणि राहाल !!

घनश्याम सारडा
पुणे🙏🙏

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)