आजचा सुविचार व सुविचार संग्रह (Thought of the Day & Collection of Thoughts)

IIश्री स्वामी समर्थII

.

  • 270.
  • 269.
  • 268.
  • 267. अहंकारी व्यक्तिस सत्य स्वीकारने अवघड जाते व सत्य जाणणारा अहंकार येऊ देत नाही..
  • 266. सत्य स्वतः साठी, प्रेम इतरांसाठी व दया सर्वांसाठी हा समाधानी आयुष्याचा कान मंत्र आहे.
  • 265. पद, प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे, नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसे तुमची वाणी आणि विचारांशी जोडलेली असतील, ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील..
  • 264. यशाचा कधी गर्व करू नका, फूल किती ही ऊंच फांदी वर असले तरी माती ला धरून राहिले तरच उमलते.
  • 263. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही. फक्त त्यांना दु:खाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते…
  • 262. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात, कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो, पण फार काळ टिकवून नाही ठेवू शकत…
  • 261. कोणतेही नाते टिकण्यासाठी आवड आणि निवड जेवढ़ी महत्वाची आहे तेवढ़ीच एकमेकांसाठी सवड़ ही तितकीच गरजेची आहे.
  • 260. फक्त अत्तर च नाही तर चांगल्या माणसांचा सहवास देखील आयुष्य सुगंधित करतो.
  • 259. सहकार्य आणि सत्कर्म जाहिरात न करता केले तर त्यातून निर्माण होणारे माधूर्य आणि समाधान अतुलनीय असते.
  • 258. डोळे तर जन्मतःच मिळालेले असतात, पण कमवायची असते ती “नजर” चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची.
  • 257. सुखाचा क्षण बाजारात विकत नाही मिळत, त्यासाठी माणूसकी आणि माणसं कमवावी लागतात.
  • 256. काही कारणामुळे एखादे नाते अनमोल वाटते, पण जे अनमोल नाते कारणा शिवायच बनते, ते आयुष्य भर जपून ठेवा.
  • 255. आयुष्याने दिलेल्या सुख दुःखाचे पारडे कधीही समतोल नसते, कणभर सुख हे कायम सरस ठरते…
  • 254. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की, मतभेद सुध्दा हसत-हसत स्विकारता आले पहिजेत.
  • 253. ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून राहील असे नाही, पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून रहाते…
  • 252. उलट उत्तर देणे नक्कीच चुकीचे आहे, पण नुसतेच ऐकून घेत बसलात, तर लोक बोलायची मर्यादा पार करतात.
  • 251. “दिखावा” आणि “देखावा” यातला फरक कळला की, “आयुष्य” आणि “माणसं” समजायला सोपं जातं…
  • 250. आयुष्यात बदल घड़वण्यास नेहमी तयार रहा, अन्यथा काय साध्य होऊ शकते या पेक्षा काय गमवू याचा जास्त विचार करत रहाल.
  • 249. स्वतः:च्या ज्ञानाच्या अपूरेपणाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे.
  • 248. कोणाला हृदयात सामावून घ्यायचे असेल तर मन मोठे करा पण कोणाच्या हृदयात स्थान मिळवायचे असेल तर स्वतः छोटे व्हा..
  • 247. यश मिळे पर्यंत आपल्या संकल्पा वर ठाम रहा वेळ पाहून मार्ग बदलला तरी एक वेळ चालेल, पण हाती घ्याल ते तड़ीस न्या.
  • 246. जगातील सर्वात मोठा आणि शाश्वत आनंद म्हणजे इतरांच्या आनंदाचे कारण होणे.
  • 245. लॉटरी काय फक्त पैशाची नसते, चांगल्या माणसांचा सहवास लाभणे हे मोठी लॉटरी लागण्यासारखेच आहे.
  • 244. मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत, तेव्हा रस्ता बदला,”सिद्धांत” नाही,कारण झाड नेहमी ‘पान’ बदलतात ‘मूळ’ नाही.
  • 243. दगड पाण्यात फक्त भिजतो अन् माती निरागसपणे विरघळते; भिजणं आणि विरघळण्यातला फरक कळला की, सगळी नाती नितळ होतील…
  • 242. माणसं जरी सोन्या सारखी बावनकशी भासत असली तरी त्यांच्यातही कॅरेटचा फरक असतोच.
  • 241. डोळे बंद केले म्हणून संकट निघून जात नाही, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संकटाचे संधीत रूपांतर करा, नाहीतर संकट अंगलट आल्याशिवाय डोळे उघडणार नाहीत.
  • 240. हातात रिकामे पात्र पाहून असे समजू नका काहीतरी मागायला आला आहे, कदाचित तो सर्वकाही दान करुन आला असेल.
  • 239. लोक कौतुक करो वा ना करो, आपण आपल्यासाठी आपले काम चोख केले पाहीजे, कारण चुका तर लोक देवा च्याही काढतात.
  • 238. पुस्तकांप्रमाणे माणसांना पण वाचायला शिका कारण पुस्तके माहिती देतात आणि माणसं अनुभव…
  • 237. फुलपाखरू क्षण मोजते, मग त्याला आनंदाने जगण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो.
  • 236. गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते, परंतु वटवृक्ष उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो, तसेच चांगले विचार रुजण्यासाठीखुप उशीर लागतो पण एकदा रुजले की आयुष्यभर विसरत नाही.
  • 235. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य…
  • 234. माणुसकी बघितली तर दिसते, दाखवली तर भेटते, जाणली तर शेवटपर्यंत टिकते.
  • 233. कसलं न कसलं वेड अवश्य हवं माणसाला, वेडं होता येत नाही तो शहाणा माणूस कसला..
  • 232. ध्येयवेड्या व्यक्तिच्या कामाच्या वेळेला सुट्टी नसते व स्वप्नाना अंत नसतो…
  • 231. पुर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो, त्याचप्रमाणे आयुष्याच्या लेखात अपयश आले तरी नव्याने यशाची सुरूवात करु शकतो.
  • 230. मन ओळखणाऱ्या माणसांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी असते.
  • 229. फांदीवर बसलेली चिमणी फांदी तुटेल म्हणून कधीच घाबरत नाही कारण ती फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवते.
  • 228. सुख आणि दुःख आपल्या मनात उगवलेली दोन झाडे आहेत, आपण ज्याला जास्त खतपाणी घालू तेच जोरात वाढणार..
  • 227. एखाद्या व्यक्तिची महानता त्याचेकडे काय आहे यापेक्षा तो इतरांना काय देऊ करतो यावर ठरते.
  • 226. एखाद्या व्यक्तिचा समजूतदारपणा आणि परिपक्वता हे वयाने नाही तर आयुष्यात घेतलेल्या अनुभवांनी सिद्ध होते.
  • 225. वयाला हरवायचे असेल तर छंदा ला जिवंत ठेवले पाहीजे.
  • 224. नेहमी सकारात्मक रहा, कारण समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही.
  • 223. आयुष्यात लांबुन पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेला पावसाळा अधिक महत्वाचा ठरतो नाही…
  • 222. राग आणि वादळ शांत झाल्यावरच समजतं, की किती नुकसान झालं.
  • 221. जीवनात संकटांवर मात करायची असेल तर स्वतः ला शांत सरोवरा सारखे ठेवा, ज्यात कोणी आगेचा गोळा जरी फेकला तरी थंड होईल.
  • 220. आयुष्यात ज्या कामाची भीती वाटते ते काम नक्की करा कारण, भीती तुम्हाला संकटावर मात करायला शिकवते.
  • 219. जो इतरांच्या सुखासाठी सोसतो स्वतः दुःखाची झळ, अभेदय असते त्याचे मनोबळ
  • 218. या जगात समाधान शोधा, गरजा काही संपतच नाहीत.
  • 217. काही गोष्टी अशा असतात ज्या मन दुखावतात पण जगाकड़े पाहण्याचा दृष्टिकोण एकदम ठीक करतात.
  • 216. संयमात शाश्वती असते, मन शाबुत ठेवले की आयुष्य हसत हसत पैलथडीला नेता येते.
  • 215. माणसाला चमकायचंच असेल तर’ स्वतःचा प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वतःचे तेज निर्माण करता आले पाहिजे.
  • 214. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदु होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ.
  • 213. आयुष्यात कधी निराश व्हायचं नसतं, जिथे दुःख दाटतं तिथेच थोड्या दूर सुख सुध्दा वाट पाहात थांबलेल असतं
  • 212. अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते, उन्हात चालताना सावलीची गरज असते आणि आयुष्याची वाट चालताना चांगल्या माणसांची गरज असते.
  • 211. सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो आपुलकीच्या शब्दांनाही असतो.
  • 210. विचार करण्याची पद्धत तुमच्या आयुष्याची दिशा ठरवते, गुलाबास काटे असतात यापेक्षा काट्याना गुलाब असतात हा विचार आनंद देतो.
  • 209. प्रगती जरूर करा पण घमंडी व बेफिकीर होऊ नका, कारण गाड़ी किती ही वेगाने धावली तरी तिला रोकण्यास एक खिळासुद्धा पुरेसा ठरतो.
  • 208. जिवंत तोच जो परिस्थिती बदलवण्याची जिद्द ठेवतो.
  • 207. इच्छा प्रामाणिक असेल तर बदल करायचा की नाही हे ठरवायला जेवढा वेळ लागतो, त्या पेक्षा कमी वेळ स्वतः मधे बदल करायला लागतो.
  • 206.सगळेच निर्णय आपले नसतात, काही वेळेचे असतात.
  • 205. भाळणे संपल्यावर उरते ते फक्त सांभाळणे आणि हे ज्याला जमले त्याला आयुष्य कळले.
  • 204. आपल्याला रडवण्याची ताकद त्याच व्यक्ती मधे असते जिला आपण आपल्यापेक्षा जास्त जीव लावलेला आहे.
  • 203. आयुष्य हल्के फुलके आहे, ओझे असते ते अपेक्षेचे.
  • 202. रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात, त्या गैरसमज दूर करण्यास मदतच करतात.
  • 201. पायातील काटा आणि वागण्यातील ताठा निघुन गेला की आयुष्य चालायला मजा येते.
  • 200. जर यशाच्या गावाला जायचे असेल तर काही वेळा अपयशाच्या वाटेवरुन चालावेच लागते.
  • 199. या जगात टिकण्या साठी आत्मविश्वास हा भीती पेक्षा कायम वरचढ असला पाहीजे.
  • 198. जे पेरलय तेच उगवणार, फक्त आपल्या कर्मा शी प्रामाणिक रहा.
  • 197. दिवस आणि रात्र याचे मर्यादे पलिकडे होते ती भक्ती, वेळ बघून होतो तो निव्वळ व्यवहार.
  • 196. विचारांची पारदर्शकता हा यशस्वी नात्याचा कानमंत्र आहे.
  • 195. काही वेळा काही गोष्टी केवळ निकट जाण्याने न मागता प्राप्त होतात, जसे की अग्नी मुळे उष्णता, बर्फामुळे शीतलता, फुलांचा सुगंध आणि ईश्वराची कृपा.
  • 194. काही वेळा काही गोष्टी धरुन ठेवन्यापेक्षा सोडून देण्यात जास्त शहाणपण असते.
  • 193. नात्याची मधुरता त्यालाच उमगते, ज्याला कुठे हसायचे आणि कुठे रूसायचे हे कळते.
  • 192. माणूस म्हणून जगता आले पाहीजे, जग खूप चांगले आहे, फक्त चांगले वागता आले पाहीजे.
  • 191.कष्ट हा उम्बरया वरचा दिवा आहे ज्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीवर प्रकाश पडतो.
  • 190. नेतृत्व व कर्तुत्व उसने मिळत नाही, ते स्वतः लाच निर्माण करावे लागते.
  • 189.विचार करूनही फायदा होत नसेल तर खरच विचार करण्यासारखी वेळ आहे.
  • 188. त्रास असतानाही, प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं, यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात…
  • 187. ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्यातरी रस्त्याने समुद्रा पर्यंत पोहोचतंच त्याचप्रकारे निःस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने देवा पर्यंत पोहोचतेच…
  • 186. कोणती ही गोष्ट करण्यासाठी प्रत्येक क्षण हा योग्य च असतो, चुकतात ते आपले निर्णय.
  • 185. अडथळा पार करत पुढे सरकायच असतं, धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवण थांबवायच नसतं.
  • 184. नाते टिकण्यासाठी ओढ़ व संयम दोन्हीचा समतोल साधावा लागतो, नात्याची वीण घट्ट जरूर असावी, पण रुतेल अशी नसावी.
  • 183. कधीही आपली तुलना इतरां बरोबर करु नका, प्रत्येक फळ हे वेगळे असते व स्वतः चे असे वैशिष्ट्य असते.
  • 182. तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही, पण त्यातील चुकांपासुन सुरक्षित अंतर राखून भविष्यकाळ उज्वल बनवू शकता.
  • 181. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करावा.
  • 180. जे साध सोप असते तेच छान असते मग ते जगणं असो वा वागण.
  • 179. आशा व संवेदना कायम जागृत ठेवा, सूर्य मावळतो व परत उगवतो पण विझत मात्र नाही.
  • 178. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही.
  • 177. आयुष्य सोपे नसते, ते सोपे बनवायला लागते, काही अंदाज बांधून तर काही नजरअंदाज करून.
  • 176. जेव्हा आयुष्यात पर्याय म्हणून कोणीच उभा नसतो, तेव्हा उत्तर बनून स्वतः च उभं राहायच असतं.
  • 175. या रंगी बेरंगी दुनियेत दुःख विसरून समाधानी व्हायचे असेल तर उधळा रंग प्रेमाचा, स्नेहाचा, नात्यांचा.. बंधांचा..हर्षाचा आणि ऊल्हासाचा..
  • 174. आवडीचे लोक सवड़ीने वागायला लागले की नात्याची किंमत कमी होते.
  • 173. चांगली माणसे सोबत असली की वाईट दिवस ही सुसह्य होतात.
  • 172. आयुष्य फक्त अनुभव देते, सुख आणि दुःख अशी आपण त्याची वाटनी करतो.
  • 171. आनंद ही मनाची नैसर्गिक अवस्था आहे, फोटोसाठी सर्वच उसने हसताना दिसतात.
  • 170. निःस्वार्थ मैत्रीचे कधी मोल करु नका, झाड़ कधी आपली सावली विकताना कोणी बघितलेय का
  • 169. हुंकार हेच सांगतो की नेमकी भावना व्यक्त करायला शब्द पुरेसे नसतात.
  • 168. तुम्ही एखाद्या व्यक्तीला तेव्हाच पूर्ण ओळखता, जेव्हा ती व्यक्ती जे बोलायला जात नाही ते ही तुम्ही समजू शकता.
  • 167. जपल्या तर आठवणी नाहीतर केवळ क्षण, राहतात त्या आठवणी आणि दुरावतात ते क्षण
  • 166. शांत रहा, सहन करा, बघत रहा…तो पर्यंतच जो पर्यंत तुमची वेळ येत नाही.
  • 165. साधेपणा त सौंदर्य असते व क्षमा करण्यात शक्ती दिसते
  • 164. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते.
  • 163. स्वतःचा खिशात लाखोंचा खळखळाट असावा, पण त्यामागे गरीबाच्या एका रुपयाचा ही तळतळाट नसावा.
  • 162 रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते.
  • 161. जर हारण्याची भीती झुगारुन दिली, तर जिंकण्याचे पर्याय समोर येत राहतात.
  • 160. सुखासाठी धडपडने गैर नाही, परंतू त्यांस कुठेतरी समाधानाची व संतुष्टी ची सीमा हवी.
  • 159. स्वतः स हिरा बनवण्यासाठी प्रयत्न करा…दुर्मिळ आणि किंमती.
  • 158. आपण काय पाहतो या पेक्षा कसे पाहतो हे महत्वाचे
  • 157. संवाद संपला की नातं थांबत, बोलून बघा कदाचित हरवलेले पुन्हा गवसेल.
  • 156. दुःखा त सुद्धा ज्याने आनंदाचा क्षण शोधला, त्यालाच आयुष्याचा अर्थ उमगला.
  • 155. प्रेमाची माणसं अवचित तुम्हाला वेदना देतीलही, पण खात्री असू दया त्यामागे तुमच्या भल्या चीच भावना असेल.
  • 154. एक वेळ मन मोकळे असणे चालेल, जीभ मोकळी सोडू नका.
  • 153. औषधांनी पडत नाही तोच फरक दहा मिनिट ज्यांच्याशी बोलून पडतो ना ती माणसं आपली समजा.
  • 152. शाश्वत प्रेम तिथेच जन्म घेतं, जिथे एकमेकांचे मन जपलं जातं
  • 151. नाते सांभाळण्यासाठी चुका सांभाळून घेण्याची मानसिकता आणि नाते टिकविण्यासाठी नको तिथे चुका काढण्याचे टाळणे गरजेचे असते.
  • 150. येणारी वेळ म्हणजे काय हे त्या लहाणग्या मुलाला विचारा जो दोन घास मिळावेत यासाठी खेळण्याच्या दुकानात काम करतो
  • 149. एखादी गोष्ट कोणताही किँतु मनात न येता आवडते, तेव्हा ती स्विकारण्या योग्य समजावी.
  • 148. दिसणे आणि असणे या पेक्षा महत्वाचे असते ते जाणवणे…
  • 147. हसावे रूसावे, जे जे वाटेल रुचेल, ते ते करावे, आयुष्य मात्र भरभरुन जगावे.
  • 146. शब्द हे एका चावीसारखे असतात, कधी मन मोकळे, तर कधी तोंड बंद करतात.
  • 145. नेहमी लक्षात ठेवा हूरहूरच प्रेम व संबंध टिकवून ठेवते, भूंगा तोपर्यंतच फुलाभोवती रुंजी घालतो जोपर्यंत त्यास मध चाखायला मिळत नाही.
  • 144. आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद देणारे पान हे ‘बालपण’ असत…
  • 143. युद्ध जेव्हा आपल्या माणसांशी असते तेव्हा एक वेळ हरावे लागले तरी चालेल, पण युद्ध जेव्हा स्वतः शी असते तेव्हा, प्राणपणाने लढायच असतं.
  • 142. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो, पण स्वभावाची कमतरता सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही.
  • 141. समाधानी वृत्ती जोपासली तर स्वतःला आनंदी ठेवणं सोपं जातं.
  • 140. आनंद हा चंदना सारखा असतो, इतरांच्या कपाळी लावताना आपली बोटे सुगंधी होतातच.
  • 139. जीवनात सुखा बरोबर दु:खालाही झेलायच असत आणि स्वतःला विसरून सा-यांमध्ये मिसळायच असत
  • 138. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते, महत्वाची असते ती फक्त असाधारण जिद्द.
  • 137. समाधान ही अंतःकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली, तो जगात सर्वात सुखी.
  • 136. जीवनात थोड सोसायच असत तर बरच भोगायच असत, ओल्या पापण्या मिटून ओठांनी हसायच असत.
  • 135. एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात.
  • 134. मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. काही वेळा एकच साधता येतं, स्वतःच सुख नाहीतर दुसऱ्याचं मन.
  • 133. सकारात्मक माणसांच्या मनात देखील कधी कधी नकारात्मक विचार येतात. फरक इतकाच की ते नकारात्मक विचाराच्या अधीन होत नाहीत.
  • 132. एखाद्याच्या मनाचा ठाव घेणं खूप कठीण, शांत पणे पहुडलेला समुद्र बहुतेकदा जास्त खोल असतो.
  • 131. पालकांनी हे स्वीकारणे गरजेचे की, आपलं घरटं सोडुन बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळणार नाही.
  • 130. विजय निश्चित असेल तर डरपोक सुद्धा डरकाळी देतो, बहादुर तो जो हार निश्चित असून देखील लढायला तयार असतो.
  • 129. काही मिळवायचे असेल तर त्याग करायला पण शिकले पाहीजे, श्वास सुद्धा सोडल्या शिवाय परत घेता येत नाही.
  • 128. आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेळ आली की नक्की मिळेल, फक हेतु शुद्ध व प्रामाणिक असू दे.
  • 127. वेळ कधीही बदलू शकते, तेवढेच निष्ठुर व्हा, जेवढे तुमच्या वर वेळ आली तर सहन करु शकाल.
  • 126. मोह संपला की संपते ती मिळवण्याची इच्छा व गमावण्याचे भय.
  • 125. एका मिनीटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनीट नीट विचार करुन घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो..
  • 124. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात…
  • 123. आपले विचार नेहमी तपासून पहा, कारण विचारां मधून हेतू तयार होतो व हेतू मुळे कृती घडते.
  • 122. दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, जो नेहमी विचार परावर्तीत करतो.
  • 121. जिभेचं वजन खुप कमी असतं… पण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं…
  • 120. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड आतून असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक नाही घेता येत …
  • 119. जेव्हा आपण म्हणतो, किती बदलला आहेस रे, त्याचा अर्थ एवढाच की तो आपल्या मनासारखा वागत नाहीये…
  • 118. वय वाढल्यावर जेष्ठ व्हावे, वृद्ध नाही. कारण… वृद्धत्व इतरांचा आधार शोधते तर जेष्ठत्व इतरांना आधार देते.
  • 117. तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो
  • 116. पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलूट करावी ती सुगंधाचीच.
  • 115. विचारांची काळजी घेतली तरच विचार तुमची काळजी घेतील.
  • 114. असलेल्या गोष्टीत रमता आले की नसलेल्या गोष्टीची हळहळ कमी होते.
  • 113. काही गोष्टी बाहेर मिरवण्यापेक्षा मनात गिरवल्या तर जास्त समाधान लाभेल.
  • 112. श्वास पूर्ण होतो पण इच्छा अपूर्ण राहतात तो मृत्यू आणि श्वास राहतो तरी इच्छा लोप पावतात तो मोक्ष
  • 111. कुठे थांबावं आणि कुठे थांबून राहू नये हे कळलं की जगणं सोप्पं होऊन जातं.
  • 110. दुसऱ्यांच्या दुःखाने सुखी होतो तो “दानव”, दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होतो तो “मानव” व दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होतो तो “देव” जाणावा.
  • 109. सर्वात मोठे ओझे हे आपल्या मनावरचे असतं, ते फेकून दिलं की आयुष्य हलकं फुलकं होतं.
  • 108. शांत राहन्यासाठी तल्लख स्मरणशक्तीप्रमाणेच तल्लख विस्मरणशक्ती पण तेवढ़ीच महत्वाची असते
  • 107. एखादी व्यक्ती तुमची मनापासून काळजी घेते ती त्याला गरज आहे म्हणून नाही तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी कोणीतरी खास असता म्हणून
  • 106. प्रत्येक दिवस एक “अपेक्षा” घेऊन सुरू होतो,आणि एक “अनुभव”घेऊन संपतो…
  • 105. विचाराकडून आकारा कड़े सरकणे हा मानवी स्वभाव आहे, त्यास निराकाराकडे वळवणे ही साधना होय.
  • 104. सुंदर विचारांची जोपासना हीच तर परमेश्वराची उपासना.
  • 103. इतरांचा आपल्याला त्रास होतो हे समजते, मग आपला कोणाला त्रास होईल असे वागू नये हे जड़ का जाते…
  • 102. प्रचंड प्रेम करणारी माणसे कशाची शाश्वती मागत नाहीत.
  • 101. व्यक्तिगत गरजें पेक्षा वृत्तिगत गरजा जास्त असतात, त्या आवरता आल्या तर आयुष्य सूखकर होते.
  • 100. कोणी दखल घेवो अथवा दुर्लक्ष करो, शांतपणे कर्तव्य करत रहा… जग झोपेत असलं तरी सूर्य उगवायचा थांबत नाही.
  • 99. कानाने ऐकलं तर शब्द ऐकू येतात आणि मनाने ऐकलं तर शब्दानमागील अर्थ…
  • 98. ठेच तर लागत राहणार ती पचवायची हिम्मत ठेवा, कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची किंमत ठेवा.
  • 97. जीव लावणारी असली की वाईट दिवस सुद्धा थोड़े सुसह्य होतात.
  • 96. काही नाती असून नसल्या सारखी असतात, तर काही नाती नसून सुद्धा असल्या सारखी असतात.
  • 95. कीर्ती ही सदगुणांची सावली आहे.
  • 94. माझे ते खरे म्हणण्यापेक्षा खरे तेच माझे म्हणा.
  • 93. दुःखाने मन कडू करण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे.
  • 92. आशा ही उत्साहाची जननी आहे.
  • 91. चंदनाला आपली ओळख सांगावी लागत नाही, त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
  • 90. अंत:करणापासून येते तेच अंत:करणाला जाऊन भिडते.
  • 89. लहानांना मोठं करण्यासाठी काही वेळा मोठ्यांना लहान व्हावं लागतं.
  • 88. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती वेळीच शांत करा.
  • 87. जो वेळ वाया घालवतो त्याच्यावर एक वेळ अशी येऊ शकते की गमवायलाही काही उरणार नाही.
  • 86. प्रवासावरुन केव्हा परतावे हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.
  • 85. नात्यात अपेक्षा ठेवणे गैर नाही, पण अपेक्षा मनात ठेवून नाते जोडणे नक्कीच.
  • 84. काही लोक अशी पण आयुष्यात येतात, जी आयूष्यात राहिली नाही राहिली तरी आयुष्य बनून राहतात.
  • 83. कोमल भावना नाते मात्र मजबूत बनवतात.
  • 82. सदैव आनंदी राहण्यासाठी साधनांची नव्हे आंतरिक उर्मी जागृत होण्याची आवश्यकता असते.
  • 81. तुम्ही तेव्हा श्रीमंत ठरता, जेव्हा पैशाने विकत न घेता येणारी एखादी गोष्ट कमवता.
  • 80. ‘काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव’ ज्यांना कळतात.. त्याच, नात्यांना खरा अर्थ असतो..
  • 79. हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात अन् प्रेमळ शब्द असतात जादुगर ज्यांनी माणसे जोडली जातात.
  • 78. हक्क गाजवंण्या आधी त्या नात्यातील कर्तव्य पार पाडले तरच त्या हक्काची किंमत राहते.
  • 77. जी परिस्थिती आपले मन स्वीकारते, तेच खरे सुख आहे
  • 76. खोटं ऐकायला तेव्हा मजा येते जेव्हा सत्त्य अगोदरच माहित असतं…
  • 75. नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकार करुन साथ निभावण्यात आहे.
  • 74. आयुष्यात हार न मानता जो झटेल तोच जिंकेल, आणि जो न लढेल तो हारेल
  • 73. आयुष्य जेव्हा खडतर परिक्षा घेऊ लागते, तेव्हा जिद्द जन्म घेते.
  • 72. सुंदर दिसावे हे वाटणे चांगले आहे, पण चांगले असणे हे केव्हाही सुंदर च वाटते
  • 71. कधी कधी देव परिस्थिती बदलत नाही, कदाचित त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.
  • 70. “सारे काही संपलेय” या नकारात्मक विचाराच्या मागे फक्त “नकारात्मक” जोडू शकलात तर ती एका नवीन सुरूवातीची चाहुल असू शकते
  • 69. स्मित ही अशी वक्र रेषा आहे, जी अनेक गोष्टी सरळ व सरल करते.
  • 68. लोक तुम्हाला वेडा ठरवून हसत असतील तर साफ दुर्लक्ष करा, लोक हसायला येतात, पोसायला नाही.
  • 67. अनेक वेळा अमृत शिंपडणारे क्षण कठिन प्रसंगाचा बुरखा पांघरुन येतात त्यामुळे संयम सोडू नका
  • 66. एखाद्या विषयात ऊंची गाठण्यासाठी त्या विषयाची खोली माहीत असणे गरजेचे आहे.
  • 65. स्वतः च्या क्षमतांवर विश्वास हवा, ससा घाबरतो म्हणून सिंह स्वतः ला राजा समजत नाही.
  • 64. एखादी व्यक्ती तुम्हाला चुकीच्या पद्धतीने वागवते हे माहीत असून देखील तुम्ही तिच्याशी कसे वागता हीच तुमच्या परिपक्वते ची खरी परीक्षा असते.
  • 63. एखादे विषयी आपले मत बनावण्या पूर्वी आपला दृष्टिकोण तपासून पहा, शबरीने उष्टि बोरं दिली यामागचे तिचे रामा बद्दलचे प्रेम व भावना लक्षात घ्या.
  • 62. नेहमी चांगल्या लोकांच्या संगती त रहा, जो व्यक्ती चांगल्या वॄक्षाचा आसरा घेतो त्याला चांगलीच सावली मिळते.
  • 61. विझत चालला असाल तरी परत पेटून उठा, इच्छाशक्ती सारखे सामर्थ्य नाही.
  • 60. अवास्तव अपेक्षा वाढल्या की वास्तवातील माणसं गमावण्याची वेळ येते.
  • 59. प्रत्येकाचे स्वतः चे असे वैशिष्ट्य असते, केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
  • 58. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.. त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते.
  • 57. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावच लागतं.
  • 56. जगातील सर्वात सुंदर रोपटे आत्मविश्वासाचे असते जे आपल्या मनात रुजवावे लागते.
  • 55. खरं नातं एका चांगल्या पुस्तकासारख असत, ते कितीही जुनं झाल तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत.
  • 54. आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.
  • 53. लोकांच बोलणं कधीच मनाला लावून घेवू नका….लोकं पेरू घेताना गोड आहे का विचारतात आणि खातांना मीठ लावून खातात.
  • 52. पुस्तकाप्रमाणे माणसांना पण वाचायला शिका, कारण पुस्तके माहिती देतात आणि माणसे अनुभव
  • 51. संवाद चालू ठेवण्यासाठी वेळ आणि शब्दांपेक्षा मनापासून इच्छा लागते.
  • 50. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
  • 49. जर अशा व्यक्तीच्या शोधात असाल, जो तुमचे आयुष्य बदलेल तर आरशात पाहा…
  • 48. स्वप्ने पूर्ण होण्यासाठी हुशार नाही, वेडे व्हावे लागते.
  • 47. पाण्याच्या लाटा पाहत किनाऱ्यावर बसून समुद्र पार करता येत नाही.
  • 46. जगात असे दोन प्रकारचे लोक आहेत, एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो.
  • 45. वेगापेक्षा आपण वेगाने कोणत्या दिशेला चाललोय हे समजणे जास्त गरजेचे आहे.
  • 44. माणसे कळण्यासाठी त्यांचे मनाविरुद्ध वागा आणि फक्त पहा…
  • 43. कोणत्याही प्रवासाची सुरुवात करण्यासाठी आधी एक पाऊल पुढे टाकावे लागते.
  • 42. ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं जिथं ते सुरक्षित राहील.
  • 41. मनापासून जपले जातं, तेच खरे नातं असतं आणि हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो.
  • 40. कौतुक कमी शब्दांत देखील करता येते, पण त्यासाठी मन मात्र मोठे असावे लागते.
  • 39. जिद्द असेल तर आयुष्याच्या वाटेवर चुकलेले एखादे वळणसुद्धा नवीन वाट शोधण्याची प्रेरणा देते
  • 38. शब्द दिल्याने आशा निर्माण होते आणि शब्द पाळल्याने विश्वास.
  • 37. आवड असेल तर सवड मिळेल
  • 36. चिकाटी हा फार छोटा शब्द आहे, पण ज्याला चिकटतो त्याचे आयुष्याचे सोने करतो.
  • 35. खांद्या ना आव्हान पेलायची सवय झाली की पावले आपोआप संघर्ष करु लागतात.
  • 34. आयुष्यात पुन्हा सुरुवात करावी लागली तर घाबरू नका…कारण यावेळेस सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून असेल
  • 33. तुम्ही प्रत्येक क्षणाची काळजी घ्या तास स्वतः ची काळजी घेतील…
  • 32. नेहमी स्वतः सोबत पैज लावा, जिंकेल तो आत्म विश्वास आणि हरेल तो अहंकार
  • 31. बोलताना आवाजाची नव्हे तर शब्दांची उंची वाढवा कारण.. पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटाने नाही…
  • 30. हव्यास सोडला की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख…
  • 29. प्रत्येक माणसात थोड़ा तरी चांगुलपपणा दडलेला असतो, प्रत्येक काळ्या ढगाला रूपेरी किनार असते.
  • 28. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण कृती करण्याची वेळ आली की स्वतःला कार्यात झोकून द्या.
  • 27. नुसते पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत. माणसांचे देखील असेच असते.
  • 26. मनमोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातलं अंतर कळाल की आयुष्याच्या वाटा या आभाळासारख्या स्वच्छ व निरभ्र होतात.
  • 25. ध्येय साध्य होत नसेल तर मार्ग बदला ध्येय नाही, कारण झाडे पाने बदलतात, मुळे नाही.
  • 24. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्ती-मंत आयुष्य घडते.
  • 23. डोक शांत असेल तर निर्णय बरोबर येतात, भाषा गोड असेल तर माणसं जवळ राहतात.
  • 22. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग भरकटू न देण्याचे नियंत्रण कौशल्य स्वतः जवळ हवे.
  • 21. गैरसमज करुन घेण्यापेक्षा, थोड़े समजून घेणे बऱ्याच वेळा योग्य ठरते.
  • 20.. एखादी गोष्ट विसरायचीय हेच विसरुन जा, कारण काही विसरायचे म्हटले की सगळच आठवते.
  • 19. दोष शोधायची हौस असेल तर जरुर पूर्ण करा, फ़क्त सुरुवात स्वत:पासून करा
  • 18. सावलीत उभे राहून स्वता:ची सावली निर्माण होत नाही, त्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते
  • 17. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
  • 16. मोठ मोठ्या गोष्टी करणारे बोलत राहतात, तेव्हा हलकेसे हसणारे बरेच काही सांगून जातात
  • 15. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, मात्र प्रत्येक गोष्ट वेगळे पणाने करतात.
  • 14. तुम्हाला खरी श्रीमंती मोजायची असेल तर कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले, तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
  • 13. कोणाशी तुलना करु नका, स्वतः वर विश्वास ठेवा. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही
  • 12. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
  • 11. कोणाला भीती आहे की देव मला पाहतोय तर कोणाला ठाम विश्वास आहे की देव मला पाहतोय.
  • 10. आयुष्याकडे पाहन्याचा सकारात्मक दृष्टिकोण हाच आनंदी आयुष्याच्या कानमंत्र आहे.
  • 9. आयुष्याच्या वाटेवर मागे वळून जरूर पहा, पण चालायचे आपल्याला पुढेच आहे हे लक्षात ठेवा
  • 8. जो कधीच विभक्त होत नाही, तोच खरा भक्त
  • 7. जे तुमच्या साठी महत्वाच्या कामातून वेळ काढतात त्यांचा जरुर आदर करा. पण प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही जास्त महत्वाचे वाटत नाही
  • 6. जरुरी नाही की प्रत्येक झाडाने फ़ळ दिलेच पाहीजे… काही झाडांची सावली सुद्धा समाधान देते.
  • 5. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात…मनातही…शब्दातही आणि आयुष्यातही…
  • 4. मित्र जर सुखात आहे तर आमंत्रणाशिवाय जाऊ नये… आणि मित्र जर दु:खात आहे तर निमंत्रणाची वाट बघू नये…
  • 3. मला ती नाती आवडतात ज्यात “मी” नाही …. आपण असतो
  • 2. धन संपन्न होण्यापेक्षा मन संपन्न होणे हे केव्हाही उत्तम. धन संपन्नता अहंकार निर्माण करु शकते तर मन संपन्नता संस्कार…
  • 1. विश्वास कधी चमत्काराची अपेक्षा करत नाही, पण बरेच वेळा ठाम विश्वासामुळे चमत्कार घडतात.
Latest Posts

जातकाचा बंगलोरहून आलेला फीडबॅक 😊🚩

साधारण वर्षभरापूर्वी मुलीच्या विवाहयोग गेली 4 वर्षे येत नव्हता, त्यासाठी कुंडली मार्गदर्शन साठी माझेकडे आले होते. त्यांना फेब्रुवारी 2026 पर्यंत विवाह ठरेल असे सांगितले होते. त्यांचा मुलीचे लग्न ठरल्याचा व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेला मेसेज शेअर करत आहे. ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)ज्योतिर्विदया वाचस्पतीसंपर्क : 7058115947(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

मा. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

मा. अजितदादा पवार यांना सर्व प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली मा. अजितदादा पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी देवळाली येथे झाला. जन्मवेळ ही बरेचदा 12 ही प्रसिद्ध व्यक्तींसाठी घेतलेली असते. त्यामुळे जन्मलग्न हे चुकीचे घेतले जाऊ शकते. त्यामुळे मी आज वेगळ्या पद्धतीने त्यांचे अकस्मिक जाण्याचे उत्तर मिळते का, याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करणार आहे. हे कोणतेही…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.