
विषय : वर्ज्य गोष्टी – अनुभविक ठोकताळे
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : अचूक निदान (खंड १ ला)
मूळ लेखक : कै. उद्धव विष्णू रुईकर (पंचांग कर्ते)
नमस्कार,
ज्योतिष शास्त्राची व्याप्ती अगदी दैनंदिन आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टींपासून विशिष्ट महत्वाच्या घडामोडी, मुहूर्त ई. बघण्या पर्यंत पसरली आहे. डॉक्टर अथवा वैद्य जसे निरोगी राहण्यासाठी अथवा आजार होऊ नये म्हणून रोजच्या दिनक्रमात काही पथ्ये पाळण्यास सांगतात. तसेच एक जाणकार ज्योतिषी रोजच्या व्यवहारात ग्रह, नक्षत्रे, तिथी यांचे कारकत्व, गुणधर्म ई. नुसार अनुभवातून दरवेळी कुंडली न पाहताही काही गोष्टी वर्ज्य करण्यास सांगून उत्तम दिशा देऊ शकतो. पूर्वीचे जुने जाणते लोक याचा दैनंदिन आयुष्यात खुबीने वापर करत असत. पण आज नवीन पिढीपर्यंत काही माहिती न पोहोचल्याने किंवा एकंदरीतच जीवन शैली बदलल्याने व आधुनिकता वाढल्याने या गोष्टीचे महत्व हळू हळू नाहीसे होत चालले आहे. असो.
असेच काही अनुभविक ठोकताळे व वर्ज्य करावयाच्या गोष्टींचे संकलन येथे देत आहे. अनिष्टता दूर करण्यासाठी व सकारात्मकता व निर्विघ्नता वाढीस लागण्यासाठी या छोट्या छोट्या टीप उपयुक्त ठरतील.
खालीळ गोष्टी वर्ज्य कराव्यात. (टाळाव्यात)
१. रविवारी – तैलाभ्यंग करू नये. स्त्रियांनी न्हाऊ नये.
२. मंगळवारी – स्मश्रू (हजामत) करू नये.
३. बुधवारी – स्त्री-संग करू नये.
४. सूर्यास्तानंतर – रात्री माती, शेण, सरपण, गोमूत्र घरी आणू नयेत.
५. दिवसा – निद्रा करू नये.
६. देव, गुरु, पिता, यांचेकडे व दक्षिण दिशेस पाय करून झोपू नये.
७. प्रतिपदा, षष्ठी, एकादशी या तिथीस तैलाभ्यंग; (न्हाणे) करू नये.
८. चतुर्थी, नवमी, चतुर्दशी – स्मश्रू (हजामत) करू नये.
९. पंचमी, दशमी, पौर्णिमा, अमावास्या स्त्रीसंग करू नये.
१०. सप्तमीस – ताम्रपात्रात भोजन करू नये. तीळ खाऊ नये.
११. अष्टमीस – नारळ, खोबरे वर्ज्य करावे.
१२. नवमीस – भोपळा वर्ज्य करावा.
१३. दशमीस – पडवळ खाऊ नये.
१४. एकादशी – पावटे, वाल, घेवडा, चवळी वर्ज्य करावी.
१५. द्वादशीस – मसुर खाऊ नये.
१६. त्रयोदशीस – वांगी वर्ज्य करावी.
१७. तृतीया, अष्टमी, त्रयोदशी – मांस खाऊ नये.
१८. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावास्या व संक्रांत या दिवशी तेल व मांस यांचे सेवन करू नये.
१९. हस्त, चित्रा, श्रवण या नक्षत्रास तेल वर्ज्य.
२०. मघा, कृत्तिका, तिन्ही उत्तरा या नक्षत्रांवर स्त्रीसंग वर्ज्य.
२१. विशाखा – स्मश्रू करू नये.
टीप : वरील तिथी, वार, नक्षत्रावर ती कृत्ये करू नयेत, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे, तथापि नैमित्तिक कारणाने ते करणे आवश्यक असल्यास हरकत नाही.
एखादा दिवस अनिष्ट चालला असेल, तर त्या दिन स्वामी ग्रहाची अनिष्टता दूर करण्यासाठी खालील गोष्टींचे दान करणे उपयुक्त ठरेल.
१. रवि अनिष्ट असता – गहू, मूळ, ताम्रपात्र यांचे रविवारी पूजन करून संकल्पपूर्वक दान करावे. २. चंद्र अनिष्ट असता – रुपे, मोती, तांदूळ, तूप, पांढरे कापड सोमवारी विधिपूर्वक पूजा करून दान करावे.
३. मंगळ अनिष्ट असता – ताम्रपत्रावर भौमाची प्रतिमा काढून विधीपूर्वक पूजन करावे. मंगळवारी मसुरा, गूळ, तांबडे वस्त्र, ताम्रपात्र यांचे संकल्प करून दान करावे.
४. बुध अनिष्ट असता – कास्यपात्र, मूग, तूप यांचे दान करावे.
५. गुरु अनिष्ट असता – कास्यपात्र, हरभऱ्याची डाळ, साखर, पिवळे कापड याची गुरुवारी पूजा करून दान करावे.
६. शुक्र अनिष्ट असता – तांदूळ, तूप, रौप्य, चित्रवस्त्र, खडीसाखर यांचे शुक्रवारी विधीपूर्वक दान द्यावे.
७. शनि अनिष्ट असता – शनिवारी लोखंड, उडीद, तेल, मीठ, काळे कापड यांची यथाशास्त्र पूजा करून त्याचे यथाशास्त्र दान द्यावे.
८. राहू काळ अनिष्ट असता – शिसे, तीळ, तेल, दान करावे.
९. केतू चा नक्षत्र दिन अनिष्ट असता – पोलाद, तीळ, तेल दान द्यावे.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)