
विषय : तत्व सिद्धांत
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : ज्योतिष सिद्धांत सार
मूळ लेखक/सौजन्य : ज्यो.रामा राव
नमस्कार,
ज्योतिष अभ्यासक होणे म्हणजे खोल सागरात डुबकी मारून मोती व विविध रत्ने वेचण्यासारखे आहे. जेवढे खोल जाऊ तेवढा जास्त खजिना नजसेस पडतो. फक्त त्यासाठी अवघे आयुष्य कमी पडते.
आपण लहानपणापासून वडीलधारे मंडळींकडून किंवा शाळेत शिकत असताना पाच तत्व महत्वाची आहेत हे ऐकत आलो आहोत. आपणा सर्वाना माहित आहे की, पंचतत्वांनी आपलं शरीर व्यापलं गेलं आहे, हीच पाच तत्व म्हणजे अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी.
आकाश तत्व :
आकाश हा एक असा घटक आहे ज्यामध्ये पृथ्वी, पाणी, अग्नि आणि वायू हे चारही घटक आहेत. आकाशाला आत्म्याचा वाहक मानला जातो आकाशात ढगही येतात, धूळही उडते आणि प्रकाशही असतो. त्याचप्रमाणे सुख, दुःख, शांती अशा सर्व भावना मनातही निर्माण होत असतात.
वायू तत्व :
पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी हवेला म्हणजेच वायूला सर्वात महत्त्वाचा घटक मानलं गेलं आहे. आपलं शरीर प्राणवायू च्या जवलानावर चालते, म्हणूनच त्याला सजीव असं म्हणतात. पृथ्वी, झाडं, वनस्पती, प्राणी, पक्षी ई. सर्वांनाच हवेची आवश्यकता आहे. म्हणूनच हवेला आयु म्हणजेच आयुष्य असंही संबोधलं जातं.
अग्नी तत्व :
अग्नी तत्व आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करते, त्याचप्रमाणे अग्नी देखील उर्जेच्या रूपात आपल्या शरीरात वसतो. अग्नीमुळेच शरीर हालचाल करू शकते. अग्नीचा घटक उष्णता, शक्ती, ऊर्जा यांचे प्रतीक आहे. आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण म्हणजेच अग्नी तत्वाच्या समतोल साधल्याने मुख्यतः शरीर निरोगी राहते.
जल तत्व :
पाणी हा मानवाच्या जीवनाचा किंबहुना सृष्टीतल्या चराचराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. मानवी शरीरात सुमारे ७० टक्के पाणी असते. त्याचप्रमाणे पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्याने भरलेला आहे. हे पाणी माणसाच्या रक्तात आणि शरीरात असते. सजीव काही दिवस अन्नाशिवाय जगू शकतात, परंतु पाण्याशिवाय जगणं कठीण आहे.
पृथ्वी तत्व :
एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी ज्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे सजीवांच्या निर्मितीसाठी पृथ्वीशिवाय इतर चार गोष्टींचीही आवश्यकता असते. पृथ्वी हे माणसाचं आणि इतर सजीवांचं निवासस्थान मानलं गेलं आहे.
ही पाच विशिष्ट कालावधीसाठी १) पृथ्वी २) आप (पाणी) ३) तेज (अग्नी) ४) वायू ५) आकाश या विशिष्ट क्रमाने कार्य करतात.
सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत ते ठराविक म्हणजे प्रथम चढत्या क्रमाने फिरतात त्यास आरोह म्हटले जाते. आणि नंतर घड्याळाच्या उलट दिशेने उतरत्या क्रमाने फिरतात त्यास अवरोह म्हटले जाते.
आरोह कालावधी अनुक्रमे ६ १२ १८ २४ आणि ३० मिनिटे आहे; आरोह-अवरोहाचे प्रत्येक आवर्तन पूर्ण होण्यासाठी ३ तास लागतात. दिवसात प्रत्येकी ३ तासांची ८ चक्रे मिळून २४ तास पूर्ण होतात. प्रत्येक दिवशी सूर्योदयाच्या वेळी तत्वाचे स्वरूप आठवड्याच्या दिवसावर अवलंबून असते. खालील सारणी तपशील देते:
ज्योतिष सिद्धांत सार मध्ये या तत्वांचा उपयोग करून बालकाचा जन्म कोणत्या तत्वानुसार मुलगा का मुलगी असेल, हे समजण्यासाठी एक पद्धती दिली आहे. ज्याचा उपयोग करून जातकाने दिलेली जन्म वेळ बरोबर आहे का हे तपासण्यासाठी उपयुक्त ठरते.
त्या बाबतची माहिती येथे देत आहे.
सूर्योदयाच्या वेळी जे तत्व ज्या दिवशी उदित असते, त्यानुसार त्याच्या दिलेल्या कालावधीनुसार आरोह अवरोह क्रमाने मांडणी करून सारिणी बनवता येते.
१) पृथ्वी तत्व : पुथ्वी तत्व हे बुधवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी ६ मिनिटे असतो.
जन्माच्या वेळेस पृथ्वी तत्व उदित असेल, तर पुरुष जातक जन्मास येतो.
२) आप तत्व : आप तत्व हे सोमवारी व शुक्रवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी १२ मिनिटे असतो.
जन्माच्या वेळेस आप तत्व उदित असेल, तर स्त्री जातक जन्मास येतो.
३) तेज तत्व : तेज तत्व हे रविवारी व मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी १८ मिनिटे असतो.
जन्माच्या वेळेस तेज तत्व उदित असेल, तर पुरुष जातक जन्मास येतो.
४) वायू तत्व : वायू तत्व हे शनिवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी २४ मिनिटे असतो.
जन्माच्या वेळेस वायू तत्व उदित असेल, तर स्त्री जातक जन्मास येतो.
५) आकाश तत्व : आकाश तत्व हे गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी ३० मिनिटे असतो.
जन्माच्या वेळेस आकाश तत्व उदित असेल, तर पुरुष जातक जन्मास येतो.
थोडक्यात सांगायचे झाले तर
१) जेव्हा पृथ्वी, तेज किंवा आकाश तत्व कार्यरत असेल, तेव्हा पुरुष बालक जन्म घेईल.
२) जेव्हा आप किंवा वायु तत्व कार्यरत असेल, तेव्हा स्त्री मूल जन्माला येईल.
३) पुरुष वाचक तत्व संपत असताना आणि स्त्री वाचक तत्व सुरू होत असताना जन्माला आलेली व्यक्ती नपुंसक असू शकते.
तत्व सिद्धांताचा त्या त्या तत्व कालावधीस दशां अंतर्दशा विभाजानासारखे अधिक विभाजीत करून तत्व अंतर तत्व अशा प्रकारे विभागले जाऊ शकते. व त्याचा सूक्ष्म वापर केला जाऊ शकतो.
जन्माच्या वेळी उदित असलेल्या तत्वाचे ज्ञान जातकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा अंदाज देते.
१) पृथ्वी तत्वामध्ये जन्मलेले जातक महत्वाकांक्षी असतात. भौतिकवादी दृष्टीकोन असतो.
२) तेज तत्वामध्ये जन्मलेले जातक तेजस्वी आणि प्रभावी असतात.
३) आकाश तत्वामध्ये जन्मलेले जातकांची अमूर्त विचार करण्याची क्षमता आणि कल्पक किंवा सर्जनशील बुद्धिमत्ता असते.
आरोह तथवा म्हणजे संधी आणि उपलब्धींमध्ये वाढत्या वयानुसार हळूहळू सुधारणा होत जाते व अवरोह तत्व कमी होत जाणारे परिणाम सूचित करते, या प्रकारे विश्लेषण करता येते.
याच पंच तत्वांचा प्रभावी वापर करून पाश्चात्य ज्योतिर्विद आलन लिओ याने प्रत्येक अंशाची फळे मांडली आहेत.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)