
विषय : देव देऊळ मूर्ती प्रतीके भावार्थ आणि उपासना
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : हिंदू संस्कृती
नमस्कार,
आज मि एका वेगळ्या विषयावर लिहिणार आहे. जगात दोन प्रकारचे लोक साधारणपणे आढळतात. धार्मिक, श्रद्धाळू व दुसरे अश्रद्ध विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन ठेवणारे. अर्थात या दोन्हीचे सोयीने मिश्रण करणारे लोकसुद्धा आहेतच. काहीवेळेस तथाकथित विज्ञाननिष्ठ ज्या वेळेस इतर लोक मंदिरात जाणा-या भक्तांची चेष्टा करत असतात व सांगत असतात की, तुमचा देव जर सर्व व्यापी आहे, तर मग त्यासाठी त्याला मूर्तीत किंवा देवळात शोधण्याची काय गरज आहे. देव सर्वव्यापक असल्याचे विधान वापरायचे, तर इतरत्र असल्या प्रमाणे तो ईश्वर देवळात, मूर्तीत सुद्धा असणारच हा मुद्दा ती माणसे विसरतात. केवळ या कारणास्तव, दगडाच्या मूर्तीची केवळ पूजा करीत नसून त्यातल्या ईश्वराच्या अस्तित्वाची, जो त्या स्वरूपात आहे, त्याची पूजा करतो. मूर्ति व देऊळ हे आमच्या मनाला ईश्वराच्या अस्तित्वाची जागरूकता आणून देण्यास मदत करीत असतात.
अनेकजन आपल्या कुटुंबाचा फोटो त्यांच्या ऑफिस मध्ये किंवा पाकिटात ठेवतात, ते त्या प्रिय व्यक्तीना विसरतात म्हणून नव्हे. तर त्यांना त्या फोटोमुळे आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम जागृत होत असते व त्यांच्या प्रति आपुलकीचा भाव मनात येत असतो.
कांही लोक एखादा वापरलेल्या वस्त्राचा तुकडा जपून ठेवतात. तसे केल्यांने, त्यांना स्वतःच्या प्रिय असणा-या माणसांची आठवण व त्यांच्या प्रति असणारा जिव्हाळ्याचा व प्रेमाचा एक आनंद मिळत असतो इतरांना तो केवळ तुकडा आहे एवढेच वाटते. हा पण एका प्रकारे श्रद्धेचा व प्रेमाचाच भाग आहे.
एक गोष्ट तुम्हाला सांगतो-
एकदा स्वामी विवेकानंद एका नास्तिक राजाकडे गेले असतांना राजां त्यांना म्हणाला की मूर्ति पूजनात कांही अर्थ नसतो, कारण मूर्ति म्हणजे केवळ एखादा कागद किंवा दगड आहे असे माझे मत आहे. त्या राजाच्या राजवाड्यात बरीचशी वडिलोपार्जित चित्रे भिंतीवर अडकवलेली होती. स्वामी विवेकानंदांनी एका मंत्र्याला त्या राजाच्या आजोबाचे चित्र काढून जमोनीवर ठेवण्यास सांगितले. नंतर ते चित्र तुडविण्यास सांगून त्यावर धुंकण्यास सांगताच, तो राजा भडकला व ओरडला, “हे काय करण्यास आपण सांगत आहात ?”
स्वामी विवेकानंद म्हणाले, मी त्यास त्या चित्रावर युंकण्यास सांगितले.”
तेव्हां तो राजा उद्वेगाने म्हणाला, आपण तसे कसे म्हणता? आपण माझ्या आजोबांचा असा अपमान करत आहात.
स्वामी विवेकानंद शांतपणे म्हणाले, त्यात काय चूक आहे माझी? हे तर केवळ एक चित्र आहे, ते आपले आजोबा तर नाहीत ना?
त्याच क्षणी राजाच्या डोक्यात प्रकाश पडला व त्यांनी तात्काळ स्वामी विवेकानंदांचे पाय धरले व क्षमा मागितली आणि मूर्ति पूजनाचा गूढार्थ ध्यानात आणून दिल्याचे आभार मानले.
सामान्यतः एखाद्याच्या नुसत्या फोटोला किंमत नसते, पण वर दिलेल्या उदाहरणा प्रमाणे तो फोटो केवळ एक फोटोच नसून, त्या राजघराण्याची परंपरा व प्रतिष्ठा दर्शविणारा एक महत्त्वाचा भाग होता. त्या राजाच्या सत्तेचे व राजघराण्याच्या संस्थानाचे, ते चित्र, हे एक साकार प्रतीक होते.
सांगण्याचा उद्देश एवढाच की, इतरांना एखादी वस्तू कितीही गौण वाटली तरी, तीच वस्तू दुस-या व्यक्तीस अगदी निराळा अनुभव व भाव उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ठेवू शकते. त्याच प्रमाणे वैदिक धर्मात देखील, भौतिक जगांतल्या प्रमाणे मूर्ति-पूजनांत, भक्ताला ती केवळ दगडाची मूर्तिच वाटत नसून, त्यांतून त्या भक्ताला त्याच्या इष्ट देवाच्या अस्तित्वाची जाणीव व अनुभव येत असतो. असा हा अनुभव एकाएकी होत नसून, निरंतर पूजनाने मन इष्टदेवावर एकाग्र केल्यांने, व त्यावर अगाध प्रेम केल्यांने, योग्य वेळ आल्यावर होतो. हे लिहित असताना मला नाशिकचे होराभूषण मनीष गोसावी सरांची आठवण झाली. मध्यंतरी एका झूम मीटिंग मध्ये एकत्र आलो असताना ते बोलताना म्हणाले होते की, ग्रह प्रत्यक्ष बोलतात कुंडली तपासताना, अन्यथा स्थाने आणि नुसती आकडेमोड यातच अडकून पडतो. किती हि एकरूपता त्या ग्रह देवतांशी.
सारांश, देवळामुळे व त्यातल्या मूर्तिमुळे आपल्या अंतःकरणात देवाच्या अस्तित्वा बद्दल भाव निर्माण होत असतात. हे सर्व जरी बाह्य असले, तरी ज्ञान व जागरुकता आपल्या अंतरंगात होत असते. ईश्वराच्या अस्तित्वाचा हा ज्ञानबोध, एका स्वरुपात व एका स्थळी पाहणे हा एक असा अभ्यास आहे, ज्यांने आपले मन पवित्र होते. आणि मग तशा पवित्र व तयार झालेल्या मनात परम सत्यानेच सर्व ब्रह्मांड व्यापलेले आहे, व ते म्हणजेच मी असे आत्मज्ञान विकसित होते.
मंदिराची सांस्कृतिक भूमिका
हिन्दू धर्मात देवस्थानाचे कार्य केवळ प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक अध्यात्मिक गरजा पुरविणे, एवढेच नसून आणखीही जास्त आहे. पूर्वी देवस्थानात धार्मिक शिक्षण, प्रवचने, वार्षिक उत्सव ई. होत असत आणि ते संगीत व इतर कलांचे क्षेत्र देखील मानले जात हा ईश्वराच्या पूजेचाच भाग आहे, असे जाणून कित्येक कलाकार आपल्या चित्रकलेचे, नृत्याचे किंवा संगीताचे अविष्कार देवळात सादर करीत असत. देवस्थानात सर्व एकत्र येऊन आपले व्यक्तिगत, अध्यात्मिक व सांस्कृतिक अनुभव परस्परांना सांगत आणि एकूण संस्कृतीच्या उन्नतीचा व अभिवृद्धीचा आणि लोक-कल्याणाचा विचार विनिमय करत.
आता देवळात फारशी प्रवचने होत नसल्याने, कर्मकाण्डाच्या मागे काय अर्थ आहे हे जाणून न घेताच लोक केवळ कर्मकाण्डातल्या विधि करण्यातच फार गुंतत असतात. आपली देवळे पुन्हा पूर्ववत व्हावयास हवीत. तिथे सर्वांनी एकत्र येऊन आपला इतिहास व आपली संस्कृति शिकावी व आपला धर्म व तत्त्वज्ञान शिकावे म्हणजेच देवळाचा खरा उद्देश पूर्ण होईल.
देवळाचा आणखी एक गूढ गर्भितार्य आहे, जो अनेक जणांना माहित नसतो. असे म्हणतात की देवळाची बांधणी, माणसाच्या शरिरास अनुसरून असते.
जसे शरिरात एक हृदय (मन किंवा बुद्धि) आहे, ज्यांत देव सामावलेला आहे, त्याचप्रमाणे देवस्थानाच्या आवारातल्या अगदी आंतल्या भागात, गर्भ गृहात, ईश्वराचे वास्तव्य असते. जणूं माणसाचे शरीर म्हणजे देवळाचे आवार, गर्भ गृह म्हणजे त्याचे हृदय, ज्यांत ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव आम्हास येत असतो.
दक्षिण भारतातल्या देवळात प्रामुख्याने, देवस्थानाचा सबंध बहिर्मुख आवार अतिशय विस्तीर्ण असतो, परंतु देवाची मूर्ति ज्या ठिकाणी असते ती जागा मात्र फारशी मोठी नसते. गर्भ गृहात बहुधा अंधार असतो आणि ज्या वेळेस दर्शनाकरिता तुम्ही जाता, तेव्हां तिथले पुरोहित दिव्याच्या उजेडांत आणि कापुराच्या प्रकाशात ईश्वराची मूर्ति तुम्हाला दाखवतात.
याचे तात्पर्य असे की, जे ब्रह्म (परमसत्य), तो ईश्वर जो माझ्यात हृदयस्थ आहे, तो अज्ञानाच्या अंधकाराने पूर्णतया झाकला गेला आहे आणि त्याचे अस्तित्व अजून मी जाणून घेतलेले नाही किंवा बघितले नाही. कापूराची आरती पुरोहिताने दाखविली म्हणजे केवळ एक सुगंधाचा गोळा, जो जळाल्यानंतर कांहीच बघण्याचे उरत नाही. (सुगंधाला वास किंवा वासना असे म्हणतात.) तो गंध आपल्या मनातल्या दुर्विचारांना व दुर्गुणांना दर्शवितो आमच्यातल्या एकत्रित झालेल्या वासना म्हणजे अहंकार, जो इच्छा, राग व द्वेष या रूपाने अवतरित होत असतो. देवळात कापूर जाळणे म्हणजे आपल्या हृदयातल्या ज्ञानाग्निला उज्वलित करून अहंकाराला पूर्णपणे जाळणे असे आहे. त्या ज्ञानाच्या उजेडात मग “परमात्म्याचे दर्शन” होते, जो आमच्या हृदयाचा स्वामी आहे.
देवपूजा झाल्यानंतर, कापूराची आरती जेव्हां सर्वांच्या पुढे नेतात, तेव्हां सर्व त्या ज्योतीवर हात ठेवून, ते डोळ्यास लावतात. असे करणे म्हणजे ज्या ज्योतिच्या उजेडात आम्ही ईश्वरास पाहिले, ती ज्योत सदैव आपल्या डोळ्यापुढे असावी असा संदर्भ आहे कारण जे डोळ्यास दिसते, ते हृदयात जाते. तेव्हां, त्या संदर्भाने, जेव्हां आम्ही निर्मित झालेल्या जगास पाहतो, तेंव्हां सर्वत्र ईश्वर रूप झालेले आहे या नवीन दृष्टीने पाहतो.
ईशावास्य उपनिषदातल्या प्रसिद्ध असलेल्या पहिल्या श्लोकातून हाच उपदेश देण्यात येतो –
” ईशावास्यम् इदम् सर्वम्”
म्हणजे संपूर्ण विश्व ज्याने व्यापित आहे किंबहुना जे सर्व अस्तित्वात आहे ते सर्व ईश्वराचेच स्वरूप आहे.
पुढ्यात आलेल्या आरतीच्या थाळीत दान अर्पण करण्याचा सुद्धा एक संदर्भ आहे. तो असा की विश्वदर्शनाच्या भव्यतेची दृष्टी जेव्हां आम्हाला लाभते, तेंव्हां त्या मानानेच आम्ही पण उदार व्हावे. आरतीत घालतांना संकुचितपणा करू नये. कांही लोक मात्र कमीतकमी घालण्यास खिसे तपासतात किंवा थाळीतून मोड काढून घेण्यासदेखील कमी करत नाहीत. देवळात दिलेले पैसे जसे समाज कल्याणाकरिता असतात, त्याचप्रमाणे भगवंताचे अस्तित्वच सर्वत्र असल्याचा ज्यावेळेस आपण अनुभव घेतो, तेंव्हां आपली श्रीमंती व संपत्ति देखील आपण इतरांच्या समवेत भोगू शकतो.
पूजेच्या सर्वात शेवटी ईश्वरास दाखवलेला नैवेद्य “प्रसाद” म्हणून वाटण्यात येतो. सर्व साधारण, प्रसाद म्हणजे खाण्याचा असतो, एवढेच आम्हाला माहित असते. पण प्रसाद याचा खरा अर्थ म्हणजे पवित्रता, आनंद, समाधान, उत्साह व शांति असा आहे. हे सर्व पावणे म्हणजेच पूजेच्या वेळेस सर्वथा आपले मन भगवंताशी एकरूपतेच्या अनुभूतीचा लाभ घेणे. आम्ही जेव्हां अत्यंत प्रेमाने आणि भक्तिभावाने केलेल्या दैनिक पूजे नंतर ईश्वराच्या मूर्तीला न्याहाळतो, तेव्हां आपल्या हृदयात समाधान व शांति अनुभवणे, हाच खरा प्रसाद आहे. पण साधारणतः आम्ही पूजा जरी केली तरी, घाई-गडबडीत एक दोन मिनिटात तो संपवितो व झाली एकदाची असे म्हणतो. त्या कारणाने शांति व समाधानाचा प्रसाद आम्ही अनुभवू शकत नाही कारण देवाशी भावपूर्ण एकाग्र मन कसे करावे तेच ध्यानात घेत नाही.
आतापर्यंत देवळाचा व देवपूजेचा गर्भित अर्थ काय असतो एवढे जरी समजले, तरी पुष्कळ चांगली गोष्ट आहे.
देवाच्या प्रतीकांचीसुद्धा एक निराळीच भाषा आहे, आणि ती पूर्णपणे समजण्यास आपल्याला वेदांचा पुष्कळ सखोल अभ्यास करावा लागतो.
उदा. भगवान विष्णूंना पद्मनाभं असेही म्हटले आहे. भगवान विष्णूंच्या नाभीतून कमळाचे फूल येते असे आपण अनेक चित्रातून पाहत असतो. संस्कृत भाषेत “क” याचा अर्थ पाणी, आनंद व ब्रह्म” आणि “मल” म्हणजे अस्वच्छ किंवा घाण. “कमल” याचा एक अर्थ पाण्यातली घाण असा देखील होतो. पण इये “मल ” म्हणजे आपल्या मधून जी अस्वच्छता किंवा घाण येते, जसा घाम हा आपल्या मधूनच येतो, बाहेरून तो येत नाही, त्याच प्रमाणे, या प्रतीकात्मक भाषेत “ब्रह्म ” यातून जो मल बाहेर आला तो या कमळाच्या रूपाने आला. याचा अर्थ हा की श्रेष्ठ, उदात्त, अनंत ब्रह्मातून, “मी” हा सर्व प्रथम असलेला मनोविकार उगम पावला.
जेव्हां “मी” गाढ निद्रेत असतो, तेव्हां ती अव्यक्त अवस्या असते, ज्यांत सृष्टि किंवा जगत् या दोन्ही स्थिति अवगत नसतात. परंतु ज्या क्षणी जाग येते, तेव्हां पहिला विचार “मी” या जाणिवेचा होतो. जर आपण या अहंकाराचा मळ साफ केला तर ईश्वर प्राप्ती होईल.
ही प्रतीकात्मक भाषा आपल्याला असे दर्शविते की, आपण भगवंताच्या (ब्रह्माच्या) निरनिराळ्या स्वरूपावर त्याचा भावार्थ जाणून जर ध्यान केले, तर या बाह्य स्वरूपातून आपल्याला त्याचे श्रेयस आंतरिक स्वरूप कळेल. नाम व रूपाच्या पलिकडे असलेले ब्रह्मतत्त्व जाणून घेता येईल व संपूर्ण सृष्टीच्या स्थिति लयाचे ज्ञान होईल. यावरून हे पण उमजेल की परब्रह्म जरी विश्वरूपाने दृश्य जगात प्रगट होत असले, तरी ते उपाधिरहित चैतन्य स्वस्वरूपात निरंतर स्थित असते. यालाच खरे ध्यान म्हणतात.
तत्काळ जरी आपल्याला प्रतीकांच्या सूक्ष्म व उदात्त भावार्थाचे ज्ञान नसले, तरी मूर्ति पूजनाने कां असेना सुरुवात करावी. त्यावर मन एकाग्र करून प्रेमभाव जागृत करावा. ध्यान श्लोकावर आधारित असा एका मूर्तीचा हा भावार्थ आहे. हिन्दू धर्मात प्रत्येक मूर्तीचे असे ध्यान श्लोक आहेत. ज्या वेळेस त्या मूर्तिच्या मागचा अपूर्व भावार्थ जाणून आपण त्याची पूजा व त्यावर ध्यान करतो, तेंव्हां एक निराळाच अलौकिक अनुभव आपल्याला येतो.
जशी विद्युतशक्ति बॅटरीतून विजेच्या तारेत वाहते व त्यामुळे मोटार गाडी सुरु करता येते, तसे मंत्र विशिष्ट पद्धतीने म्हटल्याने, दैवी मंत्र शक्ति आपल्याला विशिष्ट निर्धारित परिणामासाठी प्रभावित करते. ध्वनिलहरीचा परिणाम आपल्या मनावर व शरिरावर देखील होतो.
उदा. एक पुरोहित, गृहस्थाश्रमो लोकांच्या घरी पूजा करीत असे व नंतर त्यांनी दिलेले गोडाचे सुग्रण जेवण जेवीत असे. त्यास मधूमेहाची व्याधि असूनही गोड पदार्थ खाण्याची अतिशय आवड होती. त्यास सूर्य सूक्त वैदिक मंत्र माहित होते व तो घरी आल्यावर ते म्हणत असे. ते मंत्र कांही विशिष्टवेळा म्हटल्याने त्याच्या शरिरातून घाम निघत असे. जेव्हां तो डॉक्टरकडे तपासणी करण्यास गेला तेंव्हां गोड खाण्याने कांहीही अपाय झाल्याचे डॉक्टरना आढळले नाही. जेव्हां वैदिक मंत्राचा पूर्ण अर्थ अजाणता जरी कोणी म्हटले तरी, त्याचा सपरिणाम शरिरावर व मनावर’ होत असतो. वैदिक मंत्रांचा असा विलक्षण प्रभाव आहे ।
या सर्व गोष्टींचे ज्ञान आपल्या ऋषी मुनींनी आत्मसात केले होते. ज्योतिषी म्हणूनच तुमच्या प्रारब्ध स्वरूप जन्म कुंडलीचा अभ्यास करून तुम्हाला योग्य असणारी उपासना, प्रतीके, यंत्रे, मंत्र, तंत्र ई. सुचवत असतो. ते उपाय सश्रद्ध व एकाग्र भावाने व सकारात्मकतेने केले तर त्याचा नक्कीच उपयोग होतो.
अगदीच काही नाही तर तुमचे कुलदैवत अथवा भावपूर्ण श्रद्धा असणाऱ्या देवाची नित्य उपासना दररोज केली, दर्शन घेतले तरी त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.
आपल्या माहितीसाठी येथे प्रत्येक जन्म नक्षत्रासाठी नित्य उपासना मंत्र देत आहे.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)