नाम जप साधना


विषय : नाम जप साधना

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नाप जपाचे महत्व आणि लाभ (परात्पर डॉ. जयंत आठवले यांचे संकलनातून 

नमस्कार,

आज आपण इंद्रियांचे कार्य सुधारण्यासाठी विशिष्ट इंद्रिय देवता आणि नाम जप साधना या विषयाची माहिती घेणार आहोत.

आपण जसे राशी दैवत, नक्षत्र देवता, ग्रह देवता, तिथी ची देवता अशा विविध देवता असतात, तसेच मानवी शरीराच्या इंद्रियांना नियंत्रण करणाऱ्या देखील विशिष्ट देवता असतात. या  इंद्रियांच्या देवतांना प्रसन्न करून इंद्रियांना होणारे विकार दूर करण्यासाठी या देवतांचा नामजप करणे सहाय्यकारी असते.

उदा. डोळ्यांनी आपण पाहू शकतो. डोळ्यांमुळे सभोवतालची सृष्टी आपल्याला दृश्यमान होते. डोळे हे प्रकाशतत्त्वाचे (तेजतत्त्वाचे) प्रतीक आहेत. सूर्य (अर्क) ही प्रकाशाची देवता आहे. म्हणून डोळ्यांचे कार्य मंदावले, तर ते सुधारण्यासाठी सूर्यदेवाचा नामजप (ॐ अर्काय नमः) करणे उपयुक्त ठरते.

सोबतच्या तक्त्यात निरनिराळ्या इंद्रियांचा कोणकोणत्या देवतेशी संबंध आहे. तसेच एखाद्या इंद्रियाचे कार्य सुधारण्यासाठी कोणत्या देवतेचा जप कसा करावा, ते दिले आहे. इंद्रियांचे कार्य सुधारण्यासाठी इंद्रियांच्या देवतांचा नामजप करण्यासह वैद्यकीय उपचारही चालू ठेवले, तर इंद्रियांचे कार्य लवकर सुधारण्यास साहाय्य होते.

प्रत्येक देवतेचे म्हणजे देव किंवा देवी यांचे विशिष्ट कंपन असते. त्या देवतेच्या नावाचा जप केल्याने जी विशिष्ट कंपने निर्माण होतात, त्यांनी व्याधीद्वारे निर्माण झालेले विचित्र / अनैसर्गिक / प्रमाणबाह्य कंपन सुधारण्यास सहाय्य होते. 

वाईट शक्ती आणि त्यांमुळे होऊ शकणारे त्रास :

मनुष्याला त्रास देणारे भूत, पिशाच आदी अदृश्य जीव (लिंगदेह) म्हणजे ‘वाईट शक्ती’ (आसुरी शक्ती) मुळे होऊ शकणाऱ्या त्रासांची काही लक्षणे वाईट शक्तींच्या त्रासामुळे मनुष्याच्या जीवनात शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक इत्यादी विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. सध्या पृथ्वीवरील सात्त्विकता पुष्कळ अल्प झाली असल्याने आसुरी शक्तींचा त्रासही पुष्कळ वाढला आहे. त्यामुळे बहुतांश व्यक्तींना अल्प-अधिक प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास असतोच. विशेषतः समष्टी साधना (उदा. धर्मप्रसार, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्र- रक्षण) करणाऱ्यांना आसुरी शक्तींच्या त्रासांना मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागते.

त्रासांची काही लक्षणे पुढे दिली आहेत.

अ. कित्येक वर्षे औषधोपचार करूनही व्याधी बरी न होणे

आ. कोणतेही शारीरिक कारण नसतांना सतत थकवा असणे इ. घरात सतत भांडणे, कारण नसतांना आर्थिक चणचण किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनाधीन असणे

ई. झोपेत ओरडणे, दात करकरवणे किंवा भयानक स्वप्ने पडणे

उ. नामजप करतांना अनावर गुंगी येणे

काळाची आवश्यकता लक्षात घेऊन व काळाला अनुसरून असा वाईट शक्तींच्या त्रासांवर सर्वांनी  नामजप करणे अधिक परिणामकारक ठरते. याचा लाभ साधकाला त्याच्या भावानुसार होतो.

असा त्रास होत असल्यास तो जाईपर्यंत नामजप दिवसभरात जास्तीतजास्त वेळ करावा. त्रास गेल्यावर तो पुन्हा होऊ नये, यासाठी हा नामजप प्रतिदिन किमान २ तास करावा.

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप : सध्या बरेच जण श्राद्ध, पक्ष इत्यादी करत नसल्यामुळे त्यांना अतृप्त पूर्वजांमुळे त्रास होऊ शकतात. विवाह न होणे, पती-पत्नीचे न जुळणे, गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, ही त्रासाची काही लक्षणे आहेत. अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप करावा.

इंद्रिय तक्त्यात सांगितलेला नामजप दिवसभर करत असल्यास दत्ताचा नामजप करू नये.

तक्त्यात सांगितलेला नामजप दिवसभरात २ तास करत असल्यास दत्ताचा नामजप त्रासाच्या तीव्रतेनुसार पुढीलप्रमाणे करावा.

१. वर सांगितलेल्या लक्षणांनुसार सध्या कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसला, तरी पुढे होऊ नये म्हणून किंवा थोडासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ तास ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप करावा.

२. मध्यम त्रास असल्यास ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन २ ते ४ तास करावा.

३. तीव्र त्रास असल्यास ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन ४ ते ६ तास करावा.

समष्टी साधना करणाऱ्यांना आसुरी शक्तींमुळे होणाऱ्या त्रासांना मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी ‘सर्वांसाठीचे उपाय’ या स्तंभात सांगितलेला नामजप दिवसभरात जास्तीतजास्त वेळ करावा. अशांनी अन्य नामजप (उदा. कुलदेवता, दत्त) करण्याची आवश्यकता नाही.

वर सांगितलेल्या सांगितलेल्या त्रासापेक्षा इतर त्रासावर काही नाम मंत्र उपलब्ध न झाल्यास ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय।’ हा नामजप करावा.

४. वास्तूशुद्धीसाठी नामजप उपयुक्त वास्तूदोष घालविण्यासाठी वास्तूशांती, उदकशांती यांसारख्या उपाययोजना करतात. बऱ्याचदा वास्तूत रहाणाऱ्या व्यक्तीचे स्वभावदोष, वास्तूच्या वापराचे कारण, वास्तूवर होणारा वाईट शक्तींचा त्रास, दुःख, भवरोग ‘नामाने नाहीसा होतो. भव म्हणजे विषय. विषयाची आसक्ती हे सर्व दुःखांचे मूळ आणि सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताकडे चित्त वळते आणि इतर ठिकाणची आसक्ती आपोआप सुटून दुःख नाहीसे होते. भगवंत हा आनंदस्वरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरले की, दुःख त्या ठिकाणी राहू शकत नाही.

नामजपाने कुंडलीतील द्वादश स्थानांची शुद्धी होते.

‘१ कोटी नामजप : तनुस्थान शुद्ध होते. शरिरातील रज-तमाचा नाश होऊन सत्त्ववृद्धी होते. रोगविजांचा नाश होतो आणि रोग निर्बल होतात. शुभ स्वप्ने पडू लागतात.

२ कोटी नामजप : धनस्थान किंवा कुटुंबस्थान शुद्ध होऊन धनप्राप्ती किंवा कौटुंबिक सौख्यवृद्धी होते.

३ कोटी नामजप : पराक्रमस्थान, भातृस्थान किंवा सहजस्थान शुद्ध होते. अशक्य गोष्टी साध्य होतात. बंधू- बंधूत द्वेष असल्यास प्रेमवृद्धी होऊ लागते.

४ कोटी नामजप : सुहृदस्थान, मातृस्थान किंवा स्वास्थ्यस्थान शुद्ध होऊन शारीरिक आणि मानसिक आघात न्यून होतात.

५ कोटी नामजप : पुत्रस्थान किंवा विद्यास्थान शुद्ध होते. अपुत्री (निपुत्रिक)

पुत्रवान होतो. पुत्र द्वेष करणारा असल्यास अनुकूल होतो. अविद्वानाला एखाद्या विद्येत प्रवेश करण्याची बुद्धी होते. धारणाशक्ती आणि ग्रहणशक्ती वाढते.

६ कोटी नामजप : शत्रूस्थान आणि रोगस्थान शुद्ध होते. बाहेरील शत्रू आणि अंतरातील काम-क्रोधादी शत्रू नाहीसे होतात. रोग संपूर्ण बरे होतात. (एक कोटी नामजपाने रोग निर्बल होतात आणि) सहा कोटी नामजपाने रोग निखालस बरे होतात.

७ कोटी नामजप : जायास्थान शुद्ध होते. अविवाहितांचे लग्न होते. प्रतिकूल पत्नी अनुकूल होते. स्त्रियांस पतीसौख्य लाभते.

८ कोटी नामजप : मृत्यू-गंडांतरस्थान शुद्ध होऊन अकालमृत्यू (अशुभ काळी आलेला मृत्यू) आणि अपमृत्यू (अपघात, आत्महत्या यांसारखे मृत्यू) टळतो.

९ कोटी नामजप : धर्मस्थान शुद्ध होऊन मंत्रदेवतेचा सगुण साक्षात्कार होतो.

१० कोटी नामजप कर्मस्थान किंवा पितृस्थान शुद्ध होते. दुष्कर्मे नाहीशी होऊन सत्कर्मे पडतात. संतांचे दर्शन आपोआप होते.

११ कोटी नामजप : लाभस्थान शुद्ध होते. धनधान्य, गृह, भूमी इत्यादींचा लाभ होतो. सत्त्वगुणाची पूर्ण वृद्धी होते.

१२ कोटी नामजप : व्ययस्थान शुद्ध होते. रज-तम गुणांचा पूर्ण नाश होतो. गुरूंचा अनुग्रह स्वप्नात किंवा प्रत्यक्षपणे होऊन कृतार्थता प्राप्त होते.

ईश्वराच्या नामजपातील मानसिक प्रक्रियाही हीच आहे. नामजप करणाऱ्या व्यक्तीत कळत-नकळत ईश्वराविषयी काही भावना किंवा कल्पना असतात. त्याच्या गुणांचेही थोडेफार ज्ञान असते. ‘ईश्वराच्या कृपेने आपले कल्याण होते आणि नामजप हे त्याची कृपा संपादन करण्याचे साधन होय, याविषयी त्या व्यक्तीला श्रुतीज्ञान झालेले असते. त्यामुळे ‘एवंगुणविशिष्ट ईश्वराचे नाम आपण स्मरत आहोत’, असा भाव त्या नामाशी निगडित होतो. या भावामुळेच ईश्वराविषयीच्या आदर, प्रेम, भक्ती, दुष्कृत्यांची भीती इत्यादी भावना वाढत जातात. त्यामुळे तद्विरुद्ध असणाऱ्या भावना हळूहळू मंद होऊ लागतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या चित्ताची हळूहळू शुद्धी होते.  जप चालू असतांना चित्तातील वासनाकेंद्र, आवड नावड केंद्र, स्वभावकेंद्र वगैरे केंद्रे तसेच बुद्धीकेंद्रातील संस्कारांकडून येणाऱ्या संवेदना (बाह्य) मन स्वीकारत नाही. असे सातत्याने बराच काळ झाले की, या केंद्रांमधील संस्कार न्यून होऊ लागतात. जप चालू असतांना तेवढा वेळ तरी चित्तावर इतर गोष्टींचे नवीन संस्कार होत नाहीत. चित्तावर नवीन संस्कार होऊ नयेत, यासाठी जागृतावस्थेतील सर्वोत्तम मार्ग म्हणजे नामजप होय. (धारणा, ध्यान आणि समाधी या अवस्थांतही चित्तावर इतर गोष्टींचे संस्कार होत नाहीत.) नामजपाने वासनाक्षय होण्याची प्रक्रिया: ‘जेथे देहबुद्धी असते तेथेच वासना उत्पन्न होते. ‘देह मीच आहे’, या भावनेने वागणाऱ्या माणसाचे मन सारखे इंद्रियांतून बाहेर धावत असते. त्याच्या मनाची तृप्ती कधीच होत नाही. नाम घेऊ लागल्यावर मात्र मन हळूहळू बाहेर धावण्याचे न्यून होते. बाहेरची धाव न्यून झाली की, वासनेची शक्ती आपोआप न्यून होते. पुढे तेच मन नामामध्ये रंगू लागते. जे मन वासना भोगायचे, तेच मन दुसरीकडे रंगू लागल्यावर मनातील वासना आपोआप क्षीण होतात आणि काही दिवसांनी त्या मरून जातात. वासना सूक्ष्म आहे; म्हणून तिचा काटा काढण्यास सूक्ष्म अस्त्रच पाहिजे. ते अस्त्र म्हणजे ‘नाम’ होय.’ नामजप करत असल्यामुळे आतील विचार उफाळून बाहेर येऊन नष्ट होत असल्याने काही अनुभूती प्राप्त होतात. व्यावहारिक बोलण्यामुळे वाणी चित्तशुद्धीपासून निवृत्त होते, म्हणजे अशुद्ध होते. ती शुद्ध व्हावी म्हणून नामजप करावा. जोपर्यंत पाप आणि पुण्य शिल्लक आहेत, तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. ‘ज्याला याच एका जन्मात भगवंताची प्राप्ती करून घ्यावयाची आहे. त्याने आपली इंद्रिये, मन आणि बुद्धी यांचे पूर्ण नियमन करून कोणतेही पाप होऊ न देता, नामाचे कोणतेही अपराध होऊ न देता, अविरत नामजप केला पाहिजे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment