
विषय : पीडा निवारण्यासाठी शांती
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : प्रेडिक्टिव स्टेलर ॲस्ट्रोलॉजी
नमस्कार,
ज्योतिष शास्त्र हे प्रकृतिच्या नियमाची व्याख्या व मीमांसा करणारे पुरातन शास्त्र आहे. त्याचे जोडीस हे शास्त्र विज्ञानातील न्यूटनच्या गती तेथे प्रतीगती या तिस-या नियमाचे देखील समर्थन करते. प्रत्येक कार्यास त्याची प्रतिक्रिया ही होत असते. हे मात्र नक्की की कोणतेही कार्य बेकार नष्ट होत नाही. त्या मुळे ज्योतिष शास्त्र एक विश्वसनीय शास्त्र आहे. त्यामुळे ज्योतिषी द्वारा केलेली गेलेली कुंडलीची योग्य मीमांसा नेहमी उपयुक्त ठरत असते. पण हे मात्र तितकेच खरे कि प्रत्येक पापाचे प्रायश्चित द्शांती हे असू शकत नाही. पण लोकांचा या गोष्टीवर ठाम विश्वास असतो आणि आम्ही ज्योतिष मंडळी पण हा त्यांना ठाम विश्वास देतो की, की शांती केली कि सर्व संकटे दूर होतात.
मग असे आहे तर, आमच्या प्राचीन ऋषि मुनींनी शांती का करावयास सांगितली आहे?
जर प्रत्येक कार्याची प्रतिक्रिया होत असते, तर शांती देतील पापाचा नाश केल्या शिवाय कशी राहील?
हिन्दू ईश्वराची व ग्रहांची पूजा, हवन ई. करवितात. मोफत दवाखाने, धर्मशाळा, अन्न छत्र ई. निर्माण करवितात. गरीब व अनाथ लोकांना जेवण देतात व अडचणीत असलेल्याची मदद करतात. पण हे हे तितकेच खरे आहे की, हे सर्व कार्य करणाऱ्या सर्वांच्याच पीड़ा कमी करू शकत नाही. अन्य देशामध्ये होम-हवन प्रचलित नाही, तरी देखिल तेथेसुद्धा गोर गरीबाना सहायता देत असतात. मानवता वादी दृष्टीकोनातून केलेले हे सत्कर्म विदेशी लोकांना विश्वास असो वा नसो ते ह्या अश्या त्यागपूर्ण कार्याने त्याचे पाप दूर होण्यास मदत होणार नाही काय ?
ज्योतिष शास्त्र हे सांगते की भाग्यास बदलले जाऊ शकत नाही, पण भाग्याचा नीट व स्पष्ट अर्थ फक्त एक जाणकार, अभ्यासू ज्योतिषीच समजू शकतो. जे कर्म पूर्वजन्मी केले गेलेले आहे त्या सर्व कर्माचे फळ भाग्य मध्ये लिखित असते, कोणाचे भाग्य त्याला शांती करण्याकडे घेऊन जाऊ शकते, ज्यामुळे पुढे होणान्या पापास दूर करून, त्यास संरक्षण मिळू शकेल. काही निश्चित मर्यादे मध्ये शांती करण्या करता नाही म्हणता येते. भाग्य काही परिवर्तनाचे असे काही परिणाम दर्शवते, की ते फक्त अनुभव करण्यालायक असतात व तेव्हा त्या घटनांना आपली तर्कबुद्धी लागू पडत नाही. लोकांना आपल्या पूर्वकर्माधीन रहावे लागते व हेच भाग्य होय.
अश्या प्रकारे जातकांचे विभाजन चार समूहात केले जाते.
१. जातक जे शांति करतात व इच्छित फळ प्राप्त करतात. हे शांतीचे फायदे सांगतात.
२. जातक जे शांति करतात, तरी पण दु:खी राहता व कितीही शांती करेली, तरी आम्हास फळ काही मिळाल्रे नाही, हे सांगतात.
३. जातक जे शांति करत नाही व त्या मध्ये विश्वास ही करत नाहीत. तरी प्रसन्नता पूर्वक राहतात व धनवान असतात. नेहमी सफलता मिळत राहते.
४. जातक जे शांति करीत नाही व तरीहि दुःखी राहतात.
बिकट परिस्थितीमध्ये कोणी जातक अडकला असेल, तर तो सामान्यपणे संकटमुक्त होण्यासाठी शांती करतो. खरे तर सर्व परिणाम पूर्व जन्मातील कर्मानुसार होतात. व हे परिणाम जन्मकुंडली द्वारे माहित केले जाऊ शकतात. जाणकार ज्योतिषास पूर्वजन्माची वास्तविकता ओळखणे संभाव आहे. नदी ग्रंथामध्ये मध्ये पूर्व जन्मानुसार शाति करण्याचा सल्ला दिला जातो.
स्थूलमानाने कर्माचे तीन भाग पडतात.
१. धृत कर्म
२. धृत-अधृत कर्म
३. अधृत कर्म
धृत कर्म म्हणजे कोणतेही पूर्व जन्माचे मोठे पाप किंवा मोठी चूक जिचे गंभीर परिणाम कितीही शांती केली नाही केली, सत्कर्म केर्ले तरी या जन्मात वाईट फळ नष्ट करू शकत नाही.
उदा. हत्या, आई वडिलांची उपेक्षा, भावंडांना धोका देणे, लहान श्रमिकांना गंडा घालणे, मालकाचा सेवकांवर अत्याचार, बेईमानी इत्यादि.
धृत-अधृत कर्म म्हणजे पूर्व जन्माचे पाप किंवा चूक जिचे परिणाम शांती अथवा सत्कर्माने सौम्य करता येतात, तरी कोणतेही पूर्वकर्म त्याचा परिणाम सौम्य का होईना दिल्याशिवाय समाप्त होऊ शकत नाही. किंवा असे पाप केले जे क्षमा करणे योग्य आहे, त्यांना दया दाखवली जाऊ शकते व जर त्याने शांती अथवा सत्कर्म केले, तर त्याची पीडा निवारण होऊ शकते.
उदा. दोघांनी रु.५००००/- उधार घेतले एकाने ते परत न करता फसवणूक केली व दुसर्याने रु.४५०००/- फेडले, पण बाकीचे इच्छा असूनही फेडू शकला नाही. म्हणून फसवणार्याचे भाग्यात त्याचे दंड भोगणे लिहिले जाते व त्याने कितीही शांती, सत्कर्म केले, तरी त्याची पीडा कधीही संपत नाही. ती अटळ असते. पण दुसर्याचे भाग्यात त्याचे भोग सौम्य असतात व शांती व सत्कर्मा द्वारे त्याचे दुर्भाग्य संपून तो भाग्यवंत होऊ शकतो.
परमात्मा फार दयाळू आहे, पण तो त्याच्या न्यायाबद्दल फार जागरुक पण आहे व तो प्रत्येकाच्या पूर्व कर्माबाबत पूर्ण सजग आहे. प्रकृतीच्या नियमानुसार प्रत्येकास भोग हे भोगावेच लागतात. कोण शांती करेल व फलप्राप्ती करेल हे त्या नियमांनुसार भाग्यात लिहिलेले असते.
ज्या जातकांनी पूर्वजन्मी धृत कर्म केले आहेत, त्यांच्या जन्म कुंडली मध्ये दशा स्वामी, अंतर्दशा स्वामी, लग्न व चंद्र व ९ वे स्थानाचा स्वामी हे सर्व गुरूच्या शुभ दृष्टिमध्ये नसतात. कारण हे सर्व जातकाच्या पूर्व कर्माबद्दल सांगतात.
ज्या जातकांनी पूर्वजन्मी धृत-अधृत कर्म केले आहेत, त्यांच्या जन्म कुंडली मध्ये दशा स्वामी, अंतर्दशा स्वामी, लग्न व चंद्र व ९ वे स्थानाचा स्वामी हे सर्व गुरूच्या शुभ दृष्टिमध्ये असतात व अशा स्थितीमध्ये जातकाचे शांती, सत्कर्म द्वारा पीडा निवारण होऊन भाग्यस्वरूप बदलू शकते.
अधृत कर्म म्हणजे पूर्व जन्माचे पाप किंवा चूक जिचे परिणाम शुल्लक असतो. त्याचे मनात वाईट कर्माची इच्छा वा वासना निर्माण खालेली असते, पण प्रत्यक्षात कृती करत नाही.
उदा. एखादा वाटसरू थकून सावली साठी एका बहरलेल्या आंब्याच्या झाडाखाली उभा राहतो. त्याची नजर त्या झाडाच्या रसरशीत आंब्यांवर पडते व तो चोरून खाण्याची वासना निर्माण होते. पण त्या झाडाचा मालक आपण घेतलेल्या कष्टाची रखवाली करीत असतो. व त्याचा आवाज ऐकून तो वाटसरू आंबा चोरून न खाता आपल्या वाटेने निघून जातो.
ज्या जातकांनी पूर्वजन्मी अधृत कर्म केले आहेत, त्यांच्या जन्म कुंडली मध्ये गुरु अथवा ९ वे स्थानाचा अधिपती लग्नी किंवा चंद्र, दशा स्वामी, अंतर्दशा स्वामी बरोबर असतो. हे जातक नेहमी आनंददायी राहतात, मग ते पुण्य, शांती, सत्कर्म करो अथवा न करो.
यालाच आपण म्हणतो कि सर्व विधिलिखित आहे. आणि जाणकार ज्योतिषी हे सर्व व जन्मकुंडलीतील इतर ग्रहस्थिती व घटक तपासून योग्य तो उपाय अथवा शांती सुचवत असतो, ज्याद्वारे जातकास त्याचा लाभ होऊन त्याचे आयुष्य सुखकर होईल.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)