केंद्र अधिपत्य दोष


विषय : केंद्र अधिपत्य दोष

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : प्रेडिक्तिव्ह स्टेलर अस्त्रोलोजी रीडर

नमस्कार,

आज आपण केंद्र अधिपत्य दोष या विषयी माहिती घेणार आहोत.

ज्योतिष अभ्यास करत असताना अनेकानेक प्रश्न मनात येत असतात. पण त्याची समाधानकारक उत्तरे मात्र मिळायला फार कष्ट पडतात. उलट आपल्या मनात गोंधळाची स्थिती तयार होते.

या विषयाबाबत बोलायचे झाल्यास केन्द्र अधिपत्य काय असते ? नैसर्गिक शुभ ग्रह त्यांचे अधिपती असता ते त्यांच्या दशेमध्ये वाईट असतात का ? ते नेहमी जातकाचे आयुष्याचा अंत करतात का ? केंद्राधिपति आणि केंद्र स्थानात स्थित ग्रह कोण-कोणते विभिन्न परिणाम प्राप्त होतात ई.

केंद्र हा मूळ संस्कृत शब्द आहे. याला चतुष्टय व कंटक पण म्हटले जाते. पारंपारिक पद्धतीनुसार लग्न स्थानी जी राशि स्थित असते, ती राशी व त्या राशी पासून अथवा लग्नापासून ४, ७, १० वी राशींना केंद्र राशी अथवा केंद्र स्थान मानले जाते. तसेच चंद्रापासून अथवा कोणत्याही ग्रहापासून तो ग्रह स्थित राशी व त्या राशी पासून अथवा लग्नापासून ४, ७, १० वी राशींना त्या ग्रहापासून केंद्र राशी अथवा केंद्र स्थान मानले जाते तात्पर्य एवढेच आहे की ते ते ग्रह एकाच राशिमध्ये युतीत अथवा त्या ग्रहा पासून ४, ७, १० व्या राशित आहेत.

लग्न अथवा चन्द्राच्या राशि मध्ये अंशात्मक अंतर पाहिले जात नाही. मग ती राशिस्थित ग्रह ९ अंशावर असो वा 29 अंशावर.  फक्त राशी अंतर मोजण्यासाठी घेतल्या जातात. उदा. एखांदे कुंडलीत मेष लग्न भावारंभ २५ अंशावर आहे तर २५ अंशाच्या अलीकडील भाव १२ वे भावात जात असेल तरी केंद्र रास मेष च धरली जाईल. मग त्यातील ग्रह १ ल्या भावात असो वा मागच्या भावात असो.

म्हणजे या उदाहरणात केंद्र स्थान मेष, कर्क, तुळ व मकर होतील.

समजा चंद्र अथवा कोणताही ग्रह या कुंडलीत वृषभ राशीत असेल तर चंद्र वा त्या ग्रहापासून ती केंद्र स्थाने वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ होतील मग तो ग्रह कितीही अंशात अथवा कोणत्याही भावात असला तरीही.

पण जेव्हा कोणाला एखाद्या ग्रहाच्या बदल जाणून घ्याचे असेल की, तो केंद्र आधिपत्य च्या आधारावर शुभ ग्रह आहे अथवा पापग्रह आहे, तर मात्र त्या ग्रहास लग्न स्थानापासून पासून मोजावयास हवे, चंद्र अथवा अन्य कोणत्याही ग्रहापासून नाही.

गुरु, शुक्र, शुक्ल पक्षाचा चंद्र व अपीडीत बुध हे नैसर्गिक शुभ ग्रह मानले जातात. व असे म्हटले जाते, जर हे शुभ ग्रह १, ४, ७, १० व्या राशिचे अधिपति असल, तर त्यांची अनुकूल प्रवृति बदलून प्रतिकूल प्रवृति होते. असेही सागितले जाते, जर ते २ रे  अथवा ७ वें स्थानात असता जातकास अत्यन्त अशुभ परिणाम व मृत्यु प्रदान करतात. पुन्हा या पण गोष्टीवर जोर दिला गेला आहे की, गुरु, शुक्र व चंद्र हे केंद्राधिपती असतील तर ते बुधापेक्षा जास्त वाईट होतात. नैसर्गिक पापग्रह सूर्य, कृष्ण पक्षातील चंद्र, मंगळ, पीड़ित बुध व शनि हे हे केंद्राधिपती असतील, तर शुभ परिणाम प्रदान करतात.

माझ्या अभ्यासानुसार केंद्राधिपती दोष फक्त एखाद्याचे आरोग्य व दीर्घायू ला प्रभावित करतात. ज्या स्थानाचे ते अधिपति आहेत, त्यांचे द्वारा दर्शित फलास ते अशुभ ठरणार नाहीत. लग्न स्थान हे जातकाचे स्वास्थ्य व आयुष्य दर्शवते. लग्नेश जर ६, ८, १२ व्या स्थानात स्थित नसेल तर, निश्चित पणे त्याचे आरोग्य, वाईट काळ दशेत रक्षण करेल.

चतुर्थेश जातकाची स्थायी संपत्ती, वाहन व आई दर्शवते. सप्तम स्थान पत्नी, विवाहाचा काळ व सप्तम स्थाना द्वारा दर्शित अन्य गोष्टी दर्शविते. दशम स्थान जातकाच्या व्यवसाय, नाव, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पैतृक संपत्ति दर्शवते.

उदा.

मिथुन लग्न असलेल्या जातकाच्या कुंडलीत बुध १ ले व ४ थे व गुरु ७ वे व १० वे केंद्र स्थानाचा अधिपति असतो.

कन्या लग्न असलेल्या जातकाच्या कुंडलीत बुध १ ले व १० वे व गुरु ४ थे व ७ वे केंद्र  स्थानाचा अधिपति असतो.

मिथुन जातकास सामान्यपणे गुरु दशमेश म्हणजेच कर्म स्थानाचा अधिपती असल्याने गुरु द्वारा दर्शित व्यवसाय व समृद्धि देईल. गुरु सप्तमेश म्हणजेच भार्या स्थानाचा अधिपती असल्याने गुरु द्वारा दर्शित जोडीदार व वैवाहिक सौख्य देईल.

कन्या जातकास सामान्यपणे बुध दशमेश म्हणजेच कर्म स्थानाचा अधिपती असल्याने बुध द्वारा दर्शित व्यवसाय व समृद्धि देईल. गुरु सप्तमेश म्हणजेच भार्या स्थानाचा अधिपती असल्याने गुरु द्वारा दर्शित जोडीदार व वैवाहिक सौख्य देईल.

(टीप : इतर घटक विचारात घेऊन त्याप्रमाणे बदल होतील, पण केवळ नैसर्गिक ग्रह केंद्राचा अधिपती म्हणून या स्थानासंबंधी अशुभ फळ मिळणार नाही.)

आपल्याला हे माहित आहे की अष्टमेश हा सर्वात पापग्रह मनाला जातो कारण तो एखाद्यास मृत्यू, दुर्भाग्य ई. दर्शवतो. पण जातक चंद्रिका नुसार याला अपवाद सांगितला आहे की, जर अष्टमेश हा लग्नेश असेल, तर हा दोष नाहीसा होतो. मग आपल्या उदाहरणाप्रमाणे एखादा ग्रह चतुर्थेश किंवा दशमेश असूनही लग्नेश असता केंद्राधिपती दोष नाहीसा व्हायला हवा.

सांगायचे तात्पर्य एवढेच की एखादा ग्रह जो लग्नेश आहे तो वाईट स्थितीत नसता इतर स्थान दर्शित फळांसाठी प्रतिकूल न होता उलट रक्षकच बनेल. व फक्त आरोग्य व आयु साठी अशुभ ठरेल जे फळ लग्न स्थान दर्शवते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment