
विषय : प्राणघातक सामुदायिक अपघात आणि ज्योतिष
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : फलज्योतिषातील शंका समाधान
नमस्कार,
जेव्हा जेव्हा एखादी दुर्घटना घडते आणि एकाच वेळीं अनेक जण प्राण गमावतात, तेव्हा तेव्हा या सर्वांची कुंडली मृत्यू योग दाखवते का, त्यावेळी त्या सर्वांचे ग्रहयोग बिघडले होते का? ज्योतिषशास्त्राचे यावर काय उत्तर आहे? असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. विशेषतः ज्योतिषशास्त्राची चेष्टा करणारे तर या गोष्टीचे नेहमीच भांडवल करतात.
याचे उत्तर ज्योतिषी वि. के. फडके यांनी त्यांच्या एका पुस्तकात थोडक्यात पण तर्क युक्त दिले आहे.
मृत्यूचे एकंदर दोन प्रकार आहेत. अपमृत्यू व महामृत्यू.
यांपैकी अपमृत्यू हा केव्हाही व कुठेही येऊ शकतो.
महामृत्यू मात्र असा केव्हाही येत नाही.
प्रत्येकाच्या महामृत्यूची तारीख व वेळ निश्चित असते. त्या तारखेला व वेळेला हा मृत्यू येणारच. मग तुम्ही त्या वेळी अगदी सुरक्षित ठिकाणी एखाद्या गादीवर लोळत असा वा तुमच्याभोवती संरक्षणासाठी दहा-बारा संरक्षक त्या वेळी असोत! त्या मृत्यूला कोणीही थोपवू शकत नाही.
अपमृत्यूचे मात्र तसे नसते. रस्त्याने चालता चालता मागून स्कूटर किंवा रिक्षाची धडक बसली, तर तो मनुष्य त्या वेळी त्याच्या नशिबात महामृत्यू लिहिलेला नसतानाही मृत्यू पावतो. एखादे विमान किंवा जहाज यामधून प्रवास करताना ते विमान पडले किंवा जहाज पाण्यात बुडाले तर त्यातील बहुतेक प्रवासी अपमृत्यूचे बळी ठरतात.
अशा वेळी त्या प्रवाशांपेक्षा त्या विमानाची किंवा जहाजाची वा वाहनाची कुंडली काम करीत असते, त्या कुंडलीमध्ये तुम्हाला हे योग आढळून येतील.
मला तरी हे विश्लेषण योग्य वाटले. पण या दृष्टीने सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. खरेच त्यात तथ्यांश आढळला, तर अशा वाहनांच्या उत्पादनाची जन्म टिपण पाहून अनिष्ट काळात त्या वाहनाच्या फेरी रद्द केल्या आणि लोकांचा अपमृत्यू टाळता आला तर, याच्या इतके प्राचीन ज्योतिष शास्त्राचा उपयोग करून केलेलं संशोधन सर्वात अभिनव व मानवोपयोगी ठरेल, असे मला वाटते.
आपल्याला काय वाटते?
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)