कारकत्वाचा सुखद अनुभव


विषय : कारकत्वाचा सुखद अनुभव

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्वानुभव

कोणत्याही कुंडलीत आपण सर्व बारीक सारीक गोष्टी तपासून पाहतच असतो. पण भविष्यकथन करताना बरेच वेळा कारकत्व व स्थानांची योग्य सांगड घातली गेली तर जातकास चमत्कार वाटावा इतका अद्भुत अनुभव देऊन जातो. खर्र्तर यात चमत्कार वगैरे असे काही नसते. फक्त असलेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा योग्य वापर एवढेच असते. आणि अदभूत मानायचेच तर त्यासाठी आपल्या प्राचीन ज्योतीषाचार्याना दाद द्यायला हवी, ज्यांनी हा अमुल्य ठेवा आपल्यासाठी निर्माण केला.

या संबंधी इतक्यातच घडलेला प्रसंग सांगतो. एका मुलीचे आईवडील अनेक ठिकाणी कुंडली दाखवून, २ विवाह योग सारख्या नकारात्मक गोष्टी ऐकून धास्तावत, अनेक उपाय ऐकून शेवटी माझ्याकडे मुलीची कुंडली घेऊन आले होते. कुंडली खूप सरळ होती किंवा इतर ज्योतिषांनी विनाकारण घाबरवले होते, अशातला भाग नाही. पण तो इथे सांगायचा मुद्दा नाही. पण निराश मनस्थितीत आशेचा एक किरण मनाला उभारी देऊन जातो तसे झाले.

वृषभ लग्नाची कुंडली व मेष रास. कुंडली तपासात असताना त्यांनी विचारले कि जोडीदार कुठला असू शकेल? सप्तमावर नजर टाकली. सप्तमात वृश्चिक रास व व्ययेश देखील मंगळ. चंद्र मेषेचा १२ व्या स्थानी. मंगळ अग्नी तत्व दर्शवते, तर चंद्र जलतत्व. चंद्र समुद्र पण दाखवतो. या सर्व गोष्टी एकत्र करून उष्ण व पाणी म्हणजे दमट वातावरण व समुद्र म्हणून स्थळ मुंबईचे असू शकते असे सांगितले. तसेच १२ वे स्थान पंरदेश व चंद्र प्रवासाचा कारक या गोष्टी विचारात घेऊन, त्यांना म्हणालो कि मुलगा कदाचित परदेशी किंवा परदेशी कंपनी मध्ये नोकरीस असू शकतो.

एवढे सांगितल्यावर ती ताई एवढी उल्हासित झाली आणि मला विचारले कि, तुम्हाला कसे कळाले हे सर्व? कारण ही गोष्ट फक्त आम्ही दोघे नवरा बायको व त्या मुलाचे आई वडील अशा चौघांनाच माहित आहे, फक्त चार च दिवसांपूर्वी आमचे या बाबतीत बोलणे झालेय आणि अजून आम्ही मुलांना पण ही गोष्ट सांगितलेली नाही.

ते स्थळ मुंबईचेच निघाले व मुलगा परदेशात नोकरी करत असून पुढील महिन्यात भारतात येणार आहे, तेव्हा दोघांची भेट करून द्यायची असे त्यांच्यात ठरले होते.

सांगायचे तात्पर्य एवढेच आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी आपल्यासाठी सर्व प्रकारचे कारकत्व, स्थान, स्थिती, वर्णन ई. सूक्ष्म निरीक्षण व सखोल अभ्यास द्वारे उपलब्ध करून दिले आहे. आपल्याला फक्त काळ व परिस्थितीनुसार कुंडलीचे अवलोकन करून योग्य दुवा जोडायचा आहे. अन्यथा घाबरवून सोडायला सप्तमेश व व्ययेश मंगळ एवढी गोष्ट सुद्धा पुरेशी आहेच की. पण नकारात्मक गोष्टीतली सकारात्मक बाजू उपयोगात आणून फळ नाही, पण फळाचे स्वरूप बदलण्यासाठी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. ते स्थळ आले नसते तरी, त्यांना बाहेर गावाचे स्थळ शोधा हा सल्ला त्यांना दिलाच असता.

तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जातकाला व आपल्याला देखील एक समाधान व नवा हुरूप देऊन जातात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment